विना नांगरणी शेतीमधून तुरी आल्या घरी | शून्य मशागत शेती | Vina Nangarani Sheti | Pratap Chiplunkar
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- कोल्हापूर येथील शेती तज्ज्ञ प्रताप काका चिपळूणकर यांनी विना नांगरणी शेतीचे तंत्र विकसित केलेले आहे. या तंत्रानुसार शेतातील काडी-कचरा साफ न करता जमिनीतीच कुजविला जातो. तणाचे व्यवस्थापन करताना फक्त एकदा तण नाशकाची फवारणी केली जाते. गवत वाढल्यास फक्त कापून तिथेच टाकले जाते. विना नांगरणी शेतीत निंदणी केली जात नाही. अशा पद्धतीने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमीन भुसभुसीत राहते. तसेच, पावसाळ्यात या जमिनीतून पाणी वाहताना सोबत माती जात नाही. जमिनीच्या सुपिकतेसाठी आणि सुरक्षेसाठी विना नांगरणी शेती तंत्र खूप फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव दीपक जोशी यांनी मांडला आहे. श्री. जोशी हे देवगाव (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे गेल्या पाच वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करत आहेत. या वेळी तुरीच्या काढणीप्रसंगीचे चित्र आजच्या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे.
#pratapkakachiplunkar
#deepakjoshidevgaon
#vinanangarnisheti
#srtfarming
#shivarnews24
#विनानांगरणीशेती