Luxury in Simplicity | कोकणात राहून मी काय कमावलं?
HTML-код
- Опубликовано: 20 апр 2023
- Luxuri In simplicity
साला उगाच मोठे झालो... आकाशात उडायचं सोडून सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झालो...
पैसे कमवेन मग सुखी होईन अस वाटलं होत पण रेस मध्ये धावता धावता माझ आनंदाचं गाव मात्र हरवून बसलो...
पंच ज्ञानेंद्रियांना सुखावणारं सगळं काही होत माझ्या गावात...
.... कष्टाची भाकरी खाऊन तृप्तीचे ढेकर देत सुष्यागाद जगत होतो.. .... साधेपणातलं सुख मी ओळखल अस्त तर??...सात जन्मंच्या पुण्याईतून मिळालेला माणसाचा जन्म शेवटी मायेच्या जाळ्यातच फसला... - Развлечения
कित्ती सुंदर बोलतोस रे.. अगदी हेवा वाटतो काय मस्त जगतोयस देवभूमी कोकणात 🤗ऐकत रहावंसं वाटतं आणि तिथलं जगणं अनुभवावं 😊खरंच कोकणातली माणसं साधीभोळी... 👍😊खुप नशीबवान आहेस बाळा तु 👍खरंखुरं सुशेगात जगयतोयस 👌👌
Very nice😊👍🏞🏝
खरे आहे
अगदीच...
सुंदर प्रतिसाद...
अति सुदंर प्रतिसाद...👌👍
एक उच्च शिक्षित युवकाचे कोकणी मालवणी इंग्रजीवर असणारे प्रभुत्व खरंच ग्रेट!💐
सर्वात उत्तम कमेट
प्रचंड भाषेवर प्रभुत्व, शुद्ध, आणी चपखल, क्या बात है मित्रा, असचं कोकणावर प्रचंड प्रेम करत रहा, शतदा प्रेम करावे आपल्या कोकणावर.❤🎉❤❤❤❤🎉 ❤❤❤❤❤
I guess he has done engineering. Really great thinking
हया जगन्यावर हया मरणावर शतदा प्रेम करावे तसे तु निसर्गावर प्रेम करीत आहेस. तुझे विचार हया राजकारण्यांना कधी कळणार. ह्यांना कोकणचा कॅलिफोर्निया करयचा आहे.
प्रसाद किती रे छान बोलतोस तू तुझं बोलणं ऐकून एक गीत आठवलं. या जन्मा वर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मित्रा तुझ्या सारखं जगणे सर्व कोकण प्रमीणला. लाभो
कोकणी रान माणूस म्हणून तुम्ही खरोखर वास्तव जीवनाशी एकरूप झालात, तुमचं सर्वाना वस्तू स्थिती समजावून देण्याची तळमळ मनाला भिडणारी आहे, उगाच माणसांनी आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत, तुम्ही करीत असलेलं प्रबोधन खूप आवश्यक होऊन बसले आहे, खूप खूप धन्यवाद
खरं आहे.
true
किती सुंदर बोलतो रे बाळा तू👌👌👍
Good, dada very nice..
@@snehlatagaikwad1611 , good.
रानमाणसा..!! आज आवाज काही थबकलेला वाटतोय एक मनाच्या तळाशी साचलेलं दुःख जाणवतंय एक भावनिक साद जाणवतेय.. आणि ही साद जर आज भूमिपुत्रांना ऐकली नाही तर आपला लाल मातीने समृद्ध कोकण उद्या काळवंडल्याशिवाय राहणार नाही..
❤
बारसु रिफायनरी वर काही तरी व्हिडीओ बनवा.... नुसतं आमचं कोकण नका करू वाचवा कोकण ला.... @अहमदनगर
@@vitnorvishal7220 tumhi pan kara kaitari
कुठे ते शहरातील 'खुराड्यासारखी' घरे,अन कुठे तुज़े आलिशन घर,,
कुठे शहरातील धूराने,प्रदूषणाने,कर्णकर्कश आवाजाने 'माख्लेले रस्ते,,अन कुठे तुझे सुंदर शांत पक्षांची किलबिल एक्विनरे रस्ते
लोकांना हेच आवडते, शांतता आवडत नाही, चमचामीत खाणे आवडते,आजकाल आंबे फणस करवंन्दे, जांभळे कोणालाही आवडत नाहीत
खरोखर आहे कोकण जगता आल पाहिजे स्वतःसाठी.फक्त पैशासाठी नाही.
बरेच जण विचारतंही असतील तू कोकणात राहून काय कमावलंस पण त्यापैकी मी नाही. किंबहुना तू माझं inspiration आहेस जेणेकरून मी माझं उर्वरित आयुष्य कोकणात माझ्या गावी राहून व्यतीत करायचं ठरवलं आहे आणि लवकरच मी शिफ्ट होणार आहे. तुझ्यासारखी विचारसरणी प्रत्येक कोकणी माणसाची असली पाहिजे. तुझ्यातले चांगले बदल प्रत्येक कोकणी तरुण, तरुणीमद्धे ही घडून येवोत. आज उदरनिर्वाहासाठी पैशामागे धावून शहर गाठणारा आणि तेथील मायाजाळात गुरफटणारा प्रत्येक कोकणी माणूस जर हा विचार करु लागला तर परप्रांतीयांना कोकणात आमंत्रणाची आणि घुसण्याची संधीच मिळणार नाही. तुझ्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती लवकरच होवो हिच आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मनःपूर्वक शुभेच्छा 🌹👌👍
आमहाला देखील असंच जगायचं आहे. मुलं तयार होत नाहीत आम्हाला यायला देत नाहीत गावाला मला ही साधं राहणीमान आवडतं
@@vaishalikadam7946 ताई, पाचश्यात संस्कृतीचं नाहीतरी आपण अनुकरण करतो. मग तिथे मुलं सज्ञान झाली की, त्यांना स्वावलंबी होण्यासाठी पालक त्यांना स्वतःमद्धे गुंतवून ठेवत नाहीत किंव्हा स्वतःही त्यांच्यामध्ये गुंतून राहत नाहीत. आणि अगदी वयाच्या पन्नाशीनंतर किंव्हा निवृत्तीनंतर आपण आला दिवस न ढकलता छान स्वछंदी राहायचं निदान ह्या मताची निदान मी तरी आहे..
@@vaishalikadam7946 आता आपणच सिमिलर आवडीच्या लोकांनी मिळून सहजीवन निर्माण करण्याची गरज आहे
No
E
@@vijayaghag7889 ताई, प्रतिक्रिया शब्दात मांडली तर बरं होईल. कोड्यात नको..
प्रसाद, तुझे व्हिडियोज नेहमीच बघत असतो. हा व्हिडियो विशेष भावला. जे जे मनी होते ते ते यात तुझ्याकडून ऐकायला मिळाले म्हणून विशेष आनंद वाटला. यातला शब्द न शब्द खरा होता.. मनापासून उमटलेला होता. खूप छान वाटलं. तुझ्या पुढल्या आयुष्याचे विचार नक्कीच प्रभावित करणारे.
हे व्हिडियोज जास्तीत जास्त लोकांनी पहायला हवेत. विशेष म्हणजे कोकणातल्या माणसांनी पहायला हवेत. विकासाच्या नावाखाली आंधळेपणाने निसर्गाचा -हास करत बेसुमार धावण्यापेक्षा निसर्गात राहून निसर्गाने बहाल केलेल्या गोष्टींचा जीवनात जास्तीत जास्त वापर करून जीवन आनंदी करणे हे व्हायला हवे. त्यासाठी खरं सुख काय? खरा आनंद कशात आहे याचा जाणीवपूर्वक विचार सगळ्यांचाच व्हायला हवा, नाही का? हे तुझे व्हिडियोज असे विचार प्रबळ करायला नक्कीच सहाय्य करतायत यात शंका नाही. त्याबद्दल तुझे मनःपुर्वक अभिनंदन. पुढल्या वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा.
दादा तुझे प्रत्येक शब्द मोलाचे वाटतात आणि तुझासारख निखळ स्वच्छंदी जगाव अस वाटत..🤩तुझा निसर्गावरील प्रेमाला सलाम🙏
कोकण वाचवता यावा म्हणून तुझे प्रयत्न स्तुत्य आहे. तुझ्या सारखे अजुन कार्यकर्ते झाले पाहिजे. काही वर्षांनंतर जर तू सोशल मीडिया वर नसशील तर ही चळवळ बंद होणार नाही याची काळजी घे. तुझ्या कार्याला सलाम.👍 कोकणातले जे सुशेगाद जीवन जगतात ते नशीबवान आहेत. तुम्ही सुख कशात मोजता पैशात की समाधानात हे महत्त्वाचे. गावी उत्पन्नाची साधने निर्माण झाली पाहिजे. शहरे बकाल आणि गावे ओसाड हे चित्र बदलले पाहिजे.
Khup chan vichar ahet asha vicharane gavakade pahile tar kiti samadhan milel ani tumhi sukhi pan honar
खूपच छान! शहरी मोहापासून लांब शांत नैसर्गिक वातावरणात समाधानी आयुष्य❤❤❤
Ye bhau business sang
प्रसाद तुझे खूप कौतुक. कोकण वाचवण्यासाठी निस्वार्थीपणाने तु घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे. तुझी शब्दाची मांडणी बोलण्याची पद्धत मनाला भिडते. तुझ्या या स्तुत्य उपक्रमाला आमच्याकडून शुभेच्छा आणि आर्शिवाद🙏
कोकण वाचवण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून तुमची चाललेली तळमळ कौतुकास्पद आहे.आम्ही कोकणकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि जे तुम्ही बोलतात ते आम्ही स्वतः अनुभवलय त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत...🙏🙏
मी जयसिंग खबाले कोल्हापूर माझा कोकणच्या या देवभूमीला निसर्गरम्य दैवी अविष्काराला साष्टांग प्रणाम ❤
प्रसाद धन्य आहेस तू आणि नशीबवान ही, वाटत तुझ्यासारख जगाव पण वेळ निघुन गेली आहे आणि कोकणात, जंगलात माझी जागा नाही आणि ती घेण्याची ऐपत ही नाही,असाच निखळ जगत/वाहत राहा. तू माझा आदर्श आहेस
प्रसाद तुझ्या कार्याला सलाम , आणि तु जे कोकणात राहुन अनुभवतो आहेस ते खरच खुप सुंदर जिवन आहे , आम्ही फक्त ते मे महिन्या पुर्त अनुभवतो , आज काही कोकणवासी कायम स्वरुपी मुंबईत राहतात त्यांना आपला गाव , आपली माती , आपली माणस नकोशी वाटतात , त्यांना तु तुझ्या माध्यमातुन चांगलच उत्तर दिलस , आज आपणच जर आपल्या गावांकडे पाठ फिरवली तर आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवणार ? आज नोकरी साठी आपला गाव सोडुन आलेला चाकरमनी १०-१२ तास मुंबईत भरडला जातोय , आणि एवढ करुन पण भाड्याने किंवा अगदी लहानश्या खोल्यांन मध्ये राहतोय , त्यांना मला विचारावस वाटत हिच का आपली प्रगती? मग काय मिळवलत तुम्ही स्वताचा गाव सोडुन ? आज प्रसादने जे कमवल आहे त्या साठी खुप मोठा त्याग करावा लागतो आणि तो फक्त ध्येय वेडा आणि गाव वेडा माणुसच करु शकतो .
Hi
प्रसाद, खूप छान बोलतोस..मनाला भिडणारं ..पटणार.तू तरुण मुलगा आहेस आणि कोंकण वाचविण्याची तुझी ही तळमळ अनेक तरुणांना प्रेरित करेल असे वाटते..फक्त व्हिडिओ तून एकच समजलं नाही की तू नेमका कोणता व्यवसाय कोंकणात करतो आहेस.बऱ्याचशा गरजा निसर्ग भागवीत असला तरी काही गोष्टींसाठी पैसा कमवावा लागतोच..त्याविषयीच्या तुझ्या कल्पना ऐकायला आवडल्या असत्या..कारण बरेच कोंकणी तरुण अनिच्छेने उत्पन्नाची काही साधने नाहीत म्हणून शहराची वाट धरलेले आहेत..खूप सुंदर विचार मांडले स..कौतुक वाटते तुझे.
दादा तुमचा हा विडिओ पाहून डोळ्यात आपोआप पाणी आले असे वाटले की आपण आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करत आहोत 💐
So proud feel 💐
आज पालघर मध्ये येत असलेला रिफायनरी तेवढा बंद करा... कोकण वासियांनो 😢
Agadi khara ahe 100%. Everyone is busy in maintaining false status in society.....
आपली परशुराम भूमी म्हणजे जणू
स्वर्ग. पण हे पाहण्यासाठी सुंदर डोळे हवेत. याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आनंदी मन हवे.
खूपच छान विवेचन,तुमचा बोलण्यातला मतितार्थ लक्षात घेऊन आपली जीवनशैली निदान १० लोकांनी जरी बदली तर नक्कीच परिवर्तन शक्य आहे👍
तुमच्या निसर्गप्रेमास सलाम दादा,,आम्हा निसर्गप्रेमींना खुप अभिमान वाटतो तुमचा😊
बाळा, पुन्हा एकदा तुझो निसर्गावर अत्यंत मोलाचो संदेश. खराच सध्द्याच्या या माॅडर्न जगात तुझ्यासारख्या तरुणांची खुपच आवश्यकता आसा. वाचवुया या आपला कोकण.!!!!!!!!!!!! धन्यवाद.👌🙏
बाबू किती छान वर्णन केलेस रे कोकणातले!तू सांगितलेले सर्व सत्य आहे सर्वानी निसर्गाचा उपभोगघेतलाच पाहिजे!सद्या मी 15 दिवसासाठी माझ्या गोव्याचा घरी आहे.मुलांचे जाब
नातवंडाचे शिक्षण हे मुंबई तच करावे लागते!
प्रसाद मित्रा, प्रथमतः तुझे मनपूर्वक अभिनंदन. कोकण वाचवण्यासाठी निस्वार्थीपणे तू करीत असलेली मेहनत ही खूप कौतुकास्पद आहे. तुझी शब्दाची मांडणी , बोलण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. तुझ्या या स्तुत्य उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ❤🎉😊 6:51
होय प्रसाद खरंच आपलं गाव हीच आपलीच संपत्ती आहे. तुझं विश्लेषण ऐकताना पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट खूप आनंद देतो. हा अनुभव स्वर्गीय अनुभव आहे जो शहरात अनुभवता येत नाही. ❤❤❤❤
कोकण म्हणजे आपला कॅलिफोर्निया आहे. आम्ही कोकणाततले आहोत ह्याचा अभिमान वाटतो. आनंद आणि समाधान फक्त आणि फक्त बस शुद्धता ❤❤
अप्रतिम.! सुंदर...! माहीती सांगण्याची पद्धत लयबद्धता खूपच छान आहे
नमस्कार दादा
मला हेवा वाटतोय तुमचा. मी पण तळकोकणात आहे. मला माझ्या कोकणाचं खूप खूप आकर्षण आहे. लहानपणी आम्ही ह्या सगळ्याच गोष्टी अनुभवल्या. पण आता माझ्या वयाचा विचार करता कठीण वाटतं.
माझे घरपण आहे पण आत्ता वयाची 76 वर्षे संपल्यावर कठीण दिसत आहे.
अधून मधून कारण शोधून मी तिकडे जाऊन येऊन असतो पण कायम तिकडेच राहाणॅची इच्छा काही पूर्ण होत नाही ही खंत.
देवाकडे हेच मागतो की पुढच्या जन्मात मी जर माणसाच्याच जन्माला आलो तर कायमचं माझ्या कोकणात मला स्थिर कर.
खूप खूप धन्यवाद 😊
तु या युट्यूबवर असाच येत रहा तुझे विचार खूप चांगले आहेत, तुझे व्हिडिओज बघून आमच्या मध्ये काही बदल झाला तर झाला.खरचं माणसाला जगायला जास्त काही लागत नाही पण माणसं उगाचच फक्त धावतात
बाळा,तुला सलाम!तुझे विचार ऐकले की माझे मन भूतकाळात जाते.मी देवगड तालुक्यातील एका लहान गावात (गढितामहाने) राहिले. आता तु निसर्गाचे वर्णन केले. ते मी अनुभव ले पण त्या वयात कळले नाही.1973 ला पुढील वाटचालीत गांव विसरून गेले.
प्रारब्ध,,,,,दुसरे काय ? 😔
निसर्गाला हपापलेली लोकं कोकणाकडे वळतील ....सगळं उजाडेल 😢.....कोकणात जमिन खरेदीला चक्क बंदी घाला ....पण ज्यांना निसर्ग राखायचा असेल त्यांनाच येऊ द्या .....झाडं लावण्याची सहल काढा आता ...बाहेर जायची गरज नाही .....
कोकणच्या निसर्ग सानिध्यात जीवन जगणे म्हणजे प्रत्यक्ष प्रथ्वीवरचा स्वर्गच.
खूपच छान दादा...तुझे विचार ऐकून खुप बरं वाटत..हल्लीच आपल बोलण झालं फोन वर
तुला मी माझ्या गावतल्या जागे बद्दल ही सांगितलं...पण कसं अस्त ना .. माझ्याकडे जागा बागायती असून मी काही करू शकत नाही आहे..आणि तुझ्याकडे काही नसून तू त्यात आनंद घेत आहेस❤ मी पण लवकरच ह्याचा एक भाग होणार आहे. मला ही हे मुंबईचं शर्यती जीवन नाही जगायचं... दादा तुला सांगितल्या प्रमाणे नक्की भेट होईल आपली ..मे मध्ये ...❤
भावा काय भारी बोलतोस रे. एकदम मनातलं. सर्वांच्याच मनातील भावना व्यक्त केल्यास. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
खुप सुंदर आपल वक्तव्य आहे. भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे. ऐकत रहावस वाटत. ऐकताना माणुस मंत्रमुग्ध होतो. खुप छान. निसर्ग वाचवायची वेळ आली आहे. शासनाकडे दरवर्षी रिपोर्टींग होत. किती झाड लावली? किती जगली. सर्व कागदावर आकड्यांचा खेळ असतो बाबा.
हे तु नाही बोललास निसर्ग बोललाय निसर्गाचा खुण होतोय असे निसर्गाला आत्ता वाटु लागलयं व्वा भावा तुला मनापासून सलामच.तुझे मनापासून शतदा आभार. 👌🙏💐
खूप छान विचाप्रवर्तक तुम्ही आहात.
जगणं म्हणजे काय खरंच आज कळले..❤❤ खूप भावनाशील झालो...आपले शब्द खूप वजनदार आहेत. आम्ही आमचे साठी कधीच जागलो नाही...का?...
नमस्ते तुमच्या विचारांशी मी सहमत आहे कोकणातले खाणेपिणे सुद्धा साधे आणि छान आहे कोकणातल्या पाण्याला पण चव आहे साधे जेवण केलं तरी ते सुंदर लागतं धन्यवाद
किती छान बोलतोस! निसर्गाचे महत्त्व चांगले पटवले. खरचं आम्ही देवभूमीत रहातो. समाधानी आयुष्य जगतोय.
💐👌👌👌👌👌💐
फारच छान बोलतोस भावा
तुझ्या बोलण्यात कोकणचा मेवा
कोकण म्हणजे मायेचा ओलावा
येवा कोकण आपलाच असा किती किती
सुंदर मनाला मोहित करणार नयनरम्य
दृश्य खल खळणाऱ्या नद्या सळसळणार्ऱ्या बागा माझ्या कोकन
चे हे वैभव पहाण्यासाठी या हो माझ्या
गावा तू फारच छान बोलतोस भाव
मोहन साळवी रायगड
खूपच छान भावा तुझे बोलणे ऐकून मनाला खूप सुकून मिळतो
जबरदस्त मित्रा 👍, तू खूप छान आणि पोट तिडकीने कोकण आणि गावच्या राहणीमानबद्दल बोलतोस 👌.लोकांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडू दे हिच इच्छा 🙏🙏.. तुला खूप शुभेच्छा 💐..
😊फारच छान माहिती आहे. सर्वांनीच विचार करणे वेळ आली आहे.
सुंदर माहिती थेट गावी नेलात जगण्याची मजा निसर्गाच्या सानिध्यात आहे थँक्स
खरंच भावा तू जे बोलतोस ते खंरच आहे अस सुख कुठे नाही तूझ बोलन सुधा एकदम स्पष्ट आहे तूझ स्वप्न पूर्ण होवोत हि श्री स्वामी चरणी प्रार्थना 👍🙏
मित्रा तु जे कमवतो आहे ते अनमोल आहे. हे कोणाच्या ही नशीबात नसते👏👏
छान संदेश कोकणी रान माणूस शुभ अक्षय तृतीया 2023❤
नमस्कार प्रसाद ,तु छान माहितीपूर्ण ,विश्लेषक माहिती हृदयापासून देत आहेस ,धन्यवाद, कोकणी लोकानी याचा विचार जरुर केला पाहिजे.
छान व्हिडिओ निसर्ग जगवतो आणि जगण्याचा आनंद देतो
खरं बोललास तू प्रसाद, या सुंदर जीवनाचा तू एक आनंदयात्री आहेस. पक्ष्यांची नितांत सुंदर गाणी, वाऱ्याची तनामनाला गार करून जाणारी झुळूक, नदी ओढ्याच्या, व्हाळाच्या पाण्याचा सुंदर आवाज आणि शरीराला एका क्षणात विश्रांती देणारा त्या गार पाण्याचा सुखद स्पर्श, समुद्राची धीरगंभीर गाज, मोकळा भव्य सूर्योदय-सूर्यास्त, जो सिमेंटच्या जंगलात पाहायला मिळणं अगदीच दुरापास्त आहे, विविध वेली, झाडे, त्यांची फळे, त्यांचा सुमधुर स्वाद हे सगळं कुठल्याच फॅक्टरी त निर्माण करता येणार नाही, तर निसर्गानं हे देणं आपल्याला अगदी फुकट भरभरून दिलं आहे. असे निसर्गाच्या सानिध्यात जगणारा माणूस खरं सुशेगाद जीवन जगतो आहे, जसा की तू ☺️
तुझ्या या आनंद यात्रेस आणि निसर्ग वाचवण्याच्या, जगवण्याच्या प्रयत्नांना भरभरून शुभेच्छा 💐🌱🌴🌿☘️
Money,Building,Cars doesn't matter Nature and it's simplicity is always the first priority to live free life and healthy life
खूप खूप अप्रतिम...
इतकं अभ्यासू आणि शास्त्रीय, इतकं साधंभोळं आणि साधंसोपं, तरीही अगदी आतून आणि अगदी सुस्पष्ट मांडलंत गावपणाचं अप्रूप!
प्रत्येक वाक्य जोखून आणि मापून, तरीही तितक्याच कन्व्हिक्शनने आणि तळमळीने!
साधेपणातल्या आनंदावर मिरवणारी झगमगत्या विकासाची राख फुंकलीत आपण!
मनापासून कौतुक आणि शुभेच्छा!
कधीतरी नक्की सविस्तर व्यक्त होईन या व्हिडिओबद्दल!
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची खरंच भाग्यवान आहोत आम्ही कोकणापासून अगदी जवळ जन्माला आलो आम्ही. कोल्हापूर जिल्ह्यात.❤❤❤❤
रानमाणसा खरोखरच खूप अप्रतिम सुंदर वर्णन कोकणच्या भुमीच्या केला आहेस, कोकणच्या भुमीच्या पर्यटन वाढ होण्यात तुझ्या क्लिप चा खूप मोठा हातभार अशी आशा आहे नानांच्या नंतर तुझा भारदार आवाज मनाला भावून गेला
प्रसाद जगाची खरी श्रीमंती तुज़्याकडे आहे.
खूप खूप छान विचार
आहेत आम्ही फसलो गाव सोडून
आता काय उपयोग
मी कोकणातली आहे
हे सर्व सुख मी उपभोगल बालपणी
बाला तू छान जगतोस असाच सुखी रहा
गावबंधू,
अभिनंदनऐकून फारच छान वाटले.
सर्वप्रथम आम्हांला हे कळते पण वळत नाही.
लहानपण , बालपण, थोडे शिक्षण कोकणात गेले. वाटते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
आज साऱ्या आठवणी पुन्हा
उगळून आल्या. आम्ही दर 6/ महिन्यात एकदा 2/4 आठवडे कोकणात स्वतःच्या मातीच्या घरात राहून जुन्या आणि नविनचा मेळ करु पाहतो. तेवढंच समाधान.
सुखी आणि आनंदी रहा
God Bless you all.
🙏🙏👍🙏🙏
बर वाटल व्हिडिओ पाहून आहेत अशी माणसं अजून खूप आनंद झाला गदया आपला गावच बरा
फारच आनंदी देणारा तुझा जीवन प्रवास आहे तुझ्या हातून निसर्ग सेवा घडो आणि आम्हाला त्या मध्ये आम्हालाही सहकार्य करायला आवडेल
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खुप छान मन प्रसन्न होते तुझे बोलणे ऐकून
अगदी खरं आहे बोलतोस ते अतिशय छान सांगण्याची पद्धत
अतिशय सुंदर आणि नैसर्गिक वातावरण जीवनाला आणि जीवनात एक अतिशय सुंदर आनंदमय वातावरणात जगणे नेहमीच उत्तम तो आनंदच आगळा वेगळा असतो आपल्या अनुभवातून जाणवले फार सुंदर विचार आणि बोलणं ही छान .
तू social media मधून गायब होऊ नको प्लीज... तुझ्या मूळ खर कोकण समजत आम्हाला....
दादा जबरदस्त,सलाम आहे तुला,विकासाच्या नावाखाली काय करून ठेवले आहे हे समजून घ्यायला हवे आहे, पण विकास करण्यासाठी आपल्याला ढकल जातय हे समजण्यासाठी थांबले पाहिजे विचार केला पाहिजे ते सुद्धा समजणे कठीण झालेलं आहे,इतका हा विकास मोठा होऊ लागला आहे.
आणि हो तुझे बोलणे ,विषय मांडणे भावणारे आहे.
खुप छान बोलता सर!! आणि अगदी वास्तविक सांगता आहात तुम्ही खरंच खुप भाग्यवान आहात तुम्हाला हे सुंदर कोकणातील आयुष्य अनुभवता येत
खूप छान छान माहिती मिळाली फार आनंद झाला
You earn our respect dada...
You gave vision to many people.
I saw kokan from your eyes.. and that was amazing..😊
अतिशय सुंदर आणि अप्रतिम तुझे बोल. या गोष्टी मी सुध्दा प्रतेक्ष अनुभवल्या आहेत त्या सुध्दा खडतर खेडे गावात राहून पण असाच वाहत गेलो आणि..
किती नशीबवान आहात दादा तुम्ही, निसर्गाच्या सहवासात रहाता, खूपच छान बोलता, thank you या video साठी. निसर्ग पाहावयास मिळाला. 👍
बरेच अनुभव घेण्यासाठी कोकणात रहावे,खरे आहे ,, खूप सुरेख सादरीकरण केले आहे,,,,,,❤
👍
खूप सुंदरपणे मनोगत व्यक्त केले.तुम्ही खूप साध पण श्रीमंतपणे जीवन जगत आहात.😊भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.या समाजाला तुमच्या सारख्या रानमाणसांची गरज आहे. 🙏
सत्य व सुंदर माहिती.. खरंच कोकणातील माणसं खरोखर चांगली व माणुसकीचं आहे.. मी स्वतः अनुभव घेतला आहे व.. आज ही घेतो. मी व माझे मित्र.. मुरुड जंजिरा ला जात असतो. तुम्हाला पुढील... कार्याला.. स्नेह शुभेच्छा...
Great..अस पोटतिडकीने सांगताय.. खूपच छान..
ह्या दादांचे कोकणा बद्दल जी माहिती सांगतात ना.ती सांगायची पध्दत अतिशय सुंदर आहे.
गावात राहून तू जे कमवलं आहेस... ते लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा आम्ही शहरी लोकं कमवू शकत नाही... अनुभवू शकत नाही... या गोष्टीचं खुप वाईट वाटतं आणि तुझा खुप हेवा वाटतो प्रसाद... U r the luckiest person living in the village... मला सुद्धा तुझ्या सारखं lucky व्हायला आवडेल.... तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा... तुझ्या या प्रवासत सहभागी व्हायला आवडेल... मला करण्यासारखे काही असेल तर नक्की कळव 🙏🙏🙏
Sodal ka shahar
@@vijaysathe9510 अगदी आनंदाने 😊😊
खुपच छान संदेश..... मित्रा
Dhanyawad Bhai
Khup chan sangitale ahes
Ase vatate gavi ch rahave
प्रसाद, प्रथम तुम्हाला आणि तुमच्या कोकणासाठीच्या तळमळ आणि कळकळीला सलाम. आणि वरीष्ठ नागरिक म्हणून आशिर्वाद. आपण ज्या शब्दामध्ये व्यक्त होता ते शब्द मनाला भिडतात. आशयाचे गांभीर्य लक्षात येते. आपले विचार म्हणजे अंजन आहेत. प्रत्येक कोकणवासीयांने गांभीर्य जाणावे.
नमस्कार,मी मधुकर सावंत,बाळा,तू भावनांना जागृत करून हळवं केलस.मी लहानपणी आकंठ अनुभवलं आहे.अकस्मात तू मला 65 वर्ष मागे भूतकाळात घेऊन गेलास.धन्यवाद. बाळा,तू खऱ्या अर्थाने कोकणपुत्र आहेस.आमची पिढी हे सर्व मागे टाकून पैसा पैसा करीत मुंबईला धावलो.पैसा तर कमावता आला नाही पण दहा व्याधी मात्र फुकट कमवाल्या.आम्ही सगळे करंटे आहोत.आणखी काय लिहू.मनःपूर्वक आभार/अभिनंदन/आशीर्वाद.धन्यवाद.
Awesome
I like the way you are thinking about nature
Everyone should try to preserve our nature
नैसर्गिक जगणं किती सुंदर आहे, हे तू सोप्या शब्दात किती सहज सांगितले.
धन्यवाद.👌👌
अगदी खरं खरं आयुष्य जगतोय रे तू.
खरोखर सगळं जग पैशाच्या खोट्या सुखाच्या मागे धावतेय.
खर
खरंच जगातील सुखी माणूस.
खरा माणुस आहात जे मानवाने जगल पाहिजे हे तुम्ही सांगत आहात ईतकच नव्हे तर ते तुम्ही स्वतः पहिले जगत आहात. ईश्वर तुम्हाला शक्ति देवो
मित्रा,काय सुरेख आणि ललित सुंदर बोलता. तुमचे व्हिडीओ सहजसुंदर असतात.निसर्गाच्या भर उन्हाळ्यातील सृजनाचा अविष्कार तुम्ही किती छान उलगडून दाखविता.तुमचा व्हिडीओ बघताना एका सिद्धहस्त लेखकाचे सुरेख पुस्तक वाचतो आहोत असे वाटते.तुमच्या चिंतनशीलतेला आदरपूर्वक नमस्कार.निसर्गाच्या संपत्तीचा क्षय आपण थांबविला पाहीजे, जेणे करून आपल्या सर्वाना निसर्गाचा अक्षय आनंद घेता येईल हा तुमचा अक्षय तृतीयेच्या दिवशी दिलेला संदेश साभार पावला.आपणांस व आपल्या चमूस अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.💐👍
प्रसाद यांच्या विचारांएवढेच आपला प्रतिसाद सुद्धा उत्कृष्ट , ललितसुंदर व मनापासून आहे ़़़ 😊👍
Khup sundar Video v. Msg
भावा तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार चेहरा पाहून मला आगदी आनंद झाला अशीच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावांतील लोकांना सदैव आनंदी ठेवो हे निसर्ग सौंदर्य राजांचा अभिमान आहे,
खूप छान, दादा तुझ्या बोलण्यात खूप गोडवा आहे. खरंच जे सुख गावात आहे ते सुख शहरात नाही. शहर हे एक मायाजाल आहे. पैसा खूप आहे पण सुख नाही, माणस खूप आहेत पण आपल कोणीच नाही, जर का सुख, समाधान कुठे असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या कोणकणात आहे. म्हणून मी अभिमानाने बोलू शकतो की मी कोकणी आहे. ❤🤩💪
❤❤👌👍🙏
True
मित्रा ही शब्दाची सांगड कशी घालतोस यार खुप छान मनाला तुझं बोलन भावत
👍🏻👍🏻
अतिशय छान... तु खरा निसर्ग मित्र आहे
वा काय सुंदर विश्लेषण..
सुंदर आवाज आणि सखोल अभ्यास
जय महाराष्ट्र.
Great Mitra.....salaam tuzya naturalness la
कोकणात येऊन luxury promote करणारी माणसे कोकणी नाहीत, correct बोललास. कोकणाच खर promotion फक्त तू करतोस. कोकण सुंदर आहेच पण कोकणी जीवनपद्धती देखील सुंदर आहे, कारण ती simple आहे. काही गुंतागुंत नाही.
कोकण फक्त कोकणीच...
अगदी बरोबर आहे तुझं दादा
आज आपण future बनवण्याच्या नादात present मध्ये जगणं विसरलोय
खुपच छान माहिती दिली आहे.कोकणची आत्मियता मनातुन स्पष्ट करणे गरजेची आहे.
रवुप छान अभिनंदन आशिर्वाद असो पुढील वाटचाल करीत शुभेच्छा मित्रा रवरच मनभरून येते. तुझ्या बोलण्यात एक तळमळ निसर्गाच्या सान्निध्यात राहून किती प्रेमाने जवळ तु तो आंनद घेत आहे धन्यवाद
Absolute Truth ! Need to understand where happiness live..what is meaning of real progress..Need to educate..save and care of natural habitats.
मी राहुल वाघमारे पिंपरी चिंचवड पुणे येथील रहिवासी आहे मला पावसाळ्यात आठ दिवसांचा कोकण पहायचा अनुभवायचा आहे कमी त कमी खर्चात घरगुती पद्धतीने सोय होत असेल तर मार्गदर्शन करावे ही विनंती
Ratnagiri madhe ya
ब्लॉग खूपच आवडला, तुमचे शब्द न शब्द पटण्यासारखेच आहेत, धन्यवाद
खरंच बोललास,निसर्गाचा अनमोल ठेवा आपण जपलाच पाहिजे.त्यासाठी तू प्रयत्न करत आहे.तुझे स्वप्न पूर्ण होवो.निसर्गाची ही आपणास मिळालेली ठेव ,तिचे मूल्यमापन आपण करूच शकत नाही.विकासाच्या नावावर गावे भकास होत आहे त्याला थांबविलेपाहिजे.आजच्या मुलांना रानमेवा म्हणजे काय ते माहीत नाही.ते या तरुण पिढीला कळले पाहिजे .मी विदर्भाला,मला सुद्धा कोकणात येऊन रहावेसे वाटते.मला मदत करशील काय.त्यासाठी तुझा न.पाहिजे.तू करत असलेल्या कार्यास शुभेच्छा.
विकासाच्या नावाखाली निसर्गाची जी अवहेलना चालू आहे.खूपच त्रास होतो याचा दादा तू तुझ्यासारखे कोकणातील मंडळी एकत्र येऊन कोकणची काळजी घ्या.कारण कोकणासारख सौंदर्य परदेशात भेटत नाही.भारतीय माणूस परदेशी लोकांच नको ते अनुकरण करतो.आणि त्या लोकांना आपल्या भारतीय संस्कृती, निसर्गाविषयी आवड आहे.🙏
माणसाचं अंतिम ध्येय समाधान च आहे.....आणि ते आपल्या जवळच आहे ....प्रसाद तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जात..
👌👌👍
खरंच सुंदर माहिती आणि काळाची गरज आहे.
खूपच छान बोललास दादा तु, कोकण म्हणजे स्वर्ग आहे त्यात जगण्याचा अनुभव हा तुझ्या कडून शिकाव. खरच खुप पुण्यवान आहेस तु.
एकदम मस्त ,1000% बरोबर!!!❤❤