साक्री हा शब्द ऐकला की आम्हाला सतीश दादाच्या सासरवाडी ची आठवण झाली आणि प्रत्यक्षात त्यांच्या सासूबाई दिसल्या तुम्ही त्यांच्याच घरी गेलात छान वाटले🙏🏻🙏🏻🙏🏻
शक्यतोवर गावातील लोक कीती याची माहीती देवू नका सर्व युट्यूबर्सना विनंती भविष्यात याचा त्रास गावातील लोकांना होवू शकतो(दरोडेखोरांना आयत कोलीत)विडिओ त विचार छान मांडलेत,धन्यवाद
मित्रा फार छान माहिती दिलीस. तुझी तळमळ माझ्यासारखीच आहे शेवटी हे सर्व गावच्या तरून मुलानी गंभिरतेने मनावर घेतले पाहिजे. कोकणात एवढे नैसर्गीक रिसोर्सेस आहेत त्याचा ऊपयोग करून घेत नाहीत. सरकारच्या योजना आहेत त्याचा आपण पुरेपूर लाभ घेत नाहीत. सरकारच जबाबदार आहे हे बोलणे चुकिचे आहे. आपणच सरकार आहोत. वरिष्ठ नागरीक बैल बांधताना आपल्याला त्याची शरम वाटते. या पासून कोकण तरूणाने बोध घ्यावा.साखरी गावच्या प्रत्येक घराला भेट आणि त्यांच्याशी आपुलकिचा संवाद ला सलाम.
गावाचा विकास होणे खूप गरजेचे आहे.. त्यासाठी सरकार कडून योजनांचा लाभ घेता आला पाहिजे. अनेक प्रकारचे निधी सरकार कडून दिले जातायेत फक्त ते मंजूर करून आणण्यासाठी तेथील स्थानिकांनी प्रयत्न केले पाहिजेत..
मस्त व्हिडिओ बनवला आहे.पण आज कोकणातल्या सर्व गावाची हिच स्तिथी आहे.सर्व जण रोजगारासाठी शहरात जात आहेत.शेती सोडून दिली आहे कारण मजूर आणी मजुरी मिळत नाहीत.
कोकणातील जवळपास 80 टक्के गावात सध्या हीच परिस्थिती पहायला भेटते . हे विदारक चित्र पाहून मनाला खूपच वेदना होतात .सर तुम्ही प्रत्यक्ष वास्तव दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलात. हे चित्र आपण बदलू शकतो का?
व्हिडिओ सुंदर आहे,निसर्ग,गाव,वयोवृद्ध लोक सर्व काही चांगले वाटले, बंद घरे, विध्यार्थी विना शाळा, बालवाडी पाहून वैषम्य,उदास वाटले.कृषी पर्यटनाला निश्चितच वाव आहे.
खूप छान माहिती दिलीत. गाव खूप छान आहे. पण गावात माणसे नाहीत ही शोकांतिका आहे. भविष्यात याही पेक्षा भयानक परिस्थिती असेल. एकटी माणसे बघून खूप वाईट वाटले. डोळ्यात पाणी आले. वास्तव दाखवले त्याबद्दल धन्यवाद.
छान आणि मार्मिक भाष्य केले आहे गावचा विकास हा कोकणात फळ बागेतून होतो जागा विकण्यापेक्षा आंबा, काजू अशा फळझाडांची बाग करावी.. काजूचे उत्पन्न आंब्या पेक्षा जास्त आहे, टिकाऊ आहे, मागणी खूप आहे, दहा वर्षं लागतील पण पुढील चाळीस पन्नास वर्षे सुबत्ता येईल. आपल्या जागेत आपण रोजगार निर्माण करु शकतो. सरकारी योजनांचा पूरेपूर लाभ घेऊ शकतो. जागेचे कुंपणावर सागवान झाडे लावली तर २० वर्षांनी पेंशन सुरु झाली म्हणून समजा त्यासाठी मेहनत फारच कमी आहे. वणव्या पासून संरक्षण त्यासाठी प्रबोधन केले पाहिजे युवा पिढी ने आता कामातून पाऊस सुरू होताना थोडा वेळ काढून प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद 🙏
आपण आपली धडपड मांडली. बघून गाव मला खूप वाईट वाटते. चाळीस वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. आज हे भयाण वास्तवकोकणी लोकांना दाखवलंय. मन भरून आले आणि भीती वाटते की हे वीडियो कोकणात ल्या ऐवजी स्वार्थी लोकांनी
दादा प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे.. याला कारणीभूत आपले नेते आहेत.कारण गावी रोजगार नाही.त्या पेक्षा कारणीभूत कोण असेल तर मुलगी आणि त्या मुलीचे आई वडील कारण आज बघितलं तर प्रत्येक मुलीला मुंबई ला राहणारा मुलगा पाहिजे म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे...अजून 5 वर्षांनी एक ही माणूस गावात दिसणार नाही संपूर्ण गाव वसाड पडणार..जशी शेती वसाड पडली आहे
सरकारने अश्या गावामध्ये काहीतरी व्यवसाय सुरु करून दिला पाहिजे.... म्हणजे तरुण वर्ग गाव सोडून मुंबई /पुण्याला जाणार नाही...... कोकणात प्रत्येक गाव असेच आहेत..... गणपती आणि शिमगा. या सणाला.. फक्त गाव आहे.... असे वाटते...... खूप वाईट वाटते असे बघून....... मला वाटते येणाऱ्या पिढीला गाव कसे असते हे गोष्टी तुन सांगावे लागणार 😥😥
आमच्या गावात दीडशे घरे आहेत आणि गावात मनसे बावीस आहेत कारण रोजगार नाही रस्ते पाणी या सगळ्या समस्या कोण येईल गावात परत कधी कोरोना सारखा काय तरी येईल तेव्हा सगळे धावतील गावात
सतीश ने पण कधी या गावचा असा व्हिडिओ बनवला नाहीं.. तो फक्त आपल्या कामासाठी सासूला भेटायला येतो अणि त्याचाच व्हिडीओ बनुन टाकतो आणि लोक पण चुतीया सारखी बघतात.. तो एकाचे दोन दिवस व्हिडिओ बनवतो हवऱ्यासरखें.. तू कशी छान माहिती दिलीस त्या गावची..,👍
मित्रा खूप शान व्हिडिओ आहे आणि तो माझ्या गावचा आहे पण करायचं आम्हाला कुठे वाटतो गाव सोडून शहरात राहावं पण विलाज नाही आपल्या कोकणामध्ये काही व्यवसाय नसल्यामुळे व मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून मुंबई सारख्या शहरामध्ये जाव लागतं 😂😂
मित्रा फारच छान माहिती दिली आहे. मी पण कोकणात मंडणगड वेसवी ला रहाणारा आहे. आमच्या बाणकोट बागमांडला येथील खाडीवर चा bridge च पण काम बरेच वर्षे अर्धवट सोडून दिले आहे. मित्रा असेच गावचे video बनवून सर्वांना आणि सरकारला पण जागृत करणे जेणेकरून गावात रोजगार उपलब्ध उपलब्ध होऊ शकेल. धन्यवाद 🙏💐 मुंबई
दादा विडिओ खूप छान आहे एवढा मोठा गाव असुन बत्तीस लोकसंख्या लहान मुले नाही, अंगणवाडी बंद , सुसज्ज सुंदर शाळा मात्र 0पटसंख्या कमाल आहे.s for Satish या यु टुपरची सासुरवाडी, त्यांच्या सासुबाईने तुम्हाला पाणी दिले.खुप छान माहिती मिळाली. मी पालघरचा.
माझे पण गाव मंडणगड तालुक्यात कातळ कोंड ही छोटीशी वाडी आहे. तिथे पण हीच परिस्थिती आहे. या वाडीत काय घडलं तर आम्हाला मुंबई वरून गावाला याला लागतो. मोलमजुरी काही नाही. एसटी नाही. रस्ता खूप खराब आहे. दादा तुम्ही एकदा एक विजिट द्या. 20:18
सरकारने ब्रीज बांधला पाहिजे हे खर आहे तुम्ही सार्वांनी त्यासाठी प्रयत्नशील रहा कोकण हा कॅलिफोर्निया होईन खुप छान निसर्ग सौदर्य आहे समुद्र किनारा आहे पर्यटकांची घरगुती राहण्याची खाण्याची सोय होईल गावातील युवकांनी प्रयत्न कर .. चांगने विचार तर नेहमीच करा विचारांचे सामर्थ मोठे असत एक दिवस तुमता गाव पर्यटक स्थळ होईल
Mitra Khup chaan video banavlaas ani Koti molachi mahiti dili ani tuzya hya kaamaalaa manapasun salaam ani koknatil pratek tarun mulani Khup kahi shiknyasarkhe ahe hya kokan dev bhumi sathi
मी नाशिक वरून आहे जे तरूण रोजगार साठी मुंबईला गेले आहे त्यांना पन म्हातारे झाले का गावी यावे लागेल त्यांनी आताच गावी सोईसुविधा करून ठेवली पाहिजे ७००जनांनी एक मुखाने मागणी केली तर एक नेटवर्क टावर मिळेल अशी अनेक उपक्रम राबविले जाऊ शकतो
खूप छान व्हिडिओ दादा आणि तुज्यासोबत त्या काकांनी पण खूप छान मार्गदर्शन केल. खरोखर रोजगार अपलब्ध व्हायला पाहिजे गावी.खरच छान संदेश भेटला या व्हिडिओ च्या माध्यमानेने 🎉🎉
Tumhi lok kiti varsh zale tyacha lokana nivdun deta kasa vikas hoel jara navin pidhi ani shikshan zalel yana sandhi dili tr kharj vikas hoel pahje tasa
कोकणात MIDC परिसरातील ज्यांना रोजगार आहे गाव ते गाव गजबजलेली आहेत. पण काही गावात रोजगार नाही तिथला तरुण 10 वर्ष पूर्वी गाव सोडून शहराकडे गेलाय. त्यामुळे गावात आता शेवटची पिढी आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक तरुणाला विनंती आहे. खर तर खूप उशिरा झालाय... पण वेळ अजून ही हातात आहे. आपल्या गावाकडे लक्ष द्या. पूर्वजांच्या रुढी परंपरा याच जतन करा.... आपल्या वडिलधाऱ्या लोकांनी कोकणी परंपरा जतन केल्या म्हणून आपण गणपती शिमग्या जाऊन मज्जा करतो . जर आपण आज आपल्या परंपरा जतन नाही केल्या तर उद्याची पिढी आपल्या माफ करणार नाही... स्वतःच्या सन उत्सव रुढी परंपरा कोकणी माणसाच अस्तित्व जपा...
साक्री हा शब्द ऐकला की आम्हाला सतीश दादाच्या सासरवाडी ची आठवण झाली आणि प्रत्यक्षात त्यांच्या सासूबाई दिसल्या तुम्ही त्यांच्याच घरी गेलात छान वाटले🙏🏻🙏🏻🙏🏻
Same😊❤
मी पण सतीश दादांचे विडीओ बघतो छान वाटलं
same
आंधळा
@@yashwanttawte1877आधंळा,का? हि कमेंट दिली विश्वनाथ भाऊ😮
खरे श्रीमंत तुम्ही कोकणी मालवणी लोकच आहात. गावची इतकी मोठमोठी घर सोडून मुंबई मधे तुमचं विश्व शून्यातून निर्माण करतात. Salute आहे तुम्हाला
एकदम बरोबर बोईर भाऊ ❤
शक्यतोवर गावातील लोक कीती याची माहीती देवू नका सर्व युट्यूबर्सना विनंती भविष्यात याचा त्रास गावातील लोकांना होवू शकतो(दरोडेखोरांना आयत कोलीत)विडिओ त विचार छान मांडलेत,धन्यवाद
बरोबर.
मनातील गोष्ट बोलला....
Ayat kolit.... Kharach ki.
मग या परत आपल्या गावी,बोलणे सोफ आहे पण करन...
आता दरोडा टाकलाच पाहिजे राव... आंबे, फणस... लुटायला येऊ... पैसे देवोन.. चोरून नव्हे...
मित्रा फार छान माहिती दिलीस. तुझी तळमळ माझ्यासारखीच आहे शेवटी हे सर्व गावच्या तरून मुलानी गंभिरतेने मनावर घेतले पाहिजे. कोकणात एवढे नैसर्गीक रिसोर्सेस आहेत त्याचा ऊपयोग करून घेत नाहीत. सरकारच्या योजना आहेत त्याचा आपण पुरेपूर लाभ घेत नाहीत. सरकारच जबाबदार आहे हे बोलणे चुकिचे आहे. आपणच सरकार आहोत. वरिष्ठ नागरीक बैल बांधताना आपल्याला त्याची शरम वाटते. या पासून कोकण तरूणाने बोध घ्यावा.साखरी गावच्या प्रत्येक घराला भेट आणि त्यांच्याशी आपुलकिचा संवाद ला सलाम.
🙏
Best of luck दादा, निदान आता तरी हा व्हिडिओ पाहून सरकार चे डोळे उघडायला पाहिजे, आणि तिथे काही सुधारणा व्हायला पाहिजे 👍👌
गावाचा विकास होणे खूप गरजेचे आहे.. त्यासाठी सरकार कडून योजनांचा लाभ घेता आला पाहिजे. अनेक प्रकारचे निधी सरकार कडून दिले जातायेत फक्त ते मंजूर करून आणण्यासाठी तेथील स्थानिकांनी प्रयत्न केले पाहिजेत..
मस्त व्हिडिओ बनवला आहे.पण आज कोकणातल्या सर्व गावाची हिच स्तिथी आहे.सर्व जण रोजगारासाठी शहरात जात आहेत.शेती सोडून दिली आहे कारण मजूर आणी मजुरी मिळत नाहीत.
कोकणातल्या गावाची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटले.😢😢 .S फॉर सतीश. व तुझ्या सारख्या तरुणांनी सरकार कडे पाठपुरावा करावा.
तुझी साखरी गावातील भटकंती पहिली, आनंद वाटला. तुला भावी प्रवासासाठी शुभेच्छा🌟🙏🏾.
- राम जोशी, पुणे
Thank you 🙏
कोकणातील जवळपास 80 टक्के गावात सध्या हीच परिस्थिती पहायला भेटते . हे विदारक चित्र पाहून मनाला खूपच वेदना होतात .सर तुम्ही प्रत्यक्ष वास्तव दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलात. हे चित्र आपण बदलू शकतो का?
व्हिडिओ सुंदर आहे,निसर्ग,गाव,वयोवृद्ध लोक सर्व काही चांगले वाटले, बंद घरे, विध्यार्थी विना शाळा, बालवाडी पाहून वैषम्य,उदास वाटले.कृषी पर्यटनाला निश्चितच वाव आहे.
कोकणात उद्योग येऊं द्यायचे नाहीत,मग हे असेच होणार
खरच गावाला काही तरी रोजगारा साठी सर्वांनी प्रयत्न करा गाव ओस पडत चाललय मी रायगडजिल्ह्यातील आहे माझ्या पण गावा कडे हीच परस्थिती आहे
कोणते गाव
अरे व्यवसाय करणाऱ्याला भरपूर आहे पण कोंकणी आळशी आहे मुलांच्या शिक्षणासाठी हे पटत नाही कारण कोकण बोर्ड महाराष्ट्र राज्य मध्ये पहिला आहे
Yes correct 👌
हा व्हीङीओ ब्रीज साठी गडकरींना पाठवा ते निश्चित मार्ग काढताल
खूप छान माहिती दिलीत. गाव खूप छान आहे. पण गावात माणसे नाहीत ही शोकांतिका आहे. भविष्यात याही पेक्षा भयानक परिस्थिती असेल. एकटी माणसे बघून खूप वाईट वाटले. डोळ्यात पाणी आले. वास्तव दाखवले त्याबद्दल धन्यवाद.
दादा.तुम्ही शेवरे.या.गावचे.आहेत तुमची.गावदेवी.खुपच जागृत.देवस्थाना.आहे..खुपच छान विडिओ मस्तच जय.जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
छान आणि मार्मिक भाष्य केले आहे
गावचा विकास हा कोकणात फळ बागेतून होतो जागा विकण्यापेक्षा आंबा, काजू अशा फळझाडांची बाग करावी.. काजूचे उत्पन्न आंब्या पेक्षा जास्त आहे, टिकाऊ आहे, मागणी खूप आहे, दहा वर्षं लागतील पण पुढील चाळीस पन्नास वर्षे सुबत्ता येईल. आपल्या जागेत आपण रोजगार निर्माण करु शकतो. सरकारी योजनांचा पूरेपूर लाभ घेऊ शकतो. जागेचे कुंपणावर सागवान झाडे लावली तर २० वर्षांनी पेंशन सुरु झाली म्हणून समजा त्यासाठी मेहनत फारच कमी आहे. वणव्या पासून संरक्षण त्यासाठी प्रबोधन केले पाहिजे
युवा पिढी ने आता कामातून पाऊस सुरू होताना थोडा वेळ काढून प्रयत्न केले पाहिजेत.
धन्यवाद 🙏
सागवान लावुन २० वर्षांनी पेन्शन सुरू होते म्हणणारे ते लोक असतात ज्यांना शेतीतील काहीही कळत नाही.
@@रोशनब्राह्मण मला कळत ही नसेल मात्र मी माझ्या जमिनीत सागवान लागवडीचा प्रयोग केला आहे तो यशस्वी होईल अशी आशा आहे 🙏
आपण आपली धडपड मांडली. बघून गाव मला खूप वाईट वाटते. चाळीस वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. आज हे भयाण वास्तवकोकणी लोकांना दाखवलंय. मन भरून आले आणि भीती वाटते की हे वीडियो कोकणात ल्या ऐवजी स्वार्थी लोकांनी
दादा प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे.. याला कारणीभूत आपले नेते आहेत.कारण गावी रोजगार नाही.त्या पेक्षा कारणीभूत कोण असेल तर मुलगी आणि त्या मुलीचे आई वडील कारण आज बघितलं तर प्रत्येक मुलीला मुंबई ला राहणारा मुलगा पाहिजे म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे...अजून 5 वर्षांनी एक ही माणूस गावात दिसणार नाही संपूर्ण गाव वसाड पडणार..जशी शेती वसाड पडली आहे
खर आहे.
आता मुलींना शेतात काम करायला लाज वाटते
Karan purvi Sheti karun ghar chalavnya itpat utpanna milat hota pn ata mahagai vadhlya mule koknatlya too much limited Sheti chya besis vr sadhya chya mahagai madhye tikna kathin aahe tyamule loka shahart jataat.
@@vipultambe5294sarv gavat hich parastiti aahe
आमदार खासदार आपले कधीच विकास करू शकत नाही ते फक्त निवडणूक आली की गाव भेटीला येतील हे जनतेनेच लक्षात घेऊन आपण च आपला विकास करावा. याना मतदान करू नका.
Beautiful village.very peaceful n loving people.god bless u to show d village.
दादा तुझे विचार खूप छान आहे
लाजा सोडल्यात पार लोकांनी.
चांगली गाव सोडून. शहारा कडे चालेलत
परप्रांतीय इकडे येऊन मोठे झाले
आत्ता तरी डोळे उघडा..... धन्यवाद
केळशीला 2 वेळा जाऊन आलोय.. सुंदर गाव आहे. 👍👌💐
छान भावा चांगली माहिती दिली याला जबाबदार आपली सुक्षिसित लोक. भविष्यात आपल्या गावाची परिस्थीती वाईट असेल छान विडिओ बनवला आहे धन्यवाद.
कोकणामध्ये अशीच परिस्थिती आहे कोकणामध्ये रोजगार उपलब्ध करा मुंबई पुणे मध्ये जाणारी मुलं स्थलांतर थांबेल
सरकारने अश्या गावामध्ये काहीतरी व्यवसाय सुरु करून दिला पाहिजे.... म्हणजे तरुण वर्ग गाव सोडून मुंबई /पुण्याला जाणार नाही...... कोकणात प्रत्येक गाव असेच आहेत..... गणपती आणि शिमगा. या सणाला.. फक्त गाव आहे.... असे वाटते...... खूप वाईट वाटते असे बघून....... मला वाटते येणाऱ्या पिढीला गाव कसे असते हे गोष्टी तुन सांगावे लागणार 😥😥
आमच्या गावात दीडशे घरे आहेत आणि गावात मनसे बावीस आहेत कारण रोजगार नाही रस्ते पाणी या सगळ्या समस्या कोण येईल गावात परत कधी कोरोना सारखा काय तरी येईल तेव्हा सगळे धावतील गावात
कोणते गाव?
Shree swami Samarth ATI sunder mahiti Mitra
Very Nice Video Nice I formation Thanks
सतीश ने पण कधी या गावचा असा व्हिडिओ बनवला नाहीं.. तो फक्त आपल्या कामासाठी सासूला भेटायला येतो अणि त्याचाच व्हिडीओ बनुन टाकतो आणि लोक पण चुतीया सारखी बघतात.. तो एकाचे दोन दिवस व्हिडिओ बनवतो हवऱ्यासरखें.. तू कशी छान माहिती दिलीस त्या गावची..,👍
Khup chhan mahiti dilya baddal thankyou Mitra
मित्रा खूप शान व्हिडिओ आहे आणि तो माझ्या गावचा आहे पण करायचं आम्हाला कुठे वाटतो गाव सोडून शहरात राहावं पण विलाज नाही आपल्या कोकणामध्ये काही व्यवसाय नसल्यामुळे व मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून मुंबई सारख्या शहरामध्ये जाव लागतं 😂😂
Rane aahe to pryant tumcha vikas nahi honar
Pan aamhi oppose karnar new projects la .
कोकणात खूप आहे करायला तुमच्यात दम नाही कोकणांत व्यवसाय करायचा
Khup chan mitra,Ramakant Sakharar,Mumbai,vikhroli.
मित्रा फारच छान माहिती दिली आहे. मी पण कोकणात मंडणगड वेसवी ला रहाणारा आहे. आमच्या बाणकोट बागमांडला येथील खाडीवर चा bridge च पण काम बरेच वर्षे अर्धवट सोडून दिले आहे. मित्रा असेच गावचे video बनवून सर्वांना आणि सरकारला पण जागृत करणे जेणेकरून गावात रोजगार उपलब्ध उपलब्ध होऊ शकेल. धन्यवाद 🙏💐 मुंबई
कोकणात येणारे उद्योग हेच कोकणी लोक आंदोलन करून घालवतात,मग कसे उद्योग येणार कोकणात
निसर्गाला हानी पोहचेल असे प्रकल्प नकोत.
चांगले असतील तर नक्कीच स्वागत करू
@@aaplekokan-vinaymahadik1582 असा कोणताही उद्योग असु शकत नाही, तुम्ही मुंबई ला कामाला जा उगाच टेन्शन नको
कोकणात सर्वठिकाणी हीच अवस्था आहे. त्याला कोकणी माणूस जबाबदार आहे.
Pn hi paristhiti kokani mansa sathi changlich aahe. Karan gavat rahilyane mansachi mansikta vikasit hot nahi, vichar khupach narrow minded hotat, vishesh mhanje gramin bhagatle parents he hukumshahi vrutti chi astaat.
@@vipultambe5294 kharac ahe sahrat alyavar mansachi mansiktach vikshit hote te tuza bolnyarar kalte
Kharach ahe sharat rahun mansachi mansikta viksit hote te tuza coment varun kal..
छान माहिती, धन्यवाद!🙏🌷
खूप वाईट वाटले
इतकी छान घरं असताना लोकांची उणीव भासते शाळा अंगणवाडी इतकी सोय असताना.काय दुर्दैव.
S FOR SHATIS ची सासूरवाडी आहे साखरीला
खुप सुंदर छान माहिती दिली मित्रा
छान सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan mahiti Dili asich mahiti det ja God bless you
दादा विडिओ खूप छान आहे एवढा मोठा गाव असुन बत्तीस लोकसंख्या लहान मुले नाही, अंगणवाडी बंद , सुसज्ज सुंदर शाळा मात्र 0पटसंख्या कमाल आहे.s for Satish या यु टुपरची सासुरवाडी, त्यांच्या सासुबाईने तुम्हाला पाणी दिले.खुप छान माहिती मिळाली. मी पालघरचा.
खूप छान वाटले मित्रा
माझे पण गाव मंडणगड तालुक्यात कातळ कोंड ही छोटीशी वाडी आहे. तिथे पण हीच परिस्थिती आहे. या वाडीत काय घडलं तर आम्हाला मुंबई वरून गावाला याला लागतो. मोलमजुरी काही नाही. एसटी नाही. रस्ता खूप खराब आहे. दादा तुम्ही एकदा एक विजिट द्या. 20:18
नक्की येऊ
कातळकोंड कुठे आहे?
ही व्हिडिओ फिल्म स्टोरी नव्हे तर. कोकणातील वस्तुस्थिती आहे. ..भावा खरी वस्तस्थिती दाखवलीस....
खरे नशीबवान मास्तरच,
फुकटचा पगार.
Exam deun tithe select houn jato tewa fukat pagar khau watel ka . Shikshancha sagla anand ha mulamadhe asto . Ani kiti diwas ekte diwasbhar shalet basnar wichar kart
फार छान अनुभव आहे.......!
अक्षरशः डोळ्यात पाणी आले
सतीस दादाच्या सासूबाई दिसल्या ते नेहमी इथला विडीओ दाखवतात
Satish Dada Kai??? Kadi dakhvla nahi.. sasu Bai cha gav .. laj vatayla pahije... Vikas kasha honor.. tumhi ch path fervli... jevay jata... ughda dole banvun taka eak video...
खूपच दयनीय अवस्था आहे शासनाने योग्य ते पाऊल उचलून पुनर्वसन करणे आवश्यक आहे फक्त आणि फक्त वृद्ध वयस्कर लोक या गावांमध्ये आहेत खूप आश्चर्यचकित वाटलं.
सरकारने ब्रीज बांधला पाहिजे हे खर आहे
तुम्ही सार्वांनी त्यासाठी प्रयत्नशील रहा
कोकण हा कॅलिफोर्निया होईन
खुप छान निसर्ग सौदर्य आहे समुद्र किनारा आहे
पर्यटकांची घरगुती राहण्याची खाण्याची सोय होईल
गावातील युवकांनी प्रयत्न कर ..
चांगने विचार तर नेहमीच करा विचारांचे सामर्थ मोठे असत एक दिवस तुमता गाव पर्यटक स्थळ होईल
Very well said. My farmhouse is at Mandangad-Bankot Road.
मित्रा खूप छान व्हिडिओ आहे
Good work...find the help these people need and we all can contribute as a community
उद द्ध ट उद्योग येऊ देत नाही म्हणून तरुणांना रोजगार असाठी शहरात जावे लागते
या विभागातील राजकीय पुढारी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य , आमदार , खासदार काय करतात …..
खरं कोकणचं वास्तव दाखवलस मित्रा💐🙏💐
रोहिंगये येतील अशी गावे मोकळी सोडली तर,ताबा घेईला.
Maz gaav Kelshi. Jay Mahalakshmi. Kharokhar aapla Kokan kiti sundar aahe na ?
निसर्गाची देणगी आहे उपभोगायची अक्कल नाही मनात आले तर तिथेही रोजगार निर्माण करता येईल
Dada I am Very Proud of you. Karan tu Practicaly proper Site visit to Sakhari Village In Kokan MandanGad.
खरेच खूप छान गाव आहे
लोकप्रतिनिधी नि लक्ष द्यावे
रोजगार उपलब्ध झाला पाहिजे
Mitra Khup chaan video banavlaas ani Koti molachi mahiti dili ani tuzya hya kaamaalaa manapasun salaam ani koknatil pratek tarun mulani Khup kahi shiknyasarkhe ahe hya kokan dev bhumi sathi
मित्रा खूप छान व्हिडिओ तुझं खूपखूप अभिनंदन असेच असेच व्हिडिओ बनवत जा तुला खूप खूप शुभेच्छा
Thank you
मी नाशिक वरून आहे जे तरूण रोजगार साठी मुंबईला गेले आहे त्यांना पन म्हातारे झाले का गावी यावे लागेल त्यांनी आताच गावी सोईसुविधा करून ठेवली पाहिजे ७००जनांनी एक मुखाने मागणी केली तर एक नेटवर्क टावर मिळेल अशी अनेक उपक्रम राबविले जाऊ शकतो
हो, नक्कीच
S for Satish techi sasarwadi sakhari gab right na ? Dakavat asato ha gav Satish chan information dilis
सतीश दादा सासरवडी आहे साखरी ना आणि गाव अंबावली आहे ना शेजारी
हो, साखरी - खार - आंबवली अशी गावे आहेत जवळ
खूप छान दादा ❤
मित्रा सांकरी या गावाला कसे जावे
दादा तुम्हाला माझा सलाम 🙏🏻डोळे पाणवतील असा विडिओ बनवला आहे तुम्ही
Tumhi khup chhan vichar krtay
Khup chan sneha❤❤
गाव आहे sunder पन् माणसे नाही गावात अतिशय वाईट वाटले मला
खरच खुप सुंदर गाव आहे ♥️♥️👌👌 पण गावाची हि अवस्था पाहून खुप वाईट वाटते
छान video बनवला आणि कोकणाची खरी माहिती दिली। तसेच दादांनी कोकणचा विकास कसा होईल। हे आपण व दादांनी माहिती दिली। आपलं मनापासून आभारी आहे। , ,👍👍💯💯💯
खूप छान व्हिडिओ दादा आणि तुज्यासोबत त्या काकांनी पण खूप छान मार्गदर्शन केल. खरोखर रोजगार अपलब्ध व्हायला पाहिजे गावी.खरच छान संदेश भेटला या व्हिडिओ च्या माध्यमानेने 🎉🎉
S for Satish ची सासूरवाडी
हा भावजी आमचे 😊
Kay upyog... Jar gavchya vikasa sathi kahi kel kel nahi tr tumchi pragati kay kama chi
खरच मित्रा खूप छान विडिओ बनवले आहेस
Thank you
Betta, your toking is nice.
खूप सुंदर व्हिडिओ भाऊ !!👌👌👌
या एकट्या म्हाताऱ्या लोकांना बघून कसं तरी वाटतंय।
हो ना सगळी म्हातारी माणसे एकटी बसलेली असतात
S for SASULYA chi sasarwadi. Nehmi dakhavato to..🐰🐾
तुमचे म्हणणे अगदी बरोबर
S For Satish chi.....Sasurwadi Varsha cha Maher
Pranju & Pradnu cha Ajol
😊😊😊😊😊
Good work Vinay भाई,thanks 👍 well done God bless you
Thank you 🙏
साकरी म्हटले की सतिश दादाची आठवण येते....
जागेचे रेट काय आहेत
Tumhi lok kiti varsh zale tyacha lokana nivdun deta kasa vikas hoel jara navin pidhi ani shikshan zalel yana sandhi dili tr kharj vikas hoel pahje tasa
बरोबर आहे.
Vinay tuzi talmal karate. Dalanwalan sudharale pahije. Anjarle sarakhe paryatan whave hi ichha ahe. Sakhari madhil Mumbaila asnarya lokani rasta Ani khadi pool yasathi prayatna karate ashi Devala prarthana. Devak kalaji Asa.
Chan Maheti Deli
S For Satish Tachya Sassu
Ne Tula Chaha Dela
Bhariiii Blog 👌👌
हो, 🙏
उद्योग आले की ubt विरोध करणार
पहिलाच घर माझं आहे नाव घेतलं ते भाऊ
Thanks for this video .
अगदी बरोबर साहेब लोकांना चांगला रोजगार उपलब्ध होईल
लौकरच आता साखरी केळशीला कोस्टल रोड होणार आहे
good video
छान व्हिडिओ.
दादा मि बघीतलं साखरी आणि आबवली सतीष दादाच गाव आहे कोकण फिरायला आलतो वाशीम
गाव बघून खुप वाईट वाटले
Khup chhan Mitra👌
कोकणात MIDC परिसरातील ज्यांना रोजगार आहे गाव ते गाव गजबजलेली आहेत. पण काही गावात रोजगार नाही तिथला तरुण 10 वर्ष पूर्वी गाव सोडून शहराकडे गेलाय. त्यामुळे गावात आता शेवटची पिढी आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक तरुणाला विनंती आहे. खर तर खूप उशिरा झालाय... पण वेळ अजून ही हातात आहे. आपल्या गावाकडे लक्ष द्या. पूर्वजांच्या रुढी परंपरा याच जतन करा.... आपल्या वडिलधाऱ्या लोकांनी कोकणी परंपरा जतन केल्या म्हणून आपण गणपती शिमग्या जाऊन मज्जा करतो . जर आपण आज आपल्या परंपरा जतन नाही केल्या तर उद्याची पिढी आपल्या माफ करणार नाही... स्वतःच्या सन उत्सव रुढी परंपरा कोकणी माणसाच अस्तित्व जपा...
आपण खुपच छान सादरीकरण केले आहे. ❤
धन्यवाद🙏