अगदी खरं ! दर वर्षी काही घरे बंद होत चालली आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. तसे काही तरी होवो आणि पुन्हा एकदा कोकणातलीच नव्हे तर पूर्ण भारतातली गावं खेडी गजबजून जावोत ! तो सोन्याचा दिन येवो ! जय जवान, जय किसान !
दादा.... तु खूप तळमळीने बोलतोस..... आम्ही आमच्या शहरी आयुष्यात खूप जास्त गुंतून गेलोय.... तुला असं बोलताना पाहिल्यावर मी कोकणातली असूनही असा विचार का नाही करू शकलो याचं वाईट वाटतं....निदान मला तरी......Hatts of to you 🙏
प्रसाद जास्त काही लिहायला आज सुचत नाहीये , कारण तुझ्या आजच्या विडिओने डोळ्यात पाणि आणल , ,खरा रानमाणुस जो कोकणाची जिवणशैली वाचवण्याचा प्रयन्त करतोय , तुला सलाम
खरंच गावांना माणसांची गरज आहे..इच्छा असूनही गावी जाऊ शकत नाही...सणांना गावाला जायचे आणि आठवणी सोबत घेऊन यायचे एवढेच काय ते सुख..भविष्यात गावाला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही हे नक्की ..तुझी आत्मियता पाहून मन भरून येते..खूप पुढे जा..शुभेच्छा ❤
दादा, तुझ्या ह्रदयातून निघालेल्या भावना, तळमळ माझ्या ह्रदयापर्यंत पोहचली आणि प्रत्येक वेळी पोहचली. ह्रदय प्रत्येक वेळी पाझरले. शेवटची पिढी म्हणून जो नामोल्लेख केलास, तेव्हांच खलास झालो. कंठ दाटून आला. पुढे लिहीता येईना, मोबाईल धुरकट झाला.
शेवटची पिढी हे शिर्षक समर्पक आहे... ऐकून सासूबाईंची आठवण आली. आम्ही सुद्धा गावी घर बांधले आहे. आयुष्याचां अर्धा अधिक काळ मुंबईत घालवला पण त्या आता गावच्या हवेत समाधानाने राहतात. नव्वदीच्या वयात त्या कधी कधी आम्ही मुंबईत असल्यास एकट्या मोठ्या हिमतीने राहतात.एक नाळ जोडलेली आहे त्यांच्या भोवती आणि गावाभोवती सुद्धा . हया जुन्या पिढीची माणसे आपल्या अवतीभोवती असल्याने जगण्याचे बळ प्राप्त होते. छान बोलला आहेस तू, देव तुझे भले करो.
मी आयुष्यात प्रथमच इतका कटू वास्तव सांगणारा दर्दभरा व्हिडीओ पाहिला नव्हे जीवाचे कान करून परत परत ऐकला. प्रसाद !! तुमचे वास्तवाचे कथन खरोखर मनाचा ठाव घेते.ह्रदयाच्या गाभार्यातून आलेल्या शब्दांनी जीव गलबलला . पण ह्यांच्या घरातील तरुणांनी जमीनीच्या लोभापायी स्वतःचीच नाती पायदळी तुडविली आहेत.दुर्दैवाने आज हे चित्र कोकणात घरोघरी पहावयास मिळतेय. त्यामुळेच परप्रांतीय कोकणात स्वतःचे पाय पसरू बघतोय.तिथेही मराठी कोकणी माणसाचे उच्चाटन होता कामा नये . भाऊबंदकीत हीच परिणीती होईल. तेव्हा "हे कोकणी माणसा !! सावध हो !! प्रसाद! तुम्ही आता भाऊबंदकी थांबविण्यासाठी पुन्हा एक जबरदस्त व्हिडीओ बनवा . व सर्व कोकणी माणसांना ,भावंडांना एकत्र आणा.कोकणी माणसं , कोकणी गावं आणि आपली कोकणी संस्कृती टिकवा. Prasad !! Best of luck 👍!!
🙏 दादा तुझी तळमळ थेट काळजाला भिडला,मी आज ६३ वर्षांचा आहे, माझ्या आजीच्या हातचं जेवण करून आज पन्नास वर्षे झाली,मला आजोळ मुकलं, पण मला अभिमान आहे मला कोकणातली पार्श्वभूमी आहे, तुला तूझ्या महान कार्यासाठी खुप खूप शुभेच्छा
मित्रा प्रसाद,कोकणी रानमाणूस म्हणून कोकणाविषयी जी तुझी तळमळ पाहून मन भारावून जातो.असाच आम्हां कोकण्याना तू जागवत रहा.कधितरी तूझ्या हातात हात घालायची इच्छा होऊ दे हीच प्रार्थना!
बंधु तुझे प्रत्येक विषय हे जीवतोड आहे तुला हि कल्पना सुचणंं हि दैव देणगी असणार आहे .... अशीच माहिती पुर्ण व्हिडिओ करत रहा यामुळे थोडीफार जनजागृती होईल आणि थोडेफार जुनी परंपरा जागृत राहील ... खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
खरंच 😢, पुढची पिढी स्वतः पुरत बघणारी. दुसऱ्याशी काही घेण देण नसणारी त्यामुळे दुसऱ्याचे दुःख काय आहे हे समजत नाही. आता सुख सोयी भरपूर आहे पण समाधान कुठेच दिसत नाही.
दादू, किती ओतप्रोत भरलंय रे तुझ्यात... साधंसरळ जगणं! व्हॉइस प्रोजेक्शन इज सो इफेक्टिव, रादर इट्स सो रिअल! पण हेही खरंच... इट्स लास्ट जनरेशन... शेवटची! बाकी काही असो... जबरा फॅन झालो आपण! पण खरंच रे...
खूप छान..... मी कोकणातील आहे हे सर्व लहानपणी अनुभवले आहे.... माणसं प्रेमळ होती.... कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करायची.... माणुसकी, जिव्हाळा....कुठे तरी हरवला आहें....... आताची पिढी गणपतीला गावी येते... विसर्जन झाले कि त्याच रात्री पुन्हा शहरांत जाण्याची तयारी सुरु करतात... सकाळी ST मध्ये बसून.. टाटा, बाय बाय करतात.... पण त्या आजी चे डोळे मात्र पाण्याने भरलेले असतात.... पुन्हा एकटी....🙏🙏
तुझा आजच्या विषयाचा विचार मी खूप महिन्या पासून करतोय,आज तो तू पण घेतलास भावा,छान वाटलं... ही जी जुनी माणसं आहे ना हाच पूर्वीचा कोकण आहे पूर्ण ...मनात खूप दुःख होत पुढे कस असेल आता..!!!.
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला............ ही तळमळ कशी असेल.....ह्याचा अनुभव आज तुझ्या बोलण्यातून जाणवला...... आपसूक डोळे भरून आले.... खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला
प्रसाद, तुमचे खूप सारे व्हिडिओ पाहतो त्याचे मुख्य कारण तुझी प्रामाणिक तळमळ आणि आपुलकी असेल तुझा आवाज ! तू दाखवतोय तेव्हढे कोकण मी पाहिलेले नाहीये. या पुढे किती जमेल, माहित नाही, पण तुझ्या नजरेतून, तुझ्या भावनेतून कोकण जाणून घेणे, हा देखील खूप आनंद आहे रे माझ्या साठी !! पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...
आयुष्याच्या संध्याकाळी परतीच्या वाटेवर असलेल्या जुन्या पिढीकडून नेमके काय घ्यायला हवे आणि कसे घ्यायला हवे याबाबत अत्यंत मोजक्या आणि लाघवी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या तुझ्या भावना थेट हृदयापर्यंत पोहोचतात.....खुप छान.
खुप सुंदर व साध्या शब्दात अंतःकरणानातुन गावा च्या संकृतीचे तुम्ही वर्णन केले ते अगदी मनाला...भावले भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन करणाऱ्या तुमच्या या प्रयत्नांना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
किती छान रे प्रसाद! रानमाणूस चे सगळे व्हिडीओज मी बघत असते. मी स्वतः आता साठीला आलेय. मला कोकणचं प्रचंड वेड आहे. हे जे तू दसखवतोस ना, ते कोकण! तू सांगतोस ती सुशेगात जीवनशैली, हा निसर्ग, हे झरे, हेच जगणं मला प्रचंड प्रिय आहे अगदी लहानपणापासून. मी पुण्यातील सकाळ मध्ये मासिकातून लिहीत असते खूप. आणि बऱ्याचवेळी माझ्या कथा कोकणातील जीवनशैलीवर सुद्धा बेतलेल्या असतात. त्या अशाच एका कोकण कथेनं मला राज्यस्तरीय गो नी दांडेकर पुरस्कार मिळवून दिला.मी पुणेकर पण कोकणाची ओढ का कोण जाणे मला प्रचंडये. आणि हे तूझं कोकण प्रेम, हा निसर्ग, सुशेगात जगणं बघायला मला प्रचंड आवडतं. मी येते दरवर्षीच कोकणात. मला तुझ्या नजरेतून एकदा कोकण अनुभवायचंय. पण तू कुठे भेटशील माहीत नाही. म्हणून आजवर भेटले नाहीये. बघूया होतं का भेटणं. पण खूप छान वाटतं जेव्हाही मी रानमाणूस बघते. ☺️
खरं आहे दादा, मी देखील गावाला आहे. पण माझ्या वयाची पिढी 5 टक्के फक्त गावात राहते, नाहीतर बाकी सर्व मुबंई ला शिफ्ट झालेले. खरंच गाव ओस पडलीत 😢 फक्त आजोबा आजी घरात असतात. बाकी सर्व गावात शुकशुकाट असतो.
प्रसाद, तुझे निरीक्षण , अभ्यास, विश्लेषण अप्रतीम . हे वास्तव सत्य प्रत्येक कोकणातिल गावात आहे. मी पन्नास वर्षापूर्वीचा कोकण आणी आजचा पाहिला की दुःख होते. गावात माणसच नाहित. सगळी तरुणमंडळी बाहेर आणी कांही मोजक्याच घरांमध्ये तु सांगीतल्याप्रमाणे शेवटची पिढी दिसते. देव बरें करो.
खरं आहे तुझं म्हणनं, अगदी शंभर टक्के खरं. पण मोबाईलमध्ये हरवलेला तरुण वर्ग जेंव्हा जागा होईल तेंव्हा वेळ असेलच असे नाही. तुला प्रतिसाद देत तरुणांनी जास्तीत जास्त वेळ आपली संस्कृती जपण्यासाठी खर्च केला तर नक्कीच हि पिढी शेवटची ठरणार नाही.
दादा खरोखरच तू अंजन घातलास डोळ्यात..ती बंद घरं व मोजकीच आणि तीही म्हातारी माणसं पाहून गलबलून येत., म्हणून मी ठरवलय निवृत्ती नंतर शांत जीवन जगायचंय ..मी घर बांधतोआहे अशाच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी.... सोडतोय हे शहर....
आपण जे काही सांगता आहात हे सत्य आहे. मी पण कोकणातील आहे. देवगड, अचारा, कांदळगाव. दरवर्षी न चुकता एप्रिल मे व जून पहिला आठवडा आम्ही आजोळी असायचो. सर्व कामे करायचो. खूप छान वाटायचं. कौलारू मोठे घर व आम्ही सर्व ३० भावंडं जमायचो. तांबड्या तांदळाचे मऊ भात, तूप मेतकूट, अंबोशीचे लोणचे, नाचणीची भाकरी त्यावर खोबरेल तेल, ओल्या नारळाची चटणी. खरच खूप छान आयुष्य
भावा, तुझं प्रत्येक वाक्य मनाला भिडलं. मी लहानपणापासून शहरात वाढलो, कधीतरी गावी जाणं होतं, पण तू अख्खं गाव डोळ्यासमोर उभं केलंस. तुझ्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा. आवडेल मला तुझ्या सोबत काम करायला. या शहरी आयुष्यातून बाहेर पडेन की नाही माहीत नाही, पण तुला एकदा नक्की भेटेन.
बंधू आपणास मनापासून नमस्कार, खरोखर भुतकाळ व वर्तमान काळ याची भावनिक व प्रेमाने ओतप्रोत असा गोड तितकीच मनाला चटका व हि वयोवृद्ध आपली प्रेमळ माणसे भले ती कोणत्याही गावातील असो,पण या सर्वांचा काही काळा पुरतीच सोबत रहाणार या आठवणीने मन भरून आले, खरे तर गावी जाताना दोन्ही बाजूला बहुतेक घर बंद दिसतात व डोळ्यासमोर चित्र उभे राहते कि पडवीत उभे राहून कोणीतरी आवाज देत आहे नक्कीच माझी जीजी,आका,काकू, असणार पण क्षणात मन भानावर येते अरे येथे आता कोणीच रहात नाहीत,😢क्षणभर थांबून पुढे निघायचे असो बंधू, मनापासून धन्यवाद की या चित्रफिती व्दारे आठवणी जाग्या झाल्या पण काय करणार याला पर्याय काय। 😢असो.धन्यवाद।
Dev Karo dev tula changle aushya devo. I spend my entire life till date with hazardous chemicals for money. Being Malvani I appreciate your efforts for our culture
प्रसाद आजचो हो व्हिडिओ बघल्यार आमच्या बालपणाचो चलचित्रपट डोळ्यासमोरसून तरळूक लागलो. हीच म्हातारपणची पिढी आमी लहानपणापासूनच बघीत आयलसव. डोळ्यात पाणी हाडलय तू. उत्कृष्ट 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
दादूस काय प्रस्तुतिकरण आहे तूझे, अप्रतिम,अफलातून ,अगदी हृदयातून जाणारे। मी वाशीगाव नवी मुंबईचा आहे,अस्सल कोकणी पद्धतीच्या गावात राहणारा आहे।पण आत्ता आमच्याकडे खुप विकास झाल्याने गावाचे गावपण निघून गेले आहे फक्त आमची आगरी भाषा तेवढी आम्ही टिकून ठेवली आहे।माझी आई सुद्धा 80 वर्षाची झाली आहे, माझ्या आई सारख्या ज्या कोणी आहेत त्या पारंपरिक वेशात वावरणाऱ्या शेवटची पीढी आहे। दादूस तू जे बोललास त्याने जुन्या आठवणीना उजाळा देताना डोळे भरून आले। तुझे शतशः आभार
दादा माझी आजी जाउन आज सात दिवस झाले. तु म्हणतोस ते शंभर % खरं आहे..माझी आजी अगदी अशीच होती.आजी गेली खरी पण आम्हाला आयुष्यभर पुरेल एवढी प्रेमाची, ज्ञानाची शिदोरी देउन गेली....आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पान आम्ही हरवुन बसलो..
तुझे आभार मानावे तेवढे कमी प्रसाद दादा. तुझी निसर्गा बद्दलची ही तळमळ आणि कोकणाबद्दलचे प्रेम खरोखर कोतुकस्पद. सरकारने पण तुला साथ दिली पाहिजे रे, तुझे विचार मते समजावून घेतली पाहिजेत. बदलावं आणि विकास कोणाला नकोत पण त्यासाठी निसर्गाचे बलिदान नको. आज निसर्ग टिकला तरच आपण टिकून राहु. आपले अस्तित्व आणि पुढील जगणं हेय या निसर्गाच्या अस्तित्वावर च अवलंबून आहे.
भावा तुझ्या मनातील कळकळ, समजते आहे पण, आपण प्रगतीच्या पाठी आपण कुठे चाललोय हे कसं सगळ्यांना समजता येईल. तुझ्या निसर्गाच्या आणि गावांतील जीवन शैली राखण्यासाठीच्या तळमळला सादर दंडवत!
भावा तू किती कळकळीने आणि विचारपुर्वक बोलतोस. तू कोकणी माणसाच्या भावनांना हात घालतोस.तुझ्या बोलण्यातला शब्दांशब्द खरा असतो..अशीच समाज जागृती करत रहा. तू खुप मोठं काम करतो आहेस. आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
मी इकडे विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी,पण माझं स्वप्न कोकणातलं जगणं आहे.या जन्मात कोकणात जाऊन जगणं जमलं नाही आणि दुसरा जन्म असेलच तर तो मी कोकण भूमी तच घेणार.अट एवढीच की कोकण तेव्हा कोकणच राहीलं पाहिजे. आजचा व्हिडिओ बघुन मला गलबलून आलं.शेवटची पिढी आपल्याला सोडून जाईल म्हणालास दादा तू ....आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या.खूप आवडतात मला तूझे कोकण भूमीतील नॅरेशन.तूझे व्हिडिओ बघून मला मी कोकणात असल्याचे भास होतात. जगव कोकण भूमीला.... धन्यवाद.....
खरंच आम्ही भाग्यवान आहोत की हे सगळे आम्ही अनुभवला अशी माणसे बघितली आणि दुर्भाग्य हे की हे सगळे आम्ही जपू शकलो नाही आणि आमच्या पुढच्या पिढीला हे अनुभवता येणार नाही खरी माया, भोळी माणसे, खरा निसर्ग, तुमचा हा व्हिडिओ बघताना पण खुप मन जड होतोय सत्य परिस्थिती चा विचार करून.. पुढे तुमच्या अश्या व्हिडिओ मुळेच पुढच्या पिढीला हे सगळे ज्ञान मिळेल... आणि समजेल असे ही एक जग होते सुंदर निस्वार्थी.🙏
मी तुमचे आत्तापर्यंत बरेच व्हिडीओ पाहिलेत, तुम्हाला कोकणा बद्दल असलेली आपुलकी, तळमळ मला नेहमीच जाणवली, यापुढे कोकणातील ज्या काही घडामोडी होणार आहेत त्याचे किती वाईट परिणाम कोकणातील वातावरणात होणार आहेत ते प्रकर्षाने तुमच्या बोलण्यातून जाणवते, खरतर तुम्ही मुंबई सारख्या शहरात राहून बरीच प्रगती करू शकता त्यात वाद नाही, परंतु कोकणातील आनंदी जीवन मुंबईत मिळणे कठीण आहे, खरंच गावचे जीवन अप्रतिम आहे. तुमचे व्हिडीओ अप्रतिम असतात.
खुप पोटतिडकीने आणि सत्य बोलता तुम्ही दादा ! * अंगणात उभ्या राहिलेल्या... आजोबा, आजींना पाहुन ,* डोळ्यात अश्रू उभे राहिले. * तुम्ही खूप * बहुश्रुत आहात. * तुमचे व्हिडिओ मी नेहमीच पाहाते. * तुमचं विवेचन खुप विचारपूर्वक * केलेलं असते. तुमचा अभ्यास * दांडगा आहे*! * * तुमच्या सारखे * धडपडणारे लोक आहेत, * म्हणुन कोकण अजुन शिल्लक आहे ** तुमच्या कामांसाठी खुप शुभेच्छा 🙏🙏
प्रसाद ,निसर्ग अति शहरीकरण झाल्यामुळे रौद्र रूपं दाखवत आहे, लोकं आता कायमची आपापल्या गावी परतायची वेळ आली आहे, व्यसनं, junk food , आरोग्याला अति तांत्रिक गोष्टीने पोहोचलेली हानी ह्याने बेजार झालीआहेत, पण ही जुनी लोकं आपल्याला परत मिळणार नाहीत 😢
दादा मी शहरात संपूर्ण आयुष्य जगले जन्मापासून पण माझ्या आईवडिलांची कोकण बघायची ईच्छा राहून गेली आणि त्यांची स्मृती म्हणून मी देवरुखला कोकणी हाऊस घेतले लवकरच मी राहायला येणार आहे खूप छान व्हिडिओ असतात तुझे तुझ्या तळमळीने कामाला नमस्कार 😊
अतिशय भावनिक विषय आहे आम्ही तर मराठवाड्यातील निसर्ग आणि परिसर आम्हाला तेवढा सुखद नाही पण आपले व्हिडिओ बघून खरंच स्वर्ग कोकणात आहे आणखी माणसं कोकणाच्या सानिध्यात साध्या पद्धतीने स्वर्गातच जगली दादा तुझ्या या प्रयत्नास माझा सलाम
खूप छान,काळजाला भिडणारे वर्णन,केवळ ब्लॉग म्हणून बोलणे नव्हे तर काळजातून आलेला नी काळजाला भिडणारा, गदगडीत झालेला आवाज. अप्रतिम वर्णन. विषय छान........ खूपच छान.
तुमच्या या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुमची ही कोकण जपण्यासाठीची तळमळ सगळया पर्यंत पोहोचो तुम्ही जे काही करता आहात कोकणासाठी निसर्ग जपण्यासाठी खुप अभिमान वाटतो
खरच हृदयस्पर्शी गोष्ट आहे ही,एक वेळ होती की आम्ही ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत,मातीचे घर,बैंलगाडी सफर, शेतामध्ये नांगरणी,आणि नानींना बघून तर मला माझ्या आजीच्या आठवणी जाग्या झाल्या,तुझे खूप खूप धन्यवाद 👌👌👍👍💐💐
दादा खुप सुंदर.. खरंच या वृध्द लोकांच्या चेह-यावरील सुरकुत्या या त्यांचे जीवनातील कडुगोड अनुभव सांगतात. आपल्याला वेळ असेल त्यावेळी त्यांच्या जवळ बसुन हे कडुगोड अनुभव जगले पाहिजेत. आणि हे अनुभव, त्यांनी दिलेले संस्कार आपल्या पुढील पिढीला देण्याचा दुवा आपण बनले पाहिजे. शेवटी काय घेऊन जायचे आहे ओ... खुप मोठे व्हा..पण जन्म देणा-या मातेला , जीवन देणाऱ्या मातीला, आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नका...
खरे आहे तुझे मित्रा.... ही शेवटचीच पिढी. जिवाला जीव लावणारी, मायेने वीचारपुस करणारी, घरी येणार्या पाहुण्याला परके न समझता त्याचा योग्य तो पाहुणचार करणारी.
मुझे तुझे विडिओ बऱ्याच वेळा बघतो, उत्तम चं असतात,आज चा विषय मन हेलावून टाकणारा आहे आणि तू ज्या पोटतिडकीने मांडलास,ते सगळं अफलातून आहे, तुझ्या या सगळ्या प्रयोजन म्हणजेच खटाटोपाला , भरपूर शुभेच्छा.
खरं आहे भावा, मध्ये जावळीत ट्रेक साठी गेलो होतो चकदेव च्या, पायथ्याशी एका वाडीच्या शेवटच्या घराच्या अंगणात विसाव्यासाठी थांबलो होतो, तर त्यांनी नुसतं पाणीच नाही चहा पण करुन दिला. ते ही आजी आजोबाच, या सुरकुतलेल्या पिढीतलेच होते दोघं. अतिथी देवो भव काय असतं ते हेच रे
शेवटची पिढी हे शिर्षक वाचून ऐकून डोळ्यातून पाणी आले. वाईट वाटले.
दादा़ तुझ्या प्रत्येक भावना तळमळ हृदयापर्यंत पोहचवली.
Sad but very true
खरं आहे... मलाही वाटत आता बस झालं हे शहरात असणार जीवन.. कोकण बोलावत आहे.. माध्यम आहे प्रसाद (रानमाणूस )
मी जास्त काही बोलत नाही पण दादा तु देवमाणूस आहेस ❤
खरंच
❤❤
💯🙏
Agree
अगदी मनातलं बोललात ❤
अगदी खरं ! दर वर्षी काही घरे बंद होत चालली आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. तसे काही तरी होवो आणि पुन्हा एकदा कोकणातलीच नव्हे तर पूर्ण भारतातली गावं खेडी गजबजून जावोत ! तो सोन्याचा दिन येवो ! जय जवान, जय किसान !
दादा.... तु खूप तळमळीने बोलतोस..... आम्ही आमच्या शहरी आयुष्यात खूप जास्त गुंतून गेलोय.... तुला असं बोलताना पाहिल्यावर मी कोकणातली असूनही असा विचार का नाही करू शकलो याचं वाईट वाटतं....निदान मला तरी......Hatts of to you 🙏
तु खुप तळमळीने बोलतोस तुज काम पण आहे
Speechless ❤❤❤❤❤
खरेच तू तर गेट्स आहे तू तर हुदय
Tumhi tulshi gowda baro bar tumche photo aahe aahe tyanni kadhi video nahi banavle tyani karun dakhavle tyana pan problem aalay, bhava chatrapati shivaji maharaj Yancya Rajath aapan jagtoy.......
Hakaa saathi ladayche astay
लांजा राजापूर मध्ये पण हीच परिस्थिती आहे...... घरो घरी आजी आजोबा..... वाट पाहतायत सणाची केव्हा माझा लेक येतोय नातवंडांना घेवून 😢😢😢
c😢😢
True😢
हो ,अगदी बरोबर आहे, पण शेवटी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नोकरी निमित्त गावा पासून दूर जावे लागतेच
सर्व बरोबर आहे. पण पोटासाठी जगदिशा हिंडविशी दाहीदिशा
प्रसाद तू मनातून बोलतोस ते शब्द आणि शब्द हृदयात घर करतात तुझी ही संकल्पना मोठी मोठी होत जाऊ दे
प्रसाद जास्त काही लिहायला आज सुचत नाहीये , कारण तुझ्या आजच्या विडिओने डोळ्यात पाणि आणल , ,खरा रानमाणुस जो कोकणाची जिवणशैली वाचवण्याचा प्रयन्त करतोय , तुला सलाम
खरंच गावांना माणसांची गरज आहे..इच्छा असूनही गावी जाऊ शकत नाही...सणांना गावाला जायचे आणि आठवणी सोबत घेऊन यायचे एवढेच काय ते सुख..भविष्यात गावाला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही हे नक्की ..तुझी आत्मियता पाहून मन भरून येते..खूप पुढे जा..शुभेच्छा ❤
दादा, तुझ्या ह्रदयातून निघालेल्या भावना, तळमळ माझ्या ह्रदयापर्यंत पोहचली आणि प्रत्येक वेळी पोहचली. ह्रदय प्रत्येक वेळी पाझरले. शेवटची पिढी म्हणून जो नामोल्लेख केलास, तेव्हांच खलास झालो. कंठ दाटून आला. पुढे लिहीता येईना, मोबाईल धुरकट झाला.
Agadi kharay
Hoy re bhauu
Very good old-age. Cm navle nasik
😢
It's true
आपले विचार
आपली बोलण्याची पद्धत
खरच खूपच अप्रतिम दादा
आणि जे बोलत आहात ते खरोखरचं योग्य आहे
आपण सुखी माणसाचा सदरा घातलेल्या पिढीला मुकणार हे सत्य किती हेलावणारे आहे. हृदयाला भिडले आणि डोळ्यात पाणी आले.
शेवटची पिढी हे शिर्षक समर्पक आहे... ऐकून सासूबाईंची आठवण आली. आम्ही सुद्धा गावी घर बांधले आहे. आयुष्याचां अर्धा अधिक काळ मुंबईत घालवला पण त्या आता गावच्या हवेत समाधानाने राहतात. नव्वदीच्या वयात त्या कधी कधी आम्ही मुंबईत असल्यास एकट्या मोठ्या हिमतीने राहतात.एक नाळ जोडलेली आहे त्यांच्या भोवती आणि गावाभोवती सुद्धा . हया जुन्या पिढीची माणसे आपल्या अवतीभोवती असल्याने जगण्याचे बळ प्राप्त होते.
छान बोलला आहेस तू, देव तुझे भले करो.
मी आयुष्यात प्रथमच इतका कटू वास्तव सांगणारा दर्दभरा व्हिडीओ पाहिला नव्हे जीवाचे कान करून परत परत ऐकला. प्रसाद !! तुमचे वास्तवाचे कथन खरोखर मनाचा ठाव घेते.ह्रदयाच्या गाभार्यातून आलेल्या शब्दांनी जीव गलबलला .
पण ह्यांच्या घरातील तरुणांनी जमीनीच्या लोभापायी स्वतःचीच नाती पायदळी तुडविली आहेत.दुर्दैवाने आज हे चित्र कोकणात घरोघरी पहावयास मिळतेय. त्यामुळेच परप्रांतीय कोकणात स्वतःचे पाय पसरू बघतोय.तिथेही मराठी कोकणी माणसाचे उच्चाटन होता कामा नये . भाऊबंदकीत हीच परिणीती होईल. तेव्हा "हे कोकणी माणसा !! सावध हो !!
प्रसाद! तुम्ही आता भाऊबंदकी थांबविण्यासाठी पुन्हा एक जबरदस्त व्हिडीओ बनवा . व सर्व कोकणी माणसांना ,भावंडांना एकत्र आणा.कोकणी माणसं , कोकणी गावं आणि आपली कोकणी संस्कृती टिकवा.
Prasad !! Best of luck 👍!!
🙏 दादा तुझी तळमळ थेट काळजाला भिडला,मी आज ६३ वर्षांचा आहे, माझ्या आजीच्या हातचं जेवण करून आज पन्नास वर्षे झाली,मला आजोळ मुकलं, पण मला अभिमान आहे मला कोकणातली पार्श्वभूमी आहे, तुला तूझ्या महान कार्यासाठी खुप खूप शुभेच्छा
मित्रा प्रसाद,कोकणी रानमाणूस म्हणून कोकणाविषयी जी तुझी तळमळ पाहून मन भारावून जातो.असाच आम्हां कोकण्याना तू जागवत रहा.कधितरी तूझ्या हातात हात घालायची इच्छा होऊ दे हीच प्रार्थना!
खरंय! खूप सुंदर विलक्षण हातून निसटून चालल्याची हूरहूर मनाला अस्वस्थ करून जाते.. हा vdo पहाताना!😢
भावा तू एक महत्वपूर्ण मुद्दा छेडलायस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.❤👌👌👍
बंधु तुझे प्रत्येक विषय हे जीवतोड आहे तुला हि कल्पना सुचणंं हि दैव देणगी असणार आहे .... अशीच माहिती पुर्ण व्हिडिओ करत रहा यामुळे थोडीफार जनजागृती होईल आणि थोडेफार जुनी परंपरा जागृत राहील ... खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
खरंच 😢, पुढची पिढी स्वतः पुरत बघणारी. दुसऱ्याशी काही घेण देण नसणारी त्यामुळे दुसऱ्याचे दुःख काय आहे हे समजत नाही. आता सुख सोयी भरपूर आहे पण समाधान कुठेच दिसत नाही.
Khup gambhir vishay mandla deva . Bhavishyatali rikami ghar dolya samor aali🙏 😢
भावनिक व्हिडिओ बघून आत्मचिंतन करायला भाग पाडले तुम्ही.मनापासून धन्यवाद. 🙏
काळजाला हात घातलास भावा 🙏🏻🙏🏻एक कटू सत्य सांगितलेस. मी पण कोकणातील आहे. 🙏🏻🙏🏻
प्रत्येक emotional माणसाला हा व्हिडिओ पहिल्या नंतर नक्कीच मनात खंत वाटली असेल.. खरंच ही शेवटची पिढी..🥹
दादू,
किती ओतप्रोत भरलंय रे तुझ्यात... साधंसरळ जगणं!
व्हॉइस प्रोजेक्शन इज सो इफेक्टिव, रादर इट्स सो रिअल!
पण हेही खरंच... इट्स लास्ट जनरेशन... शेवटची!
बाकी काही असो... जबरा फॅन झालो आपण!
पण खरंच रे...
खूप छान..... मी कोकणातील आहे हे सर्व लहानपणी अनुभवले आहे.... माणसं प्रेमळ होती.... कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करायची.... माणुसकी, जिव्हाळा....कुठे तरी हरवला आहें....... आताची पिढी गणपतीला गावी येते... विसर्जन झाले कि त्याच रात्री पुन्हा शहरांत जाण्याची तयारी सुरु करतात... सकाळी ST मध्ये बसून.. टाटा, बाय बाय करतात.... पण त्या आजी चे डोळे मात्र पाण्याने भरलेले असतात.... पुन्हा एकटी....🙏🙏
खुप सुंदर कोकण आणि खुप सुंदर बोलतो प्रसाद गावडे
तुझा आजच्या विषयाचा विचार मी खूप महिन्या पासून करतोय,आज तो तू पण घेतलास भावा,छान वाटलं... ही जी जुनी माणसं आहे ना हाच पूर्वीचा कोकण आहे पूर्ण ...मनात खूप दुःख होत पुढे कस असेल आता..!!!.
खर आहे तुमचम्णणण. विकासखच्या नावाखाली आपली संस्कृती खरे साधसुध जगण हरवतोय😢
विकास नाही जगाईची भ्रांत सर्वांना वाटते गावी राहवे पण गावात रोजगार उपलब्ध नाही
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला............
ही तळमळ कशी असेल.....ह्याचा अनुभव आज तुझ्या बोलण्यातून जाणवला......
आपसूक डोळे भरून आले....
खूप खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला
प्रसाद, तुमचे खूप सारे व्हिडिओ पाहतो त्याचे मुख्य कारण तुझी प्रामाणिक तळमळ आणि आपुलकी असेल तुझा आवाज ! तू दाखवतोय तेव्हढे कोकण मी पाहिलेले नाहीये. या पुढे किती जमेल, माहित नाही, पण तुझ्या नजरेतून, तुझ्या भावनेतून कोकण जाणून घेणे, हा देखील खूप आनंद आहे रे माझ्या साठी !! पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा...
आयुष्याच्या संध्याकाळी परतीच्या वाटेवर असलेल्या जुन्या पिढीकडून नेमके काय घ्यायला हवे आणि कसे घ्यायला हवे याबाबत अत्यंत मोजक्या आणि लाघवी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या तुझ्या भावना थेट हृदयापर्यंत पोहोचतात.....खुप छान.
हरकाच भात हे शब्द ऐकून माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
कोकणातील हे गरीबांचे खास जेवण होते ❤
खुप सुंदर व साध्या शब्दात अंतःकरणानातुन गावा
च्या संकृतीचे तुम्ही वर्णन केले ते अगदी मनाला...भावले
भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन करणाऱ्या तुमच्या या प्रयत्नांना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
खूप मन हेलावून टाकणारी व्यथा आहे प्रसाद दादा तुझी कोकणात राहून कोकणी जीवन टिकून राहावं त्याची तळमळ पाहून खूप छान वाटत तुझा सार्थ अभिमान आहे😊
मी विदर्भ चा आहे सेम असच विदर्भात सुद्धा खूप काही आहे अर्थातच महाराष्ट्रात कुठे न कुठे नैसर्गिक जगणं आहे. पण आता सगळं नामशेष होत चालल आहे.❤
प्रसाद तू बोलतोस ते खंर आहे अशी माया व प्रेम करणारी व्यक्ती कमी होते आहेत तू जे बोलत आहे ते ऐकून मन भरुन आले
किती छान रे प्रसाद! रानमाणूस चे सगळे व्हिडीओज मी बघत असते. मी स्वतः आता साठीला आलेय. मला कोकणचं प्रचंड वेड आहे. हे जे तू दसखवतोस ना, ते कोकण! तू सांगतोस ती सुशेगात जीवनशैली, हा निसर्ग, हे झरे, हेच जगणं मला प्रचंड प्रिय आहे अगदी लहानपणापासून. मी पुण्यातील सकाळ मध्ये मासिकातून लिहीत असते खूप. आणि बऱ्याचवेळी माझ्या कथा कोकणातील जीवनशैलीवर सुद्धा बेतलेल्या असतात. त्या अशाच एका कोकण कथेनं मला राज्यस्तरीय गो नी दांडेकर पुरस्कार मिळवून दिला.मी पुणेकर पण कोकणाची ओढ का कोण जाणे मला प्रचंडये. आणि हे तूझं कोकण प्रेम, हा निसर्ग, सुशेगात जगणं बघायला मला प्रचंड आवडतं. मी येते दरवर्षीच कोकणात. मला तुझ्या नजरेतून एकदा कोकण अनुभवायचंय. पण तू कुठे भेटशील माहीत नाही. म्हणून आजवर भेटले नाहीये. बघूया होतं का भेटणं. पण खूप छान वाटतं जेव्हाही मी रानमाणूस बघते. ☺️
अगदी बरोबर आहे दादा ही मानस आपल्या तोडा वरुण हात फिरवायची निस्वार्थ प्रेम करनारी घआसआतल घास काढून देणारी ही मानसाना नकीच मुकणार आहोत
खर आहे भाऊ खूप छान वाटत कोकणात गावी गेल्यावर राहायला धन्यवाद 🙏
खरं आहे दादा, मी देखील गावाला आहे. पण माझ्या वयाची पिढी 5 टक्के फक्त गावात राहते, नाहीतर बाकी सर्व मुबंई ला शिफ्ट झालेले. खरंच गाव ओस पडलीत 😢 फक्त आजोबा आजी घरात असतात. बाकी सर्व गावात शुकशुकाट असतो.
खरंय वाक्य न वाक्य
सुंदर विडियो
परमेश्वर तुला तुझ्या ईप्सित कार्यात भरभरून यश देवो कारण त्यातच कोकणाचे भले होणार आहे.
दादा अगदी खरे , तळमळीने बोलतो आहे. ह्या पिढी सोबत अनुभवाचा मोठा खजिना लुप्त होईल.
मस्त व्हिडीओ झाला आहे। वर्णन सुंदर केले आहे
प्रसाद,
तुझे निरीक्षण , अभ्यास, विश्लेषण अप्रतीम . हे वास्तव सत्य प्रत्येक कोकणातिल गावात आहे. मी पन्नास वर्षापूर्वीचा कोकण आणी आजचा पाहिला की दुःख होते.
गावात माणसच नाहित. सगळी तरुणमंडळी बाहेर आणी कांही मोजक्याच घरांमध्ये तु सांगीतल्याप्रमाणे शेवटची पिढी दिसते. देव बरें करो.
खुप छान बोललास जुन्या आठवणी निघाल्या की डोळ्यातून अश्रू येतात, धन्यवाद भावा
खरं आहे तुझं म्हणनं, अगदी शंभर टक्के खरं. पण मोबाईलमध्ये हरवलेला तरुण वर्ग जेंव्हा जागा होईल तेंव्हा वेळ असेलच असे नाही. तुला प्रतिसाद देत तरुणांनी जास्तीत जास्त वेळ आपली संस्कृती जपण्यासाठी खर्च केला तर नक्कीच हि पिढी शेवटची ठरणार नाही.
धन्यवाद भाऊ मला गाव नाही पण तुझे सर्व विडिओ मी पहातो हा विडिओ बघून वाटते आयुष्यचा शेवट कोकणात व्हावा खूप खूप धन्यवाद
इतका छान आणि सुंदर विषय घेऊन व्हिडिओ बनवलात त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन!
Heart touching situation expressed with lots of love .
His voice choking with sadness . I can feel it.
दादा खरोखरच तू अंजन घातलास डोळ्यात..ती बंद घरं व मोजकीच आणि तीही म्हातारी माणसं पाहून गलबलून येत.,
म्हणून मी ठरवलय निवृत्ती नंतर शांत जीवन जगायचंय ..मी घर बांधतोआहे अशाच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी.... सोडतोय हे शहर....
आपण जे काही सांगता आहात हे सत्य आहे. मी पण कोकणातील आहे. देवगड, अचारा, कांदळगाव.
दरवर्षी न चुकता एप्रिल मे व जून पहिला आठवडा आम्ही आजोळी असायचो. सर्व कामे करायचो. खूप छान वाटायचं. कौलारू मोठे घर व आम्ही सर्व ३० भावंडं जमायचो. तांबड्या तांदळाचे मऊ भात, तूप मेतकूट, अंबोशीचे लोणचे, नाचणीची भाकरी त्यावर खोबरेल तेल, ओल्या नारळाची चटणी. खरच खूप छान आयुष्य
हे अगदी खरं आहे.आणि सत्य परिस्थिती आहे
प्रत्येक गावातील गोष्ट आहे दादा ही ❤
काय express करणार. शब्द हरवले आहेत.
वाईट वाटते
तुम्ही खुप चांगला विषय मांडला आहे यावर सध्या कोणी विचारच करत नय हा व्हिडीओ सर्वांनी पाहिला पाहिजे मग समजेल जुनी पिढी काय आहे होती
भावा, तुझं प्रत्येक वाक्य मनाला भिडलं. मी लहानपणापासून शहरात वाढलो, कधीतरी गावी जाणं होतं, पण तू अख्खं गाव डोळ्यासमोर उभं केलंस.
तुझ्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा. आवडेल मला तुझ्या सोबत काम करायला. या शहरी आयुष्यातून बाहेर पडेन की नाही माहीत नाही, पण तुला एकदा नक्की भेटेन.
बंधू आपणास मनापासून नमस्कार, खरोखर भुतकाळ व वर्तमान काळ याची भावनिक व प्रेमाने ओतप्रोत असा गोड तितकीच मनाला चटका व हि वयोवृद्ध आपली प्रेमळ माणसे भले ती कोणत्याही गावातील असो,पण या सर्वांचा काही काळा पुरतीच सोबत रहाणार या आठवणीने मन भरून आले, खरे तर गावी जाताना दोन्ही बाजूला बहुतेक घर बंद दिसतात व डोळ्यासमोर चित्र उभे राहते कि पडवीत उभे राहून कोणीतरी आवाज देत आहे नक्कीच माझी जीजी,आका,काकू, असणार पण क्षणात मन भानावर येते अरे येथे आता कोणीच रहात नाहीत,😢क्षणभर थांबून पुढे निघायचे असो बंधू, मनापासून धन्यवाद की या चित्रफिती व्दारे आठवणी जाग्या झाल्या पण काय करणार याला पर्याय काय। 😢असो.धन्यवाद।
Dev Karo dev tula changle aushya devo. I spend my entire life till date with hazardous chemicals for money. Being Malvani I appreciate your efforts for our culture
होय् हे खर आहे जुन्या लोकांचा निसर्गा बाबतीत असलेला अभ्यास पाहता ती माणस आपल्यासाठी विद्यापीठ च आहेत
तुझी कोकणाविषयी तळमळ पाहून मन हेलावून जाते तुला मनःपूर्वक सलाम आम्ही तुझ्या पाठिशी आहोत देव तुला दीर्घ आयुष्य देवो हि प्रार्थना
खुप छान वाटलं ऐकून खरंच आपण फक्त मटेरिअलिस्टिक आयुष्य जगतोय आता change नाही झालो तर कधीच नाही.. हा विडिओ खुप share करा मित्रानो
प्रसाद आजचो हो व्हिडिओ बघल्यार आमच्या बालपणाचो चलचित्रपट डोळ्यासमोरसून तरळूक लागलो. हीच म्हातारपणची पिढी आमी लहानपणापासूनच बघीत आयलसव. डोळ्यात पाणी हाडलय तू. उत्कृष्ट 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
तुझो अभिमान असा आमका कि जुन्या लोकाचो अमका आठवण करून दिलंस..जुन्या पिढी लोकांना मुळे आज आमची संस्कृती परंपरा सण जिवंत असतं ❤❤❤❤
खूपच भारी बोलतोस तू.सत्य मेव जयते.
मी पण जास्त काही बोलत नाही प्रसाद दादा तुम्ही देवमाणूस आहेस 🙏🙏🙏🙏🙏🌳🌳🌳🌳🌳
दादूस काय प्रस्तुतिकरण आहे तूझे, अप्रतिम,अफलातून ,अगदी हृदयातून जाणारे। मी वाशीगाव नवी मुंबईचा आहे,अस्सल कोकणी पद्धतीच्या गावात राहणारा आहे।पण आत्ता आमच्याकडे खुप विकास झाल्याने गावाचे गावपण निघून गेले आहे फक्त आमची आगरी भाषा तेवढी आम्ही टिकून ठेवली आहे।माझी आई सुद्धा 80 वर्षाची झाली आहे, माझ्या आई सारख्या ज्या कोणी आहेत त्या पारंपरिक वेशात वावरणाऱ्या शेवटची पीढी आहे। दादूस तू जे बोललास त्याने जुन्या आठवणीना उजाळा देताना डोळे भरून आले। तुझे शतशः आभार
दादा माझी आजी जाउन आज सात दिवस झाले. तु म्हणतोस ते शंभर % खरं आहे..माझी आजी अगदी अशीच होती.आजी गेली खरी पण आम्हाला आयुष्यभर पुरेल एवढी प्रेमाची, ज्ञानाची शिदोरी देउन गेली....आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पान आम्ही हरवुन बसलो..
तुझे आभार मानावे तेवढे कमी प्रसाद दादा. तुझी निसर्गा बद्दलची ही तळमळ
आणि कोकणाबद्दलचे प्रेम खरोखर कोतुकस्पद.
सरकारने पण तुला साथ दिली पाहिजे रे, तुझे विचार मते समजावून घेतली पाहिजेत. बदलावं आणि विकास कोणाला नकोत पण त्यासाठी निसर्गाचे बलिदान नको. आज निसर्ग टिकला तरच आपण टिकून राहु. आपले अस्तित्व आणि पुढील जगणं हेय या निसर्गाच्या अस्तित्वावर च अवलंबून आहे.
बाळा, तू कोकणासाठी खूप प्रयत्न करतो आहेस तुला भेटावं वाटतं इतकं सरळ साधं जीवन आता लोकांना फक्त दुसऱ्यांनी जगावं असं वाटतं जसा विवेकानंद शेजारी जन्मावा
Great, tuzy pryatnana udand yash yeo, hich prabhu charani prarthana...!
भावा तुझ्या मनातील कळकळ, समजते आहे पण, आपण प्रगतीच्या पाठी आपण कुठे चाललोय हे कसं सगळ्यांना समजता येईल.
तुझ्या निसर्गाच्या आणि गावांतील जीवन शैली राखण्यासाठीच्या तळमळला सादर दंडवत!
खरच ऐकून डोळ्यातून पाणी आल ह्या गोष्टींवर विश्वास नाही ठेऊ शकत की ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य होतील आणि ही जुणी पिढी आपल्यातून निघून जाईल.
प्रसाद , खुपच छान विषय मांडलास . ऐकताना खुप लोकांची आठवण झाली ! खुप आभार !👍👍
Re zhila khipach खरी आणी सुंदर video aasa aaj ho. खुप खुप धन्यवाद
भावा तू किती कळकळीने आणि विचारपुर्वक बोलतोस. तू कोकणी माणसाच्या भावनांना हात घालतोस.तुझ्या बोलण्यातला शब्दांशब्द खरा असतो..अशीच समाज जागृती करत रहा. तू खुप मोठं काम करतो आहेस. आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
मी इकडे विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी,पण माझं स्वप्न कोकणातलं जगणं आहे.या जन्मात कोकणात जाऊन जगणं जमलं नाही आणि दुसरा जन्म असेलच तर तो मी कोकण भूमी तच घेणार.अट एवढीच की कोकण तेव्हा कोकणच राहीलं पाहिजे.
आजचा व्हिडिओ बघुन मला गलबलून आलं.शेवटची पिढी आपल्याला सोडून जाईल म्हणालास दादा तू ....आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या.खूप आवडतात मला तूझे कोकण भूमीतील नॅरेशन.तूझे व्हिडिओ बघून मला मी कोकणात असल्याचे भास होतात.
जगव कोकण भूमीला....
धन्यवाद.....
खरंच आम्ही भाग्यवान आहोत की हे सगळे आम्ही अनुभवला अशी माणसे बघितली आणि दुर्भाग्य हे की हे सगळे आम्ही जपू शकलो नाही आणि आमच्या पुढच्या पिढीला हे अनुभवता येणार नाही खरी माया, भोळी माणसे, खरा निसर्ग, तुमचा हा व्हिडिओ बघताना पण खुप मन जड होतोय सत्य परिस्थिती चा विचार करून.. पुढे तुमच्या अश्या व्हिडिओ मुळेच पुढच्या पिढीला हे सगळे ज्ञान मिळेल... आणि समजेल असे ही एक जग होते सुंदर निस्वार्थी.🙏
मी तुमचे आत्तापर्यंत बरेच व्हिडीओ पाहिलेत, तुम्हाला कोकणा बद्दल असलेली आपुलकी, तळमळ मला नेहमीच जाणवली, यापुढे कोकणातील ज्या काही घडामोडी होणार आहेत त्याचे किती वाईट परिणाम कोकणातील वातावरणात होणार आहेत ते प्रकर्षाने तुमच्या बोलण्यातून जाणवते, खरतर तुम्ही मुंबई सारख्या शहरात राहून बरीच प्रगती करू शकता त्यात वाद नाही, परंतु कोकणातील आनंदी जीवन मुंबईत मिळणे कठीण आहे, खरंच गावचे जीवन अप्रतिम आहे. तुमचे व्हिडीओ अप्रतिम असतात.
खुप पोटतिडकीने आणि सत्य बोलता तुम्ही दादा ! * अंगणात उभ्या राहिलेल्या... आजोबा, आजींना पाहुन ,* डोळ्यात अश्रू उभे राहिले. * तुम्ही खूप * बहुश्रुत आहात. * तुमचे व्हिडिओ मी नेहमीच पाहाते. * तुमचं विवेचन खुप विचारपूर्वक * केलेलं असते.
तुमचा अभ्यास * दांडगा आहे*!
* * तुमच्या सारखे * धडपडणारे लोक आहेत, * म्हणुन कोकण अजुन शिल्लक आहे **
तुमच्या कामांसाठी खुप शुभेच्छा 🙏🙏
खरच खूप छान. तुमचे शब्द हृदयातून सरळ ओठांवर आले आहेत. तेच शब्दभाव, तिच तळमळ डोळ्यात आहे.खरच तुम्ही देवदूतच आहात.
प्रसाद ,निसर्ग अति शहरीकरण झाल्यामुळे रौद्र रूपं दाखवत आहे, लोकं आता कायमची आपापल्या गावी परतायची वेळ आली आहे, व्यसनं, junk food , आरोग्याला अति तांत्रिक गोष्टीने पोहोचलेली हानी ह्याने बेजार झालीआहेत, पण ही जुनी लोकं आपल्याला परत मिळणार नाहीत 😢
व्यसन, Junk food आणि शहरीकरण हे विषय गम्भीर आहेत.
दादा मी शहरात संपूर्ण आयुष्य जगले जन्मापासून पण माझ्या आईवडिलांची कोकण बघायची ईच्छा राहून गेली आणि त्यांची स्मृती म्हणून मी देवरुखला कोकणी हाऊस घेतले लवकरच मी राहायला येणार आहे खूप छान व्हिडिओ असतात तुझे तुझ्या तळमळीने कामाला नमस्कार 😊
अतिशय भावनिक विषय आहे आम्ही तर मराठवाड्यातील निसर्ग आणि परिसर आम्हाला तेवढा सुखद नाही पण आपले व्हिडिओ बघून खरंच स्वर्ग कोकणात आहे आणखी माणसं कोकणाच्या सानिध्यात साध्या पद्धतीने स्वर्गातच जगली दादा तुझ्या या प्रयत्नास माझा सलाम
प्रसाद. खरोखर. खरोखरच. आणि. खरोखर. तू. माझ्या. दृष्टीने. ग्रेट gret. आहेस. हे. सगळे. मी. आणुभवले. कोकणात.
रानमाणसा... धन्यवाद 🙏😊 ....सुरवात आणि शेवट चटका लावणारा.
great .... Really you are very Lucky....
Dear Prasad, Your great work inspires . Well done, We can't forget you. We always love Kokan.
खूप छान,काळजाला भिडणारे वर्णन,केवळ ब्लॉग म्हणून बोलणे नव्हे तर काळजातून आलेला नी काळजाला भिडणारा, गदगडीत झालेला आवाज.
अप्रतिम वर्णन. विषय छान........ खूपच छान.
तुमच्या या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुमची ही कोकण जपण्यासाठीची तळमळ सगळया पर्यंत पोहोचो तुम्ही जे काही करता आहात कोकणासाठी निसर्ग जपण्यासाठी खुप अभिमान वाटतो
बंधू नमस्कार तुम्ही ग्रेट आहेत
छान वस्तू स्तीती प्रस्तुत केली आहे
खरच हृदयस्पर्शी गोष्ट आहे ही,एक वेळ होती की आम्ही ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत,मातीचे घर,बैंलगाडी सफर, शेतामध्ये नांगरणी,आणि नानींना बघून तर मला माझ्या आजीच्या आठवणी जाग्या झाल्या,तुझे खूप खूप धन्यवाद 👌👌👍👍💐💐
दादा खुप सुंदर..
खरंच या वृध्द लोकांच्या चेह-यावरील सुरकुत्या या त्यांचे जीवनातील कडुगोड अनुभव सांगतात. आपल्याला वेळ असेल त्यावेळी त्यांच्या जवळ बसुन हे कडुगोड अनुभव जगले पाहिजेत. आणि हे अनुभव, त्यांनी दिलेले संस्कार आपल्या पुढील पिढीला देण्याचा दुवा आपण बनले पाहिजे.
शेवटी काय घेऊन जायचे आहे ओ...
खुप मोठे व्हा..पण जन्म देणा-या मातेला , जीवन देणाऱ्या मातीला, आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नका...
प्रसाद दादा,तुझी तळमळ भावते❤
खरंच कोकणातल्या शेवटच्या पिढीचं
व्हिडिओ ऐकताना पाहताना त्या काळात गेले, आता सर्व बदललंय,
खुप दुःख ही होतंय, खरंच ही शेवटची पिढी🙏
तू एक आशेचा किरण वाटतोयस कोकण निसर्ग साठी
अतिशय सुंदरपणे भावना व्यक्त केल्यास अगदी हृदयात जाऊन भिडल्या
दादा तू नेहमीच छान बोलतोस आजही तू बोलला आणि प्रत्येक गोष्ट ही मनाला भिडली जुन ते सोने म्हणून जपण्याचा प्रयत्न करूया.🙏
खरे आहे तुझे मित्रा.... ही शेवटचीच पिढी. जिवाला जीव लावणारी, मायेने वीचारपुस करणारी, घरी येणार्या पाहुण्याला परके न समझता त्याचा योग्य तो पाहुणचार करणारी.
प्रसाद खरंच तू धन्य आहेस. तुझा अभिमान वाटतो 🙏🌹
मुझे तुझे विडिओ बऱ्याच वेळा बघतो, उत्तम चं असतात,आज चा विषय मन हेलावून टाकणारा आहे आणि तू ज्या पोटतिडकीने मांडलास,ते सगळं अफलातून आहे, तुझ्या या सगळ्या प्रयोजन म्हणजेच खटाटोपाला , भरपूर शुभेच्छा.
खरं आहे भावा, मध्ये जावळीत ट्रेक साठी गेलो होतो चकदेव च्या, पायथ्याशी एका वाडीच्या शेवटच्या घराच्या अंगणात विसाव्यासाठी थांबलो होतो, तर त्यांनी नुसतं पाणीच नाही चहा पण करुन दिला. ते ही आजी आजोबाच, या सुरकुतलेल्या पिढीतलेच होते दोघं. अतिथी देवो भव काय असतं ते हेच रे