Это видео недоступно.
Сожалеем об этом.
मोदी विरुद्ध शंकराचार्य ; कोण चूक, कोण बरोबर? | Dr. Sadanand More | Behind The Scenes
HTML-код
- Опубликовано: 7 авг 2024
- अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल शंकराचार्यांनी घटलेले आक्षेप योग्य आहेत का? हिंदू धर्माला शंकराचार्यांची खरंच गरज आहे का? धर्मसत्ता विरुद्ध राज्यसत्ता असा हा वाद आहे का? हिंदू धर्म वाचवण्यात शंकराचार्यांचं योगदान काय?
ज्येष्ठ विचारवंत, डॉ. सदानंद मोरे यांचे विश्लेषण...
#ayodhya #rammandir #narendramodi
===
00:00- प्रोमो.
03:07- शंकराचार्य आणि पिठांची निर्मिती कशासाठी?
08:32- हिंदू धर्म कोणी टीकवला?
10:30- हिंदू धर्मातील वादात शंकराचार्य गैरहजर? शिवकालीन दाखले.
12:53- शंकराचार्य काल सुसंगत असण्याची मागणी कधी उभी राहिली?
16:26- महाभागवत कृतकोटी - सामाजिक जीवनातील पहिला शंकराचार्य.
18:36- शुध्दीकरण, अस्पृश्य निर्मूलन आणि शंकराचार्य कृतकोटींची भूमिका.
21:44- शंकराचार्य relevent राहिले नाहीत?
24:23- हिंदू धर्म व्यापक होण्यास कोणाचा विरोध?
25:10- मानवाला धर्माची गरज आहे?
27:33- धर्मचिकित्सा का गरजेची?
28:58- राम मंदिराच्या निमित्ताने राजसत्ता आणि धर्मसत्ता संघर्ष?
33:10- शंकराचार्यांच्या राम मंदिरावरील आक्षेपांबद्दल.
38:45- राम मंदिराच्या उद्घाटनाचा मुहूर्त राजकीय?
46:17- प्रतिकं नाकारणे हा करंटेपणा?
49:25- धर्म आणि संस्कृतीच्या अभिमानाची पुढची दिशा काय असेल?
अतिशय संतुलित विश्लेषण. मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिंदू आहे हे अत्यंत महत्त्वाचे वाक्य आहे.
असेच मत थोर विचारवंत नरहर कुरुंदकर सरांनी मांडले होते.
ही सोय फक्त हिन्दु धर्मातच आहे नाहीतर सर तन से जुदा
धर्मनिरपेक्ष चे दुसरं नाव हिंदू धर्म
कधी इतर धर्मियांना पण आपले निर्भीत मत व्यक्त करायला आमंत्रण द्या
खर म्हणजे कोणीही धर्म निरपेक्ष नसतोच, पण ढोंगबाज नक्कीच असू शकतो.
"मी धर्मनिरपेक्ष आहे, कारण मी हिंदू आहे'' हे डाॅ. मोरे यांचे मत महत्वाचे आहे. म्हणजेच, माझा हिंदू धर्म मला हिंदू असण्याबरोबर धर्मनिरपेक्ष असण्याचेही स्वातंत्र्य देतो. अयोध्येतील बाबरी मशीदीखालचे उत्खनन करणारे Archiological society of India चे के. के. मोहम्मद 'माझा कट्टा' वर म्हणाले होते की हा भारत देश सेक्युलर आहेत कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत.
उत्तम कमेंट
खूप छान
हिन्दू ही एक जीवन शैली आहे . बुद्धांच्या वेळी २५००-२६०० वर्षा पूर्वी तत्कालीन भारतात ६४ प्रकारच्या विचार पद्धती होत्या . चर्वाक हा निवळ्ळ भोग वादी विचारधारेचा अधिष्ठाता होता . हे सर्व शारिरिक हिंसा मारामार्या न करता केवळ वादविवाद च्या पातळींवर विरोधक होते . ते सर्व समावेशक सामाजिक जीवन जगत होते
good comments
कारण वैदिक परंपरेतच जी दर्शन आहेत त्यातच न्याय अथवा सांख्य इ. दर्शन आहेत त्यात देव परंपरा नाही अथवा दैववाद नाही.
कसलं सुंदर विवेचन केलंय....ज्या लोकांना गादीचा मोह असतो, गादी साठी भांडण करणारे खरे शंकराचार्य असू शकत नाही...मूळ शंकराचार्यांनी वैदिक धर्म टिकवला..त्यासाठी जीवाचे रान केले.. आपल्या धर्मात परत प्रवेश करायला या शंकराचार्यांनी प्रेरित करायला हवे होते..आधीच आपण कुणाचे धर्मांतरण करत नाही.. पण जे आपला धर्म सोडून गेले होते, ज्यांचे बळजबरी धर्मांतरण केले त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेणे हे खरच या शंकराचार्यांचे काम होतं.... ..खूप छान विवेचन आणि अगदी खरय...
मी हिंदू आहे म्हणून धर्मनिरपेक्ष आहे असे सांगणारा महान विद्वान आपल्या चॅनेलवरच भेटू शकतो
तुला झाट कळालं नाही हे समजतंय तुझ्या कमेंट वरुन😂
मला शंकराचार्य व परिवारवादी पक्षांचे नेते यांच्यात बरेच साम्य वाटते, दोघेही बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेण्यात कमी पडत आहेत कारण आपापली मठी सोडायला तयार नाहीत
1) ruclips.net/video/Qg6oatCXNN0/видео.html
2) ruclips.net/video/TyZs28qblPM/видео.html
3) ruclips.net/video/oXW3NFlq1Eo/видео.html
या विषयावर बोलण्यासाठी डाॅ. मोरे ही अत्यंत योग्य अशी व्यक्ती आहे.
खुप छान विचार आहेत मोरे सरांचे. जे मोरे सरांना समजते अजुनही चार ही शंकराचार्याना कधीच कळाले नाही कळनारही नाही
हे नक्कीच शंकराचार्य यांच्या पेक्षा बुद्धिमान आहेत.
Hechukiche hyàchya adchehi pithadhishkase chukiche tynnche bjp shi patat nahi
मोरेजींचे विचार उत्कृष्ट व आदरणीय आणि आचरणीय
सर , अतिशय उत्तम , संतुलीत मांडणी केली . शंकराचार्य यांनी राम मंदिर प्रश्र्नी उभा केलेला वाद या संदर्भात योग्य चर्चा केली . धन्यवाद
अत्यंत समर्थक आणि अभ्यासपूर्ण विवेचन. अजूनही कोणतेही पीठ धर्माचा कालानुरूप बदल घडवून आणण्यासाठी विचार करत नाही. त्यामुळे पीठे अर्थहीन झाली आहेत.
खर आहे, काही वर्षातच पंतप्रधान काही कामाचे पद नाही अजून एक दोन निवडण्यात येतील ! राज्यसंस्थांवर कोणाचाच अंकुश नसेल आणि जनता संगळी नुसती मान डोलावनारी असेल तर छान च होईल
धर्म माणसासाठी असतो धर्मासाठी माणूस नसतो best lines
This line is written by Dr. Babasaheb Ambedkar in his book.
dharmachi garaj kiti ahe
खरा सनातन धर्म हा केवळ माणसांसाठीच नसून सर्वांसाठी म्हणजेच -----
निसर्ग, धरती, समुद्र - नदी, झाडे वेली, प्राणी - पशूपक्षी इत्यादी इत्यादी सर्वांसाठीच आहे....
म्हणूनच तर सनातन धर्माने आपल्याला या सर्वांची पुजा करण्याची व त्यांच्याही अधिकाराचं भान ठेवण्याची शिकवण दिली आहे!
सनातन हिंदू धर्मात शंकराचार्य पद पुज्यनीय आहे, परंतु या पदावर चुकीचे लोक बसले आहेत
बरोबर!
बरोबर
खरेच आहे
He is really following and spreading Sant Tukaram Maharaj's social reforms and broad-minded thoughts. We respect such people in our society
1) ruclips.net/video/Qg6oatCXNN0/видео.html
2) ruclips.net/video/TyZs28qblPM/видео.html
3) ruclips.net/video/oXW3NFlq1Eo/видео.html
अत्यंत सुंदर अणि सखोल विश्लेषण. उथळ चर्चेपेक्षा अशी सखोल माहितीपूर्ण चर्चा महत्त्वाची ❤
अत्यंत सुंदर विवेचन ! सा.सकाळ मधील तुमचे लेख आजही स्मरणात आहेत. शंकराचार्य यांनी समजुतीची भुमिका घ्यावी , लोकांच्या आनंदात सहभागी व्हावे .
ज्यांनी आमच्या रामासाठी जागे पासून प्राण प्रतिष्ठा करण्या पर्यंत अभुतपूर्व योगदान केले तेच आमच्या साठी परमपूज्य आहेत
1) ruclips.net/video/Qg6oatCXNN0/видео.html
2) ruclips.net/video/TyZs28qblPM/видео.html
3) ruclips.net/video/oXW3NFlq1Eo/видео.html
यात मोदी कुठेही नाहीत
तरूणांनी सखोल असायला हवे उथळ नव्हे.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तके वाचायला हवीत...👍🙏
Fakt ekangi vachan nko
विनायकजी आपले हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. आपण घेतलेले प्रत्येक विषय महत्वाचे आहेत. मोरेसरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शंकराचार्य प्रकरण उलगडून सांगितले आहे. खूप खूप उत्तम विश्लेषण .
विकास करणारे लोकांना जनता सत्ता देते बाकी बोलघेवडे लोकांना नाही शंकराचार्य यांचे असेच झाले आहे समानतेचा पुरस्कार करणारे संत झानेश्वर महाराज यांना जेवणासाठी खापर दिले नाही
आजच बरी तुम्हाला ज्ञानेश्वराची आठवण झाली.
खर आहे 👍
अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आदरणीय मोरे सरांनी मांडले आहेत. ❤
अभ्यासपूर्ण विश्लेषण मोरे सर💐
अतिशय संतुलित व योग्य विचार मांडले मोरे सरांनी. त्याबद्दल त्यांचे आभार तर पाचलग यांनी इतके चांगले विचार मंथन ऐकवले त्याबद्दल त्यांचेही आभार.
खूपच सुंदर मुलाखत..डॉ सदानंद मोरे यांच्यासारखा संतुलित विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचे काम श्री विनायक पाचलग..व थिंक बँक करत आहेत..खूप खूप आभारी..आहे ..शेवट खूपच छान आहे..
"अभ्यासोनी प्रकटावे " हे खरंच पटले. सर, धन्यवाद 🙏
मोरे साहेबानी मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिन्दु आहे. ही स्पष्टोक्ती मनाला भावली.
आदरणीय मोरे जी
सादर प्रणाम,
दुर्दैवाने आद्य शंकराचारेयांचे उतेराधीकारी म्हणवणाऱ्यांचे वर्तन कर्मकांडांत , सोवळ्यावोवळ्यात , आपले मठ आणी संपत्ती सांभाळण्यात मग्न आहेत.
अव्दैत सिध्दांताच्या बैठकीवर बसून अहंकारातून मुक्ती न मिळवू शकणाऱ्या महानुभावांना धर्माचार्य म्हणावे का ?
सनातन धर्मामध्ये असाणाऱ्या कुप्रथा संपवण्यामध्ये त्यांचा साधा सहभागही कधी दिसला नाही, नेतृत्वावर दूरच.
सनातन धर्मावर शतकानुशतकं आणी स्वातंत्र्यानंतरही अनन्वित अन्याय होत असताना त्यविरूध्द समोर कधीही आले नाहीत.
सनातन धर्म तरूणांमध्ये जागृत रहावा, त्यांना धर्म तत्वज्ञान समजावे यासाठी काही केल्याचे आठवत नाही.
मी आपल्या मताशी संपूर्ण सहभागी आहे. सनातन धर्म आप्पल्या संत परंपरेनेच सावरला वाढवला.
शंकराचार्य संस्थेला काहीही महत्व देण्याचे कारण नाही.
ज्ञानेश्वर माउली आणि माउली तुकोबारायांच्या चरणी दण्डवत.
अतिशय उत्तम आणि संयत भाष्य मोरे सरांना ऐकणं हे नेहमीच ज्ञानवर्धक असतं....
शंकराचार्य आज नगण्य आहेत.( मी ७५ वर्षाचा ब्राम्हण समातनी आहे). पण मोरे सरांच विवेचन अत्यंत मुद्द्याला धरुन झालं. डाॅ. कुर्तकोटींबद्दल खूपच नवीन माहीती मिळाली. पण स्वामी विद्द्यारण्यांचा उल्लेख राहिला काय?
One of the best interview related to Hindu and Shankaracharya. Dr. Sadanand More is genius. Very clear thought process and well read.
Vote bank politics for upcoming LS election 2024..
Which condom used by swami
1) ruclips.net/video/Qg6oatCXNN0/видео.html
2) ruclips.net/video/TyZs28qblPM/видео.html
3) ruclips.net/video/oXW3NFlq1Eo/видео.html
फारच सुंदर विवेचन, नमस्कार दोघानाही
मोरे साहेबांच विवेचन एकदम छानच. समर्पक.
फारच सम्यक चर्चा, मांडणी आणि विश्लेषण ऐकायला मिळालं. सदानंद मोरे सरांना दंडवत. या अभ्यासासाठी मी(सगळ्यांनीच ) सरांचे कायम उपकृतच राहावे . आणि अर्थात पाचलगांनाही धन्यवाद!
परखड, समतोल, चिकित्सक विश्लेषण... समकालीन घटना चर्चा घडविण्यासाठी आभार.. स्वागत.. दिशादर्शक विश्लेषणासाठी🌹🌹
अप्रतिम विश्लेषण. शंकराचार्यानी लोकांशी संपर्क वाढवलाच पाहिजे. आवश्यक आहे ते.
निःशब्द, प्रा श्री मोरे महानुभावांचे अत्यंत समर्पक विश्लेषण, आज खरोखरच कालबाह्य रूढी, नियम परिवर्तन शील करावेत, कारण आज केलेले बदल, या नंतरच्या कालखंडात बदलावे लगतीलाच
सगळा संवाद हिंदी,इंग्रजी व इतर दक्षिणी भाषांत पुन्हा मांडला जावा.अभिनंदन.
अप्रतिम
मोरे सर कायमच खूप balanced असतात त्याच वेळी प्रांजळ आणि स्पष्ट असतात. विरळा विचारवंत 🙏
खुप सुंदर विश्लेषण. शंकराचार्याप्रती आदर आहे, शंकराचार्य हे फक्त नावाला धर्माचे अधिकारी उरलेत त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही.
बरोबर
@@Samadhang587yoga aahe
II Jai Shree Ram ll
Absolutely right.
We support Narendra Modi.
अगदी बरोबर आहे. सर्व हिंदू स्वयंभू आहेत आणि प्रत्येक क्षेत्रांतील पूर्ण ज्ञान असलेले महाभाग पण भरपूर आहेत. पध्दतशीरपणे वेगवेगळ्या माध्यमातून हिंदु धर्म आणि देवतांच्या वेगवेगळ्या कथा सांगून हिंदू धर्म म्हणजे अंधश्रद्धा, ब्राह्मण म्हणजे सर्वात स्वार्थी, लोकांना लुबाडणारे, देशद्रोही अशी प्रतिमा निर्माण करण्यांत यशस्वी झालेले आहेत आणि मिडियावाले अशा विचारवंतांना बोलवून तर वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्या देऊन टीआरपी, लाईक्स मिळवण्यांत वाकबगार आहेत. फोडणीच्या वासांनी तर जिभा वळवळायलाच लागतात. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हिंदूंना शंकराचार्यांची गरज नाही. परंतु लवकरच दहा वर्षांत हिंदूची गरज भागविण्यासाठी एक कुराण आणि इमाम सत्तर टक्के रस्ता कापून पुढे येत आहेत. हिंदूंना वस्तुस्थिती न स्विकारतां दिवास्वप्नांतच रमायला आवडते त्यांना शुभेच्छा.
शंकराचार्य हा शब्द देखील नव्वद टक्के लोकांना माहित नसेल परंतु मोदीजी हा शब्द लहान मुलांना देखील माहित आहे. असे असतांना शंकराचार्यांना कां लक्ष्य करण्यांत येत आहे ? एक तर घाबरून किंवा शंकराचार्य हे पद मंदिरांसारखे ताब्यांत घेण्यासाठी किंवा सनातन धर्माचे मूळ उखडण्यासाठी? कारण इतकी वर्षे प्रयत्न करून देखील त्यांना भारताला इस्लामिक किंवा ख्रिस्ती देश करता आला नाही. हिंदू धर्माचे मूळ कुठे आहे हे हिंदूंना माहित नाही परंतु परधर्मीयांना माहित आहे.
राम मंदिर प्रकरणापूरत शंकराचार्यांना बाजूला साराव.
नंतर परत महत्व द्याव,अस वाटत.
वा वा मस्त चर्चा. शेवटचा प्रश्न आणि आयुष्य. मोरे सर म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच. खूपच सखोल अभ्यास इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा सुसंवाद. आणि हो एकच एपिसोड.
आपल्याकडं रामकृष्ण आहेत ना !! ते असतां ही आपण त्यांना दाखवू शकलो नाहीत तर आपण करंटे !!
हा विचार खरंच मनापासून आवडला.
तुम्हा दोघांचेही मन:पूर्वक धन्यवाद.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
!! जय हरि !! 🙏
काय दुर्दैव आहे आपल्या धर्माचे
जेव्हा राम 500 वर्ष तंबूत होता आणि हे शंकराचार्य मठात श्रेष्ठत्व उपभोगत होते तेव्हा हे शंकराचार्य कुठे दिसलें नाहीत
पण आज भव्य ऐतिहासिक राममंदिर उभे होत असताना याच शंकराचार्यांना त्यात अपूर्ण बांधकाम आणि भुताचा वास दिसत आहे
कोणी कितीही धर्माचे मालक व्हा पण ज्या भारतीयांचे आणि सामान्य हिंदूंचे प्रतिनिधित्व जे मोदी करत आहेत, ज्यांनी संपूर्ण जीवन राममंदिर, काश्मीर या सारख्या मुद्द्यावर समर्पित त्यांचाच हस्ते प्राणप्रतिष्ठा होणे हा त्यांचाच अधिकार आहे
मी सहमत आहे 👍
आम्ही आपल्या विचाराशी 100 % सहमत आहोत...🙏🏻🙏🏻
100टक्के सहमत.
100% right decision.
Rammandir construction is in Progress every Indian should support it.
Remaining all things should be neglected.
It's true Hinduism support.
सुदैव इतकच आहे की आपण, शंकराचार्य पिठांबद्दल रोखठोक बोलू शकतो, आणि ते बोलण्यासाठी हिंदू लोकांनी बिलकुल हयगय केलेली नाही.
आज आपल्या देशाला मोदीची गरज आहे.
शंकराचार्यांची नाही.
हे अगदी निर्विवाद सत्य आहे.
ज्या ज्या वेळी हिंदूंवर अत्याचार होत होते त्यावेळीला हे शंकराचार्य कुठे होते?
यांनी कधी एकाही शब्दाने तोंड उघडलेलं आम्ही तरी ऐकलेलं नाही.
मोरे सथ म्हणजे अत्यंत विद्वान व्यक्तीमत्व.
सत्य, ज्ञान आणि संयमी व मृदू भाषेचे उत्तम उदाहरण.
महाराष्ट्र शासनाने अशा विद्वान विभूतींस महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन पुरस्काराचा सन्मान वाढवावा.
It's very nice and wonderful opportunity to hearing Dr. Sadanand More Sir.
धन्यवाद मोरेसर खूप सखोल अचूक विश्लेषण केले . सर्वसामान्यांना समजेल पटेल असेच विवेचन. खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर विश्लेषण मोरे सर हे at par आहेत
एक मुद्दा सती प्रथेचा राहीला त्याला पण शंकराचार्यांनी विरोधच केला होता मुळात हिंदू समाजाने तो झूगार ला हेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे धन्यवाद मित्रा
मोरे सरांचा अभ्यास, अनुभव खूप आहे. विषय समजावण्याची पध्दत अतिशय चांगली आणि संतुलित आहे.
500 वर्षपूर्वी बाबर च्या मिरबाकिने मंदिर उद्ध्वस्त केले तेव्हा कोणता मुहूर्त होता?
500 वर्षे सतत संघर्षात लाखो राम भक्तांनी प्राणाची आहुती दिली तेव्हा कुठला मुहूर्त होता?
अहो जर धर्म च राहिला नाही तर
आद्यगुरू आदरणीय शंकराचार्य यांची स्थान पण सुरक्षित राहणार नाही ,कारण अजून सुद्धा विरोधक पुन्हा नवीन बाबर आणण्यास उत्सुक आहेत.
म्हणून तर 25 वकील उभे केले ,राम मंदिर विरोधात.
म्हणून आद्यगुरू चार ही शंकराचार्य यांनी भूतकाळातील ह्या गोष्टी समोर ठेवून निमंत्रणाचा आदर करून उपस्थित राहावे.
🙏🙏🙏
Pothbharu pande hey dharma sathi nasun swa-swartha sathi ahet.. Maharashtra madhe Hindu dharma warkari sampraday mulle tikla.
शंकराचार्य यांचे षड्ररिपु नष्ट झाले का ?
कोणत्याही शंकराचार्य यांनी हिंदू धर्मावर टीका केली जाते तेव्हा काहीही प्रतिक्रिया दिली नाही
पुरीचा शंकराचार्य हा जन्मजात वर्णव्यवस्था मानणारा आहे. त्याचे जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. ह्या चारही शंकराचार्यांना जास्त किंमत द्यायची काही गरज नाही कारण हिंदू धर्म संरक्षण आणि संवर्धन यासाठी यांचे योगदान अत्यंत अल्प आहे. 🤨
The one thing that needs to be understood that they are shankaracharya.
They are protector of Vedas and sanatan dharma.
We as a Indian believe in secularism but it has not been mentioned in any Vedas or ancient Indian history.
Their is no proof of secularism in the ancient Indian history.
It is only after British power over India India has became United,until it was parted by religion, region of diffrent states
So whatever shankaracharya were doing is their duty only which was given to them by Adi Shankaracharya
It is absolutely wrong to blame them for the things that we don't agree.
As a Maharashtreean we are purogami because there were sants and Mahatma who teach us the Real Dharma which goes close to secularism which was accepted after independence .
This Dharma which was teaches to us by sant parampara n Mahatma of State of Maharashtra was not Sanatan and there it makes a difference.
So those who asks for them What they did for Hindus need tho know which Hindus they are talking about .
EVEN Though I don't support every judgement of Shankaracharya but as a suprimo of Hindu religion they needs to treated property and avoid unnecessary comments on shankaracharya .
@@R_sadanand casteist sankara don’t deserve any respect.. looking at their supreme ego and hatred towards lower castes they seem to have bhoot pisacha inside them
Lower caste la premane vagavale asate tar hi vel apalya Dharma var ali nasati
Hindu way of life itself castiest. Didn't Rama killed Sambhuk who was shudra. One who has accepted as Hindu,he should aware of Varna and cast system therein. What dharmashastra spoke that we have to accept. Donot apply double stranded. What manusmriti says ,is it free of Varna,is Geeta is free of Varna are Vedant are free from Varna .Then why you're blaming to Shankaracharyas. We are habituated with ,how to apply theory to suite with our benefits.
@@balasaheburagudwar6310 scriptures have 1000s of versions and there are 1000s of scriptures.. also sankaras have copied bulk of Buddhism.. Dharma is not a book like Semite cults.. Varna and caste should be abolished else only pandas will be left in it.. these self serving pandas can definitely be kicked out!!
मोरे सर - आजच्या भारतातील सर्वोत्तम द्रष्टा !
सर्वच मुद्द्यावर केलेले विश्लेषण खूप छान . धर्म ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे मात्र मानव जसा उत्क्रांत होत आहे त्याचप्रमाणे मानवाने निर्माण केलेल्या सर्व संस्था , सर्व विचार कालानुरूप उत्क्रांत होणे आवश्यक असते . सनातन धर्म हा चिरंतन धर्म आहे कारण तो नित्य नूतन आहे . अनेक प्रवाहानी बनलेला , वाढत जाणारा असा तो आहे
सत्य आणि वास्तवाला धरून सर्वसामान्य माणसाला सहज कळेल असे विवेचन!
मोरे सरांचे अभ्यासपूर्वक विवेचन फार महत्वाचे आहे. शंकराचार्य किंवा त्यांचे पूर्वज ऋषी मुनी हे केवळ स्वतःचा विकास ऐश आराम हेच केंद्रीभूत होते आणि आहे. अस्पृश्य किंवा अन्य माणसं समाज देश ह्याच्याशी काहीही कर्तव्य नसलेले हे सर्वजण कालबाह्य झाले आहेत. टाकावू आहेत.
सदानंद मोरे यांना ऐकायला खरच खूप भारी असत 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
सुंदर विश्लेषण
बरीच वाक्य बोध घेण्यासाठी 😊
समाजाला शहाणं व्हाव अस कोणाला वाटत?
धर्माबद्दल विचार करण्या सारखे निवेदन 😊
आहो सर एकदम बरोबर बोललात साहेब धन्यवाद
मोरे सर नमस्कार छान माहिती दिली आहे सर खरे बोलत आहात सर जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद छान
अभ्यास
आहे तुमचा
विनायक आपण चांगल्या चर्चा देत आहात धन्यवाद डॅा. मोरे तर विवेकशील
किती सटिक सुंदर विश्लेषण ✌✌✌👏👏👏👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान मुलाखत. मोरे सरांना ऐकणं म्हणजे पर्वणीच...
मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिंदू आहे... वाह वाह ❤
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे विनयजी आपले मनापासून अभिनंदन. अतिशय योग्य वेळी योग्य शब्दात चर्चा धडवून आणली. जय श्रीराम वंदेमातरम 🎉🎉🎉
Very sensible talk. Got clarity. One of the best podcast.
छान विश्लेषण .. असे अधिक विषय हाताळावेत मोरे सरांनी
Very nice discussion
सूक्ष्मात सूक्ष्म आणि साधकबाधक विचार
तेही फार मर्यादित कालावधीत 👌👍
अशा थोर अभ्यासकांना मुळेच माझा देश महान आहे
खूप छान समजावलत हिंदू धर्माबद्दल आणि परंपरा आणि शंकराचार्य यांच्याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती .
खूप छान...मोरे सरांनी मांडलेले विचार आजच्या काळासाठी खूपच मार्गदर्शन करणारे आहेत...धर्म आणि राजकारण कसं असायला हवं याची माहिती त्यांनी दिली अस वाटतं..🙏🙏🙏👍💐
खूप महत्त्वाची माहिती मिळाली.अत्यंत आवडलेला एपिसोड.
आदरणीय मोरे सरांच्या म्हणण्यानुसार जर त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जर येथील हिंदूंनी ऐकून घेऊन अस्पृश्य समाजाला समानतेची वागणूक दिली असती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लाखों अनुयायासह बौध्द धर्म स्विकारण्याची गरज पडली नसती. 🙏🙏🙏
excellent discussion🙏
Every Hindu must listen to this .
ESPECIALLY PART OF 20 MINUTES TO 22 MINUTES .
मोरे सरांचे विवेचन ऐकत रहावे असे असते. फार छान.
सदानंद मोरे सर आपणाला नमस्कार आणि खूपच उद्बोधक माहिती आपण दिली आहे आणि विनायक आपणाला सुध्दा अभिवादन
खूप माहीतीपूर्ण विचार करायला लावणारी चर्चा. धन्यवाद🙏
योग्य व्यक्ती आणून योग्य विश्लेषण करण्याबद्दल आभारी आहे
This is mind blowing!!!
अप्रतिमच! ४४ मिनिटाचा मुद्दा एकदम पटणारा वाटतो. 😊
मी धर्म निरपेक्ष आहे पण कट्टर मी हिंदू आहे कारण मला कोणत्याही जाती धर्मातील प्रथा परंपरेला विरोध कीव्हा कोणताही आक्षेप नाही कोणी माझ्या धर्माचा प्रथा परंपरेचा अपमान करत असेल तर ते मी का सहन करावं
डॉ. मोरे साहेब आपण जे म्हणालात ते आमच मनोगतच आहे, आमच्या विचारांचे प्रतिनिधित्व आपण केलेत. हिंदु धर्मासाठी व हिंदुसाठी या शंकराचार्यानी काहीच केले नाही. तेव्हा सद्य परिस्थिती ते काय म्हणतात याला आम्ही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमचा देश धर्म जे वाचवत आहे त्यांच्या बरोबर आम्ही असणंच गरजेचे आहे.
डॉ मोरे सर अगदी बरोबर आहेत , अगदी अशीच प्रतिक्रिया मी अविमुक्तेश्वर यांना दिली आहे त्यांना महाराष्ट्रातील संत परंपरेचा दाखला दिला आहे
मोरेंनी धार्मिक शुद्धीकरणाचा इतिहास बारकाईने अभ्यासावा. अनेकदा सामुदायिक धार्मिक शुद्धीकरण झालेले आहे. सर्वात जुना शुद्धिकरणाचा इतिहास हा देवल ऋषिंपासून सुरु होतो.
मनः शिवसंक्लपं अस्तु. ही वेदांची शिकवण आहे.
प्रत्येकाने ऐकावे व मनन चिंतन करावे असे, सुंदर विवेचन
मोरे सर आपण आमचे जे मार्गदर्शन केलेत ते आमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे एवढा सखोल अभ्यास करण्यासाठी आमची कित्येक वर्षे गेली असती पण आपण अगदी साराउश रुपी खुपच महत्वापूर्ण माहिती तसेच माहितीची योग्य दिशा सांगितलीत त्याबद्धल आपले व या चॅनेलचे धन्यवाद 🌹🌹🌹
खूपच सुरेख विश्लेषण । मोरे सरांना नमस्कार🙏
अशा प्रबोधनाची खरंच समाजाला आज गरज आहे। यालाच देशकाल आणि परिस्थिती म्हटली जाते चैनल चे फार फार धन्यवाद अतिउत्तम
वा वा काय सखोल❤❤❤❤❤ अभ्यास करून दिल्याबद्दल धन्यवाद
हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आदि शंकराचार्यांपासुनच्या शंकराचार्यांचे कार्याची माहिती प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात लिहुन ठेवला आहे, ज्यांना शंकराचार्याचे मंदीराबद्दलचे योगदानाची माहिती हवी आहे त्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे.
Thanks from bottom of heart for such rich discussion and unbiased opinion.
Regards
CMA Pradeep Deshpande
Why there is a need to add prefix each & every time 😂. Are you signing any document? Just expressing your view on RUclips video. Can you tell ideology behind putting Prefix everywhere? 😂😂
सुंदर
शेवट मोरे सरांनी विचार अगदी महत्वपुर्ण मांडलाय..👌🏽
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.
केवढा अभ्यास...
उत्कृष्ट विश्लेषण...
सहज समजेल असं..
इस्लाम धर्मातील मुल्ले मौलवी आणी हिंदू धर्मातील शंकराचार्य, दोघेही सारखेच कर्मठ. दोघेही 1000, 2000, 3000 वर्षांपूर्वी तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून लिहून ठेवलेल्या नियमांना चिकटून राहतात. बदलत्या काळानुसार ते नियम बदलत नाहीत.
खूप छान विश्लेषण केलत सर, मुळात धर्माला आडगाळ समजणाऱ्यांना हे दाखवायला पाहिजे. धरायते इती धर्म:, धर्ममार्तंडांनी संस्कृतीक् कार्य करण्या ऐवजी आपल्या गाद्या गरम करणे सोडा.
500 वर्षा नंतर खूपच मंगलमय वातावरण आहे ही चर्चा करण्याची गरज नव्हती.
चर्चा ह्या व्हायलाच हव्यात, या चर्चेतून हे समजलं की शंकराचार्यां चं कर्तृत्व शून्यं आहे, गेल्या हजार वर्षांत काहीच उल्लेखनीय योगदान नाही त्यांचं, तरी यांना मान आहे, पण अवाजवी महत्वं देणाचा गरज नाही
Kay mangalmay ahe ?
खुप छान चर्चा..विश्लेषण..जरुर ऐकावे
खुपच छान विश्लेषण मोरे साहेब ।
धन्यवाद, महत्वाची चर्चा ऐकायला मिळाली
Best Sir 👌💐🙏🙏🙏🙏 Thank you Dr More Sir 💐🙏🙏🙏
सर आपली चिकित्सा अगदी योग्य आहे परंतु चुकीच्या राजकीय परिस्थिती बाबत आपण सर्वांनी पहात बसने योग्य नाही विचारवंतांनी भूमिका घेतली पाहिजे
धन्यवाद खरंच खूप सुंदर अशी मुलाखत होती यामुळे माझा वैयक्तिक दृष्टिकोन बदलण्यास आपण मदत केली