श्री ज्योतिर्लिंग यात्रोत्सव, अंत्री खुर्द | कुस्ती मैदान | चित्तथरारक बैलगाडी शर्यती |
HTML-код
- Опубликовано: 21 апр 2022
- अंत्री गावाचे पौराणिक महत्व
करवीर महात्म्य या ग्रंथात या भागाचा उल्लेख आला आहे. पार्वती गीरीजारूप धारण करून शिराळा तालुक्यातील गिरजवडे या ठिकाणी तपश्चर्येला बसली होती.त्यावेळी कोलासुर राक्षस साधुसंतांना त्रास देत होता म्हणून ते भगवान शंकराकडे गेले. तेंव्हा भगवान शंकर म्हणाले मी पार्वतीला म्हणजे गिरिजाला सांगतो त्याचा बंदोबस्त करायला. त्यावेळी गिरीजा अम्बामातेचे रूप धारण करून कोलासुर राक्षसाचा उत्तर ते दक्षिण असा पाठलाग करते. या राक्षसाला तलवारीने शीरेजवळ वर केला म्हणून त्या गावाचे नाव शिरसी झाले, त्याचे आंत्र बाहेर काढले ते गाव आंत्री झाले, वाकवले ते वाकुर्डे झाले,तो राक्षस पडला ते पाडळी झाले, शिराळ्यात मातेने विश्रांती घेतली. पुन्हा पाठलाग सुरु केला, राक्षसाचा रेड्यावर हल्ला केला ते रेड झाले, रेडा कापला ते कपारी झाले. अंबामातेचे आक्रमण पाहून राक्षसगण चवताळले .त्यांनी मातेच्या वाटेत इंगळ(विस्तव) टाकला ते गाव इंग्रूळ झाले.कोल्हासुर राक्षसाचा पाठलाग चालूच होता. अम्बामातेला आशीर्वाद देण्यासाठी देवगण ज्या ठिकाणी अवतरले ते देववाडी झाले. महालक्ष्मीने कडूलिंबाचा तोबरा भरला ते कोडोली (ता-पन्हाळा). राक्षसाचा टोप उडवला ते टोप आणि जिथे त्याचा वध केला ते कोल्हापूर.
अप्रतिम👌👌
धन्यवाद...☺️🙏
अप्रतिम ✌️💐🤟🤟🤟 खूप वर्षा नंतर गावची यात्रा पाहिली
धन्यवाद...😊🙏
Nice Dada
Thank you so much...😊🙏
अप्रतिम ✌️✌️
धन्यवाद...☺️🙏
nice patil👌
Thank you so much...😊🙏
Mast bhava ....Aaj phaili aamchay gavahi jatra👌thanks
धन्यवाद...😊🙏 माझंही गाव अंत्रीच आहे. आपले सर्व विडिओ पाहत राहा. आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. आपले कौतुक आम्हाला प्रोत्साहन देते.