आजीच्या बालविवाह चे कारण ऐकून थक्क झालो | रानातच झाली चार मुले | गायल्या जात्यावरील ओव्या YouTube
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी डोक्याला बाशिंग बांधले, खेळण्या बागडण्याच्या काळात, लग्न म्हणजे काय हे माहीत नाही, आपलं लग्न झालंय हे इतरांकडून समजले. एवढ्या कमी वयात लग्न करण्यामागे काय कारण होते? थक्क व्हाल खरं कारण समजल्यावर. त्याचसोबत आजीने सुंदर आवाजात गायलेल्या जात्यावरील ओव्या, पाहुया ह्या व्हिडिओ मधुन. RUclips Mi Vatsaru.
आजीचा पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.
• गावापासून दूर राहणारी ...
• वेळ आली होती पण काळ आल...
• 90 वर्षाच्या आजीने उलग...
I was shocked to hear the reason of grandmother's child marriage | Four children were born in the wild (Childbirth)RUclips.
#maharashtra_village_life
#marathinews
#life_in_the_wilderness
#child_marriage
#dhangarijivan
#born_in_the_wild
#folk_songs
#graminjivan
#abpmajha
#saamtvmarathi
आपले काही प्रसिद्ध Popular /viral videos.
1. • गावापासून दूर राहणारी ...
2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
3. • पाण्याखालचे शिवमंदिर प...
4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
5. • पाण्याखालील शिरकाई देव...
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : milindrajebhosale@gmail.com
Facebook : mi.vatasaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.
आजी या वयात पण किती सुदृढ आहेत . आवाज तर खणखणीत आहे मला खूप आवडतात आजी. त्यांचं बोलणं ऐकतच रहावस वाटत. आजीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
धन्यवाद 🙏
खरंच पहिली जुनी पिढी खूप चांगली होती आम्ही सुद्धा आमच्या आजी पणजी सोबत दिवस घालवले आहेत खूप छान वाटायचं
ही जुनी माणसं वडाच्या झाडा इतकी भव्य सावली देऊ शकत नाहीत किंवा घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांच देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेलीत, विझून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं, म्हणून सांगतो जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा, नंतर उरतात ते केवळ भास....
🙏
आजी सारखेच संस्कार माझे सुद्धा आहेत माझंही लग्न सहावी पास झाल्यावर सातवीला जाण्याअगोदर झालं लग्न झाल्यापासून माझ्या मिस्टरांनी कधीही माहेरी सोडलं नाही कारण माझे वडील मिलेट्री मॅन होते त्यांना दारूचे व्यसन होतं त्यांनी दारू पीत असल्यामुळे आई-वडिलांची माझ्यासारखी भांडण व्हायची त्यामुळे माझ्या आजोबांनी आले पाहुणे साडेतीन वाजता संध्याकाळी 5:30 च्या दरम्यान डायरेक्ट माझा साखरपुडा केला त्यांचं घर बघितलं नाही त्यांची नोकरी बघितली नाही त्यांची कुठल्याही गोष्टीची चौकशी न करता मुलगी वयात आली आई-वडिलांच्या भांडणामुळे मुलीच आयुष्य बिघडाय नको म्हणून आजोबांनी लग्न लावून दिलं माझ्या वडिलांची आणि मिस्टरांची तर ओळख लग्नात झाली मला तरी लग्न म्हणजे काय समजत नव्हते आई-वडिलांच्या भांडणामुळे आई सारखी जायची मी मोठी असल्यामुळे मला वडिलां जवळ सोडून जायची माझ्या पाठीवर चार बहीण भाऊ म्हणजे आम्ही पाच जण होतो मला आणि माझ्या पाठीवरच्या भावाला दोन वडिलांजवळ तीघांना तीन सोबत घेऊन जायचे मग मला लग्न होताना गावाला जायला मिळते म्हणून खूप आनंद झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवरीला नटवतात एकच दिवस नटवतात ते माहीत नव्हतं अशा परिस्थितीत माझं लग्न झालं पण आजी-आजोबांनी शिकवलेलं जिथे दिले तिथे नांदून नाव करायचं आई-वडिलांचं तो नवरा आंधळा असुदे पांगळा असुदे लंगडा असुदे जसा असेल तसा तिथे आई-वडिलांनी दिले तिथे नांदून नाव करायचं मुलीचं कर्तव्य आहे स्वतःच्या पसंतीने नवरा करायचा नाही आई-वडील आपले चांगलेच करत असतात हा ठाम निर्णय मनाशी गाठ बांधून खूणगाठ त्या शब्दावर नांदले मास झिजून हाड तर राहील की अशी आजीची शिकवन होती आई-वडिलांच्या नावासाठी हाडाच्या काड्या झाल्या तरी चालेल परंतु वाकडा पाऊल टाकायचं नाही कोणी नाव ठेवू नये आपल्याकडे बोट करून दाखवू नये ह्या गोष्टी लक्षात धरून सासू-सासरे यांचे आई वडिलांचे घराण्याची इज्जत राखायचं बाईचं काम आहे असे आमचे पूर्वज तर म्हणायचे ते लक्षात धरूनच नांदले आतापर्यंत माझा सुखी संसार आहे माझ्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण होतात 2 सप्टेंबरला मला दोन मुले एक मुलगी आहे त्यांची मी लग्न सुखी संसार सध्यातरी आहे
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
शब्द च नाहीत काहीही लिहायला, आजीचे अभूतपूर्व अनुभव ऐकतच राहावेत अस आहेत भावा 🙏🙏🙏🙏🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
😊
आजी खूप छान बोलतात आणि खूप मन भरून येतं ऐकत राहावंसं वाटतं आजींनी डोळ्यामध्ये पाणी आणलं आजींना भेटण्याची मनापासून इच्छा आहे दादा मी फोनवर पण बोलले पण संध्याकाळचा फोन मला करावासा वाटला नाही कारण आजींचा आरामाचा वेळ जर असेल तर तर असं वाटतं की त्यांना डिस्टर्ब नको व्हायला एवढा छान असा निसर्ग हिरवीगार साडी पांघरलेला आजींच्या पाठीमागे पाहून सुद्धा खूप जास्त भारी वाटत होतं खूप खूप धन्यवाद दादा😊🙏🏼
तसं पाहिलं तर माणसाचं खरं जीवन हे निसर्गासोबत राहण्यातच आहे परंतु आपण आपले व्याप एवढे वाढून घेतलेले आहेत की आपण नुसतं पैशाच्या मागे धावत असतो, पळत असतो, अगदी उर फुटेपर्यंत आणि शेवटी हाताला काय लागतं याचा एकदा विचार व्हायला पाहिजे.
अगदी बरोबर आहे दादा
कायग आजी किती छान बोलतेस आजी च गाणं भारीच 🙏🏻🙏🏻
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
जुन्या पिढी कडून खरचं खुप काही शिकण्यासारखं...
धन्यवाद 🙏
दादा.आजीला.माझे.कोठी.कोठी.कोठी.नमन.माझी.ऐक.अठ.आहे.दादा.आजीचे.गाण.ऐक.रोज.ऐकवत.राहा🌺🌺🌻🌻
🙏🙏🙏
आजी चे बोल ऐकून मन भरून आले, आजीनचा ओव्या लिहून ठेवा.अशी माणसे भेटणे म्हणजे आपले भाग्य , त्यांचे आचार विचार खूप शिकण्यासारखे आहे.आजीना साष्टांग नमस्कार 🙏
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, कोणत्या शाळेत शिकली होती माहीत नाही परंतु जगाचा ज्ञान त्यांना होतं. 🙏
Aajichi jivanacha pravasacha video khup chhan vatala baghyala maja aali
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार🙏
या वयात सुद्धा नीतिमत्ता आणि संस्कार याचं महत्त्व ...... अत्यंत प्रगल्भ विचार साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ..... ग्रेट ......
आजकालच्या मुलींनी आजीच्या एकच गुण घेतला तरी आयुष्य सुंदर होईल .......
ही जुनी माणसं म्हणजे घराचा आधार, अंधाऱ्या मार्गात एखादा दिवा असावा त्याप्रमाणे आपल्या सोबत असतात.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजीच्या ओव्या लिहुन ठेवा दादा आजीला खूप चांगल आयुरारोग्य लाभो आणि त्याना खूप खूप धन्यवाद 🙏👌👍😍
हो चांगला विचार आहे, त्याचा एक संग्रह होऊ शकतो
, आजीच्या ओव्या लिहून घ्या शब्द सुंदर आहेत या नंतर मिळणार नाहीत आयुष्याचा खुप अभ्यास आहे आजीकडे ❤❤😢😢😊😊
ह्या जुन्या माणसांचे उपदेश आणि असे मार्गदर्शन पर शब्द लिहून काढले तर एक पूर्ण ग्रंथ तयार होईल आपल्याला पुढच्या पिढीला कसं जगायचं हे सांगण्यासाठी. 👍
@@Mivatsaru नक्कीच
मी खूप निराश होते .आयुष्याबद्दल मी खूप नाराज होते दुःखी होते. जगात चांगुलपणाची खरेपणाची किंमत नाही असे मला वाटत असे. पण आज आजीचं बोलणं ऐकून मला असं वाटतं. भौतिक सुखसोयी असणे म्हणजे सुखी असणे हे कृत्रिम सुख आहे. साधेपणात जे समाधान आहे तडजोड करण्यात जो आनंद आहे तोच खरा आहे. आयुष्यात काहीतरी अपूर्णता असणे गरजेचे आहे. हे मला पटले. सुख हे आपल्या मानण्यावर असते. हे मला पटले. जुनी संस्कार ही तितकेच महत्त्वाचे आहेत ज्यांना आज आपण कालबाह्य ठरवले आहे. समाजाच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी खरोखरच ते आवश्यकच आहेत
ही आजी म्हणजे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे, आज काही का होईना पण तूम्हाला हे आजीकडून चार मोलाचे शब्द ऐकायला मिळाले.
माणसाने थोडा विचार करायला पाहिजे आपण आयुष्यभर धावतो, पळतो पण शेवटी हाताला काय लागते?
Chhan
@@swatikamhatre9432 धन्यवाद
आज्जी म्हणजे 💯 नंबरी सोनं आहेत... आज्जिंचा आवाज ऐंकुन डोळ्यात पाणी आलं त्यांचे लहान पन जाणून थक्क व्हायला झालं...आणि मन सुन्न झाले माझे त्रिवार वंदन आज्जींना 🙏🙏🙏
या जुन्या लोकांनी एवढ्या हाल हाल अपेष्टा, कष्ट सोसले परंतु त्यांचा त्यांना जराही पश्चाताप होत नाही उलट त्यांना या कष्टामुळे सोन्यासारखे जीवन दिवस पाहायला मिळाले.
जूनी पीढी आदर्शवत धर्म नीती संस्कार जोपासले आरोग्य आणी समाधान लाभले हावडा नव्हता धन्यवाद व्हीडीओ केलात माऊली ❤❤
हे संस्कार हे आदर्श हे कुठल्याही पुस्तकात शिकून मिळणार नाहीत. ते मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे असे संवर्धन व्हायला पाहिजेत.
हे बहुमूल्य ज्ञान आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे परंतु या माणसांबरोबर हे ज्ञान कुठेतरी आजकाल संपत चाललेलं आहे, याचं कुठेतरी वाईट वाटतंय 🙏
आजींच निसर्गावर खूप प्रेम आहे त्यांना किल्ल्यांच महत्व व ते जिंकण्यासाठी किती लढया कराव्या लागल्या
गड आला पण सिंह गेला
सिंहगड🙏
धन्यवाद
अस वाटत आजी चे बोलन ऐकत रहावं गाणे तर एकच नंबर ❤❤❤❤
आजीच्या मुखामध्ये एकही दात नाही पण आवाज आणि सूर एक नंबर👌
@@Mivatsaru हो कणखर आवाज आणी स्पष्ट बोलणारी आजी वा क्या बात हें हेच आवडत आहे आजी चे मला आजी साठी ❤️❤️❤️❤️😘
आजी भारीच, या वयात सुद्धा कीती वीचार भारी आहेत, एवढी चांगली माणस ईथुन पुढे नाही मीळणार,शेवटची पीढी ,सलाम या आजीला 🙏.
ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतं आणि खूप नुकसान आहे कारण यासारखे मार्गदर्शक पुन्हा लाभणार नाही त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्याला.
खर आहे आजी आताची माणस पहिल्या सारखी नाही
🙏
खणखणीत आवाज आहे आजी चा
गेली 50 पेक्षा अधिक वर्षे आजी निसर्गासोबत राहिलेले आहेत त्यामुळे बहुदा निसर्गाकडून तिला ही अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असावी असं मला वाटतं.
नमस्कार वाटसरू
आजी वनदेवी आहे
चेहरयावरचे तेज खणखणीत आवाज
बोलणे शुद्ध चांगले विचार निरोगी शरीराला
सलाम आजीला उदंड आयुष्य लाभो।
आजी गेली 50 वर्षे निसर्गासोबत राहत आहेत त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तिला अशी तल्लख बुद्धी आणि निरोगी शरीर लाभलं असणार.
@@Mivatsaru7:30 6
या वयात असणा-या स्मरणशक्तीला आणि दिर्घायुषी आरोग्याला मनापासून सलाम आणि त्रिवार वंदन🙏🙏🙏 आजी.
खरोखर हे आजीला बारा तोफांची ची सलामी द्यायला पाहिजे🙏
शोभा वगैरे बोलायच्या गोष्टी अशा घरात दोन दिवस रहायला लागले कि सर्वांना कळेल
धन्यवाद
निसर्गरम्य वातावरण, अनुभवी बोल, समाधानी चेहरा आणि खणखणीत आवाज ❤
बहुधा निसर्गाच्या सानिध्यात राहुन तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाली असावी.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
काय आवाज आहे ..खणखणीत आवाज आहे आजींचा ..आजी बेस्ट
आजीला बहुतेक देवाची देणगी असणार, 50 वर्षे झाली ती निसर्गासोबत राहते.
खरा वानप्रस्थाश्रम म्हणायचा
🙏🙏🙏
अशी.माणसे. पुन्हा होणे नाही आजी खूपच भारी खूप सुंदर
ही समाधानी आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप दुःख आहे. 🙏
चष्म्याशिवाय या वयातही आजींना दिसते? खरेच निसर्ग देवतेची कृपा!... 🙏🌹🙏
बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गासोबत राहिल्यामुळे आजीला अशी अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार, त्यामुळे तिला असं निरोगी आयुष्य लाभले आहे.
धन्यवाद 🙏
आजीला नमस्कार खूप खूप छान सर्वात भारी विडीओ दादा अशी माणसे मिळत नाही आजीला आयुआरोग्य लाभो देवा शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
काय ग आजी डोळ्यात पाणी आणलेस.
आपण खरोखरच भावनिक आहात👌
🙏 खुपच सुंदर आजीचे संस्कार ही आणी ओव्या ही🙏
ही जुनी माणसं कोणत्या शाळेत गेली होती माहिती नाही परंतु संपूर्ण जगाचं ज्ञान त्यांना होतं.
आजी व्यवस्थित घर डिझर्व करतात ह्या वयात तरी.त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडते, निसर्गा वर माया आहे म्हणून त्यांना असुरक्षित,कष्ट करायला लागतील अशा घरात ठेवणे आवश्यक आहे का खरंच... त्यांच्या साठी घर सुविधा असलेले, सुरक्षित घर बनवले तरी आजींचे किती दिवस राहीले त्याचा फायदा त्यांच्या वारसांना होईल ह्याचा तरी विचार करुन घर बांधले असते
हो नक्कीच, आजीसाठी एखादं पक्के घर बांधण्याचा विचार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी पण बोलून दाखवला, त्याचा आपण विचार करीतच आहोत आणि लवकरात लवकर होईल असे मला खात्री आहे.
@@Mivatsaruछान
❤राम कृष्ण हरी माऊली आज गुरुपौर्णिमेनिमित्त नमस्कार ❤
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
ही जुनी माणसं गुरु पेक्षाही श्रेष्ठ आहेत, एक वेळ तुम्ही देवळात जाऊ नका परंतु यांचे दर्शन घ्या. 🙏
वा आजीला पाहून खरच मन प्रसन्न होतं किती गोड आवाज आहे ना आजीचा
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू 🙏
खरंचच निशब्द झालो व्हिडिओ पाहून. तरुण पिढीने खूप काही शिकण्यासारखे आहे.
ही जुनी माणसं आपल्याला घरामध्ये ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असत, ती एकदा निघून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Aaji kiti god ahet.. tyanna bhetun tyancha bolna aikat basawa watte..🤗❤️
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
एक नंबर आजी 🙏 खूप खूप शुभेच्छा काय आवाज आहे कडक आजी
जुनं ते सोनं 24 कॅरेट. 🙏
अत्यंत दुःखात दिवस काढून ही ते दिवस आजीला चांगलें वाटतात. किती ते मन मोठं आणि समाधानी आहे. आई वडिलांना बद्दल राग नाही. म्हणजे आपल्याला ऐकुन त्यांचा राग येतोय की मुलगा व्हावा म्हणून एवढ्याश्या लेकराचे लग्न करून दिले. कमाल आहे
आई-वडिलांचे सुख हे मुलांच्या आनंदातच असतं, ते आयुष्यभर आपल्या मुलांच्या भल्यासाठी कल्याणासाठी कष्ट करत असतात आणि उतार वयात त्यांना मुलांकडून एवढीच अपेक्षा असते परंतु आजकालची पिढी आपल्या आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीये हे दुर्दैव.🙏🙏
आजी लय भारी मस्त च ❤👌👌👍
धन्यवाद
आई लय भारी 😂😂😂एय मेल्या 😂गाईल खुप गोड आई ❤
आजीच्या मुखात एकही दात नाही परंतु आवाज कसा खणखणीत आणि गोड आहे.
आगदीगोड़ आज़ी❤️ माझी आज़ी डोल्यासमोर दिसाते हेच वय होत तीच 🙏🙏🙏
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालते बोलते विद्यापीठ.
ओव्या लिहून घ्या ,.ग्रेट आज्जी
हो एक पुस्तक तयार होईल
मला आजी आजोबा नव्हते तुला आजी बघुन छान वाटले 💐💐👏👏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजी खुप आवडते. आभारी आहे अशा गप्पा तुम्ही ऐकविता. ❤ आजी.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
ओव्या ऐकून कवियत्री बहिणाबाई यांचा भास होतो.. 🌹
ही जुनी लोकं म्हणजे ज्ञानाचे भांडार, भरपूर काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. 🙏
आजी ला पाहिले कि असे वाटते आयुष्य koup सुंदर आहे
थोडा विचार केला तर आपण आयुष्यभर काय करतो? स्वतःला आपण व्यस्त करून घेतलं आहे की त्या पायी आपण धाव धाव धावतो आयुष्यभर, परंतु हाती काय लागतं? वेळ निघून गेल्यानंतर या गोष्टी आपल्याला समजतात.
कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद
आई तू धन्य आहे l
अगदी बालवयातच दुःख, कष्ट, हाल-अपेष्टा सोसल्या परंतु ह्या जुन्या लोकांना त्याचं जराही दुःख नाही, उलटे ते आनंदी आणि समाधानी आहेत.
खुप छान गाईल आई ❤❤
धन्यवाद 🙏
ओव्या लिहून घ्या खूप छान आहे अजीचे पूर्णच व्हिडिओ बघितले मी खूप छान बोलते आजी कडून खूप काही शिकायला मिळते
जुन्या लोकांचे अनुभव कथन म्हणजे एखाद्या ग्रंथापेक्षा मोठे असेच आहे आणि बहुमूल्य मार्गदर्शन करणारे आहे.
धन्यवाद
छान 🙏😊
धन्यवाद
Dada khup Chan watl Aaj ajila bgun plz zatana ajila chavel as khayala geun jat ja o dev tumch khup chagl krel aji sati khup like yetat tyatun aji ch smadhan kra plz dada
हो नक्कीच, आजीला खायला नेणं हे आमचं कर्तव्यच आहे. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायला जातो तेव्हा काही ना काहीतरी घेऊन जात असतो🙏
आजीचे विचार खुपच चांगले आहेत मस्त
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आजी माझा दंडवत धन नो❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खरच जुनी पिढी खूप छान होती विचार पण छान होते, आणि आताचे विचार, दादा,आजीकडून शिकण्यासारखे,खूप, आहे, परत एकदा मुलाखत घ्या,
हो खर आहे, बरच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
आजीचे जवळजवळ सहा व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा.
Aji kìti chan ahet tyanche vichar kiti chan ,avaj chan .❤
बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आजीला एक प्रकारची अशी अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार.
🙏
आजी सलाम तुमच्या कर्तुत्वाला
ही जुनी माणसं म्हणजे चालता-बोलता विद्यापीठ आहे. बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला. 🙏
खूप गोड...माझ्या आईची आठवण आले तुम्हाला बघून ❤😢😍
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे, 🙏
ही मालवली ता वेल्हे जि पुणे इथली आहे
आजीचे माहेर आहे ते. 🙏🙏
माझी आजी आई आशीच होती😢😢 ह्या आजी ला पाहून मला खूप आठवण आली
आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे🙏
आजीचं बोलणं ऐकतच राहावं वाटतं किती हे ऐकलं तरी मन भरत नाही
धन्यवाद
Khup chan bolte aaji ❤
धन्यवाद 🙏
❤ आजीं.... ना सलाम
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Aaji mul bnd❤kshi jali❤
धन्यवाद 🙏
NGO should take care of aaji😊
She is capable as off now.
Kity mast tevhachi manse kharach chgly hotye.gokul hotye
ही जुनी माणसे, जुनी पिढी खरच मायाळू आणि प्रेमळ होती. एखाद्याला जीव कसा लावावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, परंतु आजकाल ना माया राहिली, ना प्रेम राहील, सगळं आटुन गेलं आहे.
माणूस फक्त पैशावर प्रेम करतोय आजकाल.
आजीला पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली ❤❤❤
ही जुनी माणसं म्हणजे घरचा आधार असतात.आपल्या मुलांच्या सुखामध्ये त्यांना खरा आनंद मिळतो.
खुप छान
धन्यवाद 🙏
जिजाउ आहे आजि
खरं पाहिलं तर आजीला बारा तोफांची सलामी द्यायला पाहिजे🙏
आजी कुटल्या गावी आहेतः मी नसरापूर मधे रहाते
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजींना 🙏नमस्कार
धन्यवाद😘💕
कुठल्या गावात राहते आपली ही आजी ..❤
फुलाबाई नत्थु भोसले..मु.पो.विंझर..तालुका..राजगड(वेल्हे)... जिल्हा पुणे
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Aji khup chan aahe
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खुपच छान ❤
धन्यवाद
खुप कौतुक वाटत अस वाटते आता भेटाव आजीला.आजी च गाव कोणत
आजीचा स्वभाव असा आहे प्रत्येकाला तिला भेटावसं वाटतं, आजीला भेटण्यासाठी तुम्हाला
पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील विंझर गावी यावे लागेल.
हि देव माणसं
धन्यवाद
आजीची मुल कुठे आहेत
आजीला एक मुलगा सून नातू नातवंडे सगळे आहेत परंतु आजीला गावांमधल्या घरात राहायला आवडत नाही म्हणून ती एकटी राहते गावाबाहेर शेतात.
मग तिच्या मुलाने सुनाने तिथे येऊन राहायचं@@Mivatsaru
बरोबर, हे शक्य आहे 🙏
Tya aajila todi far madt karavi
🙏🙏🙏🙏🙏
हो नक्कीच, काही सामाजिक संस्थांनी आणि स्वयंसेवकांनी आजीला घर बांधून देण्याचं मनोगत व्यक्त केलेला आहे, त्यांचा हा विचार नक्कीच सत्यात देईल आणि आजीला एक नवीन घर मिळेल अशी मला खात्री आहे.
धन्यवाद 🙏
Aajji rula bgjun mazi aajji aathvli
ह्या जुन्या लोकांचा आनंद हा आपल्या मुलांच्या सुखातच असतो.
धन्यवाद 🙏
Very very nice 👌👌👌
आपल्या सारख्या विचारवंतांची आमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली की नवीन काम करायला अगदी उत्साह येतो.
मनःपूर्वक धन्यवाद भावा🙏
Aaji
🙏
Are Baba
Aaji che naw gaw Tahsil Jilha sang mhanje jata yeil
Nahi tar dakhwu nako
Magchya video bagha tyanchya
फुलाबाई नत्थु भोसले..मु.पो.विंझर..तालुका..राजगड(वेल्हे)... जिल्हा पुणे
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आमच्या लहानपणी आमच्या गावात ही प्रथा होती
खरं पाहता या जुन्या लोकांनी खूप हाल अपेष्टा सोसल्या परंतु ते कधीही दुःखी नव्हते, चेहऱ्यावर कायम समाधान होते.
त्यांच्याकडे पैसा कमी होता पण ते खऱ्या अर्थाने सुखी होते. 🙏
खूप छान आहेत आजी.👏👏
धन्यवाद 🙏
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Aaji na mulani sambhalayla pahije
आजीचा मुलगा त्यांची श्रावण बाळाप्रमाणे काळजी घेतो परंतु आजीला गावात राहायला आवडत नाही म्हणून ती एकटी रानात राहते.
💐💐🙏🏼🙏🏼🎊🎊
धन्यवाद
धन्यवाद
Aajina 🙏🙏🙏🙏❤❤👌👌👏👏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Kya...bat....hai...❤aaji juna kal khup chan hota g 😢 ata nahi g asa kal khup bhiti n jgaila lagt ata aaji asey divas yetil kag parat?....
ही सुखी समाधानी पिढी काळाच्या पडद्याआड कायमची निघून गेली याचं दुःख आहे, आपण त्यांना आता पोरके होऊ लागतो, समाधानी पिढी पुन्हा दिसणार नाही. बहुदा नऊवारी आणि पायजमा नेसणारी ही शेवटची पिढी असणार.
🙏🙏
अगदी मनापासून धन्यवाद🙏
निसर्गाचं वरंन. न करत गप्पा गोष्टी करा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
धन्यवाद
👌🏼👈🏻🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आज जे तुम्हाला नमस्कार
नमस्कार🙏
आजी ❤
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
🙏👍👍👍👍
धन्यवाद
👌🏼👌🏼💐💐🙏🏼🙏🏼😢😢
अगदी मनःपूर्वक धन्यवाद🙏
आजी गावात राहत आहेत
आजीचं गावात घर आहे परंतु गावातल्या घरामध्ये आजीची सून आणि मुलगा राहतो, आजीला गावात अजिबात करमत नाही त्यामुळे ते रानातल्या घरात एकटी राहते निसर्गासोबत.
Ajicha patta Kay natevaika kuthe ahet
ही आजची पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील विंझर या गावात राहते, आजीला सर्व नातेवाईक आहेत मुलं नातू सुन.
Realy story
धन्यवाद
करायची लेकीच बाशिंग बघितले मग आईला मुलगा होतो अशी भावना होती
परंतु ज्या लहान मुलीचं लग्न होईल ती किती दुर्दैवी असणार.
Mazi aaji ashich hoti tich hi lgn lhanpni zalel .khup ovya bolaichi goshti sangaichi..sodun geli ata kayamchi khup aathvan yete😢
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, संस्कार पीठ. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं आजकालच्या पिढील, परंतु होतं काय त्यांचं ज्ञान किंवा त्यांच्यामध्ये असलेले हे गुण हे कुठेही लिहून ठेवत नाहीत त्यामुळे त्यांचं ज्ञान त्यांच्यासोबत कायमचे निघून जातं आणि आपण त्या ज्ञानाला आणि त्या माणसांना पोरके होऊन जातो. 🙏🙏