Ujani Dam Boat Accident: ४० तासांनी सापडले उजनीच्या पाण्यातले मृतदेह, त्या सहा जणांसोबत काय घडलं ?
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- #BolBhidu #UjaniDamAccident #UjaniDamDeath
उजनीच्या पात्रात कुगाव ते कळाशी असा प्रवास करणारी बोट उलटली आणि दोन चिमुकल्यांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला. हे ६ जण बुडाल्याची बातमी आल्यावर एनडीआरएफ आणि गावकऱ्यांनी त्यांना शोधण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं साधारण ४० तासांनंतर या सहा जणांचे मृतदेह पाण्यात तरंगायला लागल्यावर आणि बोट पाण्यात होती, तेव्हा काय झालं हे सांगायला उरला, किनारा गाठू शकलेला, पण आपल्या भावाला गमावलेला एक पोलिस अधिकारी. हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आई काय असते बाप काय असतो तो अशावेळी संकटात अनुभव येतो त्यामुळे मी ठरवलं आहे मी जिवंत असेपर्यंत आई बापाला कधीही सोडणार नाही कधीही दुखावणार नाही जय जिजाऊ
अतिशय वाईट घडले सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
Baiko ch kasa karaycha ?Mi tr lagna nahi karaycha thatavla
भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप वाईट झालंय जे झालंय ते.
एक कधीही लक्षात ठेवा, जेव्हा बोटवाला म्हणतो नको जायला.. तर त्याचं ऐका..
नातेवाईकांचे कार्यक्रम येत जात असतात.. उगाच जीव धोक्यात घालू नका.
Brobr ahe dada 👍🏻💯🥺
खरच...
बरोबर आहे.
काय रे देवा दिवसेंदिवस असच वाईट घडत चाललय.... एकमेकांना आधार द्या , मदत करा , माणुसकी जपा आणि पुण्य मिळवा.... कधीतरी अशी वाईट वेळ आलीच ती चुकेल या आशेसाठी ...❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली त्या निष्पाप कुटुंबासाठी, लेकरांसाठी धडपडणाऱ्या माऊलीसाठी, भावासाठी....❤
त्या आईच्या काळजातील आक्रोश किती भयानक असेल.... 🥺😞भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
आज पहिल्यांदा चिन्मय स्टोरी ऐकताना डोळ्यात पाणी आले 😢😢
खरंच भाऊ मी पण रडलो
आई आई असते
देवा नको रे आशी वेळ कोनावर येउ देउ
खूप वाईट झाल।।
आम्ही दोन महिन्यापुर्वी च इथे मित्राच्या गावी कुगाव ला गेलो होतो.. बोट ड्रायवर गोल्या एक नंबर माणूस होता राव 😔😔
Bullet train 🚅. पेक्षा अशा गावांना जोडणारे पुल बांधा.. जरा गरिबांकडे आणि अशा गावांकडे हि लक्ष द्या जरा...😢😢
are bhu ti dam ahi nahi kartha yet
@@chatrapati640 कुगाव ते शिरसोडी या मंजूर झालेल्या पुलाचे काम तातडीने सुरु झाल्यास जलवाहतुकीचा प्रश्नच निकाली निघणार आहे... Source ABP maza.....
@@rauljadhav3208महाराष्ट्रात असे कामे होत नाहीत हेच दुर्दैव आहे.
@@chatrapati640समुद्रात पण पाणी असतं की रे तिथं बरा होतो सागरी सेतू धरणात का शक्य नाही...?
@@chatrapati640back water ahe... Shakya ahe pul... मंजूर आहे पुल कुगाव ते शिरसोडी पण केव्हा होईल काय माहिती?
जे पोलीस अधिकारी API राहुल डोंगरे पोहून बाहेर आले ते माझे सख्खे मावस भाऊ आहेत....मी तिथे गेल्यानंतर पाहिले की खूप राजकारणी लोक तिथे घटनास्थळी जाऊन भेट देत होते....पण मला अस वाटते की याच राजकारणी लोकांनी जर यांचा १९९३ पासून चा हा पुलाचा प्रश्न सोडवला असता तर आज ही वेळ आली नसती......त्या नदी पात्राचे अंतर ३km आहे.....पण जर रोड ने जायचे झाले तर ८० km चा प्रवास करावा लागतो....अगोदरच शेतकऱ्याचे खूप हाल होत आहेत अशातच तेथील शेतकर्यांना ८० km चा खर्चीक प्रवास परवडणारा नाही.....५ वर्षात ३ ३ वेळा सरकार स्थापन करणाऱ्या राजकारणी लोकांना मागच्या २५ ३० वर्षांत १ पुल बांधता येत नाही.....
तिथ रोड नाहीत नीट, राजकारणी पूल कधी बांधणार
@@nayanveer151हरामी आहेत सगळेच राजकारणी करमाळा तालक्यातील
खर आहे भाई, बऱ्याच घटनांना हे जनतेचे पैसे खाणारे राजकारणी च कारणीभूत आहेत, नीच लोक त्यांना काही घेण देण नाही जनतेच ,ac घर,गाडी , नोकर चाकर यात ते गुंग झाले आहेत, त्यामुळे त्यांना जनतेचा विसर पडला आहे आणि पैसा कसा टेंडर मधून कमवायचा हे बगत आहेत, वेळेवर जाब विचारा लोकप्रतिनिधींना (आमदार, खासदार) पैसे न घेता मतदान करा आणि जाब विचार, तुमच्या भागात काम होत नाही ना तर गावतील लोकांनी एकत्र येऊन मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, विकास कामासाठी एकत्र येऊन पाठपुरावा करा, तस ही नाही काम झाल मुखमंत्र्याकडे जावा, नाहीतर निवडणुकी वर बहिष्कार घाला येणाऱ्या अस जाहीर करा गावाने बगा मग लोकप्रतिनिधी पळेल आणि काही दिवसात काम मार्गी कस लागत ते . लोक फुकट उमेदवाराचा प्रचार करायला बिना चपला, च उन्हात जातात तसच येथे पण थोड ksht घ्या, आपल्या हक्कासाठी, उगाच चमचेगिरी करण्यात काय अर्थ नाही, त्याने फक्त मोजकेच लोक धनदांडगे होतात.
विचार करा आधी , तशी परिस्थिती येण्याअगोदर.
🙏🙏🚩🚩🚩🚩 महाराज असते तर त्यांनी 50 खोके, आणि सर्व भ्रष्टां ना चकमक टोकातून दगड बाधून जस पाण्यात सोडतात तसे खाली सोडले असते जेणेकरून असले नीच लोक हवेच्या दाबाने सुध्दा वर येणार नाही.🙏🙏😡😡
3km raod bahandhyala 1000 hajar koti lagtil bhava
==+hi
वारा,आग आणि पाणी हायपुढे जगात कोणीही वाचऊ शकतं नाही.शवटी त्यांचं नशीब.म्हणून स्वतः सावध रहा जय महाराष्ट्र
कोना कोणाला पप्पा ला मिठी मारून thanks बोलायचं आहे पण हिम्मत होत नाही त्यांनी like करा
Karan aata papa nahi rahile😢
Arey 😢
आमच्या धुळ्याचे राज्य राखीव पोलीस दल बलगट क्रमांक 6 pis शिंदे साहेब, राहूल पावरा व वैभव वाघ हे अकोले येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण पावले अकोले येथे धरणाच्या पाण्यात त्यांची बोट उलटली भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 कृपया ह्या बातमीवर व्हिडिओ बनवा
बरोबर
Nkkich bhau
यातून एक सिद्ध झाल ते निष्काळ जी पणा लाईफ जैकेट असून पण जवळ जायच कशाला घालायच खूप वाईट झाल लोकांनी निसर्गाशी कधी च दोन हात करू नये
चिन्मय भावा नेमका मी सुद्धा तिथेच शेजारी असलेल्या सोगावात एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि जाताना असा काही वारा आला की उंबरड मधील मारुतीच्या देवळात आसरा घ्यावा लागला पाऊस आणि वारा कमी झाला आणि आम्ही तिथे पोहचलो तर एकच चर्चा गोल्या आणि त्याची लांस बुडाली आणि किती माणसे गेली हे कळले जरी नसले तर एकूण त्यावेळची परिस्थिती पाहाता बराच अनर्थ झाला असावा याची खात्री झाली.
तु केलेलं धावता वर्णन अगदी सेम टू सेम अनुभवलं असल्यामुळे तुझ्या तोंडुन ते अधिक भयाण सत्य जाणवलं...
यावर तु उपाय म्हणुन आणि परत आशा घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून शेवटी तिथे पुल निर्माण केला असता तर ही घटना झाली नसती इतकं सांगायला हवं होत कारण खुप जणांची भावना असलेला तुझ्या च्यायनल कदाचित नेते आणि प्रशासन यांच्या कानी पडले असते ...असो...
मृत आत्म्यास शांती लाभावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
हो खरंच पुल होणं गरजेचं आहे
Same bhava mala pan वाटत ह्या विडिओ मध्ये पुलाचा उल्लेख करणे गरजेचे होत... हा विडिओ बनवण्याच्या अगोदर मी bol bhidu chya insta id var msg पण केला होता... उजनी वर पुल झाला पाहिजे
उजनी वर पुल झाला पाहिजे 🙏मायबाप सरकार ला विनंती🙏😊
वाईट झाल पण बोटीवाल्याने नकार देऊनही गळ घातली यातच शाॅर्टकट महाग पडला
त्या भागात जे पण सध्या आमदार , खासदार आणि मंत्री असतील आणि जे पण माझी आमदार ,माझी खासदार, माजी मंत्री असतील त्या सगळ्यांना तिथल्या लोकांनी त्या पात्रात नेऊन त्यांना जलसमाधी द्या . त्यांच्या मुळेच हा दुःखद प्रकार घडला आहे
Tyanchi ky chuk 6 la boat band hote
Tari sodali
Vare vavdan astna jaket n ghalne ha shudha murkh pun hota
मित्रांनो मी त्याच गावचा आहे, तो जो बोट चालक आहे त्या बोटनी मी पण प्रवास केलेला आहे गावी जाण्यासाठी, त्यावेळेस तिथे खूप वारे चालू होतं पण बोट चालकाने धाडस करून बोट पाण्यात उतरवली, त्याच्या धाडसी निर्णयामुळे त्या लोकांचा जीव गेला
आपण प्रत्यक्ष दर्शी नसतांना एखाद्या कोन जबाबदार आहे हे तुम्ही सांगू नका
Bhau mi olkhto boat valyala kahi pan khot bolu nako
लाँच मालक वरती सदोष मनुष्य वध गुन्हा दाखल करा ,लॉन्च मधे कोणती सुरक्षा व्यवस्था नसताना सुद्धा लॉन्च पाण्यात घेऊन जाणे हे धोकादायक असतांना सुद्धा ती सुरू होती ,मालक ह्यांनी हे माहीत असून सुद्धा ती पाण्यात कसे काय सोडली ,गेलेले जीव हे परत येणार नाहीत पण परत अशी गोष्ट होऊ नये म्हणून लॉन्च मालक वरती गुन्हा दाखल करावी ही प्रशासन ला विनंती ,
सर्व मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@@sandipdubale7000 बरं राहू दे आता
@@DayanandMohite-yf6crबूल्लया तू.. लवड्या...तो त्याच गाव च आहे म्हणतोय तर तू त्याला च बाटा झवतोस का..छिनल माय चे
गौरव आमचा क्लासमेट , भावपूर्ण श्रद्धांजली💐
Rip
चिन्मय अतिशय हृदयद्रावक कहाणी तितक्याच ताकदीने सांगत जनजागृती आणि सोबत खरी खुरी बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी thanks
मी आट दिवसापूर्वी कुगाव ते काळाशी टू व्हीलर सहित प्रवास केला होता बोट चालक गोल्या खूप चांगला तरुण होता माझा वयक्तिक अनुभव आहे खूप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली
दिवंगत भावा बहिणी यांना भावपुर्ण श्रद्धांजली... खूप हृदयद्रावक घटना... या पुढे त्या भागातील नागरिकांनी वेळ पाळावी आणि सुरक्षे शी संबंधित सर्व नियम देखील..
वेळ वाचवता येत नाही शेवटी फक्त ऐक कारण लागते 😢😢😢आई..वडील काय असतात ऐकून खूप त्यांना मिट्टी मारून रडू वाटते मलाही छोटा..मुलगा आहे 2 मिनिट नजरेआड झाला तर अंगावर काटा येतो..राव त्या माऊलींची काय अवस्था झाली असेल..डोळ्यासमोर मूल वाहून जाताना😢😢😢😢
यांचा संघर्ष तर खूप खतरनाक होता राव अंगावर काटा येतोय 😢 प्रश्न
प्रशासनाने यावर उपाययोजना करायला हव्या
उजनी वर पुल झाला पाहिजे करमाळा तालुका व इंदापूर तालुका connectivity साठी
By Road pan jata yete.... Fakt taas bhar ushir lagto
प्रशासन किती सज्ज आहे हे आपण पुण्यात एक्सीडेंट झाल्यावर बघितलेच आहे😂😂
@@gaurri24 कुगाव ते कळाशी by road 85 te 90 km ahe... By boat 5 km ahe.. Tya peksha government पुल बांधला पाहिजे
मी त्या दिवशी प्रत्यक्ष उजनी बॅक वॉटर परिसरात धरणाच्या कडे वर होतो खरच खूप जोराचा वारा होता अक्षरशः फक्त वाऱ्याने मी उडेल अस वाटत होत
आई ची माया अपरम पर आहे आणि वडिलांची डोळ्यात कुटुंबाला वाचवायचं कास हे अश्रू 😢 सर्वान भावपूर्ण श्रद्धांजली 😢
आमच्या झरे गावचा एक होतकरू तरुण होता गोकुळ.... भावपूर्ण श्रद्धांजली......
खरंच भावा हि स्टोरी नव्हे तर ही दुःखद घटना ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येत होता .... 🥺
भावपूर्ण श्रद्धांजली चिमुकल्यानो 😢
खूप वाईट झाल.त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण घर उध्वस्त झाल.सर्वांना भावपुर्ण श्रधांजली🥹
आज आईची माफी मागतो
आईने वडील नसताना एवढा माझा सांभाळ केला मी खाल्ल्या मिठाला जागलो नाही
लाज वाटते स्वतः ची अजून ही वेळ गेलेली नाही आजपासून चांगल वागेन 😭🙏
आईला कधी दुखवू नको मित्रा 🙏🙏😭😭
लाईफ जॅकेट घालूनच बोटीचा प्रवास करावा शासनाने हे अनिवार्य केलं पाहिजे
मी स्वतः या गावात राहतो. ही घटना सायंकाळी ठीक 6:00 वाजता घडली. गावात याची माहिती होईपर्यंत 7:00 वाजले होते .पूर्ण गाव नदीच्या कडेला लोटला होता . लॉन्च वर ड्रायव्हर असणारा गोल्या हा सर्व गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय , सर्वांशी हसून खेळून बोलणारा गोल्या लॉन्च वर होता कळाल्यावर गावातील सर्व लोक हळहळ करत होते. गावातील तरुणांनी शोधायला सुरुवात केली पण अंधार पडल्यामुळे शोधायला अडचणी येत होत्या मी स्वतः होडीतून शोध कार्यात सहभागी झालो होतो. आम्हाला शोधत असताना एक लाल कलरची बॅग सापडली होती . दुसऱ्या दिवशी सकाळी 7:00 वाजता NDRF चं पथक गावात दाखल झालं . NDRF च्या पथकाने 24 तासात पुढाऱ्यांना फिरवणे शिवाय दुसरं काहीही केलं नाही . तिसऱ्या दिवशी सकाळी प्रेत फुगून वर आल्यावर बाहेर काढायचं काम फक्त NDRF ने केलं, ते कोणीही केलं असतं. या दुर्घटनेमध्ये निष्पाप बळी गेलेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.
चिमुकल्याना सोडायचे नाही.
हा आई वडिलांचा निर्धार असफल झाला.
डोळ्यात पाणी आले 😢
मन हेलावून टाकणारी घटना
प्रशासनाने ज्या ठिकाणी असा प्रवास केला जातो तिथे लोकांना सुरक्षा प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि safety audit केलं पाहिजे... Safety jacket compulsory केले पाहिजे
सहमत पण ह्या लोकांचा ओव्हर कन्फिनड्स किव्हा लाईफ जॅकेट नघlण्याचा हलगर्जी पणा केला नसता तर कदाचित ही हलगर्जी आज परिस्थिती वेगळी असती.. . शेवटी सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
माझे माहेर kalthan no.1 आमच्या शेजारी असलेल्या गावात हि घटना घडली😥याच्या आदी पण एक होडी तिथे बुडाली होती,त्यावेळी doctor फिरण्यासाठी गेले होते
Akluj che doctor hote 4-5 jana budale hote
खरय
@@Sandesh1.0Travelतुम्ही कुठले आहेत
@@Sandesh1.0Travelme pan kalthan cha ahe
😢😢😢
भावा बहिणीची काय हालत झाली असेल... त्या आईची बापाची काय हलत झाली असेल आपल्या डोळ्या समोर कुटुंब संपताना.... कल्पना करवत नाही... मोठ्यांची चुकीची शिक्षा नेहमी लहान मुलांना मिळते....😢 भावपूर्ण श्रद्धांजली
झालं ते खूप वाईट झालं लोकांचा वाईट करू नका लोकांचा तळतळाट घेऊ नका लोकांना लुटून खाऊ नका वरतुन सगळ बगत असतो देव घरातून रोज बाहेर पडतना दिवसातून एकदा हनुमान चालीसा पठण करा आपल्याला कुणाची कधी नजर लागण सांगता येत नसत कदाचित हा चकवा ही असु शकतो पाण्या मधला काळजी घ्या आणि माणुसकी जपा सोशल मीडियामुळे आपण माणुसकी विसरत चाललो आहोत
😂 are doctor pan deva ani police Jara vichar Badal je ahe te ahe tyala kahi karu shakat nahi help kara sarvachi
@@mayurshinde9737 भूत पिशाच निकट नही आवे महावीर जब नाम सूनावे स्वतः वर आले ना मग कळेल मित्रा तुला चकवा लय बेकार असतय
@@mayurshinde9737tu hasu Kay rahila.to real boltho
काय झालं कळतच नाही राव, नुसते मानस मरायलेत सगळीकडे 😢😢😢
आमच्या करमाळा तालुक्यातील घटना आहे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Sdrpf chya 3 Jawan budale त्यावरही विडिओ बनवा,😢 अकोला सुगाव प्रवरा नदी वर हा हादसा झाला त्यावर विडिओ बनवा 🙏😭
Ho.
😢
The young men were good swimmers
Yes bhava
हो
काल आमच्याकडे दोघं जण पोहायला गेली होती ते नदीत बुडाले त्यांना मृतदेह काढण्यासाठी जवानांची टीम आली होती पण दुर्दैव जवानांची बोट उलटली आणि ४ जवान शहीद झाले भावपूर्ण श्रधांजली😢
यांना life jacket नव्हते का
@@Connecting-nature भोवऱ्यात सापडले
@@Sachin.maharaj.chaudhari वाईट झाले
SDRF च्या जवानांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते का ? बिना लाईफ जॅकेटचे असे कसे उतरले पाण्यात !
ही आमच्या भागातील घटना एकदम वाईट घडलेली आहे.
चिन्मय सर आमच्या गावा शेजारी आणुर ता कागल जि कोल्हापुर येथे पण घटणा घडली आहे 4 जनचा जीव गेला आहे त्याची पण नोंद घ्यावी आणि ही बातमी आपल्या चॅनल वर यावी ही विनंती 🙏🙏
लाईफ जँकेट, बोटीवर चढण्यापुर्वीच घालण्याची प्रवाशांनी काळजी घ्यावी..चालकांवर तसे बंधनकारक करावे.
काही वेळा असं निदर्शनास येतो ती बोट चालक सगळ्यांना विनंती करतो पण लोकं त्या वर सर्रास दुर्लक्ष करून टाकतात
अकोले तालुक्यातील सुगाव गावात पन आज 6 जन बुडाले
अत्यंत वाईट घटना घडली एक आई आपले दोन्ही मुले यांना घट्ट पकडुन वाचवण्याचा प्रयत्न केला पण नियतीने काळ आडवा आला
भावपुर्ण श्रद्धांजली
अजून किती बळी घेणार प्रशासन लवकरात लवकर दोन गावाला जोडणारा पुल बनवावे या घटनेला 100% सरकार जाबदार आहे सरकार ला लवकर जाग येवो
सुरुवातीपासूनच life jacket घालूनच बसायचं ना.....
बर झाल तू सांगितलं 😅
P@@niyap16
@@yashkakade9648 gaandit bot ghalun vaas ghe
Kay nirdai manse ahet😢@@yashkakade9648
😂😂
खूपच वाईट झाले.. व्हिडिओ पाहतानाही डोळ्यात अश्रू आले. मी काही वेळा पडस्थळ चिखलठाण असा प्रवास बोटीने केला आहे. घटना प्रचंड दुर्दैवी आहे, वादळ आणी निष्काळजीपणामुळे निष्पाप माणसांचे जीव गेले. जोरदार वादळामुळे आणी जिवनरक्षक साधने नसल्यानेच ही दुर्घटना घडली असावी. इतर दिवसात पाणी एकदम शांत असते. महाराष्ट्र सरकारकडून मागे थोड्याच दिवसांपूर्वी मंजूर झालेला पूल त्वरीत आणी चांगल्या दर्जाचा बांधायला हवा. दुर्घटनेतील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
मला तुझी कीव येती रे like साठी लई मीठ मिर्ची लावून विडिओ बनवतो हे बर नाही मयत व्यक्तींना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
अत्यंत दुःखद घटना.. अंगावर काटा आला अशी वेळ कोणाचवर येऊ नये देवा..
अगदी बरोबर भावा
मी सकाळी सकाळी रडलो😭😭😭 खूप दुःखद घटना...😭
गेल्या १५-१७ वर्षा पासून बोटीने कुगाव, चिकलठाण ते काळाशी, कल्थन, पदस्थळ, शिरसोडी असा प्रवास एकदम सुखात चाललं होता. हे अचानक असं झालं आणि सगळं संपुन गेलं. खूपच वाईट झालं असं होईल म्हणून कधीच विचार पण केला नव्हता. 😢😢
भावपुर्ण श्रध्दांजली.
नियम पाळणे किती महत्वाचे असते .. निसर्गाच्या पुढे काही चालत नाही .. लाइफ जॅकेट घालून बोटी मध्ये बसणे आवश्यक असते .. संध्याकाळी आग्रह केला म्हणून बोट वाहक यांना घेऊन गेला ... मृत्यूचे आमंत्रण होते 😢😢😢
खूप दुर्दैवी घटना घडली आहे..नियतीने लहान मोठ्यांचा विचार केला नाही ..😢😢 सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घ्यावे... लवकरात लवकर (इंदापूर- करमाळा) Connectivity साठी पुलाचे काम पूर्ण करावे...🙏🙏
भावली धरनात बुडालेले 5जण मुरुत्यू मुखी पडले इगतपुरी नाशिक येथील दुर्घटनेवर व्हिडियो बनवा
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
खूप दुःखद घटना घडली आहे।
खूप खूप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी बसतानाच जॅकेट चा वापर घालायला पाहिजे होतं थोडीशी चूक जीवाला मुकण्याची वेळ आली
खूपच दुखत गोष्ट 😢😢 हे आमच्या झरे गावात घडलं आहे व आमच्या शेजारी हा प्रसंग खूप अनुभवला आहे
ही खूप दुखत घटना आहे हे आमच्या झरे गावात घडलं आहे तर या गोष्टीमुळे झरेगाव खूप अस्वस्थ आहे
भावपुर्ण श्रद्धांजली.
कृपया करून बोटीत बसताना Life Jacket घालून बसावे. किंवा Life Jacket vikat घेऊन घालावे. 1,500 ₹ मधे life jacket मिळते ते वापरावे. सर्वात महत्वाचा जीव आहे.
आपण पाच लिटर ची तेलाची डपकी जरी ओढणी ने बांधली तरी लाइफ जॅकेट चे काम होईल.
@@dewanandpimpalkar7272
चांगली Idea आहे 👍
भावपूर्ण श्रध्दांजली ⚘⚘ खुपच वाईट वाटत.
खूपच दुःखद घटना घडली😢😢....असं घडायला नको होतं... भावपूर्ण श्रद्धांजली....
अतिशय दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली
अत्यंत दु खद घटना प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पूल बांधण्याचे काम हाती घ्यावे हजारो कोटी रुपये खर्च करून मुंबई येथे जो पूल बांधला तसाच पूल कुगाव या ठिकाणी बांधण्यात यावा राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे
उजनी धरणा ने लाखो परिवार मोठे केले जगवले... पण बाधित लोकांना सुविधा आजवर का दिल्या नाहीत..
भावांनो खूप वाईट झाले आहे मी तिथलाच आहे मी हे दृश्य पाहिले भावपूर्ण श्रद्धांजली 💐
खूपच वाईट घटना देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 😢😢😢
आमच्या अकोले तालुक्यामध्ये प्रवरा नदी मध्ये देखील आज 5 जन बुडाले आहे
खूप वाईट झालं
भावपूर्ण श्रद्धांजली
उजनी नंतर सुगाव दोन्हीं घटना हलगर्जी पना मुळे झाल्या आहेत.... भवऱ्या जवळ बोट नायला नको होती... त्यात पण ओव्हर लोड दिसते
ऐकुन डोळ्यांत पाणी आलं😢😢😢
Ho na
चिन्मय सर आमच्या इगतपुरी तालुक्या मधील भावली धरणामध्ये पण एका कुटुंबातील ५ जण बुडाले. त्यावर पण video बनवा, जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होइल.🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्यंत वाईट घटना.... नदी तून बोट वाहतूक होते तर... सेफ्टी साठी व सरकारी अधिकारी यांनी वाईट घटना घडू नये म्हणुन उपाय करायला हवे होतें... शेवटी फार... वाईट घटना घडली...
समुद्रात सी लिंक होतात तर इथंही असाच एखादा पुल नक्की बांधा, गडकरी साहेबांना कळवा नक्की मदत करतील ते
खुप वाईट झाले 😪जड अंतकरनाने भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹
भावपूर्ण श्रद्धांजली
स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी नवीन पुलाकरिता पाठपुरावा केला पाहिजे.......
खूपच वाईट दुर्घटना आहे
खूप वाईट झाले ….. भावपूर्ण श्रधांजली
सरकारकडून अजून पर्यंत कुठलीच मदत जाहीर झाली नाही.😢😢
मी कळाशी गावचा आहे अतिशय दुःखद घटना घडली आहे 😭😭
खूपच वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली
आमदार खासदार यांना जलसमाधी द्यावी 😡
He agadi बरोबर... त्यांनी काय दिवे लावले अश्या प्रवासावर
यात आमदाराची काय चूक रोड बनवुन दिलाय त्या गावात जायला ... ४ २ रुपय वाचवण्यासाठी, वातावरण ठीक नसताना पण बोटीतून जायचा निर्णय त्यांचा होता..
रोड झाला म्हणून... जल प्रवास करू नये असे काही नाही... तो सुरक्षित व्हावा या साठी... व नागरिक यांचा वेळ व पैसा वाचवा म्हणून तिथे उपाय योजना करता येते... मुंबई ते अलिबाग सारखी... तिथे तर समुद्रातून जाता येतात लोक... सुरक्षित रित्या... असाच प्रश्न सगळी कडे... कोयना... भंडारदरा.. सरदार सरोवर या गावातील वाडी वस्त्यांचा आहे... लोकांनी जमिनी दिल्या आणि आता त्यांचा जीव ही हवाय का प्रशासनाला
Khar a
अतिशय वाईट दुर्घटना निशब्दभावपूर्ण श्रद्धांजली💐💐
खूप वाईट घटना घडली आहे 😢 भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
Kokan,pashim Maharashtra mde Pani ahe pn life pn khup avgd ahe tikde amch Marathwada panyachi kmtrta ahhe pn ..24 hr road connectivity ahe gavat .aramt life ahe tikde
मित्रांनो मी त्याच गावाचा आहे. माझे वय 35 आहे. लहानपणापासून ते वर्तमान परिस्थिती पर्यंत पुल बनवलाच नाही. जिथे मतदानाच्या पेट्या पोहोचू शकतात तीथे सरकारी योजना पोहोचत नाहीत. हे दुर्दैव आहे.
खरच खूप वाईट घटना घडली आहे भावपूर्ण श्रद्धांजली
हवा सुटली तेव्हाच Life Jacket घालायला पाहिजे होते 😔
होय... नक्कीच
जनता... हेल्मेट सक्ती असूनही वापरत नाही त्या सारखेच आहे हे... सुप्रीम कोर्ट सांगते तरी नाही वापरत... या पुढे तरी सावध व्हायला हवे... प्रिय लोकांनो
शेवटी नियती पुढे कुणाचं काहीच चालत नाही .. खूपचं दुःखद घटना 😢
मी पण भरपूर वेळा प्रवास केला आहे या बोटीतून या मार्गाने. पण कधी वाटलं नव्हतं असं होईल म्हणून.😢
किती वेळा लाइफ जॅकेट वापरले?
@@dewanandpimpalkar7272 कधी वापरायची गरज नाही पडली. कधी अशी वेळच नाही आली.
आमच्या इथली च ही घटना आहे 😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
भावपूर्ण श्रद्धांजली.
माझ्या गावापासून पण जवळच आहे ही दुर्घटना झालेली आहे अवघे 3 km वर भीमा नदी काठीच माझ गाव आहे.
लाइफ जॅकेट घातल्याशिवाय पाण्यात बोट न्यायचीच नाही सक्तीचं करा
Nakar dilyavar kaa??
Boat sure kelai
NDRF chya tin javanana bhavpurn shrdanjili 😭😭😭😭😭
Bhavpurn Shradhanjali. 😢
ऐकून मन अगदी सुन्न झाले
खुपच वाईट झाले
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.