ही गाणी ऐकत ऐकत मी आज साठ वर्षाचा झालो आणि आज ही गाणी ऐकून परत लहान झालो....काय जादू आहे सुमंताईंच्या आवाजात... सुमनताई तुम्हाला सुदृढ निरोगी आयुष्य १०० वर्ष लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना... अर्थात तुम्ही जगाच्या पाठीवर मराठी माणूस आणि संस्कृती जिवंत असे पर्यंत तुम्ही अजरामर आहात...❤
सुमन ताईंच्या गाणे एकल्यावर लहानपणी च्या आठवणीत रमुन जातो एव्हडा गोड आवाज. दुःख एकच वाटते एवढ्या सुंदर गोड आवाज गणाऱ्या गायिकेवर अन्याय झाला म्हणून प्रकाश झोतात आल्या नाही तरी आशा गायिकेने दुसऱ्या गायकबद्दल सांगताना चांगलेच सांगितले.. सलाम. नमस्कार 🙏सुमन कल्याणपूरकर यांना. 🙏
माझ्या ८२ वर्षे आईला रात्री आजारपणामुळे बेचैन वाटत होतं सुमनताईंची ही गाणी लावली, आई एवढी खूष झाली, आणि लिंबोणीच्या झाडामागे अंगाई ऐकली आणि खरोखर शांत झोपली.. किती सुखावह आहेत ही गाणी!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यावरून हिंदी भाषेतील एक मजेदार वाक्प्रचार आठवला... "घी देखा लेकिन बडगा नहीं देखा!" 😂 गायक/गायिका अगदी अप्रतिम गाणी गाऊन, असंख्य संगीत प्रेमींना आनंद तर देतात, परंतु त्या मागे संगीतकारांचे अथक परिश्रम ही महत्त्वाचे! 🙏
सुमन कल्याणपूर यांना जास्त संधी मिळाली नाही खूपच सुंदर आवाज लता मंगेशकर यांच्या मुळे हिंदी गाण्यांमध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली नाही एक भारतरत्न फुकट गेला
घाल घाल पिंगा वारा हे गाणं ऐकून तर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही. सुमन जी नी गाण्याला अगदी न्याय दिला आहे. गीतकार कृ. ब. निकुब सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आजच्या या जगात जिकडे माहेरी वारंवार जाता येतं, तरीही हे गाणं काळजाला भिडते. पूर्वीच्या काळी जिकडे बायकांना क्वचितच माहेरी जाता येत असे , त्यांचा मनोगत व्यक्त केलेले आहे. त्या बायकांनाही सलाम ज्यांनी माहेरच्या सुखाला आचवून दिवस काढले.
प्रत्येक गाणे ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर रोमांच उभे राहात होते. कित्येक गाणी आज कळली कि यांची आहेत ”जिथे सागरा धरणी मिळते”, “जीवनात ही घडी अशीच राहू दे” पण सगळ्यात छान “केतकीच्या बनी” ❤❤❤
अहाहा! किती मधुर आवाज आहे, ह्यातली बरीच गाणी लतादिदींची आहेत असंच मला वाटायचं, पण आज समजले , धन्यवाद अपलोड केल्याबद्दल!🙏देव तुमचं व सर्वांचं भलं करो,कल्याण करो, रक्षण करो, सर्वांचा संसार सुखाचा होवो! स्वर सम्राज्ञी सुमनताई आपणास कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏
देवा एवढं साम्य का केलस आम्हाला तर सुमन ताई कोण असा कसा आवाज दोघींचा एक सारखा होईल मला माहीतच न्हवता मला एकदा शाळेत ढोलक वाजवायला बोलवलं मी बऱ्या पैकी वाजवयचो आणि त्यावेळी मला नविका रे वारा वाहेरे हे गाण सेट करायला सांगितलं मला गाण प्रचंड आवडले मी तेव्हा म्हणालो वा काय लता दीदींनी गायले तेवढ्यात त्या मॅडम म्हणाल्या अरे ते दीदींनी नही गायलं सुमन ताईंनी तेव्हा मला माहित पडले नंतर तर त्यांची एवढी भावगीत भक्तीगीत ऐकली आणि आता पण एकांतात ऐकत आहे धन्य आहात ताई तुम्ही दुर्दैव एवढंच म्हणेन तुम्ही भारतात जन्मलात तोच जन्म दुसऱ्या देशात घेतला असतात तिथली लोक म्हणाली असती तुम्हारी लता है तो हमारी सुमन योग पण कसा दोघींच्या नावात वेल आणि फुल काही जास्त बोललो असेल तर माझा सारख्या रसिक मित्रानो थोरानो लहानानो क्षमा असावी🙏
आज पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय हे गीत ऐकल अन माझी आई आठवली माझी गुरू असलेली माझी उषाताई आठवली खुप माया करायची अगदी अशीचं सारखा आम्हा भावंडांचाचं विचार तिच्या मनात असे असे हे सुरेल सुवर्ण् गीत मनाला रुंजी घालते
सुमन कल्याणपूर तुमचा सारखा आवाज कुणाचाच नाही. शांत , मधुर ...मन शांत ,प्रसन्न वाटते तुमची गाणी ऐकून.शतशः नमन तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रभु श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤ 1:10:22
सुमनताईंची मराठी आणि हिंदी सर्वच गाणी एव्हर ग्रीन आहेत.त्यांच प्रत्येक गाणं मनाला स्पर्श करून जातं.सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या गाणात आपलेपणा जाणवतो .अशा महान सुमनताईंना माझा नमस्कार,,,🙏
लहान असताना दुपारच्या शाळेनंतर संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रेडिओवर ह्या सुमधुर गाण्यांचा ताफा असायचा... ४३ वर्षात पदार्पण करतोय आता पण बालपण अजून ह्या गाण्यांनी फुलून येतं.. खूपच सुंदर दिवस होते ते माझी मोठी ताई न चुकता हि गाणी लावायची.. सगळी गाणी अगदी तोंडपाठ आहेत आमची.. आज सुद्धा 🥰😍❤
खुप खूप छान सुमन ताईच्या गाण्यात शालीनतl आहे लहान पण आठवतो.1972 साल आठवतो आई शाळेत घेऊन जायची तेव्हा हे गीत ऐकायला यायचं सुमन ताईच आवाज मध्ये जी गोडी आहे ती कोणात नाही सुमन ताई ग्रेट आहेत
सुमनताई काय लिहाव तुमच्याबद्दल ...तुमच गाणी ऐकत ऐकत मी मोठा झालो कधी कधी वाटायच ही लता मंगेशकरानी गायलेली गाणी आहेत पण...आज ह्या घडीला ताई तुमचा मखमल आवाज कानावर पुन्हा पडला आणि सर्व चित्र स्पष्ट झाले.. एक "शापित गायिका" म्हटले तर वावग नाही ठरणार... ताई खुप मोठा अन्याय झाला तुमच्यावर .. संगीत श्रेत्रात सुद्धा असे कटकारस्थान ....मन अस्वस्थ होते ऐकुनच ... पण ताई तुमची गाणी म्हणजे पर्वणीच.. तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकणार
याच्या गाण्याचे कोण वेडे नाहीत. असा एक हि मराठी माणूस सापडणार नाही कि त्त्याना सुमन ताईची गाणी ऐकली नाही कि आवडली नाही. असो मी देखील त्यातीलच एक आहे. लहानपणा पासून रेडीओ वर सुप्रभात लागायचा त्यामध्ये हमखास एक तरी गाणे लागायचेच. मी खूप वेडा झालो होतो त्यांचे केशवा माधवा गाणे ऐकून, मी तबला वादक आहे. त्यामुळे मला जिथे मिळेल तिथे मी हे गाणे वाजवण्याचे काम करीत असे. आणि एक दिवस कोल्हापूरमध्ये आमच्या एका स्नेह्याकडे सुमन ताई आल्या होत्या, त्यावेळी त्यांना गाण्याचा आग्रह केला . त्यांनी तो त्याला मान्यता दिली आणि रात्री काही निवडक माणसासोबत गाण्याचा कार्यक्रम झाला , या साठी मी तबला वाजवला व माझे एक मित्र नंदू हार्मोनियम वाजवायला होता. खूप मजा आहे. मी आवर्जून केशव माधवा त्याना गायला सांगितले.
सुमनजींची गाणी आणि अन्य गाण्यांची डायरी होती. ती डायरी मधल्या सुट्टीत काढून सुरात गाणी गायचो आम्ही मैत्रिणी. पण सर्व माझेच कौतूक करायचे की जयाचा आवाज फार सुंदर आहे. पण माझ्या भाच्याने माझे जे काही कौतूक केले, ते मी शब्दांत बोलू वकत नाही. कारण त्याने अक्षरश: केतकीच्या बनामध्ये...हे गाणं पाठवून सांगितलं की आत्या सुमन कल्याणपूरकरांचा आवाज ऐकून मला तुझी आठवण आली. असं वाटतं की तुच गातेस. मला खूपच आनंद झाला. तशी मला अत्तिशय गाणी आवडतात आणि गायला ही आवडतात. समनजींना🙏🙏🙏 आता माझे वय ६२ वर्षे आहे. तरी ही गाणी छान गाऊ शकते.
सुमन कल्याणपूर,कृष्णा कल्ले,पुष्पा पाकधरे,उत्तरा केळकर,यांची अवीट गोडीची गाणी लहानपणी ऐकायचो,११ ते ११.३० दरम्यान रेडिओ वर सुगम संगीत असायचे.अंगाई गीते,पावसाची गाणी,भावगीते, अक्षरशः मनाला वेड लावायचे.आता पुन्हा सुमन ताईची गाणी कानावर पडताच नकळत डोळ्याच्या कडा पाणवतात.काय ते सुर,काय ते गीतकार,काय संगीत,सगळे कसे स्वप्नवत.....
सुमन कल्याण पुर कर यांची ही गाणी ऐकायला मस्तच वाटतात . बालपणीच्या आपली आवड प्रभात गीते आठवणी जाग्या झाल्या .आकाशवाणी वरचा आपला आवाज ऐकला होता आज तोच आवाज पुन्हा ऐकायला मिळाला यूट्यूब ला धन्यवाद
सुमन ताई तुम्ही अजून ही गाऊ शकता कारण आम्हाला अजूनही तुम्हाला ऐयकाला आवडेल मी तर यापुधे सुमन ताईंची च गणी म्हणेन लता दीदींनी असे करायला नको होते ऐकून खूप वाईट वाटले😢
Compilation ला अन्याय म्हणत नाहीत दादा. मला ही सुमन ताई लताजी पेक्षा जास्त आवडतात. सुमन ताई खात्या पित्या घरच्या होत्या, त्यांनी गाणं हे करियर म्हणून पाहिलं नाही. त्यांची 1990 ची बीबीसी ची मुलाखत ऐका.
काही गोष्टी अशा असतात की त्या खुलेपणाने सांगता येत नाहीत... कोणी काय सहन केलं हे ज्याचं त्याला माहिती असतं... आणि मुलाखतीत असंही सगळं छान छानच बोलायला लागतं
खुप श्रवणीय गाणी. ही गाणी ऐकताना मी माझ्या लहानपणात पोहोचलो. कारण ही गाणी आम्हाला आकाशवाणीच्या "मुंबई ब" केंद्रावरून "कामगार सभा" "आपली आवड" ह्या कार्यक्रमातून ऐकायला मिळायची. पुन्हा एकदा ते क्षण अनुभवायला मिळाले त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
हरी: ॐ, सुमनताई आपणास अनंत कोटी प्रणाम. आपली सुमधुर, भावपूर्ण गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो.. खूप च सुंदर काळ होता बालपणी चा आणि तरूणपणाचा.. आता प्रौढत्व आहे पण आपल्या आवाजाची ओढ कायम आहे.. आमची श्रवणेंद्रिये तृप्त करीत राहिलात याबद्दल करावे तितके कौतुक कमी च. मानावे तितके आभार कमी च.
लताजी बद्दल आज वाईट बोलणे चांगले नाही. त्यांचा आवाज चांगला होता पण त्याची नीती कपटी होती. त्यांच्या भरभराटीच्या काळात जे लोकं इतर गायिकांना गायला संधी देत त्या लोकांनी जर काही गाणी लताजीना गायला दिली तर त्या नकार देत. अशा लोकांवर जणु त्या बहिष्कार टाकत. असे केल्यामुळे असे लोक इतर गायिकांना गाणी देत नसत. यामुळे लताजींनी असे करुन त्यांच्या समकालिन बर्याच गायिकांचे करियर उध्वस्त केलेले आहे.
मला आजपर्यंत वाटत होत की हे सर्व गाणे लता मंगेशकर यांची आहेत पण आज समजलं की इतका सुंदर मधुर आवाज सुमनजींचा आहे. का कुणास ठाऊक लता मंगेशकर यांची गाणी मला आवडतात पण त्यांच्याकडून positive vibe येत नाही. सुमनजीं कडून positive vibe येते. त्यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून सत्कार होताना पाहून मनाला खूप आनंद झाला ❤ finally त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली.
सुमन ताईंची गाणी ऐकताना मनाला खूप शांतता लाभते. आवाजात गोडवा, शालीनता, सुसंस्कृत पणा, आदब,, औदार्य, इ. सर्व सर्व आहे.. मी जबरदस्त फॅन आहे आपली. आपली गाणी ऐकताना बालपणीचा कामगार सभा कार्यक्रम आठवत असतो. आणि मन त्य गोड दिवसांत रमून जाते. पुन्हा ताजेतवाने वाटते.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर आवाज लताताई यांच्या आवाजापेक्षाही हा गोड आवाज मनात रूंजी घालत रहातो.अनेक गाणी लतादीदी यांनीच गायली आहेत असंच वाटतं हेच तर सुम़नताईंच्या गाण्यांची खरी गंमत आहे.मुद्दाम या गायिकेला फार संधी मिळू दिली नाही.हे रसिकांचे दुर्दैव आहे.प्रत्येक ठिकाणी गचाळ मानसिकता पहायला मिळते.हे किती वाईट आहे. सुमनताई ग्रेट आवाज
खरच आम्ही खुप नशीबवान आहोत.आज माझे वय ५९ आहे पण ते बालपणातील दिवस परत आणन्याचे सामर्थ्य याच आवाजात आहे .सुमनताई ग्रेट आहेत.त्यांची सर्वच गाणी मनावर गारुड करुन जातात.कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही.परत परत ऐकावीशी वाटतात.सोबत संगितकारांचे सुध्दा अभिनंदन केल्याशिवाय रहावत नाही. खुप छान संगित दिलेय प्रत्येक गाण्यामध्ये.शाळेत असताना सुमन ताईंची बरीच गाणी मी गायली आहेत.
खरं आहे. ती मजा, आनंद कुठे हरवला आहे. शोधून सुद्धा मिळत नाही... धन्य ते आपले आई बाबा.. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला. यात ही गाणी ऐकायला लावत. आपली आवड, कामगार सभा, संध्याकाळी गाणी. अशी आवड निर्माण केली त्यांनी जे होते ते व्यवस्थित वापरून आपल्या पिढीला सुसंस्कृत केले.
सुमन हेमाडी (म्हणजे कर्नाटकातील कुंदापूर मधील गाव) यांचा जन्म ढाका येथे , सारस्वत ब्राह्मण कुटुंबात (कर्नाटकातील मंगलोरचा येथील) झाला आणि रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह केला. लोकांनी त्यांचा आवाजाची तुलना लताजींशी केली असली तरी पण सुमन कल्याणपूर त्यांचा आवाजालाअनोखा गोडवा आणि माधुर्य होते याची साक्ष या सर्व गाणी आहेत. कर्नाटकातून आम्हाला अनेक भेटवस्तू मिळाल्या. सुमन कल्याणपूर, पंडित भीमसेन जोशी, कानडवू विठ्ठला, पुरण पोळी.
आजच मी 54 वय पूर्ण करून 55 व्या वर्षात पदार्पण केले. जुने काय बदलले आणि नवीन काय मिळाले याचा विचार करू लागलो तेव्हा सुमन ताईंचे गाणे मिळाले आणि माझे लहानपण आठवून अक्षरशः रडू कोसळले. शाळा, मित्र, आई, बाबा (आता नाहीत ते )आणि ही अशी गाणी जी कामगार सभा या रेडिओवर सकाळी 11 ते 11.30 च्या कार्यक्रमाची आठवण झाली. शाळेत जायची वेळ झालेली असायची. खूप काही हरवले असे वाटले. आज मुलीने जेवायला बाहेर नेले होते. मी लहान होतो तेव्हा शाळेत जाण्यापूर्वी सकाळीच आई ओवाळून काही तरी गोड तिच्या हाताने भरवायची आणि बाबा छान पैकी नवीन शर्ट न चड्डी (?) हाफ पॅन्ट (जे कि मलाच घेऊन मापं द्यायला घेऊन गेलेलो असताना देखिल ) द्यायचे, तो शर्ट आणि हाफ पॅन्ट बरोबर वाढदिवसाच्या आधी 1 दिवस मिळेल अश्या बेताने शिवायला देत. आता खरेच तसें सुख आनंद आता मी स्वतः कितीही महाग न फॅशन चा अख्खा ड्रेस सेट शर्ट न फुल्ल पॅन्ट घेऊन सुद्धा नाही मिळत. आई बाबाची माया उब त्यात नसतेच! हे सगळे आत्ता सुमन ताईची गाणी ऐकताना बालपण आठवण देऊन गेले. ही अशीच गाणी ऐकत मोठा (?) झालो.
खूपच सुंदर आता मी सत्तरी गाठायला आले. सुमन ताईची गाणी ऐकून माहेर आठवले त्यावेळचे आई बाबा भववंड एकत्र कुटुबपद्धती.शेजारी सगळे कसे एकत्र कुटुंब सारखे.त्यात ही गाणी ऐकून थट्टा मस्करी करायचो.❤😊❤😊❤😊
ही गाणी लहान असताना कानावर पडत होते, निरागस मनावर संस्कार नकळतपणे घडत होते. त्यावेळी रेडिओ चा जमाना होताआज ही गाणी ऐकल्यावर पुन्हा लहान होतो. अस गायन आता ऐकण्यास मिळत नाही 🙏
मी आता 57वर्षाचा, सुमनताई गाणी आजही ऐकतो तेव्हा शरीरात नवचैतन्य निर्माण होते. मी मुलगा आता 29 वर्षाचा आहे , तो लहान असतांनाच निलंबनाच्या झाडामागे हे गीत गात असतांनाच त्याला खुप आवडायचे व तो लगेच झोपी जायचा. सुमनताईची गाणी आजही खूप खूप ऐकावीत वाटते.❤❤❤
पुन्हा लहानपण दे देवा! गाडी नको. बंगला नको. ते लहानपण,तो बापाचा धाक आईची माया हवी.आताची तूप भाकरी नको. चटणी भाकरी हवी. Ac गाडी नको माझी पायगाडी हवी. की जी कधीच दमायची नाही. डोंगर उतार चढाइची, पेट्रोल फक्त अर्धी चटणी भाकर असायची. आताची गाणी नको ती,लतादीदी ,सुमन कल्याणपूर ताईची सूवर्ण परी गाणीच बरी.तोच निसर्ग हवा,शेतात राखणकरायला! हवे तेच वातवरण, हवे तिच कामगार सभा! हवी की जी काबाडकष्ट करताना भर उन्हात उब द्यायची.नको अताजीन.जीन असो तर त्या सूवर्ण काळात असो.अता इच्छाच नाही असले जीवन जगयची!
शाळेत असताना रेडिओ वर आणि शनिवारी लागणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये ऐकलेली ही सर्वांग सुंदर गाणी ऐकून अक्षरशः डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. खूप समृद्ध केलं आमचं बालपण या गाण्यांनी. किती गोडवा आहे आवाजात सुमनताईंच्या ❤
सुमन ताईंच्या आवाजाचे लतादीदींच्या आवाजाशी असलेले साम्य पहाता मनात विचार येतो की त्यांना हिंदी चित्रपट संगीतात फार संधी का मिळाली नाही. वास्तविक अनेक प्रथितयश संगीतकार कसे स्व. सचिनदेव बर्मन , सी.रामचंद्र, एन.दत्ता, शंकर जयकिशन यांचे काही काळ लता दिदिंशी बिनसले होते अश्यावेळी सोलो गाण्यांसाठी सुमनाताईंचा आवाज वापरावा असे त्या दिग्गज संगीतकारांना का वाटले नाही. नाही म्हणायला शंकर जयकिशन यांनी महमद रफी यांच्या बरोबर काही द्वंदगीतात सुमनाताईंना संधी दिली. पण त्याचे कारण काही मतभेदांमुळे लतादीदींनी रफिसोबत गाणे बंद केले होते. पण सुमनताईंना हिंदी मध्ये म्हणावा इतका वाव मिळाला नाही हेच खरे. रसिकांचे दुर्दैव.
For your information everyone knows suman kalyanpurkar was better than lata mangeshksr and so our so called gan kokila lata didi forced every music director to not take her.... You can also check this information on google and black side of lata mangeshkar on RUclips .
@@ushabhujbal1422स्व. लता मंगेशकर यांचे अनेक संगीतकारांशी वेळोवेळी मतभेद झाले होते. अश्यावेळी त्या त्या संगीतकारांना आवाजात तितकेच माधुर्य असणाऱ्या सुमनाताईंची एकल गाण्यासाठी आठवण का झाली नाही ह्याचच वाईट वाटते.
ही गाणी ऐकत ऐकत मी आज साठ वर्षाचा झालो आणि आज ही गाणी ऐकून परत लहान झालो....काय जादू आहे सुमंताईंच्या आवाजात... सुमनताई तुम्हाला सुदृढ निरोगी आयुष्य १०० वर्ष लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना... अर्थात तुम्ही जगाच्या पाठीवर मराठी माणूस आणि संस्कृती जिवंत असे पर्यंत तुम्ही अजरामर आहात...❤
माझ्या ताई सारखा आवाज स्पष्ट कुणाचाच नाही.ताई या वेड्या भावाचा तुला सलाम
सुमन ताईंच्या गाणे एकल्यावर लहानपणी च्या आठवणीत रमुन जातो एव्हडा गोड आवाज. दुःख एकच वाटते एवढ्या सुंदर गोड आवाज गणाऱ्या गायिकेवर अन्याय झाला म्हणून प्रकाश झोतात आल्या नाही तरी आशा गायिकेने दुसऱ्या गायकबद्दल सांगताना चांगलेच सांगितले.. सलाम. नमस्कार 🙏सुमन कल्याणपूरकर यांना. 🙏
माझ्या ८२ वर्षे आईला रात्री आजारपणामुळे बेचैन वाटत होतं सुमनताईंची ही गाणी लावली, आई एवढी खूष झाली, आणि लिंबोणीच्या झाडामागे अंगाई ऐकली आणि खरोखर शांत झोपली..
किती सुखावह आहेत ही गाणी!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुमनताईंच्या बरोबरच आपण संगीतकार अशोक पत्की जीं ना विसरुन कसं चालेल. त्यांच्या अप्रतिम चालींमुळेच ही गाणी एवढी सुंदर झालेली आहेत. अशोक जी खरच ग्रेट. ❤
U R right. 👍
दशरथ पुजारी ना ही विसरू नका....
यावरून हिंदी भाषेतील एक मजेदार वाक्प्रचार आठवला... "घी देखा लेकिन बडगा नहीं देखा!" 😂 गायक/गायिका अगदी अप्रतिम गाणी गाऊन, असंख्य संगीत प्रेमींना आनंद तर देतात, परंतु त्या मागे संगीतकारांचे अथक परिश्रम ही महत्त्वाचे! 🙏
सुमन कल्याणपूर यांना जास्त संधी मिळाली नाही खूपच सुंदर आवाज लता मंगेशकर यांच्या मुळे हिंदी गाण्यांमध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली नाही एक भारतरत्न फुकट गेला
अगदी बरोबर बोललात
Pn दोघी ही same
अगदी kharay👍🏾👍🏾👍🏾🌹🌹🌹
12:01
Ekdam barobar
जुन्या गाण्यांना उजाळा मला घाल घाल पिंगा वाऱ्या कविता होती आता ऐकल्यामुळे खूप आनंद वाटला धन्यवाद
घाल घाल पिंगा वारा हे गाणं ऐकून तर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही. सुमन जी नी गाण्याला अगदी न्याय दिला आहे. गीतकार कृ. ब. निकुब सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आजच्या या जगात जिकडे माहेरी वारंवार जाता येतं, तरीही हे गाणं काळजाला भिडते. पूर्वीच्या काळी जिकडे बायकांना क्वचितच माहेरी जाता येत असे , त्यांचा मनोगत व्यक्त केलेले आहे. त्या बायकांनाही सलाम ज्यांनी माहेरच्या सुखाला आचवून दिवस काढले.
अतिशय भावपूर्ण गाणं तितक्याच ताकदीने गायलं आहे.
हे गाणं ऐकत असताना असंख्य भावना व दृश्य डोळ्यासमोर तरळून जातात.
@@dhaneshgandhi5640 अगदी खरं आहे... काळ्या कपिलेची नंदा मी खूप वेळा अनुभवते... अगदी तरल सुंदर अणि निरागस गाण आहे
अगदी खरे.....
प्रत्येक गाणे ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर रोमांच उभे राहात होते. कित्येक गाणी आज कळली कि यांची आहेत ”जिथे सागरा धरणी मिळते”, “जीवनात ही घडी अशीच राहू दे” पण सगळ्यात छान “केतकीच्या बनी” ❤❤❤
अहाहा! किती मधुर आवाज आहे, ह्यातली बरीच गाणी लतादिदींची आहेत असंच मला वाटायचं, पण आज समजले , धन्यवाद अपलोड केल्याबद्दल!🙏देव तुमचं व सर्वांचं भलं करो,कल्याण करो, रक्षण करो, सर्वांचा संसार सुखाचा होवो! स्वर सम्राज्ञी सुमनताई आपणास कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏
.
खूप छान गाणी मनमोहीत करणारी गोड आहेत.
जीवनात ही घडी हे गीत लता बईंनीच गायले आहे, चुकीने ह्या अल्बम मधे आलेले दिसते
सुमनताई व अशोकजी
आपणास मानाचा मुजरा.सगळीच गीते कर्ण मधूर.कितीवेळा ऐकली तरी मन तृप्त होत नाही. 🌹
mi pan asach vichar karat hoto. pan aaj tyani gayleli geete aikun Lata didi aahet ka Suman didi aahet yaacha andaj lavane kathin zale mala. kharach khoop sweet voice.
आता अशा गायिका आणि अशी अर्थपूर्ण गीत,गाणे होणे नाही किती सुंदर गाणे होती त्यावेळी नाहीतर आजकालची अर्थहीन गाणे ऐकाविशी पण वाटत नाहीत
देवा एवढं साम्य का केलस आम्हाला तर सुमन ताई कोण असा कसा आवाज दोघींचा एक सारखा होईल मला माहीतच न्हवता मला एकदा शाळेत ढोलक वाजवायला बोलवलं मी बऱ्या पैकी वाजवयचो आणि त्यावेळी मला नविका रे वारा वाहेरे हे गाण सेट करायला सांगितलं मला गाण प्रचंड आवडले मी तेव्हा म्हणालो वा काय लता दीदींनी गायले तेवढ्यात त्या मॅडम म्हणाल्या अरे ते दीदींनी नही गायलं सुमन ताईंनी तेव्हा मला माहित पडले नंतर तर त्यांची एवढी भावगीत भक्तीगीत ऐकली आणि आता पण एकांतात ऐकत आहे धन्य आहात ताई तुम्ही दुर्दैव एवढंच म्हणेन तुम्ही भारतात जन्मलात तोच जन्म दुसऱ्या देशात घेतला असतात तिथली लोक म्हणाली असती तुम्हारी लता है तो हमारी सुमन योग पण कसा दोघींच्या नावात वेल आणि फुल काही जास्त बोललो असेल तर माझा सारख्या रसिक मित्रानो थोरानो लहानानो क्षमा असावी🙏
लता मंगेशकर यांच्यापेक्षाही सुमन कल्याणपूर याचा आवाज मनाला स्पर्श करून मंत्रमुग्ध करतो. एकदम ऑसम 👌😌
आपले म्हणणे खरे आहे.आपल्याला कुणाचीही तुलना करावयाची नाही.पण त्यामुळेही एकमेकींना तोडीसतोड होत्या.असो
@@shubhadamodare3676mm
@@shubhadamodare3676llo😅l
आज पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय हे गीत ऐकल अन माझी आई आठवली माझी गुरू असलेली माझी उषाताई आठवली खुप माया
करायची अगदी अशीचं सारखा आम्हा भावंडांचाचं विचार तिच्या मनात असे असे हे
सुरेल सुवर्ण् गीत मनाला रुंजी घालते
हे अगदी खरे आहे स्वर्गीय आवाज त्याला उपमाच नाही
सुमन कल्याणपूर तुमचा सारखा आवाज कुणाचाच नाही. शांत , मधुर ...मन शांत ,प्रसन्न वाटते तुमची गाणी ऐकून.शतशः नमन तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रभु श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤ 1:10:22
ज्यांच्या गोड आवाजाने कडक उन्हाळ्यात ही सृष्टीला बहर आल्यासारखे वाटते तो आवाज म्हणजे सुमन कल्याणपूर यांचा आहे.
सुमनताईंची मराठी आणि हिंदी सर्वच गाणी एव्हर ग्रीन आहेत.त्यांच प्रत्येक गाणं मनाला स्पर्श करून जातं.सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या गाणात आपलेपणा जाणवतो .अशा महान सुमनताईंना माझा नमस्कार,,,🙏
लहान असताना दुपारच्या शाळेनंतर संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रेडिओवर ह्या सुमधुर गाण्यांचा ताफा असायचा... ४३ वर्षात पदार्पण करतोय आता पण बालपण अजून ह्या गाण्यांनी फुलून येतं.. खूपच सुंदर दिवस होते ते माझी मोठी ताई न चुकता हि गाणी लावायची.. सगळी गाणी अगदी तोंडपाठ आहेत आमची.. आज सुद्धा 🥰😍❤
good
प्रत्येक गाणे ऐकताना मनातील भाव किती खोल प्रकट झाले आहेत तेही स्वरातून आणि सुर पण असे की बावन्न कशी सोने.🎉🎉
नाविका रे......हे गाणे बालपणी च्या सायंकाळ ची आठवण करून देते.त्यावेळी संध्याकाळी नेहमी हे भावगीत रेडिओ वर असायचेच.
Ho, mi hi aikayche
खुप खूप छान सुमन ताईच्या गाण्यात शालीनतl आहे लहान पण आठवतो.1972 साल आठवतो आई शाळेत घेऊन जायची तेव्हा हे गीत ऐकायला यायचं सुमन ताईच आवाज मध्ये जी गोडी आहे ती कोणात नाही सुमन ताई ग्रेट आहेत
आतिशय सुंदर गिते आतमा दिलखुष होऊन जातो.काय आवाज आहे अजअमर असो....
सुमनताई काय लिहाव तुमच्याबद्दल ...तुमच गाणी ऐकत ऐकत मी मोठा झालो
कधी कधी वाटायच ही लता मंगेशकरानी गायलेली गाणी आहेत
पण...आज ह्या घडीला ताई तुमचा मखमल आवाज कानावर पुन्हा पडला आणि सर्व चित्र स्पष्ट झाले..
एक "शापित गायिका" म्हटले तर वावग नाही ठरणार...
ताई खुप मोठा अन्याय झाला तुमच्यावर ..
संगीत श्रेत्रात सुद्धा असे कटकारस्थान ....मन अस्वस्थ होते ऐकुनच ...
पण ताई तुमची गाणी म्हणजे पर्वणीच..
तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकणार
याच्या गाण्याचे कोण वेडे नाहीत. असा एक हि मराठी माणूस सापडणार नाही कि त्त्याना सुमन ताईची गाणी ऐकली नाही कि आवडली नाही. असो मी देखील त्यातीलच एक आहे. लहानपणा पासून रेडीओ वर सुप्रभात लागायचा त्यामध्ये हमखास एक तरी गाणे लागायचेच. मी खूप वेडा झालो होतो त्यांचे केशवा माधवा गाणे ऐकून, मी तबला वादक आहे. त्यामुळे मला जिथे मिळेल तिथे मी हे गाणे वाजवण्याचे काम करीत असे. आणि एक दिवस कोल्हापूरमध्ये आमच्या एका स्नेह्याकडे सुमन ताई आल्या होत्या, त्यावेळी त्यांना गाण्याचा आग्रह केला . त्यांनी तो त्याला मान्यता दिली आणि रात्री काही निवडक माणसासोबत गाण्याचा कार्यक्रम झाला , या साठी मी तबला वाजवला व माझे एक मित्र नंदू हार्मोनियम वाजवायला होता. खूप मजा आहे. मी आवर्जून केशव माधवा त्याना गायला सांगितले.
सुमनजींची गाणी आणि अन्य गाण्यांची डायरी होती. ती डायरी मधल्या सुट्टीत काढून सुरात गाणी गायचो आम्ही मैत्रिणी. पण सर्व माझेच कौतूक करायचे की जयाचा आवाज फार सुंदर आहे. पण माझ्या भाच्याने माझे जे काही कौतूक केले, ते मी शब्दांत बोलू वकत नाही. कारण त्याने अक्षरश: केतकीच्या बनामध्ये...हे गाणं पाठवून सांगितलं की आत्या सुमन कल्याणपूरकरांचा आवाज ऐकून मला तुझी आठवण आली. असं वाटतं की तुच गातेस. मला खूपच आनंद झाला. तशी मला अत्तिशय गाणी आवडतात आणि गायला ही आवडतात. समनजींना🙏🙏🙏 आता माझे वय ६२ वर्षे आहे. तरी ही गाणी छान गाऊ शकते.
सुमन कल्याणपूर,कृष्णा कल्ले,पुष्पा पाकधरे,उत्तरा केळकर,यांची अवीट गोडीची गाणी लहानपणी ऐकायचो,११ ते ११.३० दरम्यान रेडिओ वर सुगम संगीत असायचे.अंगाई गीते,पावसाची गाणी,भावगीते, अक्षरशः मनाला वेड लावायचे.आता पुन्हा सुमन ताईची गाणी कानावर पडताच नकळत डोळ्याच्या कडा पाणवतात.काय ते सुर,काय ते गीतकार,काय संगीत,सगळे कसे स्वप्नवत.....
अगदी बरोबर वर्णन केले आहे आपण! माझा ही अनुभव अगदी असाच !!! 👍👍
सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांचा आवाज जरी एक सारखा असला तरी ...दोन्ही ही मराठी मुली आहेत...हाच आम्हाला अभिमान आहे.
Mangeshkar family ni boycott kele industry madhye
सुमनजी बंगाली होत्या.. मराठी माणसाशी लग्न केल्यामुळे कल्याणपूर झाल्या.
महाराष्ट्रीय नव्हत्या. तरीही अप्रतिम मराठी शब्दांची लय आणि ओळख.
Suman kalyanpurkar hya mulchaya Bangladeshi Ahet
@@chandra65085त्या मूळ मराठी आहेत,सारस्वत आहेत......
सुमन कल्याण पुर कर यांची ही गाणी ऐकायला मस्तच वाटतात . बालपणीच्या आपली आवड प्रभात गीते आठवणी जाग्या झाल्या .आकाशवाणी वरचा आपला आवाज ऐकला होता आज तोच आवाज पुन्हा ऐकायला मिळाला यूट्यूब ला धन्यवाद
निंबोणीच्या झाडामागे ....हे गाणं आजपर्यंत मला लतादीदींचे वाटलं पुण सुमन ताई सुमन ताईंचे किती गोडवा.... किती गोड आवाज
अति सुंदर गाणी आहेत खूप दिवसांनी लहानपण आठवलं
सुमन ताई तुम्ही अजून ही गाऊ शकता कारण आम्हाला अजूनही तुम्हाला ऐयकाला आवडेल मी तर यापुधे सुमन ताईंची च गणी म्हणेन लता दीदींनी असे करायला नको होते ऐकून खूप वाईट वाटले😢
सुमन ताई , अन्याय तर फार झालेला आहे आपल्यावर. पण जो आपणास एकदा ऐकतो त्याला सर्व काही समजते. अतिशय शालीनता आहे आवाजात. खूप खूप प्रणाम 🙏🙏
Compilation ला अन्याय म्हणत नाहीत दादा. मला ही सुमन ताई लताजी पेक्षा जास्त आवडतात. सुमन ताई खात्या पित्या घरच्या होत्या, त्यांनी गाणं हे करियर म्हणून पाहिलं नाही. त्यांची 1990 ची बीबीसी ची मुलाखत ऐका.
अगदी 100 टक्के बरोबर आहे
काही गोष्टी अशा असतात की त्या खुलेपणाने सांगता येत नाहीत... कोणी काय सहन केलं हे ज्याचं त्याला माहिती असतं... आणि मुलाखतीत असंही सगळं छान छानच बोलायला लागतं
खुप श्रवणीय गाणी. ही गाणी ऐकताना मी माझ्या लहानपणात पोहोचलो. कारण ही गाणी आम्हाला आकाशवाणीच्या "मुंबई ब" केंद्रावरून "कामगार सभा" "आपली आवड" ह्या कार्यक्रमातून ऐकायला मिळायची. पुन्हा एकदा ते क्षण अनुभवायला मिळाले त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
सुमनताईंचा गोड आवाज आणि एका पेक्षा एक सुंदर😍💓 गाणी ऐकताना मन अलगद पणे आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागते ़
सुमन कल्याणपुरकर यांची फारच छान गाणी आहेत ऐकताना मन अगदी हेलावून जातं
आवाजाची तुलना कशाला करता. आस्वाद घ्या.अल्पकाळ का होईना मनाला शांती ,कानाला तृप्ती , गतकाळातील आठवणींना भरती येते.त्या
खळाळणा-या अविस्मरणीय आनंदाच्या लाटांमध्ये मनसोक्त चिंब व्हा. नशीबवान आहोत आपण अशी अमृततुल्य गीत ऐकण्यास मिळाली.
Barobar, khup lokana Lata barobar Tulna karaychi khanerdi savay aste. All these singers were great, so enjoy their art. 😊
Tyanchi sarv gani apratim aahetach pan shevtchya ३ ganyamadhil viyogi premika urmilechi laxmanashi tatatut v aaiche mulavaril prem apratim tyanchya ganyatun aaplich natyatil माणसे bhettat tyanche beej mazya nandlala he gane tar mala khup jawalche watte
हरी: ॐ, सुमनताई आपणास अनंत कोटी प्रणाम. आपली सुमधुर, भावपूर्ण गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो.. खूप च सुंदर काळ होता बालपणी चा आणि तरूणपणाचा.. आता प्रौढत्व आहे पण आपल्या आवाजाची ओढ कायम आहे.. आमची श्रवणेंद्रिये तृप्त करीत राहिलात याबद्दल करावे तितके कौतुक कमी च. मानावे तितके आभार कमी च.
लताजी बद्दल आज वाईट बोलणे चांगले नाही.
त्यांचा आवाज चांगला होता पण त्याची नीती कपटी होती.
त्यांच्या भरभराटीच्या काळात जे लोकं इतर गायिकांना गायला संधी देत त्या लोकांनी जर काही गाणी लताजीना गायला दिली तर त्या नकार देत. अशा लोकांवर जणु त्या बहिष्कार टाकत. असे केल्यामुळे असे लोक इतर गायिकांना गाणी देत नसत. यामुळे लताजींनी असे करुन त्यांच्या समकालिन बर्याच गायिकांचे करियर उध्वस्त केलेले आहे.
सुमन कल्याणपुर, अनुराधा पोडवाल, मुबारक बेगम, शमशाद बेगम, कविता कॄष्णमुर्ती यांच करियर खत्म केले लता मंगेशकर ने
खर आहे मित्रा
सुमनजी always more than other Singer 🌹🌹🌹
Barobar aahe tyach velchya Suman tai pan hotya Lata la tya avalat navhtya
Barobar@@dineshkashyap6644
सुमन कल्याणपूर या सगळ्यात आवडीच्या गायिका आहेत. मधुर आवाज आणि शालीनता खुप भवते.
राधिका रेगे. खूप सुंदर अप्रतिम आवाज.सुमन ताई तुम्हाला निरामय आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎉❤
देवा दया तुझी ही दैव शुद्ध लीला लागून दृष्ट माझी माझ्याच वैभवाला सुमन कल्याणपूर यांचे गाणे ऐकवा
मला आजपर्यंत वाटत होत की हे सर्व गाणे लता मंगेशकर यांची आहेत पण आज समजलं की इतका सुंदर मधुर आवाज सुमनजींचा आहे. का कुणास ठाऊक लता मंगेशकर यांची गाणी मला आवडतात पण त्यांच्याकडून positive vibe येत नाही. सुमनजीं कडून positive vibe येते. त्यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून सत्कार होताना पाहून मनाला खूप आनंद झाला ❤ finally त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली.
सुमन ताईंची गाणी ऐकताना मनाला खूप शांतता लाभते. आवाजात गोडवा, शालीनता, सुसंस्कृत पणा, आदब,, औदार्य, इ. सर्व सर्व आहे..
मी जबरदस्त फॅन आहे आपली.
आपली गाणी ऐकताना बालपणीचा कामगार सभा कार्यक्रम आठवत असतो.
आणि मन त्य गोड दिवसांत रमून जाते. पुन्हा ताजेतवाने वाटते.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
डोळ्यात पाणी येतं अशी गाणी ऐकली की बालपण डोळ्यासमोर येत आणि आपला स्वर्गीय आवाज आ..हा..कान तृप्त होतात ❤
खुप छान आणि सुरेख गाणी सुमनताई ने गायली आहेत. खरच त्याना मनापासून धन्यवाद.
17:10 17:11 घाल घाल पिंगा वाऱ्या हे गाणे ऐकले की मन माहेरी फिरून येते गोड माहेरीच स्वपन आहे हे गाणे खूप मोठ्ठे उपकार आहेत ताई 17:24
अगदी, मला तर रडूच येते
मी गाणी म्हणतो पण हे गाणे पूर्ण म्हणू शकत नाही, आई आणि आज्जी ची गळा भेट आणि अश्रू आठवतात.
मी तर ते गाणं पाठच केलं आम्हाला कविता होती आणि कधी पण एकटा बोलत असतो
सुमनताईंच्या आवाजाने लहानपण आठवलं , कवितापण, थंक्स
अप्रतिम सुंदर आवाज लताताई यांच्या आवाजापेक्षाही हा गोड आवाज मनात रूंजी घालत रहातो.अनेक गाणी लतादीदी यांनीच गायली आहेत असंच वाटतं हेच तर सुम़नताईंच्या गाण्यांची खरी गंमत आहे.मुद्दाम या गायिकेला फार संधी मिळू दिली नाही.हे रसिकांचे दुर्दैव आहे.प्रत्येक ठिकाणी गचाळ मानसिकता पहायला मिळते.हे किती वाईट आहे.
सुमनताई ग्रेट आवाज
खरच आम्ही खुप नशीबवान आहोत.आज माझे वय ५९ आहे पण ते बालपणातील दिवस परत आणन्याचे सामर्थ्य याच आवाजात आहे .सुमनताई ग्रेट आहेत.त्यांची सर्वच गाणी मनावर गारुड करुन जातात.कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही.परत परत ऐकावीशी वाटतात.सोबत संगितकारांचे सुध्दा अभिनंदन केल्याशिवाय रहावत नाही. खुप छान संगित दिलेय प्रत्येक गाण्यामध्ये.शाळेत असताना सुमन ताईंची बरीच गाणी मी गायली आहेत.
खरं आहे. ती मजा, आनंद कुठे हरवला आहे. शोधून सुद्धा मिळत नाही... धन्य ते आपले आई बाबा.. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला. यात ही गाणी ऐकायला लावत. आपली आवड, कामगार सभा, संध्याकाळी गाणी. अशी आवड निर्माण केली त्यांनी जे होते ते व्यवस्थित वापरून आपल्या पिढीला सुसंस्कृत केले.
हो ना कामगार सभा आणि ते संगीत म्हणजे आकरा वाजले
अगदी खरं आहे लताबाई पेक्षा सुमनताई कल्याणपूरकर उत्तम गाईका आहे परंतु 😢
मी पण 54 चा आहे. मंगेशकर कुटुंबाला एक यशस्वी टक्कर देण्याचे सामर्थ्य हे सुमन कल्याणपुर यांच्या आवाजात आहे.
खंरच खूप अन्याय झाला... या स्पर्धेच्या युगात त्यांच्या वर अन्याय झाला आणि आम्हा श्रोत्यांनवर देखील.... 😢😢
तुलना न करता आनंद घेतला पाहिजे, त्याला च आनंद मिळेल कारण आपल्याला सारखं काहीच मिळू शकत नाही, व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत तसें.
तुलना न करता आनंद घेतला पाहिजे, त्याला च आनंद मिळेल कारण आपल्याला सारखं काहीच मिळू शकत नाही, व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत तसें.
सुमन हेमाडी (म्हणजे कर्नाटकातील कुंदापूर मधील गाव) यांचा जन्म ढाका येथे , सारस्वत ब्राह्मण कुटुंबात (कर्नाटकातील मंगलोरचा येथील) झाला आणि रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह केला.
लोकांनी त्यांचा आवाजाची तुलना लताजींशी केली असली तरी पण सुमन कल्याणपूर त्यांचा आवाजालाअनोखा गोडवा आणि माधुर्य होते याची साक्ष या सर्व गाणी आहेत.
कर्नाटकातून आम्हाला अनेक भेटवस्तू मिळाल्या. सुमन कल्याणपूर, पंडित भीमसेन जोशी, कानडवू विठ्ठला, पुरण पोळी.
सुमनताई यांची गाणी लहानपणी च्चा आठवणींचा उजाळा देत आहे.
आजच मी 54 वय पूर्ण करून 55 व्या वर्षात पदार्पण केले. जुने काय बदलले आणि नवीन काय मिळाले याचा विचार करू लागलो तेव्हा सुमन ताईंचे गाणे मिळाले आणि माझे लहानपण आठवून अक्षरशः रडू कोसळले. शाळा, मित्र, आई, बाबा (आता नाहीत ते )आणि ही अशी गाणी जी कामगार सभा या रेडिओवर सकाळी 11 ते 11.30 च्या कार्यक्रमाची आठवण झाली. शाळेत जायची वेळ झालेली असायची. खूप काही हरवले असे वाटले. आज मुलीने जेवायला बाहेर नेले होते. मी लहान होतो तेव्हा शाळेत जाण्यापूर्वी सकाळीच आई ओवाळून काही तरी गोड तिच्या हाताने भरवायची आणि बाबा छान पैकी नवीन शर्ट न चड्डी (?) हाफ पॅन्ट (जे कि मलाच घेऊन मापं द्यायला घेऊन गेलेलो असताना देखिल ) द्यायचे, तो शर्ट आणि हाफ पॅन्ट बरोबर वाढदिवसाच्या आधी 1 दिवस मिळेल अश्या बेताने शिवायला देत. आता खरेच तसें सुख आनंद आता मी स्वतः कितीही महाग न फॅशन चा अख्खा ड्रेस सेट शर्ट न फुल्ल पॅन्ट घेऊन सुद्धा नाही मिळत. आई बाबाची माया उब त्यात नसतेच! हे सगळे आत्ता सुमन ताईची गाणी ऐकताना बालपण आठवण देऊन गेले. ही अशीच गाणी ऐकत मोठा (?) झालो.
Yes dear 100% right.
R0
खरेच
सत्य आहे
आमचं संपूर्ण बालपण अशाच गाण्यांनी भारून टाकले होते.... ग्रेट सुमनताई...
यावतचंद्रदिवाकरौ, सुमनदिदी, तुमची गाणी अमर राहतील.
अप्रतिम गीते! खरंच लहानपणात कधी घेऊन जातात कळत नाही. क्षणभर डोळ्यातून मोती ओघळ्याशिवाय रहात नाहीत.
शब्द रचना आणि संगीतकारांचे खूप धन्यवाद.
खूपच सुंदर आता मी सत्तरी गाठायला आले. सुमन ताईची गाणी ऐकून माहेर आठवले त्यावेळचे आई बाबा भववंड एकत्र कुटुबपद्धती.शेजारी सगळे कसे एकत्र कुटुंब
सारखे.त्यात ही गाणी ऐकून थट्टा मस्करी करायचो.❤😊❤😊❤😊
लता मंगेशकर पेक्षा खुप सुंदर आवाज आहे सुमन कल्याणपूरकर यांचा
लता मंगेशकर यांच्यापेक्षाही चांगलं गातात सुमन कल्याणपुर❤❤
अगदी मनातलं बोललात खुप मधुर आवाज आहे
भारत रत्न मिळविलेल्या चा आवाज ऐंशी च्या सुमारास कर्ण कर्कश्श होत गेला
घरणेशाहीने या सर्वोत्तम गायिकेच्या गायन क्षेत्रातील संधी हिरावून घेतल्या
अशी मधुर गाणी आता कोठे ऐकावयास मिळणार नवीन गायक यांच्या कडून दुर्मिळच आहे हा इतिहास जपून ठेवावे अशी गाणी आणि संगीत पुन्हा नाही होणार
.rs.ffe
😊😊
सुमनताई नमस्कार आपल्यावर अन्याय झालाय असेच मलापण वाटते आपला स्वर्गीय सुरेल आवाजा ऐकून मन प्रसन्न, शांत होते
सुमन कल्याणपूर यांना पुढे येऊ दिले नाही, खूप सुंदर आवाज
ही गाणी लहान असताना कानावर पडत होते, निरागस मनावर संस्कार नकळतपणे घडत होते. त्यावेळी रेडिओ चा जमाना होताआज ही गाणी ऐकल्यावर पुन्हा लहान होतो. अस गायन आता ऐकण्यास मिळत नाही 🙏
डोळ्यात पाणी येतं,
अशी गाणी ऐकून आणि लहान पण आठवल की
सलाम सुमन कल्याणपूर यांना.
मनापासून धन्यवाद!
वाट इथे स्वप्नातील same लता दिदी सारखा आवाज काहीच फरक नाही... कसे असेल na सुमन tai बऱ्याच लोकांना माहित नाहीत.... खुप छान आवाज
आवाजातच एवढी शालीनता आहे की गाणी ऐकताना स्वतःला विसरून आपण त्या सूरांबरोबर वाहवत जातो.
अगदी बरोबर
आकाशवाणीच्या गाण्यांची अविस्मरणीय आठवणी आजही ताज्या वाटतात सुंदर
सुमन कल्याणपूर रेडिओ स्टेशन वर बरऱ्यच वेळेस नाव ऐकीले परंतु एवढे सुंदर गाणे त्याचे आहे हे मला माहीत नाही अतीशय सुंदर गाणे,,🌹🌹🌹🌹🌹
सुमन ताईंचा आवाज लाजवाब, छान छान सुंदर,, 👌👌🌹❤️🌹❤️💐❤️❤️🙏🙏🙏🌹👆🌹💐
वाह, क्या बात है!सुमन कल्याणपुर जी आपल्या गायकीचा जवाब नाही, आपली गायकी म्हणजे एक सुमधुर संगीताची सदाबहार मैफल आहे!धन्यवाद सुमन जी, धन्यवाद सारेगामा!
धन्यवाद! सुमन जी को उनकी क्षमता के अनुरूप गाणे के चान्सेस मिलते तो चांद पे सुहागा होता !
माझे आवडते गाणे नाविका रे वारा वाहू दे अत्यंत हृदयस्पर्शी.
गोड आवाज..गाणी ऐकण्यात आपण तल्लीन होऊन जातो.बालपणापासून या गाण्याची आवड आजही तितकाच आनंद देणारी.
ताईं खूप खूप धन्यवाद!!
आशाताईंच्या तळ्यातील राजहंस, अतिशय गोड,भवणाप्रधन आवाज सुमनताई. सर्वच गाणी श्रवणीय . परमेश्वर आपणास dirghaushi ठेवो❤❤❤❤,
🎉FrC
सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात लाडीक पणा व गोडवा अदभुत आहे.
अप्रतिम आवाज अंगावर शहारे,डोळ्यात अश्रू जीवन जगल्याचे समाधान बस्स.......
सुमन ताईं चा आवाज... स्वर्गीय आनंदाचा अनुभव.. सुरेल आणि शालीन... व्वा!!
सुमन जिचा आवाज इतर गायिके पेक्षा खूपच सुंदर व अतिशय गोड आहे ❤
अजूनही सुमन ताईंच्या कडून गाणी गाऊन घ्यावीत. म्हणजे अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळतील.
कान तृप्त झाले सर्व गाणी ऐकून आहाहा मस्तच ही गीत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटतात.परत परत एकताना कंटाळा येत नाही.
निव्वळ राजकारण म्हणून लता मंगेशकरने सुमन कल्याणपूरला मागे पाडल
खुप छान छान गाणी गायली आहेत किंबहुना लतादीदी हून सुंदर धन्यवाद सुमनताई ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
" जुन्या गाण्यांचा कितीही कार्यक्रम ऐकला तरी मन शांत होत नाही.जुने ते सोने म्हणतात ते काही उगीच नाही."
सुमन जिंची गाणी ऐकताना मी पण लहान झालो , धन्यवाद .
जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप सुंदर
अतिशय मधुर आवाज भावपूर्ण गायन खूप शांत आनंद मिळतो
कान तृप्त झाले....,❤ सात्विकता आणि शालीनता.. यांचा संगम म्हणजे सुमनताई.
खुपच छान गाणे( खूप धन्यवाद )
वरील रसिकांच्या मताशी सहमत खरोखर अप्रतिम
मी.५२ वर्षा.चा.झालो.पण.अशी.सुमधुर.गाणे.लता.दिदी.सुद्धा.गायली.पण.सुमनताईंची.सर.येणारच.नाही.मानाचा.मुजरा.सुमन.दिदी❤
सुमनताई आणि लतादिदी च्या आवाजात साम्यता असल्यामुळेच कधी कधी गाणे ओळख णयात अडचण होते
मी आता 57वर्षाचा, सुमनताई गाणी आजही ऐकतो तेव्हा शरीरात नवचैतन्य निर्माण होते. मी मुलगा आता 29 वर्षाचा आहे , तो लहान असतांनाच निलंबनाच्या झाडामागे हे गीत गात असतांनाच त्याला खुप आवडायचे व तो लगेच झोपी जायचा. सुमनताईची गाणी आजही खूप खूप ऐकावीत वाटते.❤❤❤
लहानपणी यातल्या चारपाच शाळेत कवीता होत्या त्या कशातरी शिक्षकांच्या माराच्या भितीने घोकंपट्टी करून पाठ करून कशातरी वेड्यावाकड्या मार वाचवायसाठी म्हणायच्या....
आजमात्र सुमनताई अशाताईंच्या आवाजात ऐकतानां जीवनपटच डोळ्यासमोर उभा राहतो......
पुन्हा लहानपण दे देवा! गाडी नको. बंगला नको. ते लहानपण,तो बापाचा धाक आईची माया हवी.आताची तूप भाकरी नको. चटणी भाकरी हवी. Ac गाडी नको माझी पायगाडी हवी. की जी कधीच दमायची नाही. डोंगर उतार चढाइची, पेट्रोल फक्त अर्धी चटणी भाकर असायची. आताची गाणी नको ती,लतादीदी ,सुमन कल्याणपूर ताईची सूवर्ण परी गाणीच बरी.तोच निसर्ग हवा,शेतात राखणकरायला! हवे तेच वातवरण, हवे तिच कामगार सभा! हवी की जी काबाडकष्ट करताना भर उन्हात उब द्यायची.नको अताजीन.जीन असो तर त्या सूवर्ण काळात असो.अता इच्छाच नाही असले जीवन जगयची!
आता कितीही मिळाले तरी त्यात आनंद नाही मिळत आहे. जमाना बदलला म्हणजे काय याचे उत्तरंच मिळत नाही आहे...
Sarvanchya Pratikriya vachun dolyat pani alee..... tumhi amhi sarv bhagywan aahot.... ashi daivi suur aikala milale....
Mala atýant aavadñare geet *Ghal ghal Pinga Varya Mazya Parasaat, Maheei Ja Suvasachi kar Barsat....😢😊
शाळेत असताना रेडिओ वर आणि शनिवारी लागणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये ऐकलेली ही सर्वांग सुंदर गाणी ऐकून अक्षरशः डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. खूप समृद्ध केलं आमचं बालपण या गाण्यांनी. किती गोडवा आहे आवाजात सुमनताईंच्या ❤
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
पुन्हा ते दिवस येणे नाहीत.
सुमनताई केशवा माधवा हे गाणं तुमचं फार फार अविस्मरणीय आहे
माझी आवङती गायीका खुपच सुंदर गाणी ऐकायला मिळाली लहानपणी रेडिओ वर सकाळी आणी आपली आवड मधे ऐकायला मिळायची धन्यवाद ❤
सुमनजीने बचपण याद दिलाया है! बहुत बहुत धन्यवाद ताई 🌹🎉🙏
माणसाला दैवी देणगी असून सुदधा तो दैवी वागत नाही, कीव येते या वृत्तीची.......असो इतक असून सुदधा सुमनताई तुम्हीही तितक्याच ग्रेट आहात
अप्रतिम गाणी..ही गाणी आकाशवाणीवर ऐकणे आता फारच दुर्मिळ झाले आहे..धन्यवाद
मला तर ही गाणी माझीच आहेत असे वाटते
नाविका re ,केतकीच्या बनी
ही गाणी माझी खूपच आवडती आहेत.
मी अशा प्रकारे म्हणण्याचा प्रयत्न करते
अप्रतिम गाणी गायली आहेत , मला फार आवडतात , मी व माझी पत्नी पुन्हा पुन्हा ऐकतो
खुपच सुरेल आवाज,सुमधुर गायकी मी नेहमीच ही गाणी ऐकत असते,🎉
सुमन ताईंच्या आवाजाचे लतादीदींच्या आवाजाशी असलेले साम्य पहाता मनात विचार येतो की त्यांना हिंदी चित्रपट संगीतात फार संधी का मिळाली नाही. वास्तविक अनेक प्रथितयश संगीतकार कसे स्व. सचिनदेव बर्मन , सी.रामचंद्र, एन.दत्ता, शंकर जयकिशन यांचे काही काळ लता दिदिंशी बिनसले होते अश्यावेळी सोलो गाण्यांसाठी सुमनाताईंचा आवाज वापरावा असे त्या दिग्गज संगीतकारांना का वाटले नाही. नाही म्हणायला शंकर जयकिशन यांनी महमद रफी यांच्या बरोबर काही द्वंदगीतात सुमनाताईंना संधी दिली. पण त्याचे कारण काही मतभेदांमुळे लतादीदींनी रफिसोबत गाणे बंद केले होते. पण सुमनताईंना हिंदी मध्ये म्हणावा इतका वाव मिळाला नाही हेच खरे. रसिकांचे दुर्दैव.
For your information everyone knows suman kalyanpurkar was better than lata mangeshksr and so our so called gan kokila lata didi forced every music director to not take her.... You can also check this information on google and black side of lata mangeshkar on RUclips .
हेच दुर्दैव आहे हीच खरी खंत आहे ... कुठेतरी मन आतुन दुखावतं असही असु शकत....
पण सुमनताई तुम्ही ग्रेट आहात ..
@@ushabhujbal1422स्व. लता मंगेशकर यांचे अनेक संगीतकारांशी वेळोवेळी मतभेद झाले होते. अश्यावेळी त्या त्या संगीतकारांना आवाजात तितकेच माधुर्य असणाऱ्या सुमनाताईंची एकल गाण्यासाठी आठवण का झाली नाही ह्याचच वाईट वाटते.
Latadidi yani sumantai la pudhe yun dile nahi.koni Aaj he bolyala tayaar nahi.
Ye mere Watan ke logo ,he Gane Sudha pahile Suman Tai chech
अतिशय मधुर आवाज... नशीब आडवं आलं म्हणतात नं...
खरचं १०० टक्के लता मंगेशकर लता टक्कर देणारा आवाज ❤
Gg