Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो!
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- #Caste #Religion #Life
ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांचे विचार सुस्पष्ट आणि परखड असतात. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ते त्यांची मते व्यक्त करत असतात. मते मांडत असताना प्रेक्षकांच्यात आणि त्यांच्यात कोणताही आडपडदा असू नये या स्वच्छ उद्देशाने त्यांचा 'मनातलं' हा नवाकोरा कार्यक्रम प्रसिद्ध होतोय.
भारताच्या प्रजासत्ताक दिनापासून या कार्यक्रमाची सुरुवात होत असून पहिल्या भागात त्यांनी जात, धर्म, पंथ या सध्याच्या घडीला समस्त भारत देशाला सतावणाऱ्या चिंतेबद्दल विवेचन केलं आहे.
'जीवन जगताना, आपण कोण आहे ? आपल्या जीवनाचे उद्दीष्ट्य काय आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. बाह्य आणि आंतरीक शोध हे जीवनाच्या उद्दीष्टातून लागलेले आहेत. ते कोणत्याही धर्म, जात, पंथ यांच्या शोधातून झालेले नाहीत असं मत राजू परुळेकर यांनी व्यक्त केलं आहे.'
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया आपण आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
माझं वय आता 64 आहे ,मला कधी देव,जात,धर्म यांची आवश्यकता वाटली नाही
आपण खरोखर मनातलं सांगतात,अर्थात सगळ्याच्या .
देवानेच अशी माणसं घडवली आहेत
@@magicpiemagicpie कुछ भी
तुमचा स्पष्टवक्तेपणा मला फार आवडतो आजच्या धर्माच्या नावाखाली भरकटलेल्या पिढी साठी तुमचे हे विश्लेषण ऐकणं खुप गरजेचं आहे
असे विचार शाळेतून शिक्षणात शिक्षिका मार्फत सर्व विद्यार्थ्यांना शिकवले गेले पाहिजेत
अद्भुत. प्रत्येक भारतीय इतका विवेकी झाला तर भारताला तोड नाही!
ग्रेट सर🙏💐❤
फार सुंदर प्रबोधन राजू सर, खरंच जातीयता, भेदभाव हा एक आजारच आहे आणि तो आपल्यासारख्या विचारवंतांकडून प्रबोधन झाल्यानेच कमी होतं जाऊ शकतो. धन्यवाद 🙏
खूप छान सांगितलं सर तुम्ही ... असे विचार करणारे लोक अजून मिळाले तर आपला देश लवकरच जात पात विसरून माणुसकीच् नातं जपणारा देश म्हणून ओळखला जाईल...🙏🏻
सर तुमच्या सारखे व्यक्तिमत्व या अख्या भारताला समजले पाहिजे आपले व्याख्यान खुप मोलाचे आहे आणी आपली बुद्धीमता खुप निरगास आहे... यांचे कारण तुमचा अभ्यास हा प्रभोलनीय आहे 👍
छान सर अतिशय सुंदर मनोगत सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
परुळेकर साहेब आपले विचार अतीशय मोलाचे वाटले जयभीम
खूप छान आणी प्रामाणिक विचार आहेत सर आपले. मनापासून अभिनंदन तुमचे.
परूळेकरजी, आपले विचार फारच उत्तम आहेत, पण मी एक घडलेली गोष्ट सांगतो.मी वडार या भटक्या विमुक्त जातीत जन्मलो, माझे सर्व धर्मातील मित्र होते,मला रहावयास घर नसल्यामुळेच मी मित्राच्या घरात अभ्यास करावयास जात होतो, माझ्या शाळेत जे हुशार विघारथी होते त्यात माझा समावेश असल्यामुळेच मला जातीयतेचे चटके शिक्षण घेत असताना बसले नाहीत, मात्र जेव्हा मी नोकरी लागलो तेव्हा मला हे चटके जाणवू लागले, माझे वरीष्ठ ,कनिष्ठ आणि बरोबर चे अधिकारी हे सर्व गुण संपन्न होते.मी मात्र या सर्व वाईट गोष्टी पासून स्वतःहास दुर ठेवल,परिणामी माझे गोपनीय अहवाल प्रत्येक वर्षी खराब होवू लागले,याचा एकत्रित परिणाम असा झाला की मला नोकरी वरून काढून टाकण्याची शिफारस माझे वरीष्ठ कार्यालया कडून आमच्या आस्थापना विभागा कडे करण्यात आली ती मला सुधारण्याची संधी ध्यावी असे कारण पुढे करून तो प्रस्ताव परत पाठविला,नंतर मला दैवाने एक अधिकारी आणि सहकारी चांगले भेटले त्यानी माझी जात न पाहता प्रामाणिकपणे आणि चिकाटीने मी नोकरी करीत हे पाहिले , दरम्यान माझी नेमणूक वरीष्ठ अधिकारी पदी झाली पण पूर्वीचा वरीष्ठ अधिकारी जावून अतिशय जातीयवादी नवीन अधिकारी तेथे आला होता, त्याने आमच्याच ऑफिस मधील लेडीज लिपिकाला फितूर माझे विरुद्ध खोटी तक्रार करण्यास सांगितले तिने तक्रार केली माझे प्रमोशन थांबले ,हे माझ्या सहकार्याना समजले नंतर त्यांनी त्या जात्यंध वरीष्ठ अधिकारी याची भेट घेऊन त्याला असा डोस दिला त्याला स्वप्नात सुध्दा तशी अपेक्षा नव्हती, शेवटी तक्रार अर्ज मागे घेतल्यानंतर माझी प्रमोशनची ऑर्डर निघाली, पुढे मी सर्वोच्च पदाच्या एकाच खालच्या पदावरून अनेक बरेवाईट अनुभव घेत सुपर क्लास वन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो.दरम्यान माझ्याच घरा जवळच्या चांभार समाजातील मित्राने मला जेवणासाठी बोलावले, मी त्याच्या घरी जेवल्याची गोष्ट आमच्या शेतात कामावर आलेल्या जिला मी मावशी म्हणत होतो जिच्या गळ्यात तुळशीची माळ होती तिला सांगितले नंतर ती म्हणाली, तु चांभाराच्या घरात जेवलास, मी हो म्हणालो आणी त्यात वाईट काय?चांभार माणुस नाही काय असे तिला विचारले नंतर ती गप्प बसली, ऐवढेच काय गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीचे वेळेस भाजपचे खासदार आणि राष्ट्वादीचे आमदार दोघेही कट्टर मराठा यानी जे बुरूड फक्त अनुसूचित जातीचे फायदे घेतात पण स्वतःहास पददलित म्हणून घ्यावयास त्याना लाज वाटते, त्याना तिकीटे दिली महार,मांग चांभार ,ढोर, भंगी याना तिकीटे दिली नाहीत, कारण त्याच्या बहुजन समाजातील लोकांना या पददलित नगराध्यक्षाला नमस्कार करावयास लागेल यामुळे त्याच्या उच्च वर्णीय जातीचा अपमान होईल म्हणून, परूळेकरजी सन११९२ते१५/८/१९४७ पर्यंत पूर्वीच्या अखंड भारतात हिंदु मुसलमान खिश्रचन बुद्ध सिख एकत्र रहात होते,तेव्हा आपल्याच काय पण कोणत्याही ठिकाणाचे हिंदुत्व धोक्यात नव्हते पण सन२०१३ नंतर अचानक नरेंद्र मोदी आणि त्याच्या पिलावळ यानी ८०%हिंदु ज्या देशात आजही रहात आहेत त्या भारत देशातील हिंदु धर्म खतरेमे है विकास, बेरोजगारी,शेतकरी कामगार याच्या आत्महत्या ,बंद उधोग व्यापार या विषयी एकही शब्द न बोलता जर नरेंद्र मोदी पूर्वीच्या राज्य कर्तानी ज्या पायाभूत सुविधां उभ्या केल्या आहे त्या अदांनी अंबानी, बिर्ला , टाटा याना राजरोस पणे विकता याव्यात म्हणून धर्माचा आधार घेऊन निवडणूक लढवून भारतीय लोकांना मुर्ख बनवत आहेत या पेक्षा या देशाचे दुर्दैव कोणते असू शकेल.
🙏🙏🙏🙏
ब्राह्मणी धर्म विषमतेचा पुरस्कार करते , हिंदुत्वच्या लाटेत लोकशाही संविधान समाप्त हो त आहे। SC ST OBC लोकतंत्र विरोधी संविधान खत्म कर करनाराना वोटिंग करतात,
हिंदूत्व राम मंदिर रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र चे भक्त।
बुद्धा चा द्वेष चांभर मांग करतात।
अण्णा भाऊ साठे, रैदास, कांशीराम असे जातवार राजकरण झाले, हिंदु धर्म प्रेम।
माझा एक मित्र चांभर college professor पन ओढ़ हिंदुत्वाची
म्हणातो "। सर देशात एक च धर्म पाहिजे, मग तो कोणाताही असू दया।"
मातंगा ना अण्णा भाऊ साठे हवे,बाबासाहेब आंबेडकर दुय्यम, कोणी पोसल्यात जाती?
बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण धर्म सोडून, बुद्धा चा मार्ग स्वीकार ला।
लोकना हिंदूत्व राम मंदिर रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र पहिजे,
दुर्दैव
Kharech durdaiv
राजू परुळेकर सर तुमचे खरे विचार मला खूप आवडतात.
आयु. उच्च विचारक राजुजी, आपण विश्लेषित केलेल्या उच्च, मौलिक विचाराबद्दल खूप -खूप धन्यवाद.आपले विचार ऐकून बहुतांशी विचार करायला लागतील अशी आशा आहे. आज अशाच विचारांची आवश्यकता आहे. आपण अशीच समाज जागृती करावी ही अपेक्षा. आपणास चांगले स्वास्थ व दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा. जयभीम, नमोबुध्दाय, जय शिवराय.
जय शंकराचार्य.
आपले विचार खोले बाई ला आणि विक्रम गोखले यांना सांगायला पाहिजे
धन्यवाद परुळेकर साहेब. जातीबद्दल मनातलं या विषया वर आपण जे विचार मांडले ते मनापर्यंत पोचले. अतिशय मु्देसूद वास्तववादी विचार तुम्ही मांडले.तुम्ही घेतलेल्या अनेक विचारवंताच्या मुलाखती मला , आवडल्या.
आपले विचार मला तंतोतंत पटतात. सर्वांनी हे विचार अंमलात आणले तर बरेचसे प्रश्न संपतील.
जातीधर्माच्या पलीकडे एक ग्रेट विचार...
जयभीम सर , अप्रतिम..!
साहेब आपण जातीबद्दल । मनातलं । विश्लेषण आत्मपरीक्षण विचार परखडपणे व्यक्त केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏
चुकीचे आहे
Gulamgiri
ruclips.net/video/9a8d9XodSNs/видео.html
ruclips.net/video/87TTaEF_HGg/видео.html
Devacha dharm ani dharmachi devele
ruclips.net/video/mWxDUkJxcyU/видео.html
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
ruclips.net/video/2Czs3DqhzhU/видео.html
@@magicpiemagicpie काय चुकीचे आहे, ते स्पष्ट करा
@@chankhwob9069 तुम्हाला काय बरोबर वाटलं ते आधी स्पष्ट करा ! मग उत्तर देतो.
@@magicpiemagicpie sang chukicha kay kay aahe
सर तुमच्या वाचनाचा आणि त्यातून आलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा विचार करताना खुप फायदा होतो, त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार
अत्युत्तम विवेचन
छान,, शॉर्ट क्लिप सुध्दा viral करा.
लोकांमध्ये जनजागृती लवकर होइल....
हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि पचेल तेंव्हाच मानव खय्रा अर्थाने सुखी समृद्ध जिवन जगेल.
खूप छान विष्लेशण. धर्माचा वापर विस्तारवादातून झालाय, आता सत्ता आणि अर्थकारणा साठी होतोय. आपली संस्कृती विस्तारवादी नाही.
Wow...the way you to put the complex things in simple manner....I recently understood what Dr. Ambedkar did and since then became Ambedkarite and thus humanitarian. I have thrown these orthodox ideas and dogmas from my subconscious. Still his thoughts are relvent today humanity and science are enough to live today's life. Loved the example of budhha! Thank you learnt a lot from you.
But u forgot मराठी भाषा my फ्रेंड
अजून खोलवर विचार करणं आवश्यक आहे.
खूप छान माहिती आहे, प्रत्येक मनुष्याला यावरती विचार करायला हवा.
खुप छान विचार , कथन व चांगले आव्हान 👍🙏💐 की मानसाला आपल्या पायरीची जाणिव करुन देणारे विचार.... सेल्युट सर
खूप छान विस्तृत पणे जात संगती चीं माहिती दिलीत.. Hats off you
खूप छान sir
तुम्ही खरं विश्लेषण केलात त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे.
खरं आहे. आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो, त्यांचा जो धर्म व जात असते ती आपल्याला आपोआपच चिकटते. त्यामध्ये आपलं योगदान किंवा कर्तृत्व काहीच नसतं. आपण माणूस म्हणून जन्मतो, म्हणजे आपला धर्म हा मानवता धर्म असायला हवा, पण तशा नावाचा धर्मच अस्तित्वात नाही.
Khoop sunder aani pragalbha vichar . Thank you Sir
Very good खूप चांगले प्रबोधन करत आहात,
असच नेहमी रहावं ही विनंती धन्यवाद
साहेब मला कळतं नाही की तुमचं किती कौतुक करू, तुमचं कौतुक करण्याची देखील माझी लायकी नाही इतका तुमचा अभ्यास, भाषाशैली उत्कृष्ट आहे की त्यावरून दिसूनच येते की माणूस म्हणून कसं असायला हवं. कर्तुत्वाचा आणि बुद्धीमत्तेचा अभिमान असावा असे मला देखील वाटते आणि तुमच्यासारखे कोट्यावधी लोकं भारतात असावे व चांगल्या गोष्टींसाठी Brain Wash करावे अशी आशा आहे. कोणी नसुदे परंतु मला तुमचे विचार पटतात आणि ४ चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात व माझ्यात सकारात्मक बदल होतो.
खूप खूप धन्यवाद सर आपले,खूप वास्तववादी विचार सुजन सज्जन व्यक्तिमत्व,आहे आपले ,संयम ठेऊन वास्तव समतावादी विवेचन केले आपण,,,
जन्मावेळी अपघाताने मिळालेला जात, धर्म...
ना दोष देता येईल, ना गुण गाण्यासारखे....
आंतरिक व बाह्य शोध महत्वाचा 👍
Thank you sir 🙏
Sir आपले विचार खूब मोठया प्रमाणात सत्य व सरलोकांना पटणाऱ्या आहेत. आपण परिपूर्ण स्टडी करून मुद्देसूद पणे मांडनी करून. निस्कर्ष व्येवथीत मनात उतरतो. 🙏🙏
Sir आपन ब्राम्हण आहात किती उच्च कोटीचे ज्ञान आहे , भगवान बुद्ध एके ठिकानीय मंतात ब्राम्हण कोनाला मन्हावे त्याचे उत्तर आहे ,तुम्ही
True.
100% खर आहे
True ❤
Very best
Thanks parulekarji for you are valuable thoughts
सर great तुमचे विचार लोकाच्यावर बिबवले पाहिजेत आपण माणूस म्हणून जीवन जगले पाहिजे लोकांनी जन्म आणि मृत्यू लक्षात ठेवलं पाहिजे खूपच सुंदर बोललात सर
खुपच महत्वाचा विषय घेतला . खूप खूप आभार🙏
Very great 👍👍
खूप छान🌹 खूप छान🌹 खूप छान🌹 अगदी मनातलं भाऊ. 👏🏼👏🏼👏🏼 पण मग इतका सगळा सलोखा, बंधुत्व राहील तर राजकारणी लोकांचं कसं चालायचं... सध्या तर हा हीन पणा फारच फोफावला आहे. आणि ह्यातलं मोठ दुर्दैव हे की जे तत्वज्ञानावर लेक्चर्स देतात, संतांचे गुणगान गतात, ज्ञानेश्वरी वर लेक्चर देतात तीच लोकं ह्या गोष्टीना पाठींबा देताना दिसतात.
1 number jabardast saheb 👌👌👌👌👌👌🙏
लता मंगेशकर ह्या उच्च कोटीच्या जातीवादी असल्याचे लोक बोलून दाखवितात हे वस्तुस्थिती आहे
Absolutely right sir
मी अगदी प्रामाणिकपणे असंच जगण्याचा प्रयत्न केला, मला असंच जगायला आवडलं. जातिवाचक असं बरंचसं ऐकावंही लागलं अगदी सहज स्वीकारलं. कारण जास्तीत जास्त चांगले लोक भेटले जे की अंतर्बाह्य अतिशय प्रांजळ होते. त्यात विशेषतः शिक्षक जे की मला सतत परिस्थितीची जाणीव करून देत असत. माझ्या लहानपणी ब्राह्मण शिक्षक अधिक होते. ते साने गुरुजींच्या विचारांनी भारावलेले . त्यामुळे जातिभेद सहन करुनही हीनकस भावना वाढीस लागली नाही. कारण मी सुरुवातीस असे अनुभव याच लोकांकडे शेअर करत असे , जे की रुढ अर्थाने सवर्ण मानले जात . शिकत असताना खरंच सहनशीलतेची परिसीमा गाठली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मात्र , इथे पाहिजे जातीचे" (जन्म असा अर्थ न घेता) असेच काही करावे वाटते, पण शक्य नाही होत.नोकरीत सतत अडवणूक , हेतुपुरस्सर जातिवाचक असं ऐकवण्याचा प्रयत्न केला आहे. काही स्नेही तक्रार करण्यास सुचवत. तेव्हा तक्रार देण्याऐवजी जे जे चांगले ते महत्त्वाचे मानले. सेवा निवृत्तीनंतर माझ्या नंतर सेवा निवृत्त झालेल्या ना पूर्ण निवृत्ती वेतन मिळाले, मला मात्र अर्धेच. सतत जातीभेदाचे चटके प्रखरतेने जाणवत आहेत , त्यामुळे ढोंगी लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते पण अद्याप पिच्छा सुटत नाही.
खूप छान सर...
मी तर आपला फैन आहे सर.
म्हणून मी कायम मित्रात सांगतो कि तुम्ही खरे भारतीय.
खरं तर हया जगात स्वार्थ हिच खरी जात.
पण जात नाही ती "जात "...
जबरदस्त हे खरं जाती धर्मा वरील शिक्षण
This is thought inspiring ... based on universal truth ... thanks for sharing
अतिशय छान विश्लेषण
छान वैचारिक विवेचन
तुमचे विचार हे खूप प्रेरणादायी आहेत नक्कीच ही मुलाखत प्रत्येक व्यक्तीने ऐकायला पाहिजे
Sir u r great.true Indian.....
खरंच अगदी मनातलं बोललात, माझे सुद्धा असे अनेक जवळचे मित्र आहेत, जे धर्म ,देव, या बाबतीत कट्टर समर्थक आहेत, पण त्या विषयावर मी त्यांच्याशी बोलताना कधीच वाद घालत नाही, कारण मी सुद्धा हेच समजतो की तो एक प्रकारचा आजार आहे,
योग्य विचार आपण मांडलेत. मला पटले. आमच्या जीवनात सुद्धा फार कोणताच कट्टरतावाद नाही.
जे मुर्ख जातीचा उगाचच अभिमान बाळगतात त्यांनी यातून काहीतरी बोध घ्यावा..
देव जात धर्म मानवनिर्मीत आहे हे समजलं तरच भारत शांत होईल
Appreciate
khup sundar bollat Sir🙏
खूप छान बोललात सर आपण, ह्या विषयावर ! खरं तर आता मानवाने, जाती व धर्म नष्ट करून मानवता हा धर्म मानून केवळ मानव हीच जात मानने ह्या विज्ञानयुगांत गरजेचे आहे असे मला वाटते !
🙏🙏🙏
I fully agree with you.
अतिशय सुंदर वक्तव्य खरेच सर्वांनी हे समजून घेणे आवश्यक आहे
नमस्कार, अतिशय उत्तम खूप सारे ग्रंथ वाचुन आलेला निष्कर्ष आहे, ऐकन्याऱ्याला ही काही ग्रंथाची समज घेऊनच, या एपिसोड चे महत्व कळेल. खूप खूप धन्यवाद.
हे सांगायला, वेगळा विचार करायला धाडस लागतं... 👌👌
उत्तम ,अप्रतिम विचार अभ्यासपूर्ण
नरेंद्र दाभोळकर शाम मानव समजुन घ्या सर्वोत्तम जिवण जगा
सुंदर विचार प्रस्तुत केले आहेत.
खुप छान विश्लेषण सर...
मला आत्तापर्यंत तुमच चैनल माहिती नव्हतं परंतु आता माहिती झाल.
तुमच्या विचारांमुळे बौद्धिक पातळीत नक्की वाढ होणार !.
खूपच छान मांडणी केली आहे आपण. वास्तविता मांडलीय आपण.
खूप छान विचार.💐
All indians need these type of education.this is a real knowledge one must have.
Thank you sir
Khup chan as vyaktyavy Kel . Pratyekach Brien clin hoil as 👍🙏
जात हा महत्त्वाचा मूद्दा आहे. महाराष्ट्र राज्यातील नागपूर ही जात हाच आधार मानते व जातीच्या आधारावर न्याय देते.
मी दलित समाजातील आंबेडकर वादी बौद्ध आहे. मी पदोन्नती साठी नागपूर हायकोर्ट अपील केले. हायकोर्टाने माझे अपील जातीच्या आधारावर फेटाळून लावली व न्याय मागण्याचा दंड दिला. मला शिक्षक पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिलेत , त्यामूळे मी बेरोजगार व भुमिहीन झालो.
म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या ब्राम्हणांना शासन , प्रशासन यामधे पाठवूच नये.
मिलिंदराव, तुम्ही खोटे सांगत आहात. तुम्ही विशिष्ट जातीचे आहात म्हणून तुम्हाला कुठलाही न्यायाधीश नोकरीतून काढू शकत नाही. आम्ही जातीभेद जाळून टाकायला पाहिजे. आमची जात म्हणजे मानव !! आम्ही सर्व मानव आहोत.
हे खरे कीर्तन प्रवचन, राजकारणी लोकांनी लोकांना किती मूर्ख बनून ठेवले आहे..
फार छान.. सगळ्यांनीच असा विचार केला तर ..?
आपल्याला सत्य काय आहे ते कळाले त्या बद्दल आपले आणि आपल्या आई वडील यांचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤
खरी सत्य परिस्थिती सांगितली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद सर
आदरणीय परूळेकर सर,
आपण मांडलेले विचार लोकांनी आत्मसात केले आणि त्याप्रमाणे अनुकरण केले तरच ते खरे मानवतावादी राष्ट्र होईल.
I really agree with your thoughts and opinions 👍
totally agree sir, and happy you spoke about this. when the entire country is blindly being made to feel proud of something that's nothing but merely an accident.
Your place is in Pakistan
तुम्ही असा विचार करू शकता कारण तसे चांगले संस्कार तुमच्या वर झाले आहेत ग्रामीण भागामध्ये तशी परिस्थिती नाही राजकारणी लोक जाती जाती चे गठ्ठे करतात
Aapan sudhha changlya vicharancha prasar karu shakto, aaplya life madhe 10 lok sudharta aale tari chalel.
अत्यंत उत्तम सृजनशीलता व्यक्त केलीत आपण
धन्यवाद परुळेकर जी
साहेब, खूप वास्तविक, खूप छान 🙏 आपले आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. हे मी ऐकतोय, अभ्यासतोय ती एक या शृंखलेतील एक पुढचे पुष्प आहे.
माझं तर मत आहे की आपली जात सांगायची देखील गरज नाही. वाचन केल्यावर आणि काही अनुभव घेतल्यावर हे कळले की खरच दलितांवर प्रचंड अन्याय झालेत आणि अजूनही होत आहेत. मी मागे प्रयोग केलेला काहींनी जात विचारली तेव्हा मुद्दाम अशा जाती सांगितल्या की लोकांचे आचरण बदलले. काहींनी तर बोलायचे आणि घरी येणे बंद केले तेव्हा कळले की जातीयता किती आहे. हा प्रयोग सर्वांनी करून पाहावा.
नमस्कार राजू भाऊ🙏
आपण,आ. ह.साळुंखे सर, यांची मुलाखत घेतली होती.ती मागे ऐकली.त्या वरून लक्षात आले तुम्ही आ. ह. साळुंखे यांच्या विचारांचे निस्सीम भक्त आहात. हे अलीकडे मला जाणवले.त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा ,समाजापुढे आणण्याचा,तसेच,या पिढी पर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात.तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार🙏
तुमचे कर्म खूप कुशल आहेत,म्हणून तुम्हाला आ. ह.साळुंखे सरांसारखे व्यक्तित्व जवळून पाहता आले.त्यांच्या करून शिकता आले आणि येत आहे.
आ. ह .साळुंखे यांचे सर्व व्हिडिओ मी ऐकले आहेत आणि रोज परत परत ऐकत असते आणि काही पुस्तके मी आवर्जून वाचली आहेत आणि आणि पुन्हा पुन्हा वाचते.मी देखील थोडे पाली आणि बुद्ध तत्व ज्ञान जाणते.आणि रोजच्या जीवनात आचरण करते.
मला माफ करा🙏.मी तुमचे व्हिडिओ ऐकत असते.
तुम्ही,तुमची मतं ज्या पद्धतीने मांडता.किंवा ज्या पद्धतीने बोलता, मांडणी करता,त्यावरून,असे दिसते ,की आपण आ. ह.साळुंखे सर,तसेच बुद्ध विषयक आणि इतर गोष्टी ज्या तुम्ही नमूद करता यांचा पुन्हा एकदा थोडा अजून अभ्यास करावा. तयारी करावी.मुद्देसूद मांडणी करावी.आणि मग व्हिडिओ टाकावेत. कारण अजूनही तुमची या विषयावर विशेष पकड आहे,असे वाटत नाही.तुमच्या सारख्या बेडर माणसांची आम्हाला म्हणजे समाजाला,अलीकडच्या काळात तर खूपच गरज आहे.
याबद्दल इथे बुद्ध विषयक जी घटना किंवा गोष्ट तुम्ही सांगितली ,ती अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने बुध्दांनी सांगितली आहे.साधारण त्याच पद्धतीने,आणि आ. ह.साळुंखे यांनी ती त्यांच्या अनेक भाषणातून अतिशय सुंदर पद्धतीने मांडली आहे.बुद्ध विचार जसेच्या तसे मांडणे आवश्यक आहे.
तुम्हाला माहित असेलच त्यांचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत. माझ्या या वक्तव्यामुळे,इथे मत(comment) मांडणारे माझे बंधू आणि भगिनी,तुम्ही आणि तुमची सर्व टीम दुखावले गेले असतील आणि दुखावणार असतील अशा सर्वांची मी माफी मागते. माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा तर नाहीच,पण शिक वण्याचा देखील नाही.🙏,
प्राचार्या,
डॉ.छाया मित्तर. ठाणे
किंवा इथे कॉमेंट देना
True
मस्तच , आपल्या सारखे अनेक लोक भेटले. नरहर कुरुंदकर सर, प्राचार्य. शिवाजीराव भोसले,आ. ह. साळुंखे, प्रभाकर मांडे सर, भोसले सर, प्राचार्य. ना. य. डोळे सर, पठाण सर, बडवे मॅडम, बि.जी जोशी, औरंगाबाद. शास.बी.एड्, रंगा वैद्य, भाई वैद्य, किशन पटनायक, योगेंद्र यादव, सुनील केसला, डॉ स्वाती अफलाटून , प्रा. संजय मं. गो. व लतिका सु. मो., मेधा पाटकर, उषा वाघ , अरविंद कपोले , सुभाष लोमटे, प्रा.श्रीराम जाधव, शैला सावंत, आशाबाई नेर्लेकर, शैला लोहिया, सुधाताई काळदाते, नलिनी पंडित, सिंधूताई काटे, आशाता, वीणा सुराणा, हेमा हडसनकर, किती तरी नावं आहेत. मात्र त्याउलट संख्या अधिक होईल. अशांची आठवण होतेच हे फार वाईट.
Humanity is Important.
छान विश्लेषण सर ❤
सर तुमचे.विचार ऐकले की खरोखरच सकारात्मक उर्जा मिळते या देशात समाजात तुमच्या सारख्या निष्पक्ष आणि संवेदनशील व्यक्तीमत्वाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे या समाजाला जातियद्वेष धर्मद्वेष पंथभेद.असमानता या गोष्टी खरोखरच घातक आहेत. सर तुमच मोलाच मार्गदर्शन असच मिळत राहो आणि समाजाला योग्य मार्गदर्शन मिळो.
खरच साहेब आपण जे बोलता ते रुदयाला भिडत आहे....मिर्झा गालिब ची आठवण येते...तुम ने जो कहा गोया यह भी मेरे दिलं मे था.
आजचा पाहिलेला सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ👌
Aaj ase sunder mahitipurn dnyan prattekane ghene garajech ahe kuthe konachya ghari janmma ghyava he konachyahi hatat nahi
अतिशय मुद्देसूद sir👍👍
मी ब्राह्मण आहे अशी स्वता:ची ओळख करुन देणे जरुरीचे नाही.मात्र आपले विचार महान आहेत.
Bramhan aahe he privilege aahe.
Brahmanane sangitale mhanje satya
he Hindu bahujan samaja war feed kelele aahe.
आपण ज्याला जात म्हणतो त्या मुळात जाती नाहीच आहेत आणि जात हा पूर्णपणे वेगळा विषय आहे तो जीवशास्त्राशी संबंधित आहे. त्यावर मी राजू परुळेकरांशी जाहीर बोलायला तयार आहे
आला मोठा जातीयवादी
होमो सेपियन,होमो सेपियन सेपियन,नियाडरथल हे म्हणायचे आहे का..
माझे तर हेच वाटत आहे
*अतिशय अभ्यास केला ज्यामुळे स्वतः पारंगत होत असताना अनेकांचे मुद्दे खोडून काढण्याची क्षमता निर्माण झाली, ह्या क्षमतेला तर्काची जोड दिली आणि समरसता जाणवली म्हणजे अभ्यास आणि तर्क सुसंगत आयुष्य जगणे सुरू केले.*
खूप चांगले विचार आहे आपले
खूप खूप धन्यवाद सर
Well said Sir❤
नमस्कार आपले विचार प्रत्येक घरात पोहचले तर जगात प्रत्येकाला जगण्याचा खरा आनंद घेता येईल.
You are awesome and more than journalists
आपले व्हीडिओज खुप आवडतात. विचार एकदम स्पष्ट आहेत व ते सांगताही छान.