Pooja Khedkar | पूजा खेडकर प्रकरणावर चाणक्य मंडलचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्याशी खास बातचीत
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2024
- Pooja Khedkar | पूजा खेडकर प्रकरणावर चाणक्य मंडलचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्याशी सविस्तर बातचीत
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
RUclips - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews
कुठे तुकाराम मुंढे, कुठे पूजा खेडकर... देवा!, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
तुकारामाच उगाच कौतुक करू नका, मूलखाचा उद्धट आणि स्वमग्न माणूस आहे. सध्या राजकारण्यांशी वाद घालतो म्हणून तुम्हाला चांगला वाटत असेल, पण जेव्हा तुमचे काम येईल, तेव्हा किती उर्मट आहे ते समजेल😂😂😂😂
@@deepaktelang507 जास्त कमिशन पाहिजे असतं, म्हणून नेत्यांशी वाद होतात....😂😂😅
👍@@johnsena9234
@@deepaktelang507 तुकाराम मुंढे वर होणार्या अन्याया बाबत धर्माधिकारी कधी बोलणार नाही.धर्माधिकारीला रेशीम बागेतून दिक्षा मिळाली आहे.गाढवान वाघाच कातडं पांघरलं म्हणजे गाढव वाघ होतं नाही.
अरुण भाटिया. महेश झगडे. सुनील केंद्रेकर. व आताचे हिरो तुकाराम मुंडे साहेब हे खरे यूपीएससी चे हिरो आहेत.
महेश झगडे प्रमोटेड आई असते यूपीएससी नव्हती
काही उपयोग नाही U PC कायदा तसा बनवला आहे ?
फक्त तुकाराम मुंढे साहेब हे प्रामाणिक पणे काम करीत आहेत.त्यामुळे त्यांच्या बदल्या एक सारख्या होत राहतात.असा प्रामाणिक माणूस राजकारण्यांना नकोशी असतो.कारण भ्रष्टाचार् उघड पणे करता येत नही.
या देशाची विडंबना आहे देशाचे पंतप्रधान म्हणतात की,मी जनतेचा सेवक आहे पण युपीएससी मार्फत निवड झालेले अधिकारी स्वतःला त्या विभागाचे शहेनशहा समजतात.
विश्वास नांगरे पाटील यांची एकदा जातिवंत पत्रकाराने मुलाखत घ्यावी.....तो किती प्रामाणिक आहे ती समजेल लोकांना
Nusti chamkogiri😂
पोपटपंची आहे
Mahacorrupt+chaplush+chamkogiri
अगदी बरोबर बोललात.
To kunbi certificate gheun bsla ahe Ani lavto Kay patil...Ani tyacha bap sarpanch hota Ani to mnto ki khup garib hoto n all...full chamkogiri😂😂😂😂
जे प्रामाणिक आहे तुकाराम मुंडे साहेब सारखे त्यांना प्रत्येक 4 महिने मध्ये बडली भेटते काई दुर्दैव आहे महारष्ट्र आणि देशाचा
😂😂😂😂
अविनाशजी बहोत बढीया,चाणाक्यांची पंचसूत्री खर्या अधिकार्यांचे हृदय असायला हवे . धन्यवाद सर
आदरणीय अविनाश धर्माधिकारी यांनी अतिशय परखड आणि योग्य शब्दांत विषय उकलून दाखवला आहे. त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. तसेच या विषयावर सुयोग्य प्रश्न विचारून विषयाला धरून संपूर्ण संभाषण केले त्याबद्दल राहुलजींचेही अभिनंदन.
पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही आयएएस लोकांची लॉबी खूप ताकदवान आहे. जवळजवळ ९९ टक्के प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाते. यात राजकीय नेत्यांचीही भागीदारी निश्चितच असते. जोपर्यंत एखाद्या राजकीय पुढाऱ्याला व्यक्तिगत स्वारस्य एखाद्या प्रकरणात नसेल तोपर्यंत आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही. हे सत्य आहे. अगदी पारदर्शकपणे तपास केला तर ९० टक्के आयएएस गोत्यात येतील. पण तपास करणेही निवृत्त आयएएस अधिकारीच असतात. त्यामुळे उंदराला मांजर साक्ष असा प्रकार होतो.
धर्माधिकारी सरांना खुप छान विश्लेषण केले सरांना धन्यवाद 🙏🙏
हा नियतीचा खेळ आहे. पापाचे घडे भरले की आशि उपरती होते. वडील माजी सनदी अधिकारी ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेतला आहे. ह्याचा मागे वडिलांचा हात आहे. पूजा खेडकरचा हया खोडकर पणा मागे आई वडिलांचा हात आहे.
पूर्वी म्हणजे 1970 साली 5%, 1980 साली 15%, 1990साली 25%, 2000 साली 45%, 2010 साली 58%, 2020 साली 80%, 2024 साली 90% अप्रामाणिक adhikari👌 सरकारी सेवेत आहेत
Perfect! 🎉
अमिताभ गुप्ता IPS याच्या कोविड काळातील वाधावान प्रकरणाचे काय झाले? कारवाई काय झाली.
हा विषय 4 दिवस चालेल नंतर पुन्हा पहिले पाढे सुरू होतील.... पुणे मॅटर लोक विसरून गेले .... हा मॅटर विसरून जातील....आणि हे सुध्दा न्याय कुठेच नाही फक्त चर्चा...चर्चा आणि चर्चाच
श्रीमंत लोकं गरीब OBC लोकांसाठी असलेले आरक्षण चोरत आहेत ...8 लाख रुपयांची मर्यादा असताना पूजा खेडकर ओबीसी certificate मिळालेच कसे याची चौकशी राज्य सरकारने कारवाई करावी.... यामध्ये तलाठी,तहसीलदार,उप जिल्हाधिकरी यांची कसून चौकशी करावी
@@vikas_0707 श्रीमंत इ मा व असं म्हणा, नुसतं श्रीमंत नाही. नाहीतर उगाच बामनांना शिव्या घालत राहतील.
प्रत्यके सनदी अधिकारी शेण खाणाराच असतो. मुळात निवड प्रक्रियाच इंग्रजांनी तयार केलेल्या निकशांवर आधारित आहे, त्यांना नितीमत्तेशी काय देणंघेणं होत?
उद्धट नसलेला IAS अधिकारी कोणी पाहिला असल्यास नाव सांगा, त्याच्या पाया पडायची इच्छा आहे!
अविनाश धर्माधिकारी साहेबांनी मांडलेले मत त्रिवार सत्य आहे. प्रशासकीय अधिकारी होतानाच इतक्या कुलापती जर असतील तरअशी व्यक्ती प्रशासनात आल्यावर अधिकाराचा काय वापर करेल . चिंतनाची व संशोधनाचा भागच आहे?
सर्वच सरकारी अधिकारी तसेच मंत्री यांची प्रॉपर्टी चौकशी केली पाहिजे ती पण तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांची बदली करतात ह. ....खोर
राहुल कुलकर्णी सर खूप खूप दिवसांनी ऐकायला मिळाले.कदाचित NDTV मराठी मीच पहिल्यांदाच पाहत असावं.राहुल कुलकर्णी सर एखादया विषयात घुसले की a to z माहिती मिळण्याची खात्री.धन्यवाद राहुल सर आणि धर्माधिकारी सर.
14:55 शेवटी BJP RSS cha माणूस हा विरोधात कसा बोलेल खर जरी असेल आणि निती मूल्ये moral ethics च्या गोष्टी करतो.. लहान बाळाला देखील कळेल पॉलिटिकल सपोर्ट शिवाय हे शक्य नाही! Atleast possibility असू शकते एवढं जरी म्हणाले असते तर आदर वाटला असता..पण ढोंगी बाबा यांचा सारखा जणू आम्हीच देवाचे अवतार आणि आम्हीच नीतिमत्ता शिकवणार असो ..
पॉलिटिकल बॅकिंग असूच शकत नाही ती गोष्ट निव्वळ खोडून काढणे कारण केंद्रात आणि राज्यात यांच्या आवडत्या पक्ष्याची सत्ता आहे.. तुम्ही ही गोष्ट एवढ्या सरसकट कशी काय फेताळू शकता मुळात..!
Bjp rss cha माणूस म्हणलं की झालं मी लय शहाणा अरे त्यांचं knowledge pn बघ कर्तुत्व बग की नुसताच bjp rss म्हणायचं आणि स्वतः ल सांत्वन द्यायचं की तुला तेवढं मोठं काय करायचं झालं नाही😂😂😂😂😂
२०२४ मधील पार्लमेंट निवडणुकीत ९५ टक्के अधिकाऱयांनी मोदीजी विरोधात काम केले अशी माहिती आहे ! कारण त्यांचे दोन नंबरचे उत्पन्न मोदीजी मुळे बंद झाले याचा प्रचंड संताप आहे !
Kuthe band zale ? Ek veles tahsildar office , RTO , police station la jaun bagh ....ani mantralaya madhe tar crores che vyavhar hotat..
Roj bhrastachari karamchari anti corruption madhe pakadale jatat.
Newspaper vach , what's app University vachane band karm.
Phadake jativr gelat.adhikari 10 patine shrimant zalet
😂andhbhakt
पूजा खेडकरचा संपूर्ण तपास माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे देण्यात यावा, भारत सरकारने समिती स्थापन करून त्यात धर्माधिकारी साहेबांना सामील करून घ्यावे.
ते तरी प्रामाणिक आहेत का? 😂
@@rajnikantgolatkar1363बिर्ला कन्येचीही तपासणी करण्यात यावी साहेबांकडून 😂
@@padmakarnanhore4951खोटा प्रचार झाला बिर्ला यांच्या कन्येबाबत. नीट माहिती घ्या.
एकदम योग्य बोलत आहेत धर्माधिकारी सर
अपवाद वगळता सर्व आय एस अधिकारी हे विलासी आयुष्य जगतात.
लोकांनाच त्यांचे अधिकार आणि कर्तव्य यांची योग्य जाणीव नाही. त्याबाबत शिक्षण व्यवस्थेत योग्य त्या सुधारणा करायची राजकारण्यांची ईच्छा नाही.
एक भामटा नांगरे पाटील त्याची पण पोलखोल करा एकदा..
@@Xyxucv99 अगदी बरोबर मी हे असे का बोललो ते लक्षात घ्या केरळ मध्ये सफीर क्ररीम नावाच्या आय. पी एस. अधिकाऱ्यांला सन 2017 ला पकडले होते.
@@Xyxucv99 अगदी बरोबर मी हे असे का बोललो ते लक्षात घ्या केरळ मध्ये सफीर क्ररीम नावाच्या आय. पी एस. अधिकाऱ्यांला सन 2017 ला पकडले होते.
सनदी अधिकारी ने भ्रष्टाचार केल्यास व तो सिद्ध झाल्यास अशा अधिकारीसाठी देशद्रोहाची शिक्षेचा कायदा असला पाहिजे.बहुतांश पैसे गैरमार्गाने कमवण्याच्या उद्देशानेच या सेवेत येतात.
बीडच्या पंकजाताईची साथ आहे खेडकर कुटुंबाला
९० नाही ९९ असावेत.. त्यात हे सुधा आहेत... नागरे पाटीलचे गुरू शरद पवार तेव्हा काय ते समजून जा
नागरे पाटिल यांची संपत्ति पण सांगा
म्हणजे कळेल काय ते.
खरे आहे. महविकास आघाडी चे सरकार होते तेंव्हा हा अधिकारी सिल्व्हर ओक वर सारखा जायचा असे मिडियानी वेळोवेळी प्रसिद्ध केले आहे.
अहो सगळे ips polarized आहेत..... आपला एकाच नाव का घेता..... स्वतः पुण्याच्या पालकमंत्र्यांनी हव्या त्या ips ला बोलावतात...
RSS च प्रभाव असलेले व्यक्तीम्हतव अविनाश
सरांचे अगदी बरोबर
परप्रांतीय जे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत ते मुख्यतः पैसा कमावण्यासाठी.... सनदी अधिकारी IAS किंवा IPS च का, हुशारी, ईमानदारी, , इच्छा शक्ति कामाच्या अनुभवाने देखील चांगला अधिकारी घडतो. इतिहास, भूगोल ची माहिती, विभागावर आणि तेथील लोकांवर प्रेम हवे, बाहेरून आलेला व्यक्ति कडे हे कुठून येणार??
पैसे भरून, जातीच्या आधारावर, खोटे सर्टिफिकेट घेऊन अधिकारी झालेले लोकांकडून काय अपेक्षा करणार??
पुढारी व सरकारी अधिकारी, कर्मचारी मिळून भ्रष्टाचार करीत आहेत.हे थांबविणे अवघड आहे.
व्यवस्था अतिशय वेल सेटल्ड आहे, IAS IPS, IRS अधिकारी (काही अरुण भाटिया, तुकाराम मुंढे, प्रवीण गेडाम असे अधिकारी सोडता) गुलामासारखेच वागतात कारण त्यांचे वैयक्तिक हितसंबंध आणि निवृत्तिनंतरही काय हा प्रश्न.
प्रत्येक व्यक्तीला दोन वेळा आमदार दोन वेळा खासदार होता येईल आसा नियम करणे आवशक आहे वयाची मर्यादा 70 वर्ष करणे आवश्यक याने भ्रष्टाचार कमी होईल
१५० कोटी महिना होता गोळा करण्याचा आदेश मंत्री देतात असे मुंबई सारख्या आंतर राष्ट्रीय शहराचा मुख्य कमिशनर म्हणतो त्याचे काय?
@@vg134 तो हरामखोर पोलीस आयुक्त पैसे देवजनच आयुक्त झाला होता, हे माहित आहे का? असल्या नालायक लोकांच्या आरोपला राजकीय फडणवीस याचा पाठिंबा होता. असल्या नालायक लोकांचा काय विचार करणार
सरकारी नोकरी चरायचे कुरण. आयपीएस होऊन देशाची सेवा करायची आहे वगैरे सगळ्या गप्पा आहेत. फार थोडे अधिकारी सरळ मार्गी आहेत.
@@chandukunte6426 अधिकारी सोडा,राजकारणी काय लायकीचे आहेत?सरकारी यंत्रणेला भ्रष्ट म्हणणाऱ्या स्वच्छ राजकारण्यांनी गेल्या पंचाहत्तर वर्षात किती भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदभ्रष्ट केलं?तसंच लालू आणि पंडित सुखराम यांचे शिवाय किती भ्रष्ट राजकारणी गजाआड गेले.सर्व एका माळेचे मणी आहेत.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे.साहेब...एकच नं...
Bhava toh tr sarvat jsti bhrasht ahe agodr DE lavychi m uklyache
But , 90% officers are ARROGANT .There seems lack in their training.
आदरणीय तुकाराम मुंढे साहेब यांना माझा मनापासून नमस्कार असेल
बहुसंख्य सरकारी अधिकारी लाच खाल्याशिवाय एकही काम करत नाहीत
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
This rot has been started from 1995 onwards. In 1995 NDA came to power ,those honest then politicians took over the powers of transfer from Regional Officers.Not single transfer is without depositing money.Those officers do not pay for transfer do not get good posting.This has resulted into huge corruption in transfer. Ultimately people are suffering.
मुलाखतीचा उत्तरार्ध अंतर्मुख करणारा...इतके मौलिक मार्ग दर्शन केल्याबद्दल आभार..
डाॅ.शारदा देवदत्त तुंगार
मुळात एवढ्या गोष्टी मॅनेज झाल्यात तर मग ही समिती नेमली आहे ती का नाहीं मॅनेज होऊ शकत
प्रशिक्षण वगैरे वर बोलून विषयांतर केलेले आहे. मुख्य विषय हा आहे की खोटे सर्टिफिकेट देवून IAS ची नोकरी काबीज करणाऱ्या पूजा ला घरी पाठवलं पाहिजे.
एक no अगदी बरोबर
माझ्या भावचा जन्म दाखला पाहिजे होता त्यासाठी मला त्या अधिकाऱ्यांनी खुप वेळा फिरवलं खुप त्रास दिला साधे नगरपालिका अधिकारी एवढे बोगस असतात तर हे किती बोगस असतील
धर्माधिकारी साहेब झिंदाबाद, सर्व प्रामाणिक अधिकारी झिंदाबाद ❤
फक्त तुकाराम mundhe साहेब ❤❤❤❤❤❤❤
धर्माधिकारी सर तुम्ही परत सेवेत परत या..... सिस्टीम बदलावी लागणार आहे ‼️🇮🇳‼️
@@sambhajisavekar9850 😂😂😂
@@sambhajisavekar9850 त्या ऐवजी, त्यांच्या मागच्या यशस्वी यादी तील लोकांना भेटा, त्यांनी खरचं चाणक्य मध्ये शिक्षण घेतले का कळेल..... 😂😂
राज्यस्य मूलम् इंद्रियनिग्रहः !
फारच अर्थपूर्ण सनातन सत्य सांगितले आहे…
या बाबींचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या त्या लोहचारित्र्याच्या लोकसेवकांना प्रणाम !
अशा लोकांचे प्रमाण वाढो ही सदिच्छा! अन्यथा सर्वपक्षीय अनेक मुजोर नेत्यांनी भारताची वाताहत जी करायची ती करून ठेवली आहेच! काही अपवाद जे आहेत त्यांचे हात देव बळकट करो!
पुजा हे हिमनगाचे टोक असू शकते परंतु पुजा चे प्रकरण घडले म्हणून त्याविषयी चर्चा आहे परंतु कालच जी चर्चा टीव्ही वर हहोटी राधेश्याम मोपळवर यांच्या बाबत काय
या साठी जनतेने योग्य लोकप्रतिनिधींची निवड केली पाहिजे , भ्रष्टाचारी लुच्चे लफ्फंगे लाचार दळभद्री दलबदलू अशांना खडी फोडायला पाठवले पाहीजे. नवीन लोकप्रतिनिधी निवडताना जनतेने डोक ठिकाणावर ठेवून निवडावा.
एखाद्या गरीबाची झोपडी, हातगाडी तोडायला पोलिस तत्पर असतात... भारतात न्याय विकत मिळतो हे अलीकडच्या घटनांनी सिद्ध झालं आहे...ते दिवस दूर नाही जेव्हा गरीब लोक आपला अधिकार हिसकावून घेतील..
Avinash धर्माधिकारी साहेब खरंच छान विचार सडेतोड उत्तरे दिलीत You are great sir
सरकारी कर्मचारी जनतेचे सेवक नाही मालक बनले आहेत.
भारतातील राज्य व केंद्रीय कमिशन सर्विस मध्ये सिलेक्शन झालेल्या सर्व कॅंडिडेट्स ला अग्निवीर मध्ये चार वर्षे ट्रेनिंग दिल्यानंतर इतर राज्यामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी पाठवावे
अहो 99%अप्रामाणिक नसून 99% अप्रामाणिक आहेत हे सत्य आहे. आता लोकांचा प्रशासनावरून विश्वास उडत चालाय हे सत्य आहे 🤝
श्री. अविनाश धर्माधिकारी sir IAS अधीकारी होते ना?त्यांनी बहुतेक राजीनामा दिला.
पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. पण भाजपाने त्यांना तिकीट देण्याऐवजी बाहेरून आलेल्या कलमाडींना तिकीट दिले. या कलमाडींनी वाजपेयींच्या विरोधात मत दिले. वाजपेयींचे सरकार पडण्यामधे जी कारणे दिली जातात त्यात हेही मुख्य कारण आहे. पण ते कोणी सांगत नाही. जयललीतांचा प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता कोणी मांडत नाही.
खरच आहे🇮🇳जे अधिकारी यात लिप्त आहे त्यांच्या वर कारवाई होने आवश्यक आहे🇮🇳🚩🙏🇮🇳
शिकाऊ कलेक्टर ची अशी वर्तणूक हे जनतेचा सेवक
लोकसेवा करायची उलट कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या वर आरोप करण किती घाणेरडा प्रकार आहे
जर नव्वद टक्के अधिकारी प्रामाणिक नाहीत,तर त्यांनी बनलेल्या प्रणालीला चालवणारे आणि त्यावरच अवलंबून असणारे राजकारणी किती प्रामाणिक असतील?विचार केला तर भीती वाटते!
ते आमचे नोकर आहेत हे त्यांच्या nameplate वर लिहिले पाहिजे
ias,ips अधिकारी हे आज ही स्वतःला इंग्रज समजतात..ते सामन्याला जुमानत नाहीत.
80% आधिकारीअपरामाणिक आसतात महणुन तर पुढारयाचे पोट भरतात
भारत अजूनही देश म्हणून अस्तित्वात आहे हेच आश्चर्य वाटत.
सुकथनकरांचे रिबेरो टी एन शेषन असे अधिकारी आता दुर्मिळ झालेले आहेत.
धर्माधिकारी सर फॅक्टवर कमी आणि अध्यात्मिक नैतिक उपदेश ढीगभर करतात.मुद्दा सोडून बाकीचं सगळं बोलतात.शब्दबंबाळ प्रवचन..!
नावातच सगळ आल् तुझ्या.. गब्बर सिंग कडून नैतिकता आणि अध्यात्मिक विचार, याची काय अपेक्षा ठेवावी.. मूर्ख माणूस.. अरे UPSC मध्येच ethics चां पेपर आहे. त्याबाबत बोलताय सर..
पुरोगामी महाराष्ट्र राज्यात त्यांची जात आडवी येते भाऊ..सगळ बोलता येत नाही!
गब्बरसिंग मराठी कधी लिहायला लागला ? 😅
90/नाही तर 99.99/ अधिकारी भ्रष्ट आहेत.😢
नेहमी प्रमाणे चौकशी करणारे देखील असेच भ्रष्ट अधिकार असणार हे उघड आहे. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी ऐवजी त्याची मस्त थंडगार लस्सी मात्र होईल.
तपास करणारे अधिकारी अजून जास्त पैसे घेतील पूजा खेडकर करून
एकदम उत्तम व्यक्तीची मुलाखत. वेळोवेळी सरांचा अजून मुलाखत, बाईट्स घ्या @एनडीटीव्ही
नीट चे परीक्षार्थींना किती पैसा 💸 मोजावे लागतात ह्याचा छडा लावण्यात आला नाही तर
हे पूजा खेडेकर प्रकरण,काही दिवस चर्चा
परत सगळे शांत
हिंदूस्थान ला जगातील सर्वात मोठी शक्ती बनविण्यासाठी हे असे प्रकार नकोत 😢 अपराध्याला कडक शासन
होईल का नाही साशंकता आहे 😢😢
व्वा व्वा! काय जोक आहे, pramotee अधिकारी आणि direct recruit अधिकारी यांना समान वागणूक आणि अधिकार आहेत. जरा customs, GST, Police खात्यात जाऊन बघा, खरी परिस्थिती कळेल. धर्माधिकारी साहेब सनदी अधिकारी असल्यामुळे खूप उंचीवर बसत असावेत त्यामुळे जमिनीवर नेमके काय चालते याचा अंदाज नाही.😂
तुम्ही शिकवा आता त्यांना 😂😂😂😂 काय लोक आहेत एक एक😂😂😂
युपी एस सी सक्षम अधिकार्याचा परफारमन्स तपासुनच बढती दिले जावे,
आपल्यासारखे समजूतदार IAS असतील तर politicians पण देशाचं काही वाकड करू शकत नाही
युपीएससी चे मोठेपण टिकवणे असेल तर पुजा खेडकर हिस बडतर्फ केलेच पाहीजे.
फार कमी अधिकारी तुकाराम मुंडे सारखे मिळतील. त्यांना शासन काम करू देत नाही त्यांना कुठेच काम करू देत नाही. जनतेच दुर्दैव
90% समाज अप्रामाणिक आहे
आयपीएस तुकाराम मुंडे सारखा इमानदार अधिकारी एक महिन्यामध्ये त्याची बदली होते कुठे जाऊ द्या आणि जो भ्रष्टाचारी आहे त्यांची पूर्ण पाच वर्षे जातात
IAS la पर्याय उभा करण्यासाठी अभ्यास होणे आवश्यक आहे.
आयएएस म्हणजे I am Supreme हा attitude samapla पाहिजे
बरोबर सर
खाजगीकरण योग्य पर्याय आहे यासाठी
सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना भ्रष्ट अधिकारी खूप प्रमाणात त्रास देतात प्रामाणिक पणे नोकरी करने फार अवघड आहे
अभिनंदन राहुल कुलकर्णी आणि आमचे आदर्श शिक्षक अविनाश धर्माधिकारी सर एक अफलातून प्रशासकीय अधिकारी❤
महाराष्ट्राचा बिहार झाला . असं म्हणायचं का ?
UPSC वरील श्री धर्माधिकारी सर यांचा अंध विश्वास आहे ती सुधारण्यासाठी व जबाबदार अधिकारी यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करायला हवे खोटे डोळ्याचा अपंगत्व असलेल्या उमेदवाराला पेपर लिहायला मदतनीस दिला जातो तो जर प्राध्यापक असू शकतो त्याचा शहनिषा करण्याची जबाबदारी UPSC ची नाही का ?
अविनाश धर्माधिकारी म्हणजे प्रशासकीय संतच म्हणावे फारच समजदारीचे विचार ऐकायला मिळाले
धन्यवाद
Jaun ya chanakya mandal la ... Kalel
Lol 😂😂
सुंदर विश्लेषण श्री धर्माधिकारी साहेब
खुप छान मुलाकत घेतली प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही मार्गदर्शन करणारे आहेत याचा सर्वांनी बोध घेणे ची गरजेचे आहे
युपीएससी आणि एमपीएससी परिक्षा देणारे विद्यार्थी अधिकारी बनण्यासाठी (लोकांवर राज्य करण्यासाठी आणि आपल्या हाताखाली 10 -12 नोकर कर्मचारी असणार )असे विचार करूनच ते परिक्षा देत असतात
त्यांनी जनतेची सेवा करायची अशी भावना ठेऊन परिक्षा देण्यासाठी क्लासेस नी सांगावेत
सर कृपया यावर विचार व्हावा
Anti corruption Department + माहितीचा अधिकार ( RTI ) + शिक्षा या दोन्ही खात्याने इमानदारीने काम केल ना....सर्व सरळ होतील....
Pooja मुळे हे चव्हाट्यावर आले आहे, तिला धन्यवाद , अविनाश जी खूप चांगली सजेशनस दिले आहे भारतीय प्रशासकीय सेवे च्या भविष्या करीता , कलेक्टर च काय सर्व अधिकारी कसे वागले पाहिजे ह्यासाठी सक्त आचार संहिता झाली पाहिजे
99% बेईमान फिर भी मेरा भारत महान.
या विषयावर माजी IAS अधिकारी माननीय महेश झगडे सर यांची मुलाखत घेण्यात यावी.
लोकांना असलेले अधिकार माहितच नाहीत . सरकारी यंत्रणा लोकांना फक्त जबाबदारी सांगते .😮
सरांचा तो भाबडेपणा नाही पत्रकार महोदय ...., संस्कृती नीतिमत्ता हा भारताचा कणा आहे, तुमच्यासारख्या लोकांना बोथट झाल्यात गोष्टी... महानता आहे ती, आदर्शवाद म्हणजे जीवनात वापरायचा नसतो का साहेब
ह्या बाईला मेडिकलला प्रवेश कसा मिळाला त्याचाही शोध घेतला जावा,
त्याचबरोबर ही बाई जर दृष्टीने अधू
असेल तर ती सर्जरी कशी पास झाली तेही तपासणे योग्य ठरेल.
धर्माधिकारी साहेब माहिती अधिकारात दिलेल्या तक्रारीलाही 4 महिने झाले तरी उत्तर मिळत नाही इतके सरकारी अधिकारी निरढावलेले आहेत
पूर्वीपासूनच इतकी सर्व माहिती असताना देखील आपण गप्प का बसला
चौकशी अधिकारी म्हणून श्री.तुकाराम मुंडे सरांची नियुक्ती करायला पाहिजे.
सुंदर चर्चा ऐकून खूप छान वाटले आभार
I am at Sindhudurg currently. facing problems in land matters because of previous corrupt officers.. at lower level...
फार दिवस झाले तुम्हाला ऐकल न्हवत राहुलजी, दोघांचेही आभार
सरकारी अधिकाऱ्यांचे पेन्शन बंद करून टाका, TA DA बंद करून टाका, कोण कुत्र पण upsc mpsc कड जाणार नाही
99%राजकारणी90%अधिकारी कर्मचारी जर भ्रष्ट आहेत तर देश राष्ट्र कशे चालेल
हेच आहे ,सबका साथ हमारा विकास 😢😢😢
माहिती चा अधिकार आहे पण किती अधिकाऱ्यांना या कायद्यानुसार शिक्षा झाल्यात
सध्या माहितीच्या अधिकाराचा वापर ही कोणाला तरी त्रास देण्यासाठीच, केला जातो. त्याचा मूळ उद्देशच लोक विसरतात.