चिंदर गावातील गावपळण | ३ दिवस गावा बाहेर राहण्याची कोकणातील एक आगळीवेगळी प्रथा | कोकणातील गावपळण
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- कोकणात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रुढी, प्रथा, परंपरा अजूनही त्याच पद्धतीत राबवल्या जातात. अशीच एक प्रथा म्हणजे गावपळण.
कोकणातील काही गावांमध्ये पुर्वजांनी सुरू केलेली गावपळण ही प्रथा अजूनही काही बदल न करता तशीच सुरू आहे.
काय असते ही गावपळण? कुठे होते? का करतात? असे बरेच प्रश्न माझ्या मनात होते. मागच्या ३-४ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या चिंदर या गावी ही प्रथा होते असे मी ऐकून होतो. पण नेमकं कधी होते हे माहीत नव्हतं. पण यावर्षी गावपळणच्या ठिक दोन दिवस आधी ही गावपळण कधी होणार आणि कुठे होणार हे समजलं. मग त्यादिवशी तिथे जाण्याचं ठरलं. पण तरीही तिथे गेल्यावर काय अनुभवायला मिळेल, गाव बंद असेल तर भेटायचे कोणाला, सर्व लोक कुठे भेटतील, बाहेरच्यांना गावात घेतील कि नाही असे सर्व प्रश्न समोर होते. म्हणून चिंदर गावातील कुणी कुणाच्या ओळखीचं भेटतो का याची शोधाशोध सुरू झाली. सोशल मीडियामुळे जग तसं जवळ झालं आहे.
काही संपर्क मिळाले, त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी संध्याकाळी चिंदर गावच्या रामेश्वर मंदिरात पोहोचलो. पण मला कदाचित उशीर झाला होता. कारण मी जाईपर्यंत पुर्ण गाव रिकामी झालं होतं. सर्व घरं बंद होती. सर्व दरवाजे कुलुपबंद, रस्त्यावर एकही मनुष्य नाही. मंदिरात सुद्धा कोणी नव्हतं. आजुबाजुला तीन मंदिरं आहेत, पण कुठेच कोणी दिसत नव्हतं. शेवटी अर्धा तास शोधाशोध करुन झाल्यावर एक व्यक्ती भेटली. तीसुद्धा घाईघाईत बॅग घेऊन स्कुटर वरुन निघणार होती. त्यांना विचारलं सर्व गाव वाले कुठे आहेत. तर म्हणाले "आता गावत कोण नाय भेटाचो, सगळा वशाड पडला अस्तला आता." म्हणजे आता गावात कोणी नाही भेटणार, सर्व ओसाड पडलं असणार. ते म्हणाले माझ्या बरोबर चला, मी दाखवतो, मी तिथेच जात आहे.
मग ते गावा गावातुन कच्च्या रस्त्याने, लहान मोठ्या वाटेने मला सड्यावर (डोंगरावर असलेली सपाट जागा) घेऊन गेले. तिथे अक्षरशः एक गाव वसलेलं होतं. एका सरळ रेषेत काठी आणि ताडपत्री वापरून छोटी छोटी घरं बनवलेली होती. एक किचन आणि एक हॉल असतो एवढी जागा. किचन मध्ये चुल आणि तीन दिवसाचे राशन. बाहेर मोकळी जागा. लाईट, पाण्याची सर्व सोय तिथे केलेली होती. गुरं एका बाजुला बांधलेली होती. लहान मुलं क्रिकेट खेळत होती. तरुण मुलं लाईट वगैरे लावणे किंवा इतर कामं करत होती. आणि वयस्कर लोक मस्त आराम करत गप्पागोष्टी करत होते. एकुण अशी सर्व लगबग या तात्पुरत्या वसवलेल्या गावात चालू होती. ही जागा चिंदर गावच्या वेशी बाहेर आहे.
तिथल्या लोकांशी गावपळण या प्रथे बद्दल विचारलं असता ते म्हणाले एरव्ही गजबजलेलं आमचं गाव रवळनाथाने कौल दिल्यानंतर रिकामी होऊ लागतो. तीन वर्षांतून एकदा तीन दिवसांसाठी चिंदर गाव निर्मनुष्य केलं जातं. ग्रामस्थ आपापली गुरं ढोरं, पाळीव प्राणी पक्षी घेऊन गावा बाहेर पडतात. दैवी गोष्टी जरी असल्या तरी यामागे शास्रीय कारण देखील सांगितले जाते.
कोरोना काळात प्रत्येक गाव जसं बंद करण्यात आलं होतं तसंच गावातील वातावरण प्रदुषण मुक्त करण्यासाठी गाव रिकामी केलं जातं. त्याच सोबत तात्पुरत्या बांधलेल्या गावात लोक एकत्र भोजन, भजन, खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम करून सहजिवन अनुभवतात. याने एकोपा वाढतो. जुनी भांडणं मिटतात. या तीन दिवसांत महीला देखील रोजचे कामकाज आटपून संध्याकाळी फुगडी वगैरे असे पारंपारिक खेळ खेळतात. कामानिमित्त बाहेर गेलेले चाकरमानी सुद्धा या गावपळणला आवर्जून उपस्थित राहतात.
तीन दिवसांनंतर चौथ्या दिवशी रवळनाथाला पुन्हा कौल लाऊन सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी जातात. सोबत असतात त्या गावपळण वेळच्या सहजीवनात घालवलेल्या आठवणी.
ही प्रथा कधी चालु झाली, का चालु झाली हे नक्की कोणाला माहीत नाही. पण परंपरा जपणाऱ्या या कोकणात ही प्रथा बऱ्याच पिढ्यांपासून सुरू आहे आणि पुढची पिढी सुद्धा ही परंपरा अशीच चालू ठेवेल हे नक्की.
👍 Follow: Unexplored Konkan
👤 Facebook:
/ unexploredkonkan
📷 Instagram:
/ unexploredkonkan
🎥 RUclips:
/ @unexploredkonkan
🖱️ Website:
www.unexploredkonkan.in
Contact: 9970683669 Mady Velkar
हा माझा गाव आहे अतिशय निसर्ग रम्य या गावात अनेक मंदिरे आहेत या गावपळणीचा आनंद मी अनेकवेळा लहानपणी घेतला आहे खूप सुंदर आहे माझे गाव माझे माहेर
आश्या प्रथा गाव रोग जंतू मुक्त होऊन वातावरण शुद्ध होऊन प्राणी जीवन सुखी
व्हावे हा उद्देश असावा .आता लशी . फवारणी
वगेरे आल्या पूर्वी निसर्गाचा विचार केला गेला
आहे.
हा एक सार्वजनिक ऊत्सव आहे
सुंदर प्रथा हि प्रथा भविषात पर्यटक हि प्रथा पाहण्यासाठी हजारों च्या संखेने येतीले खुप खुप शुभेच्छा समस्त गावकर्याना 🚩🚩 एक इछा घर टुमदार बनवा 🙏🙏🎊🎊🎊🎊🎊🎊🙏🙏🙏🙏🙏गावपळ जिन्दाबाद 👍👍😂🙏🙏🙏 धन्यवाद माहिती बद्दल 🙏🙏🙏
त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत
1 नंबर गावपळण ऐकून माहित होत पण आज त्या बदधलची माहिती आपल्या माध्यमातून मिळाली.
Khup khup dhanyawad
अशा प्रकारची प्रथा पहील्यांदाच बघायला मिळाली
फार सुंदर माहिती दिली
चंदर गावामध्ये आता14वाडी आहेत
परंतु सगळे जण एकच वाडीचेशुटींग
दाखवत आहेत देव बरे करो
सर्वच वाडीतील लोक गावा बाहेर राहत नाहीत, काही दुसऱ्या गावात राहतात, तर काही आपल्या नातेवाईकांकडे. मी दुसऱ्या वाडीत गेलो होतो, पण तिथे लाईट नव्हती. म्हणून जास्त शुट करता आले नाही.
Maza maher
खूप छान एक वेगळीच मजा आहे यात परंपरा सोडून द्या सगळे मिळून एकत्र गावा बाहेर राहणे सगळे एकत्र यायचे यात आनंद आहे
हे माझ्या आत्यचे गाव आहे चिंदर आणि ही प्रथा माहित आहे बऱ्याच वेळेस आत्यकडून ऐकले होते. गावपळण या प्रथेत ३ दिवस गावात देव नसतो.....मृत व्यक्तींच्या आत्म्यास या दिवसांत मोकळीक दिली जाते त्याचं अस्तित्व या दिवसांत असते..
हो दादा बातमी टीव्ही ला पाहिली होती एकदा खुप छान प्रथा आहे 👌👌🎁💯💯 चेक करून परत करा नक्की
गावात एकोपा कायम रहान्या साठी आणी लोकांमधे नव चैतन्य निर्माण करन्या साठी ही प्रथा मार्गदर्शक आहे
हो
छान व्हीडिओ आणि गावपळण सुद्धा.
धन्यवाद
फार छान मस्त
धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज बोल भाऊ
Come out of old days and hallucinations. He is not disrespectful at all.
👌👌👍👍
छान मित्रा
धन्यवाद
आजी आजोबांकडून ऐकलेलं की ह्या तीन दिवसात वाईट शक्तींचा वास असतो, म्हणून देवाला कौल लावून त्यात जी तारीख दिवस आणि वेळ ठरेलं त्या वेळेत सर्व गावकारी गाव सोडतात आणि वेशी बाहेर एकत्र राहतात, तिथे मस्त ग्रुप पिकनिक चा फील येतो 👍, आमच्या बांदिवडे गावापासून चिंदर काहीच अंतरावर आहे
Ek no👍,All the best for upcoming video.
Thanx a lot
Hii bhava #ratnagiriker .. Aamchyakde ashi pratha nhiye
Pn video Chan ahe ek no🤩
Hi pratha Sindhudurga madhil chindar gavatil aahe
@@unexploredkonkan ha Chan ahe प्रथा ashich japun theva😊😇
Super video dada
Thanx
नाटेकरांनु चांगली माहीती देऊन गावपळण म्हणजे " उत्सव " अशी गावपळणीची प्रतिमा तयार केली आपण. आपण वर्णन केलेल्या स्वरुपामुळे गावपळण म्हणजे
"गावपळणीचोसण" म्हणुन भविष्यात ओळखला जाईल. गावपळणीचीजञा कोणी म्हणतील. देवाची कृपा प्राप्त करण्याची संधी म्हणजे प्रथा . म्हणजे एक तीन दिवसाचे व्रत.
आचरा गावची गावपळण पण सगळ्यांना ऐकून माहित असेल ३ दिवस भूतां खेताना गाव रिकामा करून दिला जातो
Dada aamchya gavi pan hi parmpara aahe. Aamhi pan 3 divas gavachya baher rahato. Aamchya kade 7 varsha nantar ashi parmpara yete. Yach varshi jhal aamchya gavi hi pratha. Aata 7 varsha nantr yeil. Aamhi tyala righoni bolto. Aamche gav ballaleshwar Pali ( bhoir che navghar) aahe. Khup majja yete.
धन्यवाद, माहिती दिल्याबद्दल. 👍
चिंदर गावातील भगवंत वाडीत सुध्दा फेरफटका मारायला पाहिजे होता, भगवंत गड वाडी याच वेशीत येते, संपूर्ण गावाचे शुटींग केले असते तर सर्वांना याची माहिती मिळाली असती.
Gelo hoto tithe, ratricha shoot tithalach aahe, tithe light navati...
दिवसा जाऊन नक्की शुटींग करावे, जुन्या जाणत्या वयस्कर व्यक्तीशी संपर्क करुन तिथल्या चाली रिती बद्दल योग्य ती माहिती मिळवावी. वेळे अभावी मी येऊ शकलो नाही, पुन्हा योग आला तर नक्की येऊन तुमच्याशी संपर्क करेन. मला जी काही थोडीफार माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करेन.
ो
वळू
To tar bharich hota...
Bhari ..ya pratha nimittane gav ektra rahto ani gavatli mandali anand ghetat...khup chan...aplya pratek prathela rituals na dharmik ani practical reasons ahet🙌💙💚
@@prernaparab2171 ho
उत्तम चित्रीकरण. छान माहिती मिळाली.
@@smitaogale4483 thank u so much