Hari Narke । Raju Parulekar । Interview हरी नरके यांची धक्कादायक मुलाखत
HTML-код
- Опубликовано: 7 авг 2024
- गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अकाट्य बहुजनवादी तार्किक मांडणीचा, ब्राम्हणवादाविरूद्धच्या संघर्षाचा मागोवा घेणारी धक्कादायक मुलाखत.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
ruclips.net/video/pL5L7b4HRXo/видео.html
मा आदरनिय नरके सर आणि पत्रकार फार सुरेख संगम मांडणी केली समाज ला फार छान माहिती दिली महापुरूषांच्या कार्याचा आढावा घेतला ब्राह्मण वाद आणि बहुजन समाज विचार चर्चा केली समाज ला समजुन सांगितलं आजही ब्राह्माण वाद आणि बहुजन वाद निर्माण झालेल्या दिसतोय धन्यवाद
663😅😅😅😅😅😅😢🎉 22:01 j
9l65
5:34 😅😊😊
S vv .
❤❤❤❤❤❤❤❤❤या पेक्षा अधिक नाही सांगू शकत इतकी प्रेरणादायी मुलाखत
खरे शिव शाहू फुले आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर अश्या लोकांना ऐकावे 🙏🙏🙏
हि मुलाखत नव्हें हे ज्ञानाचे भांडारच खुले केले होते.दोघांनिही ऐकणार्याला ऐकता कान थोडे असे झाले.प्रत्येक वाक्य खरे अभ्यासपुर्ण आणि वैचारीक आश्चर्यच आमच्या सारख्या पामराला वाटले.आणित्याच्यावर प्रतिसंंवादकाच्या वाक्याचा सुखद धक्का अनेक दिग्गजांच्या ज्ञानाचा ज्ञानांचा ठेवा पण आमच्या् सारख्या अज्ञानांना खाऊ वाटला.पण या मूळे हरी नरकेंच जाणे म्हणजे प्रचंड हानी.झाली याचे प्रचंड वाईट वाटते.सध्य काळाची ती फा....र मोठी गरज होती.
शिव शाहू फुले आंबेडकर या महा मानवाच्या विचारांचा वारसदार, प्रा. हरी नरके सर यांच्या अचानक निघून जाण्याने पुरोगामी चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे. संराना कोटी कोटी विनम्र अभिवादन🙏
गौतम बुद्ध, छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या महान विचारांना मानाचा मुजरा.
ज्या दिवशी या वरील महामानव क्रांतीसुर्य याचे विचार आत्मसात करू आपले परिवर्तन निश्चित आहे
परुळेकर सरांनी स्मृती शेष हरी भाऊ नरके साहेब यांची घेतलेली ही मुलाखत ज्ञान कोषातील , इतिहासातील मैलाचा दगड आहे , 10पुस्तके वाचली तरी या मुलाखती तील ज्ञानाची बरोबरी होणार नाही , अतिशय चिकित्सक, बौद्धिक परंपरेला साजेशी अशी मुलाखत घेतल्या बद्दल सरांचे अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
खूप महत्वपूर्ण माहिती मिळते आहे .सामाजिक अंग सोबत महात्मा फुले यांचे व्यावसायिक दृष्टीकोन सांगणे हे आजच्या पिढीला खूप गरजेचं आहे .
धन्यवाद हरी नरके साहेब आणि राजू परुळेकर साहेब यांचे.
मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे हे उच्च दर्ज्याचे अभ्यासक .
या मुलाखतीतून बहुजनांना खूप काही शिकायला मिळेल , याची खात्री वाटतेय.
माझी आजी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शिकलेली आहे, त्यांनीच आजीच्या वडिलांना तिला शाळेत घाला असा सल्ला दिला होता,
आणि ती पूर्ण गावातून एकमेव शिकलेली मुलगी होती .
एक ग्रेट भेट! मा. हरी नरके साहेब यांचा व्यासंग, अभ्यास, विचार, त्यांची अस्खलिपणे बोलण्याची पद्धत आम्हाला नेहमीच प्रभावित करत आली आहे. फुले शाहू आंबेडकर हे महापुरुष त्यांच्या किती नसानसांत भिनलेले आहेत हे, दिसते.
खूपच छान मुलाखत.. या मुलाखतीतून अनेक गोष्टी समजल्या.धन्यवाद,...
मुलाखत घेणारे राजु परूळेकर सुध्दा पुरोगामी ब्राम्हण आहेत.सम्यक दृष्टीचा उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व व मुलाखत देणारे डॉ प्रा हरी नरके सर सविस्तर बोलले.त्यांचा प्रत्येक अनुभव मोलाचा इतिहास सांगतो.
धर्माच्या वर्चस्ववादी सत्तेच्या काळात म.फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे एकमेवाद्वितीय कार्य असे कार्य पुन्हा कोणी केले नाही.
या अलौकिक समाज सुधारक दांपत्याला शतं शतं नमन.
अप्रतिम मुलाखत.
अतिशय चांगला कार्यक्रम. खूपच नाविन्यपूर्ण माहिती. आणि गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, म. फुले, शाहूमहाराज, आंबेडकर हे सर्व पैशाने, प्रतिष्ठेने मोठे असूनही समाजसुधारणेचा ध्यास घेण्याचे समान सूत्र परूळेकर यांनी शोधले. खूप खूप धन्यवाद. अत्यंत चांगला कार्यक्रम केल्याबद्दल.
फक्त शिवाजी महाराजच....प्रतिष्ठा संस्काराने सर्व दृष्टीने .. महाराजां व्यतिरिक्त महाराजां एवढेच मोठे आणि समाजाभिमुख करू केलेले फकत सावरकर आहेत बाकी कुणीही नाहीत....
राजु परुळेकर आपन खूप चांगले पत्रकार विचारवंत आहात . हरि नरके साहेबां ची मुलाखत अप्रतिम . परुळेकर सर आपण ब्राम्हण असुन सुध्दा ब्राम्हण्य आपल्या आचार विचारात नाही . जयभिम .
ही मुलाखत पाहून फुलेंच्या जीवनाविषयी खुप माहिती मिळाली.आमच्यासारख्या न वाचणाऱ्या लोकांना ही मुलाखत पर्वणीच
राजू परुळेकर सर आणि श्रीहरी नरके सर आपल्या दोघांची जुगलबंदी अप्रतिम आहे.
Classical मुलाखत..प्रत्येक शब्द अाणि प्रत्येक वाक्य हे सोन्यासारखं.. ही मुलाखत खुप महत्वाची आहे.आणि बहुजनसमाजातील सर्व तरूणांसाठी मार्गदर्शक ठरेल.सामाजिक मनं विकसित होण्यासाठी ही मुलाखत अत्यावश्यक वाटते..समाजसुधारकांविषयी प्रत्येक दिवशी कृतज्ञता व्यक्त करत रहावं वाटतं.खुपच छान मुलाखत.
खूप छान माहिती कळाली ,महात्मा फुले ग्रेट
खूपच सविस्तर, मुद्देसूद आणि बराच ज्ञान खजिना उलगडणारी मुलाखत आहे, दोन्हीं महान विभूतीचं अभिनंदन
अद्भुत ज्ञान खजीना...सत्य परिस्थीती दारूण आहे....लोकशाही , मतांची आकडेवारीचे राजकारण...काय होणार...कोण जाणे..
बाबासाहेब खरेच सर्वश्रेष्ट होते ❤❤🌹🙏🌹
आज पहिल्यांदा यू ट्यूब वर माझा वेळेचा सदुपयोग झाला असे मला वाटते. आणि ही माहिती धर्म वेडे लोकांना नक्की पाठवा. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल
श्री नरके साहेब, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई बद्दल दिलेल्या माहिती धन्यवाद, कारण काही बारीक गोष्टी साधारण माणसाला माहीत नसतात ते कळते जेव्हा आपल्या सारखे ज्ञानी भाग घेतात. त्या काळी सासूबाई सून चा एवढा आदर सममान करते. आदरणीय.
सर्वात सुंदर, वैचारिक मुलाखत पाहून आनंद झाला. असेच वैचारिक तार्किक खरी सामाजिक मुलाखत बघायला आवडेल.. धन्यवाद सर माझ्या बुद्धीस सकस आहार दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार..🙂
फार छान मुलाखत/वैचारिक खाद्य मिळालं. बुद्धा पासूनची वैचारिक परंपरा पुढे शिवाजी महाराज, क्रांतिबा व सावत्री माई फुले, शाहुजी महाराज, , डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर मानवतावादी विचारवंतांचा वैचारिक धागा आपण विनुन बहुजनांना कृती दिशा देण्याची प्रेरणा यातून नीच्यित मिळेल. अप्रतिम.
धन्यवाद...!!!
बालभारती मधे बाबासाहेबांचा धडा होता आणि त्या धड्याचे नाव होते दलीतांचे कैवारी आज माझे वय ५४ आहे मला असे वाटते की बाबा साहेबांनी भारत देशाला राज्य घटना तयार करुन दिली धन्यवाद बाबासाहेबांचे एवढं मोठं कार्य असून त्यांना फक्त दलितांचे कैवारी एवढ्या धड्याचे शीर्षक त्यांनी केलेल्या कार्य मुलांना कधी शिकवले नाही आता मला कळते आहे की बाबासाहेबांचे किती थोर कार्य केलेले आज एवढं मोठं कार्य केले असताना पण त्यांना एका पानाचा दलितांचे कैवारी एवढेच एवढेच अभ्यास होता का तुमच्या मुलाखतीमुळे तुम्ही तुम्ही थोर पुरुषांचे पूर्ण माहिती आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्हाला खूप खूप धन्यवाद
महात्मा फुलेंबाबत ते समाज सुधारक होते इतकच माहीत होतं. ते त्याकाळी मोठे उद्योजक होते हे या मुलाखतीच्या माध्यमातून समजलं........ धन्यवाद......
हरी नरके सर आपले विचार हे आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवनाच्या प्रवाहात आलेल्या सर्व गोष्टी या खूप छान आणि अज्ञात असलेल्या गोष्टी आज आपण कडून समजल्यात . असाच आपले विचार या सकळ जनसमण्यांस समजावे. आणि याचा आपल्या आयुष्यात, जडणघडणीत मोलाचा वाटा होईल याची अपेक्षा. प्रा. हरी नरके सर आपणास पुढील निरोगी वाटचाली साठी शुभेच्छा.
मी एमपीएससी परीक्षार्थी आहे.इतिहास हा माझा ऑप्शनल subject असुन देखील आतापर्यंत जेवढा इतिहास कळला नसेल इतका इतिहास sir हरी नरके ह्यांच्याकडून समजला, त्यासाठी त्यांचे शतशः आभार. आणि परुळेकर sir ह्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. अशाच वैचारिक चळवळतील लोकांच्या मुलाखती आम्हाला पहावयास मिळुदे हीच अपेक्षा.
यांच्याकडून पेपर chek करून घे सरावासाठी
@@amolbhosale8818 😃😃😃
आगदी
डाक्टर हरी करके आपली सुरवातीच संघर्ष मय जीवन आणि त्यातुन आपन साहू, फुले आणि आंबेडकर विचार अंगिकार केंलय।आपनास साधुवाद करतोय।
तुम्ही आपले bakray चारा गाढवा बरोबर् zopa
अप्रतिम... भारतीय समाजकारण व राजकारणाला दिशा देणारी ही मुलाखत आहे..
अप्रतिम मुलाखत ! ही मुलाखत महाराष्ट्रातील जन माणसाने पाहिली तरी मोठ्या प्रमाणात प्रबोधन होईल. आपण कोणत्या चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहोत की काय हे देखील पडताळून पाहता येईल. धन्यवाद हरि नरके सर आणि परुळे सर 🙏🙏🙏
मा.हरी नरके सरांनी राष्टपूरुषांच्या विचारांचा वारसा जपला
अत्यंत ज्ञानवर्धक आणि मन, बुद्धी तृप्त करून टाकणारी मुलाखत ...👌👌👌
दोघांचही अभिनंदन, अभिवादन आणि आभार🙏🙏🙏
👍👍👍❤️💐💐💐
सर पहिल्यांदा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांवर एवढी माहिती मिळाली, ही सर्वी माहिती शालेय जीवनात मिळणे अत्यावश्यक आहे. धन्यवाद सर
नरके सर परुळेकर सर आपणांस सविनय जय भीम 🙏नरके सर म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहेत. ही मुलाखत खूपच चांगली घेतली आहे
डॉ. हरी नर्के सर व राजु परुळेकर सर आपले मनपुर्वक आभार,आपल्यामुळे फार महत्वाची वास्तविक माहिती मिळाली.👍👍👌👌✌✌🙏🙏🙏
अप्रतिम मुलाखत. पुन्हा पुन्हा पाहण्यासारखी.
राजु परूळेकर नेहमी हटके मांडणी करतात. मराठीत सद्य घडीला सत्यवचनी असणारे पत्रकार आहेत ज्यात तुम्ही येता
ही मुलाखत ऐकून मी खूपच भारावून गेलो आहे. आता मला हरी नरके, य. दि.फडके, पा. वा . काणे, वि.का. राजवाडे आणि राजू परुळेकर या सर्वांचं लेखन वाचायची तीव्र इच्छा झाली आहे.
आ ह साळुंखे सुद्धा
मा . हरी नरके सर व मा . परुळेकर सर आपल्या दोघांचे स्पष्ट विचार ऐकले खर तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ . बाबासाहेब आंबेडकर ही खूप थोर / महान व्यक्तिमत्वे आहेत . पण आपण त्यांना जाती - जाती मध्ये त्यांना बंद करून टाकले आहे .
या थोरांचे विचार नेहमीच आपणांस प्रोत्साहित करत असतात . सलाम त्यांच्या कार्याला .
बरीच नवीन माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाली . छान मुलाखत . धन्यवाद !
आदरणीय राजू परुळेकर सर आपण फुले,शाहू,आंबेडकर साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक दिवंगत हरिभाऊ नरके सर यांची घेतलेली दीर्घ मुलाखत पाहिली खूप छान मैत्रीपूर्ण वातावरणात अनेक ऐतिहासिक विषयावर चर्चा आणि माहितीची देवाण घेवाण पहायला मिळाली आणि ज्ञानात भर झाली यदाकदाचित ही हरिभाऊ ची शेवटची मुलाखत असावी असे दिसते हरीभाऊ ना विनम्र अभिवादन
अज्ञातवासात असलेले साहित्य नरके गुरुजीं मुळे सर्व सामान्य माणसाला कमी किंमतीत उपलब्ध करून दिली आहेत अशा उच्च शिक्षण विभुषित व्यक्तिस भावपूर्ण श्रद्धांजली
हि मुलाखत म्हणजे फक्त बहुजन समाजातील च नाही तर सर्वांसाठीच खूप महत्वाची आहे..🙏
परुळेकर सर खूपच छान मुलाखत
एका मुलाखती मध्ये दोन पुस्तके वाचल्यासारखं वाटत आहे
फारच सुरेख मुलाखत .राजीव जी तुमच्या मनातील प्रश्र्न विचार करायला लावतात .ही मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहे .मी एक सामान्य स्त्री पण सी .डी . देशमुख यांबद्दल माहीती कळवली . माननीय य.दि .यांनी लगेच त्यावर त्यांनी पत्र पाठविले .
It's not an interview, it's an awesome discussion.
भाऊ, मराठीत लिहा.
बरीच माहितीपूर्वक माहिती भेटली धन्यवाद सर .
आदरणीय नरके सर आणि राaजू परुळेकर सर दोन विद्वानांची मुलाखत ऐकून मला धन्य वाटलं डॉ 😂बाबासाहेब महत्मफुळे सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रावर आपण लख्ख प्रकाश टाकला अपणा दोघानाही कोटी कोटी प्रणाम
अतिशय अभ्यासू असणारे राजू परुळेकर....आणि संपूर्ण आयुष्य बहुजनांसाठी झटणारे हरी नरके जी....दुग्ध शर्करा योग
भगवान बुद्ध नंतर 2500 वर्ष नंतर फुले शाहू आंबेडकर युग निर्माते आहेत
खूपच विचार करायला लावणारं प्रत्येक मुद्द्यावरचं नरके सरांचं विश्लेषण आहे. राजू सरांचे विशेष धन्यवाद या मुलाखतीसाठी. 🙏🏻
बहुजनांच्या डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत... छानच
झाेप उडेल अशी मुलाखत आणि माहिती ही धन्यवाद तुम्हा दाेघांच ही सर 🙏🙏🙏😊
श्री नरके सरांची मुलाखत मला खूप आवडली.ज्या थोर व्यक्तींची त्यांनी केलेल्या अलौकिक कामगिरीचा, समाज प्रबोधनाचा उत्तुंग असा आलेख सरांनी ठेवला आहे त्याचे आजच्या नेत्यांनी पारायण केले पाहिजे.तुम्हा दोघाना माझे शतशः प्रणाम.
अत्यंत महत्वाची माहीती पुर्वक इतिहासाचे पुरावे देऊन घेतलेली नंबर एक मुलाखत.
Great Sir.👍
Brilliant, thank you Raju Parulekar and of course Narake Sir
खूप सुंदर मुलाखत हि भेट अप्रतिम आहे
वेळ काढून अगदी आवर्जून एकावी आशी मुलाखत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्यात शाहू, फुले, आंबेडकरांनी महाराष्ट्र देशासाठी काय केले, सामाजिक, सांस्कृतिक चळवल कशी उभी केली, आपल्याला काय संस्कार दिले हे जाऊन घेण्यासाठी आणि बरेच काही, खूप सुंदर 👌🏻👍
अतिशय सुंदर, मनाला शांत वाटणारी, एकत राहावी अशी चर्चा एकली.एका वेगळ्या जगात फिरून आल्यासारखे वाटले.आत्ताच्या सामाजिक गढूळ वातावरणात एक आदर्श चर्चा ही परत परत तरुणांना एकावयास मिळाली पाहिजे. सध्या समाजात आदर्श वाटावी अशी एकही व्यक्ती दिसत नाही. परत एकदा एक चांगली चर्चा एकवयास मिळाली या बद्दल आपणा दोघांना नमस्कार.
खूप सुंदर मुलाखत.
चित्तथरारक...
अतिशय सुंदर आणि अति उत्तम झालेली आहे मुलाखत एकदम छान 🙏 आपले मनापासून आभार
खूप छान व वस्तुनिष्ठ व सत्य माहिती सांगितली आहे नरके साहेबांनी.
खूपच छान मुलाखत घेणारे आणि देणारे, त्यामुळे बरीच माहिती मिळाली, धन्यवाद
❤ केवळ ज्ञानभांडार.
*🌿🌹मनःपूर्वक❤️धन्यवाद🌹🌿*
राजु परुळेकर साहेब आपले खुप खुप आभार. हरी नरके साहेब यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तिच्या तोंडून खुप काही रहस्य ऐकायला मिळाली आणि अनेक संभ्रम दूर झाले.
अतिशय चिकीत्सक मांडणी,या सत्यशोधकी ज्ञानाला कोणताही अती मती वाला काउंटर करू शकत नाही.😊
स्वातंत्र्यपूर्व काळातील महान व्यक्तीचा इतिहास किती मोठा होता है सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचलाच नाही त्यामुळे आजची ही सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या ह्या एकलेल्या मुलाखती वरून फार गैरसमज दुर होतांना दिसतात.
नरके सरांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुलेंनी टिळकांच्या जामिनासाठी 10,000 रूपये त्याकाळी भरले. हे ऐकल्यावर फुले यांच्या चांगुलपणावर तर साक्षात परमेश्वर देखिल शंका घेणार नाही. हे अजिबातच सोपे काम नाही.
10 हजार रुपये ? त्या काळी
@@subh2173 मुंबई तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस चे बांधकामाचे कंत्राट महात्मा फुले ह्यांच्या कंपनीने GIPR आणि ब्रिटिश बॉम्बे सरकार कडून मिळवले होते , १५०००० रुपयाचे कंत्राट तत्कालीन काळात ब्रिटिश सरकारने काढले होते
महात्मा
महात्मा फुले यांच्या विनंतीवरून पुण्याचे रामशेठ उरवणे यांनी टिळकांचा जामीन केला होता.👍
हो खर आहे हे
या मुलाखत नाही हा तर वैचारिक खजिना मेजवानीच, अभिनंदन आणि धन्यवाद राजू सर.
हरीभाऊ सर व राजु भाऊ खुप छान तुमचा अभ्यास छान माहिती धन्यवाद सर
✍📖मराठी साहित्य क्षेत्रातील थोर विचारवंत, लेखक, मराठी ब्लॉगर आणि फुले साहित्याचे गाढ अभ्यासक आदरणीय प्राध्यापक हरी नरके यांना भावपूर्ण आदरांजली💐 तथागत बुद्ध कृपेने त्यांना मुक्ती देवो हीच प्रार्थना 💐🌹🙏
खूप चांगली मुलाखत. डॉ.हारी नरके सरांचे अभिनंदन .धन्यवाद.आणि दोघांनाही शुभेच्छा.
ब्राह्मणां पेक्षा जास्त ब्राह्मणवाद ओबीसी मध्ये आहे
सूर्यापेक्षा सूर्याकडून उष्णता घेऊन तापलेली पायाखालची वाळू अधिक त्रासदायक आणि तापदायक असते.
@@kishorrasal9506 उपमा गंडलीये.
जातीभेद सगळेच करतात, खापर मात्र ब्राह्मणांवर फोडतात, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना त्यामुळेच त्याला जातीभेद न म्हणता ब्राह्मणवाद म्हणतात, जेणेकी मूळ लपावे.
@@kishorrasal9506
त्या ऐवजी म्हणा
नाली दुर्गंध कमी देते, नालितल्या घाणीचे अंगावर पडलेले शिंतोडे जास्त दुर्गंधी असतात 😊
@@DailyLifeSolution सुभाषित आहे ते,उपमा योग्य आहे.
आगदी बरोबर👍 , हरी नरके सर आज तुम्ही आमच्यात नाहीत याचे दुःख वाटते!😢
खूपच छान व मौलिक विचार (नरके सर व परुळेकर सर) ऐकायला मिळाले.यासाठी खूप खूप आभारी आहे.धन्यवाद..👌👍🙏
खूप खूप धन्यवाद . या मुलाखतीतून खऱ्या अर्थाने महात्मा फुले , शाहू महाराज , छत्रपाती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , य. दी. फडके समजले . हरिभाऊ नडके सर, व राजू परुळेकर तुमचा खूप मोठा व्यासंग . त्रिवार धन्यवाद .
संपूर्ण मुलाखत ऐकली...दोन अभ्यासू व्यक्तिमत्त्वांनी खिळवून ठेवले होते.. धन्यवाद नरके सर अणि राजू परुळेकर..
Khup chan, अभ्यासपूर्ण, interview, salute to Karke sir
अप्रतिम मुलाखत आहे --- सर्वांनी आवर्जून पाहावी 👌👌
बहुजनवादी इतिहास बुद्ध ते बाबासाहेब आंबेडकर हा किती अनमोल वारसा आहे हे ह्या मुलाखतीतून कळते.
खूप छान राजू सर व आ. हरी नरकेजी 🙏
राजू पळूलेकर आपले आभार आणि नरके सरांचेही आभार!
प्रा. हरी नरके सर आणि परुळेकर सर, हा interview करण्यासाठी खुप खुप धन्यवाद! 🙏👏👍
बहिष्कृत भारत मध्ये बाबासाहेबांनी ब्राम्हण्यवाद असा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ ते एका विशिष्ठ प्रवृतीशी निगडित आहे, त्याचा ब्राम्हण जातीशी फारसा संबंध नाही. ब्राम्हण्य म्हणजे अशी प्रवृत्ती, जे स्वतःला, स्वतःच्या जातीला दुसऱ्यापेक्षा वरचढ समजते
राष्ट्रपुरुषांनी समाज प्रबोधन करण्यासाठी पाठवलेला विद्वान म्हणजे हरी नरके साहेब
अतिशय सुंदर मुलाखत
महात्मा फुले सावत्रीआई फुले यांची उपकार स्त्री , पुरुष , सर्व बहुजन हे आचंद्रसूर्य पर्यंत विसरणार नाहीत
नरके सर आणि राजू परुळेकर तुम्हा दोघांना खूप धन्यवाद ! अप्रतिम मुलाखत!!
बहुजनांना सार्वसमावेशक प्रगल्भ विचारांचा फुलेवादी, आंबेडकरवादी, प्रबोधनकारवादी होण्यापेक्षा मनुवादी, दांभिक, संकुचित ब्राह्मणवादी होणे आवडावे हेच या समाजाचे दुर्दैव आहे.
अप्रतिम अभ्यास पूर्ण मुलाखत नरके सर, जय शिव शाहू फुले आंबेडकर जय संविधान जय भारत 🙏
खूप छान सखोल मुलाखत इतिहास
अप्रतिम मुलाखत....अतिशय माहितीपूर्ण....धन्यवाद
राजू परूळेकर, तुमचे आभार.तुमच्या उपक्रमास शुभेच्छा.
I am impressed and inspired sir thank you so much for this interview
खूप उत्सुकतेने एकावी अशी चर्चा आहे.
भ.बुध्द छ.शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ आंबेडकर, जवळकर, जेधे, प्रबोधनकार ठाकरे आणि बरेच इतर बहुजन समाज सुधारक यांच्या विचारांची ऐतिहासिक माहिती मिळाली. 👌👍🙏 धन्यवाद हरी नरके व राजू परुळेकर साहेब.
ज्ञानात मोलाची भर पडली. 🙏💐💐
अत्यंत माहिती पूर्वक संभाषण...❤️❤️❤️.. राजू सर ह्यांना एक सुचवाव वाटत, तुम्ही समोर बसलेल्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण झाल्यावर जर बोललात तर आणखी चांगलं होईल असे मला वयक्तिक वाटते, बाकी तुम्ही आमच्यापेक्षा खूप बुद्धिमान आहात...
प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा असे दोघेही उत्तम (मनाने आणि बुद्धीने)असतील तर अशी छान मुलाखत विकसित होते
खुप छान विश्लेशन केले आहे
परूळेकर सर ,तुमचा प्रश्न असा होता कि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शालेय शिक्षणात म्हणजे बालभारती मधे कधीच शिकवले. नव्हते त्यामुळे च अजूनही लहानपणापासून काही लोकानां त्याच महत्व समजत नाही. जयभीम......
सर आपले आणि नरके सरांचे मनापासून आभार, खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान माहिती या मुलाखतीत समोर आली.
सन्मानित नरके सर हे आजच्या काळातील अत्यंत संयत आणि अभ्यासू विचारवंत आहेत, त्यांची मुलाखत घेऊन , या तुमच्या वैचारिक परंपरेत मानाचं पान तुम्ही लिहिलेलं आहे , राजू जी....धन्यवाद....!
अप्रतिम मुलाखत प्रा.हरी नरके सरांच्या ज्ञानाची अद्भुत मेजवानी आणि सय्यमी मुलाखतकार राजुजी परुळेकर मस्त योग जुळून आलाय.खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
डॉ हरी नरके सर आणि राजू परुळेकर सर यांचे खूप खूप धन्यवाद