RANMANUS | कोकणातल्या मुलींना गावातला नवरा का नको..?
HTML-код
- Опубликовано: 22 мар 2024
- #Kokansadlive #KokanNewsUpdate #Breakingnews #kokan #kokani #malvan #nature #sea #heaven #river #hills #water
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.com/@KokansadLive...
फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive
आपलीच माणसं माती खातात त्यांना कमी वेळात पैसे पाहिजे . १०-२० एकरी जमिनी विकून १०*१५ च घर मुंबई मध्ये घ्यायचं ..प्रसाद बरोबर बोलतोय
भावा आपली लोक मटका खेळण्यात दंग झाली सिंधुदुर्ग मध्ये जास्त प्रमाण चालते 😢😢😢 त्याऐवजी व्यवसाय केला तर खूप काही होईल
Sindhudurg ani govyaat khup kheltat matke sagle jar matke khelache banda jhle tar kiti paise vachtit ya tynka sangat kon tya peksha shair market madhe thode thode paise taka pude tech paise vadle astle
p@@marathibujgo265
खरच हा पोटतिडकीने लागतोय ते मनावर घेवून ऐकल पाहिजे. सलाम दादा.
सांगतोय
हा माणूस एवढ पोट तिडकिने सांगतो याचा विचार आताच करा नायतर आपल्या वाट्याला पष्यातपच उरणार एवढ नक्की आहे . कोकण वाचवा❤❤
सहमत 👍
Ha development virodhi aahe
Ghatavar development zali sarva sukhi zale pan kokni manus ha asach bhikhari rahila pahije ka re gawde ...... development zalich pahije pan kokni manus please zamini viku naka
Tyachi development chi vyakhya samajayla sagalyanach nahi jamanar😂
@@sandhyachavan4829 ghatavar lokan kade jaam paisa aala apanch ka asa rahyacha
दादा वाचव रे कोंकण, तू आमचा आवाज आहेस रे,
देवाच्या कृपेने तुला खुप शक्ती मिळो
Dada yekata nahi vachau shaka aapan saglyani tyala madat keli pahije
@@nishaddesai124 ho jashi jithun madat karayla tayar aahot... Fkt konkan vachla pahije
अगदी बरोबर प्रसाद आपल्या कोकण आपणच वाचवचा असा आपले जमिनी नविकता आपल्या जमिनी हीच आपली संपत्ती आहे
Right point, अगदी बरोबर आहे,
माझी कोकणातील सर्व जनतेला आणि खास करून तरूण तरूणींना हा आमचा प्रसाद परमेश्वराने कोकणासाठी दिलेला प्रसाद आहे.तर त्याच्या मुखातून कोकणाच्या संवर्धन संरक्षणासाठी आलेले विचाररुपी प्रसाद सर्वांनी ग्रहण करून.स्वताच्या विचारांमध्ये परीवर्तन करवे. कोंकण वाचवा.
ज्याला बाप आणि आजा समजला तोच खरा कोकणी माणूस. आज्याने आंबा लावला पण तो नातवासाठी.(निस्वार्थीपणा)याचीच खरी गरज आहे. तरुण-तरुणीबद्लचे मत योग्यच आहे.❤❤❤❤❤❤❤❤
मुंबई मध्ये मराठी माणूस अक्षरशः थर्डक्लास जीवन जगतोय.... आणि कोकणात राहणाऱ्या मुलींना मुंबई मध्ये राहणारा च मुलगा हवाय...... कश्याला हा हट्टाहास... पोरखेळ झालाय आयुष्याचा....
कोकण ची हळू हळू मुंबई होते आहे, सगळीकडे परप्रांतीय घुसले आहेत, अताच यांना हकलवल पाहिजे नाहीतर आपणच आपल्याच राज्यात परप्रांतीय होऊ. जास्तीत जास्त मराठी मध्ये बोला. पुढच्या पिढीला आपल्या भाषेची गोडी लावा.
पण कोकणातील लोकांना मराठी पेक्षा हिंदीच जास्त आवडते...
आणी परप्रांतीय लोक कोकणी आणी देशस्थ लोकांमध्ये भांडणे लावून देतात...
@@Kattarmaratha250 फक्त कोकणातील नाही तर बहुतेक मराठी लोक हिंदी मध्ये बोलतात, जरी समोरचा मराठी बोलत असला तरी.आणि याचेच परिणाम की भविष्यात मराठी माणूस आणि मराठी भाषा इतिहास जमा होईल.
@@ganeshredkar5383 मी काही काळ मुंबई वास्तव्यास होतो नोकरी म्हणून पण मन रमत नसल्याने आणि वडील एकसपायर झाल्याने घरी शेतजमीन असल्याने घरी लक्ष द्यायला कुणी नव्हते म्हणून गावी यावे लागले....
मी वाशी मध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीस होतो आणि माझा सोबत अजून एक सुपरवायझर होते ते सिंधुदुर्ग जिल्हातील होते पण नेहमी हिंदीच बोलत असायचे आणि अजून एक पेन रहिवासी आगरी कोळी होते त्यांना पण हिंदीतच बोलायची सवय जास्त होती पण माझासोबत नेहमी मराठीतच बोलायचे कारण समोरचा कितीही हिंदीत बोलला तरीही मी त्याचे उत्तर हिंदीतच द्यायचा.....
आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचा एक mng होता उतर भारतीय तो मराठी बोलायला शिकला फक्त माझासोबत राहून...
तोडकी मोडकी का होईना...
मी तीन वर्षे नोकरी केली...आता ती कम्पनी बंद पडली आहे....
काल परवा एक व्हिडिओ पाहिला हुंब्रट मधला , तिथे एक परप्रांतीय मागील पंधरा वीस वर्ष खारी बटर विकतोय, अगदी थोडी फार मालवणी सुध्दा बोलत होता तो.
@@krishnanarsale7138 याला जबाबदार आपलीच कोकणी माणस आहेत.
प्रसाद तू एकदम खरं बोलतोस, मी ही मुंबईतील नोकरी आणि घर सोडून कवकरच माझ्या गावी कायम चे राहायला जाणार आहे,मुबई मधील जीवन खूप धावपळीची आहे.स्वतःसाठी जगण्यासाठी आपला गाव बरा.
भाऊ बन्दकी पण एक कारण आहे....तू घरा चे देखभाल खर्च पहाय चा की मी....ह्या वादात जाऊ दे मग विकुन च टाकू.....घरोघरी माती च्या चुली
🙏 अगदी बरोबर प्रसाद दादा कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची शान आहे कोकण जसा आहे तसाच जपला पाहिजे जर कोकणमध्ये डेव्हलपमेंट झाल तर निसर्गाशी छेडझाड होण्याचे प्रकार आहे विकासाच्या नावाखाली 🌴झाडे व जंगल नष्ट करून काहीही उपयोग होणार नाही असे जर झाल्यास पावसाचे प्रमाण खुप कमी होणार हे निश्चित. म्हणून 🌴🌴🌴🌳🌺🌻☘️🌲🌱🌧️🌧️ निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,😊❤
आता गवचांना गाडी बंगला ची आस लागलीय, त्यांना शेणाने सारवलेली जमीन नको झालिये. सामान्य माणूस हरवला आहे
दादा तुझ बरोबर आहे पण आपला सुंदर कोकण राजकीय लोक संपवणार
अरे दादा तुला मला हव आहे आपल कोकण ..पण आज्यच्या तरुण तरुणींना नकोय कोकण काय सांगणार ह्यांना कस सांगणार..जपा रे आपल कोकण जपा..सगळ आहे आपल्या कोकणात फक्त एकदा नीट बगा लक्ष द्या ...नका विकू आपल्या जमिनी विनिती आहे तुम्हाला ❤❤हा जो व्हिडिओ बनवतो ...का तर त्याला पैसे भेटतात म्हणून नाही तर त्याला. खरचं वाटत आपल कोकण टिकाव...plz विचार बदला आपल कोकण वाचवा..
अगदी बरोबर
प्रसाद तु नेहमी आपल्या कोकणा बद्दल जीव तोडून बोलत असतो.तरूण पिढीला आपल्या कोकणाबददल जागरूक करत आहेस देव तुझ्या कार्याला नक्की यश देणारच आहे.आणि आपल्या कोकणातील तरूण नक्की याचा विचार करेल अशी आशा करूया आणि आपण आपले कोकण वाचवण्यात यशस्वी होऊ
🙏🏻 तुमच्या सारख्या अशा प्रबोधनाची गरज आहे
संपूर्ण कोकण ecosensitive zone होणं गरजेचं आहे
कित्येक कोकणी माणसानी utube वर कोकण विकायला काढलाय
कोकणी माणसा सावध हो आपल्या पूर्वजांच्या जमिनी कवडीमोलाने विकू नका परत जमीन घेणं शक्य होणार नाही 🙏🏻 श्री स्वामी समर्थ
प्रसाद तुम्ही खरं बोलताय पण याला जबाबदार आपला मराठी माणूस एक दिवस कदाचित असाही येईल मराठी माणूस आपलं अस्तित्वच संपवेल केवळ कोकणच नव्हेच तर मुंबईसारख्या शहरात ही मराठी माणसाचे अस्तित्व संपूष्टात आले आहे
परप्रांतीय पळवा कोकण वाचवा
बरोबर आहे तुम्ही थोड्या पैशाच्या साठी जमीन विकु नका उद्या तुम्हाला फायदेशीर आहे नाहीतर मुंबई पुणे सारखी तुमची आवस्ता होईल कोकण ऊद्या गोव्या पेक्षा भारी होईल नाहीतर तुम्हाला परराज्यातुन आल्या सारख तुमची आवस्ता होईल आताच विचार करावा
प्रसाद गावडे यांचा अभ्यास खूप मोठा आहे
असेच काम करत रहा प्रसाद नक्कीच
आपल्या यश येईल
सरकारने विकासाची व्याख्या आता तरी बदलायची गरज आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग ची गंभीर परिस्थिती आज जगासमोर का आहे याचा विचार होणे गरजेचे आहे
अरे भावा ही समस्या फक्त कोकणातच नव्हे तर सम्पूर्ण राज्यात चालू आहे...
आणी मी तर मराठा समाजातील आहे माझे वय 31 झाले आहे पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात राहतो आधी मुंबईला होतो पण नोकरी करायला मनाला पटत नव्हते त्यात वडील एकसपायर झाले आणी मग गावी आलो शेति-दुग्ध व्यवसाय करू लागलो आज कित्येक दलाल (लग्न जमवणारे लोक) यांना पैसे देवूनही मुली दाखवत नाहीत...
मुलींचा अपेक्षा फक्त मुलगा शहरात राहणारा असावा आणी तो नोकरदार असावा.
किंवा शासकीय नोकरीत असावा.
घरी जमीन बंगला शहरात फ्लॅट असावा मुलगा सुशिक्षित असावा मग तो व्यसनी पण चालतो काहींना....
वर्षाला 16/17 लाख कमावून सुद्धा आम्हाला आमच्याच भागातील लोक मुली देत नाहीत....😢😢😢
भावा तुझी इन्कम तर खूप छान आहे तरी सुद्धा तुला लग्न जमण्यास अडचण येते आहे हे ऐकुन आश्चर्य वाटले ...हल्ली शेतकऱ्याला आणि गावाकडे वास्तव्यास असणाऱ्या तरुणांना ना योग्य आदर दिला जातो ना लग्ना साठी मुलगी दिली जाते , अत्यंत निकृष्ट दर्जाची वागणूक मिळते....दादा एक प्रश्न होता, शेती आणि दुग्ध व्यवसाय परवडतो का रे ??? कारण प्रत्येक शेतकरी नेहमीच शेती व्यवसायाबद्दल तक्रार करत असतो... त्या अनुषंगाने तुमची स्थिती चांगली आहे , बहुतेक आपल्याकडे शेतजमीन भरपूर असेल .... पुढील वाटचालीस शुभेच्छा❤तुमचं गाव आणि जिल्हा जाणून घ्यायला आवडेल
@@MarcusA6583 दूध व्यवसाय तेव्हाच परवडतो जेव्हा तुम्ही ओपन गोठा पद्धत वापरलं आणि गायी पण अश्या घ्याव्या लागतील ज्या दिवसाला कमीत कमी 20लिटर दूध देतील तरच हा व्यवसाय करणं सुधा सोप्प जाईल आणि चांगला encome पण होईल...आणि शेती परवडण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या जमिनीचा सुपीकता वाढवण खूप गरजेचे आहे त्यासाठी रासायनिक खाते वापरण बंद करून सेंद्रिय खत वापरावे व ज्या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते अशी पिके घेणे गरजेचे आहे उदा- कापूस, कांदा, ताग. याच्यामुळे तुमचे उत्पन्नात वाढ होईल...तसेच पिकाचा योग्य भाव मिळवायचा असेल तर योग्य वेळेला योग्य पीक घेणं खूप महत्त्वाचं असतं..तसेच पीक घेताना योग्य पद्धतीचा वापर करन या सर्व गोष्टींचं अभ्यास करून जर शेती केली तर नक्कीच आपल्याला शेतीतून पण चांगला फायदा होऊ शकतो
Sagla parwadat fakt karta ala pahije aplyala saway Kasi ahe mahiti ahe ka 2 masi gheyachya Ani 1nawkar manus laun gheyacha mag kasa parwadanar saglach karta ala pahije mansala sen kadta hi ala pahije Ani te wikata hi ala pahije tyat khara skill asta Ani khup motha rocket science nahi lagat apan Kay karto yala nahi jamla mala Jamel ka loss madhe Gela tar Kay hoil lok Kay mantil ...ha wichar kart basla na kahich nahi honar bhau doodh kada sen kada imandarine te quality product yoge darat vika kiwa anki kahi Kara Kam Kara jaga ugich pawadta ka nahi doodhache pocket chi Kay quality milk aste ka aj lokho lit milk pouch sell hotat tyana parwadata mg Yana ka nahi parwadat
Anki 1 gost sangto Apan kadi marnar he apnala mahit nahi Ani Puna ya planet wrti yenar nahi he nakki je Kay karaycha te Anand gheun kart Raha enjoy the life......we not born here again and again..life gets once
@@mauliadmane409 अगदी योग्य बोललास भावा ... मी पूर्णपणे सहमत आहे ...कोणताही व्यवसाय / काम असेल तर आपण स्वतःहून त्यात उतरून केलं पाहिजे तरच ते परवडते ...🙏
प्रसाद भाई एकदम बरोबर आहे तुझ येणाऱ्या पुढील पिढीला शेती करणे हे गरजेचे असेल फुढे येणाऱ्या नवीन पिढीला शेती करावी लागेल
( मला पण असं वाटत की कोकण वासिय हो की तुम्ही तुमची जमीन बाहेरच्या माणसांना विकू नका
जमीन कोणी स्वतः च्या मर्जीने विकत आहे पैसा मिळवण्यासाठी तर कुणी परिस्थितीला कंटाळून जमीन विकत आहे,तर कुणी शिक्षणासाठी, विषय असा आहे की वेळेनुसार जे घडणार आहे ते घडणारच....नोकऱ्या नाही आहेत,शेतकरी शेती सोडून नोकरी मिळवत आहे ...का,कारण की महागाई झाल्या मुळे मजुरी वाडली, नवीन पिढी शहरी कामाला...शेती करणार कोण ,गाव वाचवणार कोण, गाव हे फक्त फिरण्यासाठी पण काम मात्र शून्य...काही वर्ष पाहिलं तर कोकण फक्त म्हाताऱ्या माणसांनीच भरलेलं दिसेल, शेती न करण्याचं मुख्य कारण म्हणजे रेशन स्वस्त भेटत आहे लोकांना जमिनी पडीक राहिल्या मग अश्या जमिनी ठेवून करणार तरी काय म्हणून मोठ्या लोकांना ते विकतात .... मी गुहागर चा , रत्नागिरी जिल्ह्यात जयगड ठिकाणी JSW जिंदाल कंपनी ने पूर्ण डोंगर विकत घेतला ....
दादा आपली कमेंट वाचून निराश झालो, परंतु हेच सत्य आहे ... कारण अताची आधुनिक पोधी शेती कडे किंवा गावाकडे अत्यंत हिन दृष्टी ने पाहते , शेतकऱ्याला कोणीही आदर देत नाही , तरुण शेतकऱ्यांना कोणताही बाप लग्नासाठी मुलगी देत नाही , गवगड्यात अत्यंत उदासीनता आहे ...मूलतः गावात राहून आपला आर्थिक आणि वैचारिक विकास होय नाही कारण तिथले वातावरण तसे नसते ,म्हणून लोक शहरात वळत असतात... आताच्या काळात तर बेरोजगारीचा प्रमाण सुद्धा खूप वाढले आहे , गावातील तरुणांनी दुहेरी गळचेपी झालेली आहेत ... परिस्थिती खूप वाईट आहे .... काही दिवसांनी गाव ओस पडली तर नवल वाटायला नको😢
खूपच छान मित्रा
कोकण म्हणजे स्वर्गच
खू..प छान साद घातलीय आपण!!!
आपली तळमळ प्रत्येक कोकणी माणसाने जपानी,तरच कोकण वाचेल !🙏🙏येवा कोकण आपलाच असा!!!👍👍👌👌
खरंच प्रसाद दादा आपलाच कोंकण वाचवायला हवे आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🥭🍍🍉🥥🌽🐟🐬🦐🙏🙏🙏🙏🙏
आपण अगदी मूलभूत प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहेत.
कडक कायदे करण्याची गरज आहे,जमीनी पर राज्यातील लोकांना विकण्यास बंदी केली पाहिजे तसे कायदे व्हायला पाहिजेत तरच काही तरी फरक पडेल.नुसती आंदोलनं आणि उपोषण करुन ह्या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्यांना काही फरक पडणार नाही.मुंब ई आधी कोकणच होत
खरं बोलतोय प्रसाद
हि काळाची गरज आहे
I'm from sawantawadi...and will support Prasad always...
काही जण रीलस बनऊन जमीन विकत आहेत.
खूप सुंदर आणि प्रमाणिक विचार आहे तुझे प्रसाद. देव तुझ्या प्रयत्नांना यश देवो.
विकासच्या नावाने कोकण बरबाद होईल कृपया कोकण वाचवा.
Barbad honar nahi prakalp aale pahije pan jamini viku naka
@@siddhantsawant5717 प्रकल्प म्हणजे कारखाने येतील सर्व वातावरण खराब होईल जंगल तोड होईल. परप्रांतीय लोंडे येतील गुन्हेगारी वाढेल.
अतिशय छान.. महत्त्वपूर्ण माहिती.
कोकण दरिद्री म्हणते कोण..
छे छे ती सुंदर सोन्याची खाण
लोकांना समजवून सुद्धा समजत नाही, 😢
कारणं आणि सल्ले सर्व देतात. इथे प्रत्यक्ष काम करून अनुभव घेणं आवश्यक आहे. सल्ले त्यांचे ऐका जे स्वतः कोकणात काम करत आहेत.
सत्य त्रिकालाबाधित सत्य.
EK NUMBER SANGITAL DADA
भाऊ कदाचित मी मरताना डोळ्यात हेच मला काम करायचे होते अशी अपूर्ण इच्छा ठेवून मेलो असतो आणि पुढच्या जन्मी माझे हे तु करीत असलेले काम मला करावे लागले असते...पण "याचि देही याचि डोळा" धन्य झालो. अगदी माझ्या विचाराची पूर्ण कॉपी आहेस तु!! मी जे लहानपणापासून स्वप्न पाहिलं ते तू प्रत्यक्षात पूर्ण करीत आहेस. आता मला दुसरा जन्म हे काम हाती घ्यावे लागणार नाही. उलट आता गावापेक्षा कोकणात जन्म घेऊन हे old is gold जीवन जगायचे आहे मस्त!!
खुप खुप धन्यवाद प्रसाद सर
प्रसाद सर तुमचे प्रत्येक video मनाला touch करून जातात खरच शहरी भागात खुप developmenent होतंय plus pollution तर लिमिट च्या बाहेर वाढतंय in future pollution ला त्रासून मुंबई कर कोकणात परतील जी निसर्ग प्रेमी आहे
प्रसाद खुप चांगले काम करत आहेस कोकणात जाग्रुती झाली च पाहिजे.
Bhava no jamini viku nka tya jaminit kahitri rojgar nirman kra.
Khoopach sunder vichar aahet salam prasad.
कोकण म्हणजे स्वर्ग , आपल्या कोकणातल्या लोकांना काय वेड लागले आहे ते त्यांचे त्यांनाच माहीत, आपल्या वाडवडीलानी जपलेली हि कोकणातली सोन्यासारखी जमीन कवडीमोल भावाने विकून परप्रांतियांना कोकणात शिरकाव करू देवू नका प्रसाद दादा please तु काहीतरी कर एकदा का हे परप्रांतीय कोकणात आले तर कोकणाची वाट लावतील
Khar ahe❤
Khupch chan कोकणी माणूस
मस्त दादा खूप छान विचार आहेत तुझे ....❤
🎉🎉 अगदी छान विचार प्रसाद 👍🏼👍🏼
खरा राखणदार ❤😢👌
.अप्रतिम वर्णन
Khar aahe....kokan vasiyanich kokan aaplya hatat theunch ,, kokan vachavale pahije.
Very nice we are with you
बरोबर अप्रतिम व्हिडिओ
dada khup Sundar Vichar , Keep up the Good Work
Pprasad sir je boltata te barobar aahe 👍👍
Prasad sir tumchya ya Kamala Yash Milo❤❤❤
आज मुंबईची परिस्थिती आहे तीच कोकणाची होईल असं होऊ देऊ नका मुंबई मराठी माणस कमी परप्रांतीय जास्त झाले आज राजसारखं जगतायत जर प्रसादच म्हणणं ऐकलं नाही तर हेच होईल
Dada you are great 👑❤️🙌 love you so much....🙏🙏
गावा सारखा जिवन जगाला नवीन पिढीला जगायला आवडत नाही. शेती करायला आवडत नाही. आपल्या आजोबानी वडलांनी शेतीवरच आयुष्य काढले. मला वाटते शेती करावी, कावळारू घर असावी असे वाटते. आम्ही जमिनी विकल्या. आणि आम्हाला प्रदूषण मिळालले. गाव राहिलाच नाही. सिडकोन ने जमीनी घेतल्या आणि कंपनी चे प्रोजेक्ट आले. पण त्याच कंपन्या बंद पडत आहेत. जागा विकू नका 🙏🏾
खूप खूप छान विचार प्रसादसर🎉❤
रायगड ची सत्य परिस्थिती आहे.
किती पोट तिडकीने सांगतोय पण तर तरळे गावं अश्या बऱ्याच लोकांना धरणात जमिनी जाणारं आणि त्यांचे पैसे मिळणारं याचीच वाट बघत आहेत . आवाज अप्रतिम सांगण्याची पद्धत आणि भाषेतील शुद्धता एकदम छान 👌👌
प्रत्येक कोंकणी माणसाचा आवाज प्रसाद गावडे
खूप छान भावा
barober bolatos mitra.Nice information given you.
ज्यांच्याकडे पैसे नाही ज्यांच्या मुलांना शिक्षण द्यायचे आहे नोकरी नाही असे लोकं जमिनी विकतात कोणालाही स्वतःहून इच्छा नसते जमीन विकायची.
Bhari dada 👍👍
Perfect. Outstanding. Superb. Prasad. You are the best.
कोकण हे स्वर्ग आहे त्याला स्वर्गा सारखे जपा.
Great sir ❤
कोकणात परप्रांतीय घुसून मूळ कोकणी माणसे
देशोधडीला लागणार आहे. ही सुरुवात झालेली आहे. कृपया कोकणी माणसाने परप्रांतियांना जागा विकू नये. तुम्ही उत्तरप्रदेश बिहार येथे जावून जागा विकत घेऊन दाखवा. तुम्हाला तेथे उभे करणार नाहीत. अगदीच गरज असेल तर फक्त कोकणी माणसांना विका.
We are support with you
माझा ता माझा आणि तुझा ता सुध्दा माझा, हा स्वार्थी भाव,आपमतलबीपणा सोडून एक होणे गरजेचे आहे.
बरोबर आहे.
14:
अगदी बरोबर
Tuj kharch prasad . Mi 2013 pasun mi n chukata mi kokanachya preamat padlo ahe mi tya pasun maji moti family gheun yet ahe, maji family pan khup preamat padali ahe, maje sagle Mebar dar barshi kokanat janeyashthi khup utukuk ahe , koan manje 1 sorge age. Mi marathavadhya ek putra ahe . Yave kokan apalch asawa. Prasad i love y
❤❤❤❤❤❤
छान खरच सर्वांनी याचा विचार केला पाहिजे.
कोकण वाचवा
निसर्ग वाचवा
Dada proud of you😢
प्रसाद sar खूप छान कार्य तुमचं
❤❤❤❤
Aata sagle ho ho boltil comment kartil pan shevti lagna karayla mumbai la job la jave lagel 😅
💯
बरोबर आहे
Well said Prasad
सगळय यूट्युबवर मराठी हे सांगायलाच पाहीजे
Tyana evdyat jaag yenar nahi
विकासाच्या नावाखाली प्रत्येक राजकारणी लोक स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत वेळीच जागे व्हा. कृपया कोकण वाचवा❤🙏🙏🙏🙏😢
👌👌
ही परिस्थिती सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक खेड्यात आहे, गाव ही गावांसारखी राहू द्या ,त्यांच शहरीकरण करू नका, गावात एक दोन महिने खिशात पैसे नसताना चांगलं राहू शकता पण शहरात एक आठवडा सुद्धा बिगर पैशाचे राहू शकत नाही, वाढत शहरीकरण म्हणजे, कमवा, कमवा, कमवा, कमवा, आणि मरा ,मग जाळायला गावाला
एकदम योग्य बोललास दादा❤
थोडं थांबा❤, माणूसच पृथ्वी नष्ट करत चालला आहे,माझा नातू च नष्ट होणार नाही तर सजीव सृष्टी रहाणार नाही ❤
Yes, You are right 100%
❤
Barobar aahe chan hya mhahitine kakani mansane aaplya aacharnat aanave
You are true
स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागत .. स्वर्ग पाहिजे तर काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे ..पण त्यासाठी तयार मात्र कोण नाही