Apan sarvanach uttere det rahilat tar apan chakraun jaun wed lagaychi pali yeil tika karnare khup ahet ani utter denara ekach ahe mhanu jithe awashyak asel ani marmik asel tithech utter dilele bare ani social media war aslyamule kahi khodkar kinwa ardhwat dnyni lokakade durlaksh kelele bare social media war saglech vidwan vysangi prakand pandit ahet asehi nahi ekhanda paugandawsthetla mulgahi kahitari uthal bhadak coment karun jato tyala wyathit hou naye apan khup changle ani aithihasik tathya sarvasamor thewat ahat ani abhyapurn mahiti ahe he sarwana kalte pan kahi lok wakdyat sirlyashivay satisfied hot nahit
@@KimantuLiveMaratha is not caste but its clan of caste or group of caste. In which 96 kuli means caste included. So all of the devgiri yadav is connected with heyeya yadav ishversen abhira. One main thing you have to notice that all jadhav is not yadav because its also group of 4 caste so. We dont say all of the jadhav is connected to devgiri yadav. Jadhav is the onle sirname otherwise nothing else.
@@Parth_AbhimanyuAll Jadhav in Maratha caste is basically Yadav, all of them may not be in the line of devgiri Yadav but they all are Yadav Yaduvanshi and are descendents Yaduvanshi raja or of raja Yayati raja Pururava
आमचा आडनाव यादव आहे आमचे पूर्वज देवगिरी येथे होते पुन्हा आमचे पुनर्वसन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सातारा येथे झाले आमचं आडनाव यादव आहे आणि आम्ही मराठा आहोत जय शिवाजी जय भवानी 🚩🚩
मी गवळी आहे पण हे फक्त महाराष्ट्रामध्ये म्हणतान नहितर पूर्ण भारतामध्ये व अन्य देशानमध्ये जसे नेपाल इत्यादी मध्ये यादव असे ओळखले जाते व आपल्या भारतात सुद्धा प्रलेक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने यादवाना पुकारले जाते पण आमच्या महाराष्ट्रातील गवळी समाजाची मुंबई नायगाव इथे पूर्ण महाराष्ट्रातील गवळी / यादव समाजाची “ महाराष्ट्रीयन यादव चॅरिट्री " आहे. हा आणि आम्ही चंद्रवंशी क्षत्रिय यदुवंशी आहोत आणि यादव समाज हा खूप मोठा समाज विखुरलेला आहे. यंदु चे वंशज आहोत आम्ही सर्वे आणि महाराष्ठामध्ये यादव हे देवगिरी मध्ये आले व त्यानी आपले साम्राज्य स्थापन केले व छत्रपती शिवाजी महाराज्याची आई या यादव घराण्यातील होता की ज्या माझ्या मते मला नाव नीट ठावूक नाही लखनौजी यादव याच्या सुकन्या होत्या पण मला असे वाटते की त्या यादव आडनावाच आता महाराष्ट्रमध्ये जाधव झाले आहे. हा आणि आम्हला राव साहब ही पदवी बहाल झालेली आहे, की जे आता हरियाणातील यादव त्याच्या नावापुढे राव साहब वापरतात हा आणि यादव / महाराष्ट्रमध्ये गवळी याचा धनगर वैगरे जातीशी । बिनकुल सुद्धा काही संबद्ध नाही नाही नाही आम्ही क्षत्रिय होतो आहोत आणि राहणार पण फरक झकाच की आम्ही गाडिच्या माघे क्षत्रिय नाव लावून फिरत नाही स्वतःला म्हणत सुद्धा नाही कारण क्षत्रिय कोण आहे ते l दिखावा करून नाही तर मैदानामध्ये जनतेच्या संरक्षणासाठी युद्ध करून समजते व प्राप्त होते. आणि मला माहिती असल्याप्रमाणे व माझ्या माहितीप्रमाणे मराठा हे पहिले कुणबी होते व अजूनसुद्धा कदाचित विदर्भामध्ये कुणबी मराठा असं काही तरी आहे चंद्रवशी क्षत्रिय यंदुवशी यादव / गवळी जय श्री राधाकृष्ण जय श्री बलरामजी की जय यादव जय माधव धन्यवाद!
चांगली माहिती दिलीत साहेब. आपल्या मुंबईमधल्या 'महाराष्ट्रीयन यादव चॅरिटी' संस्थेला भेट देऊन मला आपल्याकडून अधिक माहिती घ्यायला आवडेल. कदाचित महिकावतीच्या बखरीत उल्लेख केलेल्या प्रतिबिंब यादव राजांशी आपला संबंध असू शकेल. या विषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील आपण सर्व यादव मंडळींची काही भेट आयोजित करता आली तर कृपया कळवावे ही विनंती.
@@KimantuLive हो नक्की तिथे UP चे यादव सुद्ध्य आपल्याला कधी कधी भेटतात. हा आणि मला साहेब नका म्हणून कारण मी तुमच्या पेक्षा काही मोठा नाही मी एक विद्यार्थी असून आता First Year ला आहे.😊😊 मला तुमचे विचार खूप आवडले आपण मराठा आहात की यादव आपल्याला नामदेवराव जाधव माहित असतील बहुतेक व्यवसायाशी संबंधिती व्यक्ता आहेत ते त्यांना सुद्धा देवगिरीच्या यादवानबदल थोडी माहित आहेत. चंद्रवंशी क्षत्रिय यदुवंशी यादव जय यादव जय माधव धन्यवाद साहेब !
गोल्ला,ग्वाल, गवळी,यादव, गोलकर, इत्यादी नावाच्या जातीने यादव महाराष्ट्र मध्ये आणि अंद्रपदेश मध्ये ओळखल जाते.हे सर्व कृष्ण वंशीय आहेत . मी पण यादव आहे. आंध्रप्रदेश मध्ये तर सर्व गोला आणि गवळी लोकांना यादव च म्हणले जाते.
मराठा एक ग्रुप है जबकि यादव एक वंश है जो दुनिया के हर देश में रहते है यदु एक श्रृंग वेद के आर्यन है उनके वंशजों को यादव कहा गया है ये एक अलग पहचान रखते है अब आज कल हिंदू लोग वेद माता गायत्री भवानी श्री कृष्ण वासुदेव यादव इत्यादि का पूजा करते है और खुद को उनसे जोड़ने के लिए तरह तरह के उदाहरण देते है जबकि ये उनकी मूर्खता है अभीर एक आदिम जाति नस्ल है इसका एक अलग पहचान है इथोपिया अफ्रीका में इसको अफर यूरेशिया में अबीर टर्की में अवर यूरोप में आयरिश चीन में शू कहा जाता है जबकि मराठा एक ग्रुप है सैकड़ों जातियां शामिल है उसमे बहुत यादवों से ही होगे मगर यदुवंशी यानि अभिर ट्राइब का एक अलग कानून होता है ये अगर राजा बनते है तो उनको समाज से बाहर कर दिया जाता है इसका कारण श्रीकृष्ण ने कहा था कोई यादव किंग नही बन सकता 👇👇 एवमाश्वास्य पितरौ भगवान् देवकी सुत:। मातामहं तु उग्रसेनयदूनाम् अकरोतन्नृपम्।१२ आह चास्मान् महाराज प्रज्ञाश्चाज्ञप्तुमर्हसि । ययाति शापाद् यदुभिर्नासितव्यं नृपासने ।।१३ श्रीमद्भागवत पुराण दशम् स्कन्ध ४५ वाँ अध्याय यही कारण है कोई भी यादव राजा नही बना आज तक हालाकि ये मिथक है इसका कारण विज्ञान है मगर कोई भी यादव राजा बनते समय अपने वंश का त्याग कर देता है और एक नया उपाधि धारण करता है सबसे बड़ा उदाहरण तो नेपाल ही है भक्तमान अहिर नेपाल ही बसाया मगर उसने गुप्त उपाधि धारण किया मैसूर वदलियार उपाधि धारण किया विजयनगर साम्राज्य राय उपाधि धारण किया हरियाणा राव उपाधी धारण किया हा इतिहासकार उनको यादव राजा ही कहते है मगर धार्मिक और अभिरा ट्राइब के अनुसार उनको यादव नही कह सकते उनको मराठा ही माना जाता है अब बहुत लोग कहते है शिवाजी महाराज की माता यादव थी उनके विवाह भोषले से हुआ था अब सवाल ऐसा हुआ तो शिवाजी महाराज तो जैविक रूप से यादव हुवे क्यों की वेद के अनुसार यादव आर्यन है और हेल्पोग्रूप डीएनए टेस्ट के अनुसार अहीर में 65%आर1ए1 जीन है जबकि मराठा और राजपूत में मात्र 30%ही है अब संतान में तो माता पिता दोनो का जीन बराबर जायेगा ना तो शिवाजी में माता के जीन 32.5% और पिता के जीन 15%ही हुआ जैविक रूप से तो यादव ही हुवे सायद यही कारण लोग शिवाजी की पहचान राजमाता जीजा से लोग करते है उनके पिता को बहुत कम लोग जानते है जीजाबाई ने शिवाजी को योद्धा बनाया और मराठा शामराज्य स्थापित किया शिवाजी महाराज मराठा ही माने जाते है यादव तो कानून के धार्मिक ग्रंथ के अनुसार राजा बनेगा ही नही वैसे भी ब्राह्मण कहते है ब्रह्मा से सब पैदा है तो भाई ब्रह्मा की पत्नी अहीर कन्या वेदमाता गायत्री थी तो सारी दुनिया अहीर से पैदा हुआ ना दूसरा जगत जननी दुर्गा है तो मराठा भी जगत जननी दुर्गा भवानी से पैदा हुआ है तो दुर्गा तो अहीर कन्या ही है ना भाई अहीर एक आदिम जाति नस्ल है ये तो पंडित हजारी प्रसाद द्विवेदी ने अशोक के फूल में लिख दिया है अब भारत में उनसे बड़ा शोधकर्ता जाति का थोड़े है कोइ
@@balajiyadav6650 brother up Bihar haryana mp have yaduvanshi Ahir rajpoot oo ke kahne bhadko nahi gopal rajvansh of Nepal was also Ahir king brother 👍👍🥰🥰⚔️⚔️
@@balajiyadav6650 😂😂😂aheer chandravanshi Kshatriya and synonyms to Yadav's. The Yadav's of Maharashtra migrated from mathura so basically they are same as north
मराठा cast ..सिख/ लिंगायत यांच्या प्रमाणेच तयार झाली आहे.(म्हणून मराठा लोकांच्या रंग रुपात विविधता आढळते).बहिमन empire च्या काळात. महाराष्ट्रातील अनेक cast चे लोक जे 5 श्याह्या च्या सैन्यात होते त्यांना मराठा महणण्यात येऊ लागले .नंतर कालांतराने मराठा cast तयार झाली....🙏🔥🇮🇳😷
साहेब! इथेच सगळ्यांचा गैरसमज होतो आहे. यादव हे कुळ आहे. जात नाही. मराठा ही जात आहे. कुळ नाही. एका जातीत अनेक कुळातले लोक असू शकतात आणि एका कुळातले लोक देखिल अनेक जातीत असू शकतात. मराठा व इतरही अनेक जातीत अनेक कुळे सामावलेली दिसून येतात. तसेच यादव कुळ पण अनेक जातीत विभागलेले दिसून येते. या भारत देशात सर्वजण मिश्रवंशिय आहेत. हजारो वर्षांच्या इतिहासात इथे एवढी उलथापालथ झाली आहे की इथे कोणी असा दावा करू शकत नाही की मी कोणा एका शुद्ध वंशाचा किंवा विशुद्ध कुळाचा आहे. शुद्ध जातीचा असण्याचा तर बिलकूलच कोणी दावा करू शकत नाही. कारण सर्वच जाती अनेक कुळांनी आणि वंशानी मिळून बनलेल्या आहेत. त्यामुळे आपण सर्वच जणांनी आता शहाणे होण्याची गरज आहे. हे वंश, कुळ आणि जातीपातीतून बाहेर पडून बंधूभावाने राहण्याची गरज आहे. भारतीय हाच एक आपला वंश, हेच एक आपले कूळ, भारतीय हीच आपली जात, धर्म आणि एकमेव खरी ओळख आहे.
Me kshatriya Yadav (Ahir) Madhya Pradesh se hu or mere rishtedar aaj bhi Maharashtra ke Ourangabad , jalna , nanded , beed , nagpur , usmanabad , chandrapur , buldhana , Washim, akola , akot , Amravati, paratwada , me rahte hai or meri mummy bhi Maharashtra ke Amravati ( Achalpur ) se he or jaha yadav rajaon ke rajya huwa karte the to yadav log bhi wahi rahte chale gaye yaha tak ki Yadav samrat maharaja krishna dev ray ka samrajya Karnataka , Telangana , or odisa , Andra Pradesh waha tak tha to waha par bhi hamare rishtedar rahte he par aaj kal ke log to dusro ka itihas chura kar apna batane me lage he jada Marathi mere to samaj nhi aai par aapne sahi kaha yadav alag h Dhanyavad bhau aapka 🙏🚩🚩 Jay shri krishna Jay shivray 🦚🚩
I think you're confused between kshtriya yadav vansh and ahir/ gawli. Some decades back ahirs adopted this surname which didn't belongs to ahirs at all. No any yadav is connected to ahir, but there are some ahir kingdoms.
आम्ही सुर्यवंशी क्षत्रिय 96 कूळी चव्हाण - पाटील. आमची वंशावली ही सांभर राजस्थान ची आहे. आमचे पुर्वज सांभरीया चौहान होते. कूलदेवी शाकंभरी माता.(राजस्थान) (आम्ही राजपूतवंशी मराठा. शुध्द 96 कूळी)😎😎
तुम्हाला अजून अभ्यासाची गरज आहे.तुम्ही राजेनरेश जाधवराव यांच्याशी संपर्क साधा, संदर्भासह तुम्हाला योग्य माहिती मिळेल..यादव काळातील लेखावर जाधव उल्लेख असलेला संदर्भ त्यांच्याकडे आहे.. मराठा जातीच्या उल्लेखाचेही संदर्भ देतील ते
पहिला मुद्दा. सध्या मराठा कुळात असलेले जाधव यादवांचे वंशज नसावेत असे मी व्हिडिओमध्ये कुठेच म्हटलेले नाही. त्यामुळे तुम्ही जे संदर्भ देत आहात ते तपासून पाहण्याची काहीच गरज नाही. त्यांची गरज तेव्हा पडली असती, जेव्हा मी मराठा कुळातील जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज असू शकत नाहीत असे काही विधान केले असते. दुसरा मुद्दा. शिवछत्रपती हे एवढे विलक्षण व्यक्तिमत्व आहे की एक काय चार जन्म अभ्यास केला तरी अजून अभ्यासाची गरज पडेलच. जेवढा शक्य होईल तेवढा अभ्यास चालूच आहे. तरी पण आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद. तिसरा मुद्दा. राजे नरेश जाधवराव यांच्याशी बोलायला माझी काहीच हरकत नाही. चर्चेनेच ज्ञान वाढते. परंतु मी त्यांना ओळखत नाही. तुम्ही ओळखत असाल आणि ते बोलायला तयार असतील, तर कृपया त्यांची वेळ घेऊन मला कळवावे. माझा फोन नंबर व्हिडिओमध्ये आहेच.
आम्ही यादव देवगिरी चे सध्या साताऱ्यात आमचे गाव आहे माझे काका मला सांगत होते 6month's पूर्वी की आमच्या गावात शिवाजी महाराज चे घोड्यांचे तल होते आणि आमचा गाव चे यादव सुबेदार होते असे लिखित आहे असे मला सांगितले.
हो देवगिरीचे यादव क्षत्रिय-मराठाच आहेत कारण मी सुद्धा यादव कुळाचाच आहे आडनाव हे पदवी व गावानुसार बदलले परंतु वंशकुळ आहे ना यादवच आहे कारण कुळ गोत्र बदलता येत नाही देवगिरीचे यादव यांचे वंशज मी आहे माझ्याकडे मोडी लिपी मध्ये लिहिलेले जुने दस्तावेज आमच्या कुळाचा माहिती जतन केलेल्या हेळवी याच्याकडे आहे त्यामध्ये कुळ गोत्र कुळदेव कुळदेवी व इतर माहिती त्यांच्याकडे आहे
आपण म्हणताय ' मराठा हा शब्दच पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये अस्तित्वात आला आहे ' मराठा शब्दाचा उत्पत्तीचे ज्ञानेश्वरी मधल्या पुरावा मी आपल्यापुढे मांडतो माझा 'मराठाची' बोलू कौतुके । परी अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके मेळविन ॥ [ ज्ञानेश्वरी , अध्याय 6 ओवी क्र. 13 ] आपण आपण आपल्या व्हिडिओला आकर्षक शीर्षक देऊन आपले दर्शक वाढवण्यापेक्षा आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात. इतिहासाचा चांगला अभ्यास करावा आणि मगच लोकांसमोर यावे. असे अक्कल शुन्य ज्ञान पाजळण्यापेक्षा आपण इतिहासाचा सखोल अभ्यास करावा !
पहिली गोष्ट व्हिडिओ जर नीट ऐकला असता, तस सहज लक्षात आले असते की व्हिडिओमध्ये चर्चा मराठा शब्दाची उत्पत्ती केव्हा झाली याबद्दल चाललेली नसून मराठा ही संज्ञा महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकसमुहाला उद्देशून वापरायला सुरुवात केव्हा झाली व रूढ केव्हा झाली याबद्दल चाललेली आहे. तुम्ही जे ज्ञानेश्वरीतल्या श्लोकाचे वर उदाहरण दिलेले आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर चर्चा मराठा समाजाबद्दल करत नसून मराठी भाषेबद्दल करत आहेत. ज्ञानेश्वर वरील श्लोकात माझ्या मराठी भाषेची किती कौतुके सांगू? माझी मराठी भाषा अमृतालाही पैजेत जिंकणारी आहे असा मराठी भाषेचा महिमा वर्णन करत आहेत. मराठा समाजाबद्दल चर्चा करत नाही आहेत. त्यामुळे वरील श्लोकाचा या व्हिडिओच्या विषयाशी काही एक संबंध नाही. मालोजीराजे भोसले, लखुजीराजे जाधव यासारखे सरदार जेव्हा दख्खन सुलतानांची चाकरी करून नावारुपाला चढले, तेव्हा महाराष्ट्रातील समाजाची एक वेगळी अशी विशेष ओळख निर्माण होऊ लागली व आज आपण जो मराठा शब्द वापरतो. तो मराठा शब्द खऱ्या अर्थाने प्रचलित झाला व तो खासकरून सुलतानांच्या पदरी चाकरी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातल्या लोकांना उद्देशून रूढ झाला. त्याआधी मरहट्ट, महारथी, महाराष्ट्रिक, नाग अशी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांची ओळख होती. पण कोणी महाराष्ट्रात राहणाऱ्या समस्त जनसमुहाला निखालसपणे मराठा संबोधले नव्हते. तुम्हीच उगाच वडाची साल पिंपळाला लावून स्वत:ची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. दुसऱ्याची अक्कल काढल्याने आपली अक्कल वाढत नाही आणि विषयाशी काही एक संबंध नसणारे खोटे संदर्भ दिल्याने कोणी कोणाला पंडित पण म्हणत नाही. तुम्ही जो श्लोक उदाहरणासाठी देता आहात त्याचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला चांगला ठाऊक आहे आणि त्या श्लोकाचा व श्लोकाच्या विषयाचा या व्हिडिओच्या विषयाशी मी वर म्हटले तसा काही एक संबंध नाही. तेव्हा जरा टीका करताना किंवा ट्रोल करताना संदर्भ तरी नीट विचार करून विषयाशी संबंधित देत जा. कशाला उगाच हात दाखवून अवलक्षण करून घेऊन स्वत:ची पण इज्जत काढता आहात आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची पण वाट लावता आहात? तुमच्यासारख्याच अर्धवट पुस्तके वाचणाऱ्या, अर्धवट व्हिडिओ पाहणाऱ्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या अर्धवटांमुळे मराठ्यांच्या इतिहासाची आज वाट लागलेली आहे.
सभी यादव अहिर होते हैं भगवान श्री कृष्ण को अहीर की उपाधि मिली कालिया अहि यानी सर्प का दमन करने के बाद तथा बाद में कुछ यादव मराठा में शामिल हो गए कुछ राजपूत में और बहुत से जाट में
होय. यादव ही एक शूर ,लढाऊ जात आहे. ते मूलतः up आणि बिहार चे यादव जे की गोकुळ, मथुरा, वृंदावन ई. ठिकाणचे . ते स्थलांतरामुळे भारतात सर्वत्र पसरले आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या नावाने ओळखले जातात. महाराष्ट्र आणि अंद्रप्रदेश मध्ये गोल्ला,ग्वाला,गवळी,यादव, गोलकर, गोल्लेवार ई. नावाने ओळखला जात.
@@vaibhavgumalwad3548 Bhai inko itne praman dege yeh bhagte aye ge haryana Ahirwal up mp me royal yaduvanshi Ahir have great history and ancestry and marshal history brother apka number mil sakta hai brother baat karege 🥰🥰🙏🙏
सम्राट जयामध के पुत्र राजकुमार विध्रव के नाम से बिध्रभ क्षेत्र हैं।। राष्ट्रकूट सहित्की का वंश है।। यादव हैं। कदम्वा या कदम यादव हैं।। गायकवाड़ यादव हैं।। चालुक्य, ककातिया, होयसाला यादव हैं।। अभीरा ,जाधव,यादव हैं।। कल्याण, विरार, शेऊना,संगमनेर, भिल्लम, भिक्कम, अशीरगढ, साम्राज्य ऐ सभी यदुकलवंशम ही। हैं।। वैदिक क्षत्रिय हैं।।आज का 70% मराठा समाज यदुवंशी हैं।।और विशेष महत्व की बात ये हैं।।हमारे महाराष्ट्र मैं रहने वाले लोगों बडे उत्साहित होकर खानदेश बोलते है।। ये बिल्कुल गलत है।। दुवारिका से सूरत, नासिक, धुलिया, मालेगांव, देवगिरी से हेदराबाद तक इस क्षेत्र का नाम कन्हादेश था।। कृष्णा देश।।जगृत होने की आवश्यकता है।।बैमिसाल इतिहास हैं।।अभीरा, अहीर, यदुकुलवंशियो का।।जय श्री कृष्ण।।
अभीरा, अहीर, यदुकुलवंशियो का इतिहास बेमिसाल है, इसमे बिलकुल कोई दो राय नही है श्रीमान! और दो राय हो भी क्यो? जिस कुल की उत्पत्ती भगवान श्रीकृष्णजी से बतायी जाती है, उसका इतिहास तो बेमिसाल होना भी चाहिये। परंतु यह व्हिडिओ अभीरा, अहीर, यदुकुलवंशियो के इतिहास के बारे में नही है। यह व्हिडिओ आज के मराठा समाज में से कितने कुलों का डीएनए यादवों से मेल खाता होगा, इस बारे में है। आपने जो बात रखी, ७०% मराठा यादव है, उसमें भी सत्य का अंश कम ही है। आज की मराठा नस्ल बहोत सारे नस्लों के मिश्रण से बनी मिश्रित नस्ल है। इसमें ज्यादा से ज्यादा ८ से १०% ही यादव हो सकते है। परंतु मराठाओं का इतिहास इतना गौरवशाली है और शिवछत्रपती जैसा दुसरा कोई आदर्श राजा दुसरी किसी नस्ल में भारत देश में प्रकट नही हुआ, इसलिये आजकल बाकी के नस्लों के लोग शिवछत्रपती और मराठा नस्ल पे अपना हक जताना चाहते है। इसमे सिर्फ यादव ही नही, राजपुत, कन्नडिगा, आंध्र, गुज्जर और भी बहोत नस्ले है। सच्चाई तो यह है की इन सब नस्लों का थोडा थोडा अंश मराठों में है। इसलिये कोई अपने आप को मराठाओं से जोडना चाहे तो उसमें कुछ गलत नही होगा, परंतु हर किसी को यह बात माननी चाहिये की मराठा अपने आप में एक अलग ही नस्ल है, और शिवछत्रपती मराठा नस्ल के ही राजा है।
असीरगढ़ के यादव के बारे में कुछ जानकारी हो लिंक हो तो देने की कृपा करें क्योंकि आशा अहीर कोई गडरिया बताया गया है और उसका उल्लेख कहीं नहीं मिलता आपके पास कुछ हो तो देने की कृपा करें असीरगढ़ बुरहानपुर मध्य प्रदेश
@@KimantuLive दर वर्षी आमच्या घरी हेळवी येतो मोडी लिपीत लिहिलेले दस्तावेज त्यांच्याकडे आहेत ते वाचून दाखवतात त्यामध्ये कुळ गोत्र व इतर माहिती सुद्धा आहे
छान. त्या दस्तावेजात मिळणाऱ्या माहितीचे समर्थन करणारे काही ऐतिहासिक पुरावे अथवा संदर्भ मिळतात का ते शोधा. म्हणजे तुमचा दावा शास्त्रशुद्धरीत्या एकदम पक्का होऊन जाईल.
#कौन_थे_देवगिरि_के_यादव_क्षत्रिय_मराठा_या_अहिर....? _____________________________ आजकल देखा जा रहा हैं देवगिरि के यादवो को यूपी बिहार के अहिर अहिर घोषित कर रहे हैं। लेकिन देवगिरि के यादवो का युपी बिहार के अहीरो से कोई संबंध नहीं है। देवगिरि के यादव यदुवंशी क्षत्रिय मराठा थे। देवगिरी का यादव राजवंश #भगवान_श्रीकृष्ण_जी के सीधे वंशज थे। इसका प्रमाण हमें यादवो के शिलालेखों से मिलता है। #रामचंद्र_यादव के दरबार में #हिमाद्री_पंडित नाम के प्रधान थे। उन्होंने इसवी 1260 में #राजप्रशस्ति नामक ग्रंथ लिखा उसमे उन्होंने यादवो की पूरी वंशावली लिखी है। जिसके दो विभाग किए हैं। पहले विभाग में #श्रीमन्नारायण_ब्रह्मदेव_ऋषि_अत्री से लेकर भगवान श्रीकृष्ण जी तक की वंशावली दी गई है। और दूसरे विभाग में भगवान श्रीकृष्ण जी से लेकर देवगिरी के यादवो तक की वंशावली दी गई है। उस वंशावली में भी हिमाद्रि पंडित ने देवगिरि के यादवो को यदुवंशी क्षत्रिय मराठा ही कहा है। मथुरा से सारे यादव भगवान श्रीकृष्ण जी के साथ द्वारका आए और बाद में जब द्वारका समुंदर के पानी में डूब गई तब बचे हुए यादव महाराष्ट्र के नासिक में आए तब #दृढ़प्रहार_यादव ने नाशिक के #चंद्रादित्यपुर को राजधानी बनाया इन्ही दृढ़प्रहार को देवगिरि के यादवो का मूल पुरुष भी माना जाता है। चंद्रादित्यपुर को आज #चांदोर कहां जाता है। बाद में #सेऊनचंद्र_प्रथम ने इसवी 860 में राजधानी को चंद्रादित्यपुर से नासिक के #श्रीनगर में स्थानांतरित किया श्रीनगर को आज #सिन्नर कहा जाता है। राजा भिल्लमदेव पंचम ने 1185 में राजधानी को नासिक के श्रीनगर से #देवगिरी मे स्थानांतरित किया। जिसे आज दौलताबाद कहा जाता है जो कि महाराष्ट्र के संभाजीनगर (औरंगाबाद) जिले में स्थित है। #रामचंद्र_यादव के समय में देवगिरी पर विदेशी इस्लामिक आक्रांता अलाउद्दीन खिलजी का आक्रमण हुआ और उसने धोखे से रामचंद्र यादव को हरा दिया उस समय उनका भाई महादेव आधे से ज्यादा सेना लेकर दक्षिण दिग्विजय करने गया था इसका ही फायदा अलाउद्दीन खिलजी ने उठाया और धोखे से देवगिरी पर कब्जा कर लिया। बाद में बचे हुए यादवो को देवगिरी छोड़कर भागना पड़ा और वह सब महाराष्ट्र के विदर्भ प्रांत में आज के बुलढाणा जिले में जाकर बस गए वहां पर उनका अपभ्रंश यादव से जाधव हुआ। रामचंद्र यादव के पुत्र शंकरदेव - गोविंददेव - ठाकुरजी - भूकनदेव - भूतजी - अचलोजी विठ्ठलदेव - लखुजीराजे जाधव (1550) जो की छत्रपति शिवाजी महाराज जी की माता #जीजामाता के पिताजी थे। #लखुजीराजे जाधवराव यह देवगिरि के यादवो के सीधे वंशज थे। देवगिरि के यादव यदुवंशी क्षत्रिय मराठा थे उनकी राज्य भाषा मराठी थी उनके शिलालेख में वह खुद को यदुवंशी क्षत्रिय मराठा कहते हैं। राजप्रशस्ती में भी हेमाद्रि पंडित ने देवगिरि के यादवो को यदुवंशी क्षत्रिय मराठा ही कहा है।
आपके अभिप्राय के लिये धन्यवाद श्रीमान. आपने आपके अभिप्राय में बहुत ही ज्ञानपूर्ण और सोच को बढावा देनेवाली बाते कही है। पर में आपसे विनम्रतापुर्वक निवेदन करना चाहता हू की आपने जो विचार और तथ्य रखे है, वो इस व्हिडिओ के विषय से मेल नही खाते. आप जो बाते कह रहे है वो अपने आप में ही एक चर्चा और बहस का स्वतंत्र विषय है। इस के उपर बात करनी होगी तो एक व्हिडिओ अलग से बनानी पडेगी। आप से बिनती है की आप इस विषय में अपना ज्ञान बढाते रहिये और समस्त तथ्यों को उजागर कर के एक व्हिडिओ बना कर जनता के सामने पेश किजिये। हाल-फिलहाल में दुसरे शोधकार्य में व्यस्त हू। चाह कर भी आप ने उपस्थित किये हुये विषय पे अभी कुछ खोजबिन या फिर अभ्यास नही कर सकता। इसलिये अभी के लिये में आप का क्षमाप्रार्थी हू।
श्रीमान जी नमस्कार आपने जो जानकारी दि बहुत ही शानदार है असीरगढ़ बुरहानपुर मध्य प्रदेश में स्थित है उसमें आशा अहीर का जिक्र आता है फरिश्ता कहता है कि आशा अहीर वहां पर एक गडरिया के रूप में थे और उनके कब्जे में असीरगढ़ था उसके बारे में कुछ जानकारी आपके पास में है क्या हे तो देने की कृपा करें धन्यवाद
Bhai साहब सारे yadav और सारे अहिर ek hi hai भले वह kahi ke भी ho sirf उनकी भाषा कि बदलावं hua hai kyu कि koi bhi कास्ट ho vah sare desh me ghume थे और vahi पे रेहने लगे और rahi bat यादवो ki ye श्री कृष्णा जी ke sath pure desh me yadav ko फैला diya था और दिमाग me dal lo ki sare yadav और अहिर ek hi hai अहिर ek पदवी hai jaat nahi संस्कृत se अभिर ka जाके बादमे अहिर हुआ
108 कुळी क्षत्रिय धनगर समाज कोकणात असणारे क्षत्रिय भंडारी तसेच कित्ते भंडारी सोमवंशी क्षत्रिय वान माळी ज्या मध्ये भाई ठाकूर फेमस नाव बरेच आहेत दुसरे ही जवळ पास बऱ्याच जातीत क्षत्रिय पोट जाती आहेत महाराष्ट्र ही भूमी क्षत्रिय ओळखली जाते तसेच किनार पट्टी वर सूर्यवंशी क्षत्रिय सोन कोळी तसेच वनमाळी स माजातील राजे ही होते तसेच पैठणचे शालिवाहन राजे हे कुंभार समाजाचे होते तिथे ते शोभा यात्रा ही काढतात त्यांच्या बद्दल काही खरी खोटी माहिती मिळत नाही जव्हार तालुक्यातील राजे हे मुकणे आदिवासी महादेव कोळी राजे आहेत आज ही आहेत त्यांचे वंशज. यादव.राजे क्षत्रिय गवळी समाजाचे होते यात किती तथ्य आहे प्रत्येक जातीत लिंगायत आणि क्षत्रिय आणि 5ते7 पोट जाती आहेत महाराष्ट्र राज्य किंवा पूर्ण भारत हा मिश्र वंशी आहे हे तर त्रिवार सत्य आहे.
सातवाहन स्वतःस ब्राह्मण म्हणवतात मग ते कुंभार कधी झाले? आजकाल सगळ्यांनाच क्षत्रिय बनायचं आहे😂धनगर, माळी,कोळी क्षत्रिय आहेत मग उरलाच कोण. थापा पचतील अशाच माराव्या या लोकांनी.
७व्या शतकात चीनचा प्रवासी युआनत्संग भारतात आला होता.त्याने केलेल्या वर्णनात मरहट्टा शब्द आढळतो. त्याने येथील लोकांचे वर्णन केले आहे कि कणखर व रंगाने सावळे होते.ते दिहल्ले ,घेतहल्ले असे शब्द वापरतात.बाराव्या शतकात चक्रधर स्वामी,म्हाइंभट , ज्ञानेश्वर यांनी मराठीचे कौतुक केले आहे, ज्ञानेश्वरी लिहिली आहे.
देवगीरीचे यादव हे श्रीकृष्णाचे वंशज मानले जातात यांना यादव कींवा जाधव म्हटले जाते आणि यांची कुलस्वामिनी श्री विंध्यवासिनी कींवा योगमाया ही मानली जाते गुजरात मधील यादव/जाधव हे हरसिद्धी देवीसिंह आपली कुळदेवी मानतात असे बऱ्याच यादव/जाधवां कडुन ऐकायला मिळते
एवमाश्वास्य पितरौ भगवान् देवकी सुत:। मातामहं तु उग्रसेनयदूनाम् अकरोतन्नृपम्।१२ आह चास्मान् महाराज प्रज्ञाश्चाज्ञप्तुमर्हसि । ययाति शापाद् यदुभिर्नासितव्यं नृपासने ।।१३ श्रीमद्भागवत पुराण दशम् स्कन्ध ४५ वाँ अध्याय कोई भी यादव जो राजा बनता है उसको यादव समाज अपने समाज से बाहर कर देता है श्रीकृष्ण को जब लोग कंस के मरने के बाद राजा बनाना चाहते थे तो श्रीकृष्ण ने यही कहा था जाओ एक बार द्वारका वहा पूछो कितने गज का ध्वज होता है और हर कुछ घंटे में धवज क्यों बदला जाता है यादव राजा नही बनता कभी गणतांत्रिक शासन करते है।
मराठवाड्यामध्ये जे पूर्वी यादव होते ते आत्ताचे जाधव आहेत जावळीचे मोरे हे पूर्वी मौर्य वंशाचे आहेत भोसले घराणे राजस्थानमधील सिसोदिया वंशाचे आहेत यावर आपण सविस्तर माहिती सांगावी
तुमचा अभ्यास आणि विद्वत्ता दोन्ही चांगले आहे....तुमचा विडिओ समजण्यासाठी..... इ.स.पु १५०० पासुन आता पर्यंत चा इतिहास , तसेच वेगवेगळ्या राजवटी आणि आक्रमणे , माहित असणे गरजेचे......समाजशास्त्र , मानववंशशास्त्र थोडी फार माहिती पण आवश्यक .....आपलया सांगणयातील काही गोष्टी जर व्यवस्थित समजुन घेतलया .....तर समस्त भारतीय लोकांसाठी तो एक चांगला धडा असेल......काही प्रशनांची उत्तरे पण यात मिळतात....धन्यवाद....
मुळात देवगिरीच्या यादवांची भाषा मराठीच होती आणि बाहेरील प्रांतातील लोक मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांनाच मराठा म्हणत असत. एवढी सरळ गोष्ट आहे तिच्यावर एवढा research करण्याची आणि या गोष्टीचा एवढा उहापोह करण्याची गरजच नाही 😀. मराठी लोकांनी जातीवाद सोडून भाषेला महत्त्व द्यावे. जे आपली भाषा बोलतात ते सगळेच आपले आहेत कारण ते महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. युरोपियन लोकांनी native American लोकांना संपवून अमेरिका बळकावली तसे हाल महाराष्ट्राचे व्हायला नकोत बास एवढेच.
प्रस्तुत व्हिडिओमध्ये देवगिरीच्या यादवांची भाषा मराठी होती का नाही? याबद्दल चर्चा चाललेली नसून, शुद्ध स्वरूपात व आजच्या शुद्ध मराठी भाषेत आपण जो हा एक 'मराठा' शब्द वापरतो, तो महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकसमुहाला कधीपासून वापरला जाऊ लागला? एत्तदेशीय व परकिय लिखाणात व व्यवहारात केव्हापासून रूढ झाला? याची चर्चा चाललेली आहे. यादवकालीन मराठी भाषा हा एक वेगळा स्वतंत्र पीएचडीचा विषय होऊ शकतो. त्यामुळे त्यावर चर्चा करायची असेल तर एक वेगळा व्हिडिओ बनवायला लागेल. राहता राहिला महाराष्ट्राच्या भुमीपुत्रांना बाजूला सारून महाराष्ट्र बळकावण्याचा, तर त्याला अनेक गंभीर गोष्टी कारणीभूत आहेत. आपले शिवछत्रपतींच्या विचारांचे अनुयायी व्हायचे सोडून पुतळ्यांचे आणि सोहळ्यांचे गुलाम होणे, हे ही एक महाराष्ट्राचे आणि इथल्या भुमीपुत्रांच्या अध:पतनाचे महत्वाचे कारण मानता येऊ शकेल. नाही का?
कदंब राजवंशाची स्थापना व मूळ आजच्या कर्नाटकात आहे हे सत्य आहे. बाकी महादेव कोळी व कदम याविषयी आपण जे बोलता आहात, ते मोघमपणे मान्य करायला काहीच हरकत नाही. पण काही वंशावळ्या, गोत्र, देवक व इतर कागदपत्रे अभ्यासासाठी कोणा कुटुंबाकडे उपल्ब्ध झाली, तर मग खात्रीने त्यांचा संबंध कदंब राजवंशाशी जोडता येऊ शकेल.
Its true Yadava used Kannada Langugage in the begining of their period. But later it changed to Marathi and Marathi become prominent languge of Yadavas for later generations. So Its not important what any dynesty at the start. Important is what was it become in at the end.
Simplification Kshatriya living down the Narmada river speaking marathi language were Maratha and 96 kuls are 96 kshtriya dynasties of Bharat together form 96 kul of Maratha Edit :- extra info Sisodiya become sisode Chalukya became Chalke, Marne, sarkale etc Solanki become salunkhe ,solankhe From shinde it became shindiya in north Patil become patel We are one all hindus from the world and from great Himalayas to great hindmahasagar from gandhar to bangal from burma to Gujarat🔥 Jay shree ram Jay hindurashtra Jay Akhand bharat 🔥 Jay Shivrai
मि पण मराठा आहे माझे आडणाव कोरडे आहे आसईच्या युद्घात द्वत्तीय मराठा आग्ल या च्यामध्ये माझे पुर्वज होते त्या युद्धानंतर आमचे आडणाव कोरडे पडले त्याच्या अगोदर माझे आडनाव सुर्यवंशी होते आणी ते राज्यस्थान मधून येथे व्यापार काण्यासाठी आले होते ही माहिती आमच्या पुर्वीच्या भटाकडे लिवलेली आहे
फक्त एक नोंद असेल तर विश्वसनीय मानता येणार नाही. पण भटाकडे तुमच्या पुर्वजांची वंशावळी व नावे असतील तर दखल घेता येईल. ही वंशावळी व गोत्र, देवक वगैरे इतर गोष्टी इतर मानक कागदपत्रांशी जुळाल्या, तर मग विश्वसनीय मानता येईल.
Wrong information, more than north Indian rulers South Indian rulers more particularly from Karnataka have ruled in western, konkan and marathvada region and chalukya empire is most important in one of them which you have missed out. You need to do more study. Your study is more inclined towards north Indian history whereas maharashtra is more connected with Karnataka and andhra.
Dear Sir, My Study is not inclined to north Indians. The topic of this video inclined to. I always also mentioned the contributions of Satvahana, Andhra, Hoyasala, Kadamba in Maharashtra History. But unfortunately, it's very little written in history about these dynasties compare to north Indian dynasties. And what was written in south Indian and English language. Very little available to read in Marathi even me too. So due to unavailability of right source in local language very little people know about topics you mentioned. Even when I try to search good book on Chalukya in marathi, I can't find it. It's not the case about Mourya, Gupta, Rajput, or Yadavas. I used to read English but a lot of common people do not. It's the root of the problem. So people know little about southern dynasties due to the unavaiblitiy of a good resource book, it's not my fault. What can I do? Hope you will understand. Thanks & Regards
साहेब! तुम्ही पण ज्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देता, त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्याआधी तो व्हिडिओ पूर्ण नीट व्यवस्थित ऐकण्याची व त्यावर चिंतन, मनन करण्याची बिलकूल तसदी घेत नाही हे स्पष्टच दिसते आहे. कारण तसे असते तर अशी उचलून जीभ टाळ्याला लावली नसती. कारण व्हिडिओमध्ये मराठा समाजाचा उल्लेख प्रथम कुठे आढळून येतो याबद्दल चर्चा चाललेली नसून 'मराठा' हा शब्द महाराष्ट्रात राहणाऱ्या समाजाला उद्देशून कधी पासून वापरला जाऊ लागला, याबद्दल चालली आहे. सम्राट अशोक आणि ह्युएन त्संग या चीनी प्रवाशाने कुठे 'मराठा' हा शब्द वापरल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही. तुमच्या कुठे वाचण्यात आले असेल आणि तुमचा अभ्यास याबाबतीत पक्का असेल, तर तुम्ही तो संदर्भ सादर करा आणि इतिहास संशोधनात स्वत:चे नाव अमर करा. तुमच्यात तेवढी पात्रता दिसून येतेच आहे तुमच्या प्रतिक्रियेवरून. संदर्भ द्या आणि सिद्ध करा.
*अतिशय उत्कृष्ट अभ्यासपूर्ण आणि निःस्वार्थ भावनेने दिलेले अप्रतिम उत्तर, अगदी माझ्या अभ्यासाप्रमाने सुद्धा खूप आनंद झाला सर तुमचा व्हिडिओ बघून. तुमच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा !!*
इतिहास में कभी कभी चाह कर भी सभी बातों के यथोचित प्रमाण ढूंड पाना संभव नही हो पाता है। क्यों की बहोत से प्रमाण समय के साथ खो जाते है। अगर आप इतिहासकार की नजरिये से चीजों को देखते हो तो किसी भी ऐतिहासिक चीज के उपर बात करने के लिये, आप के लिये साधार साक्ष्य, तथ्य और प्रमाण बहुत ही जरूरी हो जाते है। आप ने जो प्रश्न किया है उसका उत्तर समय के चक्र में कही खो गया है। अगर आप किसी भी इतिहासकार से पुछोगे तो उचित साक्ष्य, तथ्य और प्रमाण के अभाव की वजह से देवगिरी के यादव गवळी अहीर थे ये कहना, और गवळी अहीर नही थे ये कहना, दोनों ही उचित नही होगा। मेरे विचार में इस विषय में अभी और संशोधन की जरुरत है।
प्राचीन काल मे यादव यदुवंशियों को कहा जाता था | आज के अहीर 19 शताब्दी के बाद से यादव लगाना चालु किये हैं और अपने आप को यदुवंशी कहते हैं|😅 ये अहीर, देवगिरि के यादव (जाधव) के साथ कल्चुरियो को भी अपना बताते हैं जो की गलत हैं देवगिरि के यादव आज के जाधव हैं और कल्चुरी की चार शाखा हुई 1त्रिपुरी के कल्चुरी 2महेसमती के कल्चुरी 3 रतनपुर के कल्चुरी 4 रायपुर के कल्चुरी मैं रायपुर का कल्चुरी हु, रायपुर के लास्ट कल्चुरी शासक अमर सिंह देव थे जिन्हे मराठा शासक रघु जी ने 1750 मे हरा दिया था और पास के ही 5 गांव दिये थे जो बड़गांव, मुद्हेना, नंदगांव, फिंगेशर, गोईंदा ये गांव है | आज भी उनके वंशज इन्ही गांव मे रहते हैं मैं उनमे से एक हु| हमारा इन अहिरो से कोई लेना देना नही हैं | हमारा दूसरे वंश के क्षत्रियों के साथ वैवाहिक संबंध बनते है | ये अहीर अपने आप को यदुवंशी क्षत्रिय कहते है और आपस मे शादी करते रहते हैं 😅😂🤣
@@political_ahiryadav/ jadhav is yaduvanshi kshtriya. Gawali/ ahir has no relation with us We come under general category. Gawali/ ahir come under obc
मैडम यदुवंशी अलग अलग क्षेत्र मैं अलग अलग सर नाम लिखते हैं।।कारणवश हम लोग भृमित होजाते हैं।।Gavali, Yadav, Abhira, Rashtrakoota,Ahir, यदुवंशी हैं।।बैमिसाल इतिहास हैं।। एक इतिहास कार हैं।।सुम्नत कुमार, और रोही,4वैदो,18पुराणों से एक बुक लिखी हैं।।अभीरा, गवली, यादव, उसकों आप अवश्य पडे।। यदि आप चाहें तो मै सुम्नत कुमार का फोन नम्बर दे सकता हूँ।। आप डारेक्ट अपने पत्ते पर मगा सकते हो।।
Isme koi sak nahi yadav , ahir same hai. Vedic time se yadav ko ahir ke roop me pukara jata aa raha hai. Chahe wo yayati ho ya fir yadu ho ya fir Aahuk ho ya Krishna ho. Yadhu aur bhagwan Krishna ko gop gwala aur kaliya nag marane par ahir bhi kaha gya hai . Yadu ne bhi vishalkay nag ko mara tha isliye unhe ahir kaha gya . Aahuk bahut hi pratapi the nirbhik the isliye unhe bhi ahir kaha gya aur unke vanshaj ahir as yadav lagane lage. ततस्ते पापकर्माणो लोभोपहतचेतस: । आभीरा मन्त्रामासु: समेत्याशुभ दर्शना: ।। ४७। अर्थात् उन पापकर्म करनेवाले तथा लोभ से पतित चित्त वाले ! Fir bat aati hai ki Mahabharat me aesa kyu likha hai abhir ne yadav stree ka apahran kiya Arjun jab le ja rahe the. Yahi bat barahwi Satabdi me abhir sabd ke isthan par gop ka use hua hai. "सो८हं नृपेन्द्र रहित: पुरुषोत्तमेन । सख्या प्रियेण सुहृदा हृदयेन शून्य: ।। अध्वन्युरूक्रम परिग्रहम् अंग रक्षन् । गौपै: सद्भिरबलेव विनिर्जितो८स्मि ।२०। To aesa kyu isse shlok se ye sabit hota hai ki gop abhir ahir ek hi hai aur yadhu Krishna ko rigved me gop namo se sambodhit kiya gya hai. To lootane wale koi aur nahi yadav hi the jinpar sarap ka prabhav tha jinko Arjun ne haraya . Isiliye Arjun unko dwarka se leke indraprastha ki taraf le ja rahe the. Ye hi abhir sabd ahir kahalaya jiska matlab nirbhay (fearless) hota hai . Gop gwala isliye yadav ko kahate the kyuki yadu , Krishna sabhi gayo ko palate the us samaj yahi unke dhanwan hone ka praman tha. Sach to ye hai ki inme koi difference nahi hai tanik bhar bhi nahi. Lekin in sabke bad “rajput “ log ek hi bad karate hai 1924 ki jab all india mahasabha me sabhi ahir yadav surname lagane lage . Wo yadav hai isliye yadav lagate hai naki Bane hai . Rajputo ki purani aadat hai koi bhi mahan hua to unhe apni jati ka bata do . Wo sach janne ki koshish bhi nahi karate nahi unhe iski shram hai. Rahi bat jo log kahate hai yadav shudra hai vaishya hai kshtriya hai to unhe ye bata dn ki yadu ne vachan diya tha ki wo kabhi raha nahi banenge isi vachan ko nibhate hue Krishna ya balram dono hi Raja nahi bane. Yadavo ne yadu ke vachan ka man rakhate hue kabhi chandravanshi nam use nahi kiya aur yaduvanshi use kiya usne bhi aaj ke rajput ghush rahe hai yadavo ko yadav na bolke. Yadav ne kabhi varn vyavastha ko apanaya hi nhi . Isliye wo janma se to kshtriya hai lekin kisi bhi Varna me nahi nahi Braham nahi kshtriya nahi shudra aur nahi vaisya. Swaym rigved me yadu ko aur Krishna ko kahi gop kahi detya (monsters) kaha hai . Because Brahmin can't tolerate any other cast to be more worshipped than their. All india yadav mahasabha me ahir gop ko yadav surname diya nahi gya wo yadav Vedic kal se hai isliye yadav use karate hai . Nahi to koi bhi muh uthake yadav kahlata . Joki aaj ke rajput banane ki koshish kar rahe hai. Aur Rahi bat jadeja ki joki kahate hai 2010 me court ne kaha wo Krishna vanshi hai to ye bat bilkul jhoot hai kyuki court me Jamin ka mamla tha court ke order me kahi bhi nahi likha ki jadeja Krishna vanshi hai. Likha kya kahi vansh tak ka jikara nahi hai usme . Ye sab bhi rajputo ke dwara failaya hua jhooth hai . Ab ye kal aaye log yadvo ko yadav na kahake khud ko yadav kahalwa rahe hai . Agar ye sach me yadav Hote to jagannath mandir dwar ye kholte naki yadav. Ye sach hai kahi yadavo ko vaishya kaha gya hai kahi shudra to kahi kshtriya lekin yadav inne se kisi me bhi nahi aate ye bat alag hai wo janma se kshtriya hai. Isliye Mahabharat me bhi yadav wird use hua hai gop hua hai ahir hua hai naki kshtriya yadavo ke liye . Aur Krishna inhi jati me janma liye. To ye dimag se nikal do ki inme kuchh bhi difference hai yadav kal ke aaye rajput nahi hai we Vedic kal se apni sahash aur bahaduri ke liye ahir kahalate aaye hai . Agar isme kisi ko koi dikkat hai to wo pahale ved Vishnu puran aur Mahabharat geeta hai achhe se path kare . Sach to yahi hai ki ye manana hi nahi chahate isliye Bina Jane yadav ko yadav nahi mante. Jo rajput ahir yadav ko oppose karate hai unhe “ahir no asaro" sentence ka history bhi dekhana chahiye tab pata chalega rajput ko bachane ke liye ahir ne khud ke bete ki kurbani dedi.
साहेब मी सुद्धा पवार आमचे आजी आजोबा आम्हाला सांगायचे कि आपण धार पवार आहोत.तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूर्वीच्या राजे महाराज्यांची आणि आता उपलब्ध असलेल्या आडनाव ह्यांची dna test कशी करतात. किंवा त्यांची आणि आपली dna same आहे ही कशी ओळखतात.
साहेब! हे इथे एका व्यक्तीचे किंवा घराण्याचे डीएनए टेस्ट करून कळणार नाही. त्यासाठी व्यापक प्रमाणावर सर्व समाजातून जे सर्व लोक धारचे पवार यांचे वंशज असल्याचा दावा करतात, त्या सर्वांचेच डीएनए सॅंपल घेऊन त्यात एखादा कॉमन जीन आढळतो का ते पहावे लागेल. जर स्वत:ला धारचे पवार असल्याचा दावा करणाऱ्या सर्व लोकांच्या डीएनए मध्ये त्या सगळ्यांना एकत्र जोडणारा सामायिक जीन सापडला, तर मग तो जीन आला कधी व कुठून याचा शोध घ्यावा लागेल. मग कळेल की धारच्या पवारांना जोडणारा तो एक सामायिक जीन नक्की कोणत्या वंशाशी संबंधित आहे. काम महाअवघड आहे. पण कोणी करायचंच म्हटलं तर अशक्य नाही. पहा कोणी स्पॉन्सर मिळाला या कामाला तर. आणि काही रिझल्ट मिळाला तर मला पण कळवा.
खूप खूप आभार खरी माहिती बद्दल ( नाहीतर लोक खोटाच बोलतात ) देवगिरी चे यादव हे मुळ चे मथुरा (यूपी ) येथिल होते . महाराष्ट्रात ऐवून अन्य माराठाशी लगीन गाठ बांधून मराठा झाले ...
सर! महाराष्ट्र व मराठा समाज इथे शासन करणाऱ्या अनेक मिश्र वंशांपासून बनलेला असून यादव देखिल त्यातीलच एक आहेत. आणि बाहेरून तर सर्वच इथे आलेले आहेत. त्यामुळे उगाच फक्त यादवांनाच त्याबाबतीत दूषण देणे योग्य होणार नाही.
@@KimantuLive मराठा ही जात नाही किंवा समाज नाही मराठा हा ग्रुरुप आहे .....तयत कदम हे खडंबा भोसले हे राजपूत मोरे हे मोर्य शिंदे हे non Aryan आणि आहेर , यादव हे यादव आहे .......पण याने काहीच फरक पडत नाही . मराठा जात नाही हा एक विचार आहे स्वातंत्र्याचा ,अभिमानचा , संघर्षाचा आणि गुलाम न होनायचा .
साहेव! तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेत ते सुंदर आहे. पण कोणी मानो अथवा ना मानो पण आजच्या तारखेला मराठा ही एक जात आहे. सरकार दरबारी कागदोपत्री लोक तशी नोंद करतात. आणि एकदा निर्माण झाली की कधीच नष्ट होत नाही तिला जात म्हणतात. जात नाही ती जात. त्यामुळे आता या विषयावर उगाच डोके आपटून काही उपयोग नाही.
साहेब! या व्हिडिओच्या विषयाचा ब्राह्मण, कोब्रा, युरोपिअन यांच्याशी आणि त्यांच्या डीएनएशी काही तरी संबंध आहे का? कमेंट तरी जरा आशय-विषय समजून करत जावा की राव! एवढाच तुमचा गुणसुत्र आणि जनुकीय शास्त्राचा प्रकांड अभ्यास आहे, तर मग बनवा की दहा व्हिडिओ या विषयावर तुमच्या चॅनेलला. अडवले कोणी आहे.?
जगदंब = जग = विश्व ,अंब = आई अर्थात जी विश्वाची आई आहे ती जगदंबा आणि जगदंबेलाच जय जगदंब म्हणतात कदंब हा वृक्ष आहे आणि देवीस कदंबवनचारीणी म्हणजे कदंब वनात राहनारी म्हटले जाते
साहेब आपला अभ्यास कुठे तरी चुकत आहे माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली हे 1275 ते 1296 या कालखंडातील आहे त्याच्या वाग्मयात मराठा शब्द दिसत आहे आपण 16 व्या शतकात उडी घेतली
पहिला मुद्दा. तुम्ही म्हणता ते सर्व सत्य आहे साहेब. पण या गोष्टी भागवत धर्म, अध्यात्मिक काव्य, संत साहित्य, मराठी भाषा याच्याशी निगडित आहेत. हे विषय खरोखरच चर्चा करण्यासारखे आणि स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यासारखे आहेत. पण दुर्दैवाने तुम्ही बोलत आहात ते मुद्दे या व्हिडिओचा विषय नाही आहेत. या व्हिडिओचा विषय मराठा शब्दाची उत्पत्ती कधी झाली आणि देवगिरीच्याच्या यादवांना उद्देशून १२व्या शतकात हा शब्द वापरला जात होता का? इथपर्यंतच मर्यादित आहे. व तेवढ्यापुरताच हा व्हिडिओ पहावा ही विनंती. दुसरा मुद्दा. तुम्ही ज्ञानेश्वरीतला जो दाखला दिला आहे. तो आधी देखिल आपल्या एका दर्शक मित्रांनी दिला होता, त्याला मी सविस्तर उत्तर आधीच खाली दिले आहे. वेळेअभावी परत इथे टाईप करत नाही आहे. आपण गैरसमज करून घेणार नाही आणि ते खाली जाऊन वाचाल अशी अपेक्षा आहे. तिसरा मुद्दा. महाराष्ट्र शब्दाची शब्दाची उत्पत्ती अथवा राज्याची निर्मिती हा पण या व्हिडिओचा विषय नाही. म्हणून याबद्दल देखिल व्हिडिओत काही एक उल्लेख नाही. त्यामुळे याबद्दल कृपया इथे काही चर्चा करू नये. तो एक सर्वस्वी वेगळा चर्चेचा विषय आहे. तुम्हाला एखादा विषय मी पूर्णपणे उलगडून सांगावा व त्यावर माहिती द्यावी असे वाटत असेल, तर चॅनेलचे सभासद व्हावे ही विनंती. तुम्ही सांगाल त्या विषयावर तुमच्याशी चर्चा करून आपण एक चांगला व्हिडिओ बनवू शकतो.
The Nashik Gazetteer states that in 246 BC "Maharatta" is noticed, as per the Mahavanso, as one of the ten places to which Ashoka sent an embassy,[1] and the word "Marhatta" (later used for the Marathas) is found in the Jain Maharashtri literature.[6] कृपया ह्यावर आपलं मत कळावे
त्यात जे काही लिहलं आहे ते खरंच आहे. पण ते जे काही लिहलं आहे किंवा म्हट्लं आहे ते त्या काळातल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना उद्देशून म्हटलेले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक काळात कित्येक स्थित्यंतरे व स्थलांतरे झाली आहेत. त्यामुळे त्या काळात राहणारे जे लोक आहेत तेच आज महाराष्ट्रात राहणारे लोक आहेत असे नाही. मराठा हा शब्द सोळाव्या शतकापासून आजपर्यंत महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व लोकांना आणि त्यातही जातीवाचक एका लोकसमुहाला वापरला जातो. सम्राट अशोकाच्या किंवा जैन ग्रंथ लिहले गेले त्या काळातल्या लोकांना उद्देशून नाही. शिवाय त्या काळातले लोक व आत्ताचे लोक यांची गुणसुत्रे देखिल जुळत नाहीत. म्हणून त्याकाळात महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना त्या काळात मरहट्ट किंवा अजून काही नावाने संबोधत असतील तर त्या नावाने ओळखावे व सोळाव्या शतकापासून आज महाराष्ट्रात राहणाऱ्या समस्त लोकसमुहाला मराठा नावाने संबोधावे हे इतिहासशास्त्राला धरून होईल. कारण प्राचीन काळी इटलीत राहणाऱ्या लोकांना आजही रोमन म्हणतात व आज राहणाऱ्या लोकांना इटालियन म्हणतात. हे तसेच आहे. प्राचीन काळी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या प्राचीन नावाने (मरहट्ट किंवा अजून जे काही असेल ते) त्या नावाने ओळखावे आणि आजच्या अर्वाचीन काळात राहणाऱ्या लोकांना मराठा म्हणून ओळखावे. कारण कालचे रोमन आजचे इटालियन होऊ शकत नाहीत आणि आजचे इटालियन देखिल कालचे रोमन असू शकत नाहीत. तसेच पुर्वीचे मरहट्ट आजचे मराठा होऊ शकत नाहीत आणि आजचे मराठा देखिल कालचे मरहट्ट होऊ शकत नाहीत.
@@KimantuLive Sir It's "Maharatta" Mentioned in Ashoka Era,,,, not Marahatta,,, I think u just made spelling mistake in Marathi,,, See his coment also it's "Maharatta" By the way ur analysis is way beyond Neutral and unbiased,,,, Great sir
मरहट्ट आणि महरट्ट असे दोन्ही शब्द माझ्या वाचनात आलेले आहेत. यातला एक बरोबर असू शकतो किवा दोन्हीही बरोबर असू शकतात. किंवा वेगवेगवेगळ्या काळात काही अपभ्रंश होऊन वेगवेगळे शब्द झालेले असू शकतात. आपण त्याबद्दल आता काही ठामपणे सांगू शकत नाही. म्हणून वर प्रतिक्रियेमध्ये लिहताना पण मी (मरहट्ट किंवा अजून जे काही असेल ते) असाच उल्लेख केला आहे. तरीही प्रतिक्रिया एवढ्या बारकाईने वाचून सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सुचनांचे नेहमी स्वागतच आहे.
आपले मन:पुर्वक आभार साहेब! तुमचे म्हणणे खरे आहे. सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर देता येणे वेळे अभावी शक्य नाही. मग व्हिडिओ बनवण्याचे सोडून तेवढे एकच काम राहिल करण्यासाठी.
अचूकपणे नक्की तारीखवार कोणालाच सांगता येणे शक्य नाही. कारण तो काळ कुठेच कोणीच लिहून ठेवलेला नाही. अंदाज लावायचा म्हटाला, तर प्रत्येकाचा अंदाज वेगळा येणार. त्याला आता कोणी काही करू शकत नाही.
पहिला मुद्दा. साहेब पौराणिक गोष्टी आणि ऐतिहासिक गोष्टी यात फरक आहे. इथे आपण इतिहासातल्या घटनांबद्दल चर्चा करतो आहोत. पुराणातल्या नाही. दुसरा मुद्दा. या व्हिडिओमध्ये चर्चा मराठा शब्दाच्या उत्पत्तीची चालली आहे. महाराष्ट्राच्या उत्पत्तीची नाही.
ऋषीचे कूळ व नदीचे मूळ विचारु नये म्हणतात साहेब. कारण यात इतके गोंधळ आहेत की नक्की काही सांगता येणे अवघड आहे. महाराष्ट्रात तर अनेक वंश, गोत्र व प्रवर चातुर्वणात समानच आहेत. म्हणून तर खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. कारण खंडोबा हे चारही वर्णातल्या लोकांचे कुलदैवत आहे. महार पण मुळचे हिंदूच आहेत. आजही महाराष्ट्रातले महार लक्षणीय संख्येने हिंदूच आहेत. सर्वच काही बौद्ध झाले नाहीत. त्यामुळे महार समाजातील आडनावे व कुळदेवता देखील हिंदू प्रथापरंपरांप्रमाणे काहीही असू शकतात. शोधला तर इतिहासही महाराष्ट्रातील इतर कुळांइतकाच महान असू शकतो. त्यात एवढे आश्चर्य वाटून घेण्यासारखे काहीही नाही आहे.
या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देता येणे शक्य नाही. याबद्दल पुष्कळ विचारवंतांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत आणि वेगवेगळी मांडणी केली आहे. ते सर्व समजून घ्यायचे म्हटले तर मग एक स्वतंत्र व्हिडिओच बनवावा लागेल.
त्या काळात महार लोकांना काही लोक उगीचच त्रास द्यायचे आपल्याला त्रास होऊ नये म्हणुन लोकांनी त्या काळातील लोकांनी त्या गावात जे पुढारी लोकं असतील त्याची आडणाव लावायला सुरवात केली कींवा त्या काळात ज्याच्या घरी वर्षानुवर्ष लोकं कामं करायची त्या लोकांनीपण त्या मालकाच आडनाव वापरायला सुरवात केली
@@vandanadhumal8073तुम्ही एखादं गाव सांगा जिथं महार लोकांनी तिथल्या पुढारलेल्या लोकांची आडनाव लावली? अस कुठंही नाही एकाच गावात कधीच एकाच आडनावाचे जातीचे लोक नसतात.सगळ्यांचे वेगवेगळ्या आडनाव असतात. जास्तीतजास्त बाजूच्या गावात असतात ते मूळ गावातून स्थलांतरित झालेले असतात . तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण गावावरून जात कळते जर तुम्ही म्हणले तसे असते तर तस झालं नसत.आणि तुम्हाला माहित आहे का?महार लोकही एकाच आडनावमध्ये लग्न करत नाही. तुम्ही म्हणले तस असत तर खुशाल त्यांनी लग्न केले असते कारण काही संबंधच नाही तर लग्न करायला काय समस्या एकाच आडनावात?पण तसं नाही म्हणून ते एक आडनावात लग्न करत नाहीत
@@kgdkgd4170जिल्हा सातारा, तालुका वाई, येथील गावे पांडे, बोपेगाव आणि खानापूर. या ठिकाणी मुळ गावकरी सर्व जातींचे लोक जाधव आडनावाचे आहेत. जाऊन स्वतः पडताळणी करु शकता.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब. पण प्रस्तुत व्हिडिओमध्ये चर्चा कोणी मराठी आहे की नाही या संबंधाने चाललेली नसून, १२ व्या शतकात महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना आजच्यासारखे मराठा म्हटले जात होते का? किंवा त्या काळात आज जशी एक मराठा जात महाराष्ट्रात अस्तित्वात आहे तशी होती का? आणि त्यापैकी कोणाला शुद्ध 'मराठा' हा शब्द वापरला जात होता का? या संबंधात चर्चा करण्यात आलेली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे निखालस नाही अशी आहेत. मराठीचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे आणि असायलाच हवा. पण इतिहाससंशोधन करताना डोळ्यावरची अभिमानाची झापडे बाजूला काढून ठेवली पाहिजेत. नाही तर धर्म, जात, भाषा, पोकळ दंतकथा आणि कल्पनाविलासात, सत्य आणि इतिहास दोन्ही अदृष्य होऊन जातात.
आधि मराठा समाजाची संकल्पना काय आहे ती... मराठा हे सर्व एकच आहेत.... पण देवगिरीचे यादव काही राजपूत तर काही चालूक्य तर काही सातवाहन वंशज हे सर्व क्षत्रिय कम्युनीती मिळून मराठा छत्रपतींचा काळात किंवा आधी झाले असावेत...
यादव व चालुक्य यांचा संबंध आता लावु नका, यादव हे चालुक्य साम्राज्याचे मांडलिक होते...ज्यावेळी चालुक्य साम्राज्य क्षिण झाले तेव्हा यादवांनी स्वतः ला राजे घोषित केले....चालुक्य व सेन्द्रक वंशी शिंदे या़चा संबंध अगदी जवळचा आहे....
शायद आपने व्हिडिओ ठीक से सुना नही है श्रीमान। यादव कुल की गरिमा अपने जगह है। पर मराठा एक मिश्रवंशिय वंश है। उसमें से कुछ के पुर्वज यादव हो सकते है। पुरे मराठा समाज को यदुवंशी नही कहा जाता।
पहिला मुद्दा. साहेब! माझा सगळा इतिहास नाव गाव, ईमेल, वेबसाईट, फोन क्रमांकासहित व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ नीट पाहिला तर सर्व काही समजेलच. तुम्हाला पण विनंती आहे. किमान डिस्प्लेला स्वत:चा ओरीजनल फोटो तरी ठेवा हा प्रश्न विचारण्याआधी. आणि तुमच्या यूट्यूब अकाऊंटला पण तुमची माहिती किमान ईमेल आणि फोन नंबर दिसू द्यात. त्याने प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विश्वासहर्ता वाढते. प्रश्न विचारणाऱ्याचे अकाऊंट फेक तर नाही ना अशी शंका मनात यायला जागा राहत नाही. दुसरा मुद्दा. माझे ज्ञान मोडके-तोडकेच आहे. मी कधीही मोठा इतिहासकार असल्याचा दावा केला नाही. पण मराठ्यांच्या उत्पत्तीबद्दल तुमच्याकडे काही मोठे ज्ञान असेल, तर कृपया तुमच्या यूटयूब चॅनेलला एक व्हिडिओ बनवा. आम्हाला पण आपल्या थोर ज्ञानाचा थोडा लाभ होऊ द्यात.
@@KimantuLive youtube वापरण्याचं तांत्रिक ज्ञान आम्ही update करूच ती गरज आहेच नाहीतर गैरसमज चं रूढ करण्यात चाणाक्ष मंडळी यशस्वी होतात मराठा समाज आतापर्यंत त्याचाच बळी पडलाय असो आपला हेतू शुद्ध नाही हे नक्की
पहिला मुद्दा. चाणाक्ष मंडळी गैरसमज रूढ करण्यात यशस्वी होतात हे सत्यच आहे. पण मराठा समाजात देखिल आता इतिहासाबद्दलची जागृती व ज्ञान वाढले आहे. इंटरनेटमुळे सहज संदर्भ वाचायला उपलब्ध होतात व कोणी आता इतक्या सहजतेने खोटे बोलू शकत नाही. बोलले तरी ते जास्त काळ टिकत नाही. लोकांना सर्व कळते. दुसरा मुद्दा. आता हेतू शुद्ध आहे की नाही हे व्हिडिओ बनवून किंवा काही लिहून सिद्ध करता येणे अवघड काम. त्यामुळे त्याबद्दल इथे आता फार काही लिहित नाही. पण तुमचे माझ्याबद्दलचे मत ऐकून खेद वाटला. विनंती आहे आपण इतर व्हिडिओ पहावेत व येत राहणारे नवीन व्हिडिओ पण पहात राहावेत. जर भविष्यात कधी माझ्या विषयी आपले मत बदलले तर आनंदच होईल.
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने इसवी सन १९३१ मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. त्यामुळे कागदोपत्री का होईना 'मराठा' हा शब्द तेव्हापासून अधिकारिकरीत्या जातिवाचक झाला असे आपण म्हणून शकतो.
महाराष्ट्रात राहणारे सर्वच जण स्वत:ला मराठा म्हणवून घेऊ शकतात. महाराष्ट्रात कोणी मानले नाही तरी, महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातल्या जाती-पाती कोणाला माहित आहेत? आजही महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठा म्हणूनच ओळखले जातात. पंजाब प्रांतात राहणारा पंजाबी, काश्मिर मधला काश्मिरी, तसेच महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. राहिला प्रश्न जातीचा, तर जात नाही ती जात म्हणतात. ज्या दिवशी जात हा प्रकार आपल्या देशाचा आणि सर्वच धर्मांचा पिच्छा सोडेल त्या दिवशी या देशाचा स्वर्ग होईल. पण धर्म बदलला तरी जात इथे माणसांचा पिच्छा सोडत नाही हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे कोणी कशाला स्वत:ला जातीवाचक मराठा म्हणवून घ्यायचा हव्यास करायला पाहिजे? मराठा ही पण शेवटी एक महाराष्ट्रातल्या इतर जातीप्रमाणे एक जातच आहे. कोणी स्वत:ला असताना किंवा नसताना उगाच मराठा, ब्राह्मण, धनगर किंवा अजून काही म्हणवून घेण्यापेक्षा शाळेच्या दाखल्यांवरून आणि सरकारी कागदपत्रांवरून जातीचा कॉलमच कसा काढून टाकता येईल यासाठी प्रयत्न केले, तर सर्वच जण खऱ्या अर्थाने मराठा होतील. सर्वांचा इतिहास एकच. सर्वांची ओळख एकच. महाराष्ट्रात राहतो तो मराठा.
@@KimantuLive अगदी बरोबर बोलला तुम्ही पण मी जातीने मराठा नाही पण मी इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा समजतं की मी सुद्धा मराठा आहे. माझा असा तर्क आहे की जर मराठा शब्द जातीवाचक नसता तर किमान महाराष्ट्रात तरी जातीयवाद फोफावला नसता कारण मराठा शब्दात जी वीरता जाणवते ती दुसऱ्या शब्दात जाणवत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लोक मराठा या शब्दाच्या छत्राखाली एकजुट येऊन समाजातील जातीयवाद नष्ट व्हायला मदत झाली असती
जातीयवाद मराठा शब्दाशी किंवा इतर कोणत्या गोष्टीशी संबंधित नाही आहे. तो मानवी प्रवृत्तीशी संबंधित आहे. राहता राहिला प्रश्न मराठा होण्याचा. तर मग कोणत्याही सरकारच्या एखाद्या सर्टिफिकेटचा मराठा होण्याऐवजी शिवछत्रपतींच्या विचारांचा मराठा होणं हे आज मराठा आणि बिगर-मराठा दोघांसाठीही आणि महाराष्ट्रासाठीही कधीही जास्त हिताचे व भाग्याचे होऊ शकेल.
सर .. आपण सांगत आहात 2000 वर्षा पुर्वी विविध लोक महाराष्ट्र क्षेत्रात आले मग त्या पुर्वी कोणते लोक या महाराष्ट्र भोगोलिक क्षेत्रामध्ये रहिवासी असू शकतात. सविस्तर सांगावें सर
खूप सारे लोक हे पूर्वी नोमॅड म्हणजेच भटके होते. ती त्यांची जीवनशैली होती मजबुरी नाही. महाराष्ट्र मध्ये जे शासक /सामंत होते ते शक म्हणजेच सिथियन (scythian) होते. कुल्याही लेखी पुरावे नसलेला इतिहास मग संस्कृती, जीवनशैली , समाजजीवन या मध्ये शोधावा लागतो. जर शक लोक बद्दल बोलायचे म्हणाले तर हे अर्थातच स्वतः इतिहास लिहीत नसतं. यांचा इतिहास कोणी तरी दुसऱ्याने सांगितलेला किंवा मग समाजशात्र, नाणेशास्त्र आणि इतर इतिहास साधन वापरून शोधला जातो. मराठा हे मिश्रवंशीय हे सत्यच आहे कारण संपूर्ण भारत हाच मुळात मिश्रवंशीय आहे. पण इतिहासकार जेव्हा मूळ सांगत असतात ते जास्तीत जास्त कोणाच्या जवळ आहे याच शोध घेतात. सर्व भारत विक्रम सवन्त वापरात असताना दक्खन मात्र शक सवन्त वापरात. शक सवंत चा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी शक राजा चेस्टना यांचा राज्याभिषेक झाला होता त्याचमुळे शक सवंत सुरु आहे आणि आपण आजही वापरतो. शक सवंत सातवाहन यांनी सुरु केला हे मुळातच ऐतिहासिक नाही. डी . सी. सरकार याला "historical inaccurate notion " म्हणतात . जवळपास सर्व महाराष्ट्रा , माळवा, गुजरात, आणि कर्नाटक च काही भाग हा या शक अधिपत्य्या खाली होता. गुप्त राजा चंद्रगुप्त ।। ने हे राज्य संपवलं. (इ. स. ४१५ ) पण नंतर यातील कोणिही परत गेला नाही ते इथेच राहिले आणि येणारया राजवटी मध्ये सामंत वैगेरे पदव्या धारण करत राहिले आणि इथल्या संस्कृतीचा भाग बनले. या वरून आपण समजून घेऊ शकता मराठे कोण आहेत. राहिला तुमचा प्रश्न च उत्तर ते कोठून आले ? ते आले यूरेशिया च्या गवताळ प्रदेशातून. आजचा कझाकिस्तान , सर्बिया , उरल पर्वत रांगा , आणि काहीसा ukrain . आपल्या आजच्या माइंडसेट ला न पटणार आहे पण हा इतिहास आहे. पण लक्ष्यात घ्या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रपती हीच पदवी का घेतली असेल राज्याभिषक करते वेळी. येथील सर्व सामंताना क्षत्रप म्हणले जायचे. या सर्वांचा राजा म्हणजे क्षत्रपती. काही प्रश्न असतील तर जरूर कळवा. धन्यावाद :) @kimantulive Sir काही आक्षेप असेल तर जरूर कळवा
खूप छान दादा. आपल्या भेटीचा मानस आहे. आणि मराठा म्हणजे या श्लोकात आहे. दिला एकदा शब्द न पालटावा | पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा || धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला | मराठा म्हणावे अशा वाघराला || आपत्तीतही पाय मागे फिरेना | महा संगरी धैर्य ज्याचे गळेना || मिळवितो रणी म्लेंच्छ सेना धुळीला | मराठा म्हणावे अशा वाघराला ||
वाह! मराठ्यांची महती वर्णन करण्यासाठी लिहला गेलेला एवढा सुंदर श्लोक दुसरा कोणता याआधी वाचण्यात आला नव्हता. आजची संध्याकाळ आणि दोन्ही मन प्रसन्न केले साहेब तुम्ही. जगदंब! भेटायचं म्हणाल तर कधीही येऊ शकता तुम्ही. मनाचे आणि घराचे दोन्ही दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडेच आहेत.
Sir tumhala ek prashn vicharayacha ahe khup mahatwacha ahe . BHOSALE kul he ( BHOYSALA ) hya kula pasun aal asav ani ( BHOYSALA ) he dakshinetal ( KOYSALA ) pasun aal asav . Hyavar kay watate. Mala ti bhosale he mewad che ahe hya baaddal thodi shanka watate . Karan jar aapan shivaji maharaj sambhaji Maharaj hyanchya kapalavar jar pahil tar te aadave chandanache teen patte lavayache , je jast larun karnatak madhe pahile jate . lamb bhagawa tila nahi lavayache
शिवछत्रपतींनी स्वत:च त्यांचा घराण्याचा मूळ पुरुष मेवाडच्या शिसोदिया वंशातील होता हे पुरावे दिले आहेत. आणि गागाभट्ट व इतर तत्कालीन विद्वानांनी पण ते मान्य केले आहेत. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासारखं काही शिल्ल्कच राहिलं नाही आहे साहेब.
पहिला मुद्दा. साहेब! कोणाला आवडो ना आवडो आज मराठा ही कागदपत्रांवर वापरली जाणारी शासनमान्य जात आहे. आणि लोकमान्य पण जात आहे. मराठा ही जात आहे की नाही या विषयावर आता चर्चा करण्यासारखं काही शिल्ल्क राहिलेलं नाही आहे. मराठा हा समुहवाचक, जातवाचक आणि स्थलवाचक शब्द आहे. दुसरा मुद्दा. मराठा जातीततल्या कोणाला आता स्वत:ला सिद्ध करायला उदात्तीकरण करून घ्यायची गरज नाही. कारण औरंगजेबाला याच मातीत गाडण्याचं उद्दात्त कार्याचं श्रेय याच मराठा जातीच्या नावावर आहे. अर्थातच महाराष्ट्रातील सर्वच जातीतील सर्वच जण २७ वर्षे महाराष्ट्रात मुघलांशी लढत होते, सर्वांनीच आप-आपल्या परीने आप-आपलं शक्य ते योगदान दिले आहे. पण या लढ्यात मराठ्यांचाच हिस्सा फार मोठा होता हे कोणी इतिहासकार पण नाकारू शकणार नाही. मराठा जातीच्या प्रखर प्रतिरोधाविना महाराष्ट्र मुघलांना हरवू शकला नसता हे एक ऐतिहासिक सत्य आहे. तिसरा मुद्दा. आता कोणाला मराठा जातीविषयी फारच असुया वाटत असेल आणि मराठ्यांच्या या उद्दात्त लढ्याचं श्रेय मराठ्यांना द्यायचं नसेल, मराठ्यांच्या या सम या पराक्रमाला कोणी मराठा जातीचं उदात्तीकरण मानत असेल, तर मग तो वेगळा भाग आहे. त्या विषयी न बोलेल तर चांगलं आहे. कारण तो इतिहासाचा भाग नाही. असुयेचा भाग आहे.
देवगिरीचे सीवना यादव द्रविड(कानडी) होते. महाराष्ट्रा वर 1000 वर्षे कानडी लोकांचे राज्य होते. चालूक्य, राष्ट्रकूट, वेस्टर्न चालूक्य हे कानडी राजे होते. देवगिरीचे सीवना यादव हे चालुक्यां चे सुभेदार होते. नंतर ते स्वतंत्र झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले मराठी राजे होते. शिवाजी महाराजां पूर्वी 350 वर्षे महाराष्ट्रावर खिलजी, तूगलक, बहमनी सल्तनत,आदिलशाह, निजामशाह यांचे राज्य होते. इस 1300 ते 1947 पर्यंत मराठवाड्या वर मुस्लिम शासकांचे राज्य होते.
Apan sarvanach uttere det rahilat tar apan chakraun jaun wed lagaychi pali yeil tika karnare khup ahet ani utter denara ekach ahe mhanu jithe awashyak asel ani marmik asel tithech utter dilele bare ani social media war aslyamule kahi khodkar kinwa ardhwat dnyni lokakade durlaksh kelele bare social media war saglech vidwan vysangi prakand pandit ahet asehi nahi ekhanda paugandawsthetla mulgahi kahitari uthal bhadak coment karun jato tyala wyathit hou naye apan khup changle ani aithihasik tathya sarvasamor thewat ahat ani abhyapurn mahiti ahe he sarwana kalte pan kahi lok wakdyat sirlyashivay satisfied hot nahit
आपले मन:पुर्वक आभार साहेब.
@@KimantuLiveMaratha is not caste but its clan of caste or group of caste. In which 96 kuli means caste included. So all of the devgiri yadav is connected with heyeya yadav ishversen abhira.
One main thing you have to notice that all jadhav is not yadav because its also group of 4 caste so. We dont say all of the jadhav is connected to devgiri yadav. Jadhav is the onle sirname otherwise nothing else.
@@Parth_AbhimanyuAll Jadhav in Maratha caste is basically Yadav, all of them may not be in the line of devgiri Yadav but they all are Yadav Yaduvanshi and are descendents Yaduvanshi raja or of raja Yayati raja Pururava
@@Parth_Abhimanyu Konta hi rajvansh Devgiri chya Yadav n pasun suru zalela nahiye, tyapurvi pasun rajvansh ahet
आमचा आडनाव यादव आहे आमचे पूर्वज देवगिरी येथे होते पुन्हा आमचे पुनर्वसन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सातारा येथे झाले आमचं आडनाव यादव आहे आणि आम्ही मराठा आहोत जय शिवाजी जय भवानी 🚩🚩
Gav kont tai
Mi pan yadav aahe
Me pan yadav ahai mirdha tal phaltan
Mi yadav gulumb tal. Wai dist. Satara
Mi pan yadav ahe saspade satara
मी गवळी आहे
पण हे फक्त महाराष्ट्रामध्ये म्हणतान नहितर पूर्ण भारतामध्ये व अन्य देशानमध्ये जसे नेपाल इत्यादी मध्ये यादव असे ओळखले जाते व आपल्या भारतात सुद्धा प्रलेक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने यादवाना पुकारले जाते पण आमच्या महाराष्ट्रातील गवळी समाजाची मुंबई नायगाव इथे पूर्ण महाराष्ट्रातील गवळी / यादव समाजाची “ महाराष्ट्रीयन यादव चॅरिट्री " आहे.
हा आणि आम्ही चंद्रवंशी क्षत्रिय यदुवंशी आहोत आणि यादव समाज हा खूप मोठा समाज विखुरलेला
आहे.
यंदु चे वंशज आहोत आम्ही सर्वे
आणि महाराष्ठामध्ये यादव हे देवगिरी मध्ये आले व त्यानी आपले साम्राज्य स्थापन केले व छत्रपती शिवाजी महाराज्याची आई या यादव घराण्यातील होता की ज्या माझ्या मते मला नाव नीट ठावूक नाही लखनौजी यादव याच्या सुकन्या होत्या
पण मला असे वाटते की त्या यादव आडनावाच आता महाराष्ट्रमध्ये जाधव झाले आहे.
हा आणि आम्हला राव साहब ही पदवी बहाल झालेली आहे, की जे आता हरियाणातील यादव त्याच्या नावापुढे राव साहब वापरतात
हा आणि यादव / महाराष्ट्रमध्ये गवळी याचा धनगर वैगरे जातीशी । बिनकुल सुद्धा काही संबद्ध नाही नाही नाही
आम्ही क्षत्रिय होतो आहोत आणि राहणार
पण फरक झकाच की आम्ही गाडिच्या माघे क्षत्रिय नाव लावून फिरत नाही स्वतःला म्हणत सुद्धा नाही कारण क्षत्रिय कोण आहे ते l दिखावा करून नाही तर मैदानामध्ये जनतेच्या संरक्षणासाठी युद्ध करून समजते व प्राप्त होते.
आणि मला माहिती असल्याप्रमाणे व माझ्या माहितीप्रमाणे मराठा हे पहिले कुणबी होते व अजूनसुद्धा कदाचित विदर्भामध्ये कुणबी मराठा असं काही तरी आहे
चंद्रवशी क्षत्रिय यंदुवशी यादव / गवळी
जय श्री राधाकृष्ण
जय श्री बलरामजी की
जय यादव जय माधव
धन्यवाद!
चांगली माहिती दिलीत साहेब. आपल्या मुंबईमधल्या 'महाराष्ट्रीयन यादव चॅरिटी' संस्थेला भेट देऊन मला आपल्याकडून अधिक माहिती घ्यायला आवडेल. कदाचित महिकावतीच्या बखरीत उल्लेख केलेल्या प्रतिबिंब यादव राजांशी आपला संबंध असू शकेल. या विषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील आपण सर्व यादव मंडळींची काही भेट आयोजित करता आली तर कृपया कळवावे ही विनंती.
@@KimantuLive हो नक्की तिथे UP चे यादव सुद्ध्य आपल्याला कधी कधी भेटतात.
हा आणि मला साहेब नका म्हणून कारण मी तुमच्या पेक्षा काही मोठा नाही मी एक विद्यार्थी असून आता First Year ला आहे.😊😊 मला तुमचे विचार खूप आवडले आपण मराठा आहात की यादव
आपल्याला नामदेवराव जाधव माहित असतील बहुतेक व्यवसायाशी संबंधिती व्यक्ता आहेत ते त्यांना सुद्धा देवगिरीच्या यादवानबदल थोडी माहित आहेत.
चंद्रवंशी क्षत्रिय यदुवंशी यादव
जय यादव जय माधव
धन्यवाद साहेब !
गोल्ला,ग्वाल, गवळी,यादव, गोलकर, इत्यादी नावाच्या जातीने यादव महाराष्ट्र मध्ये आणि अंद्रपदेश मध्ये ओळखल जाते.हे सर्व कृष्ण वंशीय आहेत . मी पण यादव आहे. आंध्रप्रदेश मध्ये तर सर्व गोला आणि गवळी लोकांना यादव च म्हणले जाते.
मी गोल् ला यादव आहे.
Ahir Yadav From Bihar..
Nice Information 👌
ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहे ते सर्व मराठा आहेत.
हो नक्कीच 1931chya आधी महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती च्या आधी मराठा लावले जायचे उदा. जसे तेलगू माळी तसच मराठा माळी, हे कागदोपत्री उपलब्ध आहेत.
हा काय नवीन शोध
Right
@@dakhorepatil6916 पण ९६ कुळी मराठा हा समाज पूर्ण पने वेगळा आहे.
Okk pan 96 kuli ha assal Maratha
मराठा एक ग्रुप है जबकि यादव एक वंश है जो दुनिया के हर देश में रहते है यदु एक श्रृंग वेद के आर्यन है उनके वंशजों को यादव कहा गया है ये एक अलग पहचान रखते है अब आज कल हिंदू लोग वेद माता गायत्री भवानी श्री कृष्ण वासुदेव यादव इत्यादि का पूजा करते है और खुद को उनसे जोड़ने के लिए तरह तरह के उदाहरण देते है जबकि ये उनकी मूर्खता है अभीर एक आदिम जाति नस्ल है इसका एक अलग पहचान है इथोपिया अफ्रीका में इसको अफर यूरेशिया में अबीर टर्की में अवर यूरोप में आयरिश चीन में शू कहा जाता है जबकि मराठा एक ग्रुप है सैकड़ों जातियां शामिल है उसमे बहुत यादवों से ही होगे मगर यदुवंशी यानि अभिर ट्राइब का एक अलग कानून होता है ये अगर राजा बनते है तो उनको समाज से बाहर कर दिया जाता है इसका कारण श्रीकृष्ण ने कहा था कोई यादव किंग नही बन सकता 👇👇
एवमाश्वास्य पितरौ भगवान् देवकी सुत:।
मातामहं तु उग्रसेनयदूनाम् अकरोतन्नृपम्।१२
आह चास्मान् महाराज प्रज्ञाश्चाज्ञप्तुमर्हसि ।
ययाति शापाद् यदुभिर्नासितव्यं नृपासने ।।१३ श्रीमद्भागवत पुराण दशम् स्कन्ध ४५ वाँ अध्याय
यही कारण है कोई भी यादव राजा नही बना आज तक हालाकि ये मिथक है इसका कारण विज्ञान है मगर कोई भी यादव राजा बनते समय अपने वंश का त्याग कर देता है और एक नया उपाधि धारण करता है सबसे बड़ा उदाहरण तो नेपाल ही है भक्तमान अहिर नेपाल ही बसाया मगर उसने गुप्त उपाधि धारण किया मैसूर वदलियार उपाधि धारण किया विजयनगर साम्राज्य राय उपाधि धारण किया हरियाणा राव उपाधी धारण किया हा इतिहासकार उनको यादव राजा ही कहते है मगर धार्मिक और अभिरा ट्राइब के अनुसार उनको यादव नही कह सकते उनको मराठा ही माना जाता है अब बहुत लोग कहते है शिवाजी महाराज की माता यादव थी उनके विवाह भोषले से हुआ था अब सवाल ऐसा हुआ तो शिवाजी महाराज तो जैविक रूप से यादव हुवे क्यों की वेद के अनुसार यादव आर्यन है और हेल्पोग्रूप डीएनए टेस्ट के अनुसार अहीर में 65%आर1ए1 जीन है जबकि मराठा और राजपूत में मात्र 30%ही है अब संतान में तो माता पिता दोनो का जीन बराबर जायेगा ना तो शिवाजी में माता के जीन 32.5% और पिता के जीन 15%ही हुआ जैविक रूप से तो यादव ही हुवे सायद यही कारण लोग शिवाजी की पहचान राजमाता जीजा से लोग करते है उनके पिता को बहुत कम लोग जानते है जीजाबाई ने शिवाजी को योद्धा बनाया और मराठा शामराज्य स्थापित किया शिवाजी महाराज मराठा ही माने जाते है यादव तो कानून के धार्मिक ग्रंथ के अनुसार राजा बनेगा ही नही वैसे भी ब्राह्मण कहते है ब्रह्मा से सब पैदा है तो भाई ब्रह्मा की पत्नी अहीर कन्या वेदमाता गायत्री थी तो सारी दुनिया अहीर से पैदा हुआ ना दूसरा जगत जननी दुर्गा है तो मराठा भी जगत जननी दुर्गा भवानी से पैदा हुआ है तो दुर्गा तो अहीर कन्या ही है ना भाई अहीर एक आदिम जाति नस्ल है ये तो पंडित हजारी प्रसाद द्विवेदी ने अशोक के फूल में लिख दिया है अब भारत में उनसे बड़ा शोधकर्ता जाति का थोड़े है कोइ
Aher, Ahirrao, Ahire, Ahir, jadav, yadav = maratha surnames are legacy of devagiri yadav
Right...I'm also ahirrao(maratha)
@@ashishahirrao6834 hey bro r u yadav?
Ahirrao suryavanshi aahet.
Up bihar che shudra ahir aani maharashtra madhle ahirrao vegle aahet.
@@balajiyadav6650 brother up Bihar haryana mp have yaduvanshi Ahir rajpoot oo ke kahne bhadko nahi gopal rajvansh of Nepal was also Ahir king brother 👍👍🥰🥰⚔️⚔️
@@balajiyadav6650 😂😂😂aheer chandravanshi Kshatriya and synonyms to Yadav's.
The Yadav's of Maharashtra migrated from mathura so basically they are same as north
मराठा cast ..सिख/ लिंगायत यांच्या प्रमाणेच तयार झाली आहे.(म्हणून मराठा लोकांच्या रंग रुपात विविधता आढळते).बहिमन empire च्या काळात. महाराष्ट्रातील अनेक cast चे लोक जे 5 श्याह्या च्या सैन्यात होते त्यांना मराठा महणण्यात येऊ लागले .नंतर कालांतराने मराठा cast तयार झाली....🙏🔥🇮🇳😷
खरे आहे.
यात तत्थ्य वाटते. त्यात संकरसुद्धा झालेला असु शकतो.
यादव हे हिंदु आहेत. पण जातीने मराठा नाहीत. महाराष्ट्रात राहणारे सध्या चे यादव मराठा म्हणता येईल पण जातीने तर ते यादव च आणि यादुवंशी आहेत.
साहेब! इथेच सगळ्यांचा गैरसमज होतो आहे. यादव हे कुळ आहे. जात नाही. मराठा ही जात आहे. कुळ नाही. एका जातीत अनेक कुळातले लोक असू शकतात आणि एका कुळातले लोक देखिल अनेक जातीत असू शकतात. मराठा व इतरही अनेक जातीत अनेक कुळे सामावलेली दिसून येतात. तसेच यादव कुळ पण अनेक जातीत विभागलेले दिसून येते. या भारत देशात सर्वजण मिश्रवंशिय आहेत. हजारो वर्षांच्या इतिहासात इथे एवढी उलथापालथ झाली आहे की इथे कोणी असा दावा करू शकत नाही की मी कोणा एका शुद्ध वंशाचा किंवा विशुद्ध कुळाचा आहे. शुद्ध जातीचा असण्याचा तर बिलकूलच कोणी दावा करू शकत नाही. कारण सर्वच जाती अनेक कुळांनी आणि वंशानी मिळून बनलेल्या आहेत. त्यामुळे आपण सर्वच जणांनी आता शहाणे होण्याची गरज आहे. हे वंश, कुळ आणि जातीपातीतून बाहेर पडून बंधूभावाने राहण्याची गरज आहे. भारतीय हाच एक आपला वंश, हेच एक आपले कूळ, भारतीय हीच आपली जात, धर्म आणि एकमेव खरी ओळख आहे.
Yadav is kshtriya maratha
@@sangramranavoice7667 Jai shree krishna 🙏
All Kuls and Jati are Hindus only !!! ♥️
Yadav vansha ahe jaat nhi
जो स्वतःला शिव रायांचा मावळा समजतो ,, तो प्रत्येक मराठा आहे 🚩🚩🚩
𝐽𝑎𝑖 𝑌𝑎𝑑𝑎𝑣 , 𝐽𝑎𝑖 𝑀𝑎𝑑ℎ𝑎𝑣
𝐽𝑎𝑖 𝐷𝑎𝑑𝑎 𝐾𝑟𝑖𝑠ℎ𝑛𝑎
𝐽𝑎𝑖 𝑐ℎ𝑎𝑡𝑟𝑎𝑝𝑎𝑡𝑖𝑦 𝑠ℎ𝑖𝑣𝑎𝑗𝑖 𝑚𝑎ℎ𝑎𝑟𝑎𝑗 𝑘𝑖 𝑗𝑎𝑖
Me kshatriya Yadav (Ahir) Madhya Pradesh se hu or mere rishtedar aaj bhi Maharashtra ke Ourangabad , jalna , nanded , beed , nagpur , usmanabad , chandrapur , buldhana , Washim, akola , akot , Amravati, paratwada , me rahte hai or meri mummy bhi Maharashtra ke Amravati ( Achalpur ) se he or jaha yadav rajaon ke rajya huwa karte the to yadav log bhi wahi rahte chale gaye yaha tak ki Yadav samrat maharaja krishna dev ray ka samrajya Karnataka , Telangana , or odisa , Andra Pradesh waha tak tha to waha par bhi hamare rishtedar rahte he par aaj kal ke log to dusro ka itihas chura kar apna batane me lage he jada Marathi mere to samaj nhi aai par aapne sahi kaha yadav alag h Dhanyavad bhau aapka 🙏🚩🚩 Jay shri krishna Jay shivray 🦚🚩
I think you're confused between kshtriya yadav vansh and ahir/ gawli. Some decades back ahirs adopted this surname which didn't belongs to ahirs at all. No any yadav is connected to ahir, but there are some ahir kingdoms.
@@Maharashtriktell the relationship of nandbaba and vasudev
What a nice video.. loved your narration and balanced approach.. thanks for sharing 👍
Glad you liked it! 🙏
आम्ही सुर्यवंशी क्षत्रिय 96 कूळी चव्हाण - पाटील. आमची वंशावली ही सांभर राजस्थान ची आहे. आमचे पुर्वज सांभरीया चौहान होते. कूलदेवी शाकंभरी माता.(राजस्थान) (आम्ही राजपूतवंशी मराठा. शुध्द 96 कूळी)😎😎
तुमच्याकडे वंशावळी उपलब्ध आहे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.
Amhi suheldevanche vanshaj ❤️
आम्ही साळुंखे सोळंकी राजपूत आहोत मग
Tumche gav konte
@@yvishe1997 हो ❤️
तुम्हाला अजून अभ्यासाची गरज आहे.तुम्ही राजेनरेश जाधवराव यांच्याशी संपर्क साधा, संदर्भासह तुम्हाला योग्य माहिती मिळेल..यादव काळातील लेखावर जाधव उल्लेख असलेला संदर्भ त्यांच्याकडे आहे.. मराठा जातीच्या उल्लेखाचेही संदर्भ देतील ते
पहिला मुद्दा. सध्या मराठा कुळात असलेले जाधव यादवांचे वंशज नसावेत असे मी व्हिडिओमध्ये कुठेच म्हटलेले नाही. त्यामुळे तुम्ही जे संदर्भ देत आहात ते तपासून पाहण्याची काहीच गरज नाही. त्यांची गरज तेव्हा पडली असती, जेव्हा मी मराठा कुळातील जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज असू शकत नाहीत असे काही विधान केले असते.
दुसरा मुद्दा. शिवछत्रपती हे एवढे विलक्षण व्यक्तिमत्व आहे की एक काय चार जन्म अभ्यास केला तरी अजून अभ्यासाची गरज पडेलच. जेवढा शक्य होईल तेवढा अभ्यास चालूच आहे. तरी पण आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद.
तिसरा मुद्दा. राजे नरेश जाधवराव यांच्याशी बोलायला माझी काहीच हरकत नाही. चर्चेनेच ज्ञान वाढते. परंतु मी त्यांना ओळखत नाही. तुम्ही ओळखत असाल आणि ते बोलायला तयार असतील, तर कृपया त्यांची वेळ घेऊन मला कळवावे. माझा फोन नंबर व्हिडिओमध्ये आहेच.
आम्ही यादव देवगिरी चे सध्या साताऱ्यात आमचे गाव आहे माझे काका मला सांगत होते 6month's पूर्वी की आमच्या गावात शिवाजी महाराज चे घोड्यांचे तल होते आणि आमचा गाव चे यादव सुबेदार होते असे लिखित आहे असे मला सांगितले.
Konte gav
हो देवगिरीचे यादव क्षत्रिय-मराठाच आहेत कारण मी सुद्धा यादव कुळाचाच आहे आडनाव हे पदवी व गावानुसार बदलले परंतु वंशकुळ आहे ना यादवच आहे कारण कुळ गोत्र बदलता येत नाही देवगिरीचे यादव यांचे वंशज मी आहे माझ्याकडे मोडी लिपी मध्ये लिहिलेले जुने दस्तावेज आमच्या कुळाचा माहिती जतन केलेल्या हेळवी याच्याकडे आहे त्यामध्ये कुळ गोत्र कुळदेव कुळदेवी व इतर माहिती त्यांच्याकडे आहे
Thats Good
@@KimantuLive mi you dube var vanshavli baghitalibahe ti khari asel ka??
उत्तर वंशावळी कोणत्या नजरेने पाहता त्यावर अवलंबून आहे. इतिहास अभ्यासकाच्या की स्वत:च्या अहंकाराच्या?
आपण म्हणताय ' मराठा हा शब्दच पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये अस्तित्वात आला आहे ' मराठा शब्दाचा उत्पत्तीचे ज्ञानेश्वरी मधल्या पुरावा मी आपल्यापुढे मांडतो
माझा 'मराठाची' बोलू कौतुके ।
परी अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके मेळविन ॥
[ ज्ञानेश्वरी , अध्याय 6 ओवी क्र. 13 ]
आपण आपण आपल्या व्हिडिओला आकर्षक शीर्षक देऊन आपले दर्शक वाढवण्यापेक्षा आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात. इतिहासाचा चांगला अभ्यास करावा आणि मगच लोकांसमोर यावे. असे अक्कल शुन्य ज्ञान पाजळण्यापेक्षा आपण इतिहासाचा सखोल अभ्यास करावा !
पहिली गोष्ट व्हिडिओ जर नीट ऐकला असता, तस सहज लक्षात आले असते की व्हिडिओमध्ये चर्चा मराठा शब्दाची उत्पत्ती केव्हा झाली याबद्दल चाललेली नसून मराठा ही संज्ञा महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकसमुहाला उद्देशून वापरायला सुरुवात केव्हा झाली व रूढ केव्हा झाली याबद्दल चाललेली आहे.
तुम्ही जे ज्ञानेश्वरीतल्या श्लोकाचे वर उदाहरण दिलेले आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर चर्चा मराठा समाजाबद्दल करत नसून मराठी भाषेबद्दल करत आहेत. ज्ञानेश्वर वरील श्लोकात माझ्या मराठी भाषेची किती कौतुके सांगू? माझी मराठी भाषा अमृतालाही पैजेत जिंकणारी आहे असा मराठी भाषेचा महिमा वर्णन करत आहेत. मराठा समाजाबद्दल चर्चा करत नाही आहेत. त्यामुळे वरील श्लोकाचा या व्हिडिओच्या विषयाशी काही एक संबंध नाही.
मालोजीराजे भोसले, लखुजीराजे जाधव यासारखे सरदार जेव्हा दख्खन सुलतानांची चाकरी करून नावारुपाला चढले, तेव्हा महाराष्ट्रातील समाजाची एक वेगळी अशी विशेष ओळख निर्माण होऊ लागली व आज आपण जो मराठा शब्द वापरतो. तो मराठा शब्द खऱ्या अर्थाने प्रचलित झाला व तो खासकरून सुलतानांच्या पदरी चाकरी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातल्या लोकांना उद्देशून रूढ झाला. त्याआधी मरहट्ट, महारथी, महाराष्ट्रिक, नाग अशी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांची ओळख होती. पण कोणी महाराष्ट्रात राहणाऱ्या समस्त जनसमुहाला निखालसपणे मराठा संबोधले नव्हते.
तुम्हीच उगाच वडाची साल पिंपळाला लावून स्वत:ची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. दुसऱ्याची अक्कल काढल्याने आपली अक्कल वाढत नाही आणि विषयाशी काही एक संबंध नसणारे खोटे संदर्भ दिल्याने कोणी कोणाला पंडित पण म्हणत नाही.
तुम्ही जो श्लोक उदाहरणासाठी देता आहात त्याचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला चांगला ठाऊक आहे आणि त्या श्लोकाचा व श्लोकाच्या विषयाचा या व्हिडिओच्या विषयाशी मी वर म्हटले तसा काही एक संबंध नाही.
तेव्हा जरा टीका करताना किंवा ट्रोल करताना संदर्भ तरी नीट विचार करून विषयाशी संबंधित देत जा. कशाला उगाच हात दाखवून अवलक्षण करून घेऊन स्वत:ची पण इज्जत काढता आहात आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची पण वाट लावता आहात?
तुमच्यासारख्याच अर्धवट पुस्तके वाचणाऱ्या, अर्धवट व्हिडिओ पाहणाऱ्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या अर्धवटांमुळे मराठ्यांच्या इतिहासाची आज वाट लागलेली आहे.
खूप अभ्यास पूर्ण व्हिडीओ आहे..👍
आपले मन:पुर्वक आभार साहेब!
yadavs are true Maratha warriors
सभी यादव अहिर होते हैं भगवान श्री कृष्ण को अहीर की उपाधि मिली कालिया अहि यानी सर्प का दमन करने के बाद तथा बाद में कुछ यादव मराठा में शामिल हो गए कुछ राजपूत में और बहुत से जाट में
True
देवगिरीचे यादव आणि विजयनगर साम्राज्याचे संस्थापक यादव यांच्यातील अंतर स्पष्ट करणे आवश्यक आहे.
विजयनगरच्या साम्राज्याचे संस्थपक यादव आहेत हा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे साहेब?
The Yadavas of Devagiri were the descendants of Abhira king Ishwarsena
यासाठी काही अधिकृत प्रमाण मानता येईल असे अधिकृत कागदपत्र किंवा दस्तावेज आहेत साहेब?
सर यादव हे सर्व भारतात पसरले आहे, महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, असे संपूर्ण देशात पसरले आहे
खरं आहे.
होय. यादव ही एक शूर ,लढाऊ जात आहे. ते मूलतः up आणि बिहार चे यादव जे की गोकुळ, मथुरा, वृंदावन ई. ठिकाणचे . ते स्थलांतरामुळे भारतात सर्वत्र पसरले आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या नावाने ओळखले जातात. महाराष्ट्र आणि अंद्रप्रदेश मध्ये गोल्ला,ग्वाला,गवळी,यादव, गोलकर, गोल्लेवार ई. नावाने ओळखला जात.
@@vaibhavgumalwad3548 Bhai inko itne praman dege yeh bhagte aye ge haryana Ahirwal up mp me royal yaduvanshi Ahir have great history and ancestry and marshal history brother apka number mil sakta hai brother baat karege 🥰🥰🙏🙏
@@greekgod3974Ji ha North mei ahir and yaha Gavali h . Mai khud Yadav Gavali hu.
@@vaibhavgumalwad3548Mi Yadav Gavali ahe ani tumhi?
सम्राट जयामध के पुत्र राजकुमार विध्रव के नाम से बिध्रभ क्षेत्र हैं।। राष्ट्रकूट सहित्की का वंश है।। यादव हैं। कदम्वा या कदम यादव हैं।। गायकवाड़ यादव हैं।। चालुक्य, ककातिया, होयसाला यादव हैं।। अभीरा ,जाधव,यादव हैं।। कल्याण, विरार, शेऊना,संगमनेर, भिल्लम, भिक्कम, अशीरगढ, साम्राज्य ऐ सभी यदुकलवंशम ही। हैं।। वैदिक क्षत्रिय हैं।।आज का 70% मराठा समाज यदुवंशी हैं।।और विशेष महत्व की बात ये हैं।।हमारे महाराष्ट्र मैं रहने वाले लोगों बडे उत्साहित होकर खानदेश बोलते है।। ये बिल्कुल गलत है।। दुवारिका से सूरत, नासिक, धुलिया, मालेगांव, देवगिरी से हेदराबाद तक इस क्षेत्र का नाम कन्हादेश था।। कृष्णा देश।।जगृत होने की आवश्यकता है।।बैमिसाल इतिहास हैं।।अभीरा, अहीर, यदुकुलवंशियो का।।जय श्री कृष्ण।।
अभीरा, अहीर, यदुकुलवंशियो का इतिहास बेमिसाल है, इसमे बिलकुल कोई दो राय नही है श्रीमान! और दो राय हो भी क्यो? जिस कुल की उत्पत्ती भगवान श्रीकृष्णजी से बतायी जाती है, उसका इतिहास तो बेमिसाल होना भी चाहिये।
परंतु यह व्हिडिओ अभीरा, अहीर, यदुकुलवंशियो के इतिहास के बारे में नही है। यह व्हिडिओ आज के मराठा समाज में से कितने कुलों का डीएनए यादवों से मेल खाता होगा, इस बारे में है। आपने जो बात रखी, ७०% मराठा यादव है, उसमें भी सत्य का अंश कम ही है। आज की मराठा नस्ल बहोत सारे नस्लों के मिश्रण से बनी मिश्रित नस्ल है। इसमें ज्यादा से ज्यादा ८ से १०% ही यादव हो सकते है।
परंतु मराठाओं का इतिहास इतना गौरवशाली है और शिवछत्रपती जैसा दुसरा कोई आदर्श राजा दुसरी किसी नस्ल में भारत देश में प्रकट नही हुआ, इसलिये आजकल बाकी के नस्लों के लोग शिवछत्रपती और मराठा नस्ल पे अपना हक जताना चाहते है। इसमे सिर्फ यादव ही नही, राजपुत, कन्नडिगा, आंध्र, गुज्जर और भी बहोत नस्ले है। सच्चाई तो यह है की इन सब नस्लों का थोडा थोडा अंश मराठों में है। इसलिये कोई अपने आप को मराठाओं से जोडना चाहे तो उसमें कुछ गलत नही होगा, परंतु हर किसी को यह बात माननी चाहिये की मराठा अपने आप में एक अलग ही नस्ल है, और शिवछत्रपती मराठा नस्ल के ही राजा है।
जय श्री कृष्णा
असीरगढ़ के यादव के बारे में कुछ जानकारी हो लिंक हो तो देने की कृपा करें क्योंकि आशा अहीर कोई गडरिया बताया गया है और उसका उल्लेख कहीं नहीं मिलता आपके पास कुछ हो तो देने की कृपा करें असीरगढ़ बुरहानपुर मध्य प्रदेश
सर आमच्या दस्तावेज नुसार आम्ही यादवच आहे त्यामध्ये असा उल्लेख आहे की देवगिरीचे यादव कुळ 96 कुळी मराठा
चांगली गोष्ट आहे साहेब. पण कोणत्या दस्तावेजात असा उल्लेख आहे?
@@KimantuLive दर वर्षी आमच्या घरी हेळवी येतो मोडी लिपीत लिहिलेले दस्तावेज त्यांच्याकडे आहेत ते वाचून दाखवतात त्यामध्ये कुळ गोत्र व इतर माहिती सुद्धा आहे
छान. त्या दस्तावेजात मिळणाऱ्या माहितीचे समर्थन करणारे काही ऐतिहासिक पुरावे अथवा संदर्भ मिळतात का ते शोधा. म्हणजे तुमचा दावा शास्त्रशुद्धरीत्या एकदम पक्का होऊन जाईल.
जय माधव 🚩🚩🚩जय छत्रपति शिवाजी ⚔️⚔️⚔️ जय यादव 💪💪
#कौन_थे_देवगिरि_के_यादव_क्षत्रिय_मराठा_या_अहिर....?
_____________________________
आजकल देखा जा रहा हैं देवगिरि के यादवो को यूपी बिहार के अहिर अहिर घोषित कर रहे हैं। लेकिन देवगिरि के यादवो का युपी बिहार के अहीरो से कोई संबंध नहीं है। देवगिरि के यादव यदुवंशी क्षत्रिय मराठा थे।
देवगिरी का यादव राजवंश #भगवान_श्रीकृष्ण_जी के सीधे वंशज थे। इसका प्रमाण हमें यादवो के शिलालेखों से मिलता है। #रामचंद्र_यादव के दरबार में #हिमाद्री_पंडित नाम के प्रधान थे। उन्होंने इसवी 1260 में #राजप्रशस्ति नामक ग्रंथ लिखा उसमे उन्होंने यादवो की पूरी वंशावली लिखी है। जिसके दो विभाग किए हैं। पहले विभाग में #श्रीमन्नारायण_ब्रह्मदेव_ऋषि_अत्री से लेकर भगवान श्रीकृष्ण जी तक की वंशावली दी गई है। और दूसरे विभाग में भगवान श्रीकृष्ण जी से लेकर देवगिरी के यादवो तक की वंशावली दी गई है। उस वंशावली में भी हिमाद्रि पंडित ने देवगिरि के यादवो को यदुवंशी क्षत्रिय मराठा ही कहा है।
मथुरा से सारे यादव भगवान श्रीकृष्ण जी के साथ द्वारका आए और बाद में जब द्वारका समुंदर के पानी में डूब गई तब बचे हुए यादव महाराष्ट्र के नासिक में आए तब #दृढ़प्रहार_यादव ने नाशिक के #चंद्रादित्यपुर को राजधानी बनाया इन्ही दृढ़प्रहार को देवगिरि के यादवो का मूल पुरुष भी माना जाता है। चंद्रादित्यपुर को आज #चांदोर कहां जाता है। बाद में #सेऊनचंद्र_प्रथम ने इसवी 860 में राजधानी को चंद्रादित्यपुर से नासिक के #श्रीनगर में स्थानांतरित किया श्रीनगर को आज #सिन्नर कहा जाता है। राजा भिल्लमदेव पंचम ने 1185 में राजधानी को नासिक के श्रीनगर से #देवगिरी मे स्थानांतरित किया। जिसे आज दौलताबाद कहा जाता है जो कि महाराष्ट्र के संभाजीनगर (औरंगाबाद) जिले में स्थित है।
#रामचंद्र_यादव के समय में देवगिरी पर विदेशी इस्लामिक आक्रांता अलाउद्दीन खिलजी का आक्रमण हुआ और उसने धोखे से रामचंद्र यादव को हरा दिया उस समय उनका भाई महादेव आधे से ज्यादा सेना लेकर दक्षिण दिग्विजय करने गया था इसका ही फायदा अलाउद्दीन खिलजी ने उठाया और धोखे से देवगिरी पर कब्जा कर लिया।
बाद में बचे हुए यादवो को देवगिरी छोड़कर भागना पड़ा और वह सब महाराष्ट्र के विदर्भ प्रांत में आज के बुलढाणा जिले में जाकर बस गए वहां पर उनका अपभ्रंश यादव से जाधव हुआ। रामचंद्र यादव के पुत्र शंकरदेव - गोविंददेव - ठाकुरजी - भूकनदेव - भूतजी - अचलोजी विठ्ठलदेव - लखुजीराजे जाधव (1550) जो की छत्रपति शिवाजी महाराज जी की माता #जीजामाता के पिताजी थे। #लखुजीराजे जाधवराव यह देवगिरि के यादवो के सीधे वंशज थे।
देवगिरि के यादव यदुवंशी क्षत्रिय मराठा थे उनकी राज्य भाषा मराठी थी उनके शिलालेख में वह खुद को यदुवंशी क्षत्रिय मराठा कहते हैं। राजप्रशस्ती में भी हेमाद्रि पंडित ने देवगिरि के यादवो को यदुवंशी क्षत्रिय मराठा ही कहा है।
आपके अभिप्राय के लिये धन्यवाद श्रीमान. आपने आपके अभिप्राय में बहुत ही ज्ञानपूर्ण और सोच को बढावा देनेवाली बाते कही है। पर में आपसे विनम्रतापुर्वक निवेदन करना चाहता हू की आपने जो विचार और तथ्य रखे है, वो इस व्हिडिओ के विषय से मेल नही खाते. आप जो बाते कह रहे है वो अपने आप में ही एक चर्चा और बहस का स्वतंत्र विषय है। इस के उपर बात करनी होगी तो एक व्हिडिओ अलग से बनानी पडेगी।
आप से बिनती है की आप इस विषय में अपना ज्ञान बढाते रहिये और समस्त तथ्यों को उजागर कर के एक व्हिडिओ बना कर जनता के सामने पेश किजिये। हाल-फिलहाल में दुसरे शोधकार्य में व्यस्त हू। चाह कर भी आप ने उपस्थित किये हुये विषय पे अभी कुछ खोजबिन या फिर अभ्यास नही कर सकता। इसलिये अभी के लिये में आप का क्षमाप्रार्थी हू।
श्रीमान जी नमस्कार आपने जो जानकारी दि बहुत ही शानदार है असीरगढ़ बुरहानपुर मध्य प्रदेश में स्थित है उसमें आशा अहीर का जिक्र आता है फरिश्ता कहता है कि आशा अहीर वहां पर एक गडरिया के रूप में थे और उनके कब्जे में असीरगढ़ था उसके बारे में कुछ जानकारी आपके पास में है क्या हे तो देने की कृपा करें धन्यवाद
Bhai साहब सारे yadav और सारे अहिर ek hi hai भले वह kahi ke भी ho sirf उनकी भाषा कि बदलावं hua hai kyu कि koi bhi कास्ट ho vah sare desh me ghume थे और vahi पे रेहने लगे और rahi bat यादवो ki ye श्री कृष्णा जी ke sath pure desh me yadav ko फैला diya था और दिमाग me dal lo ki sare yadav और अहिर ek hi hai अहिर ek पदवी hai jaat nahi संस्कृत se अभिर ka जाके बादमे अहिर हुआ
🙏⛳जय शिवराय⛳🙏
🙏🌷 जय महाराष्ट्र🌷🙏
खुपच छान माहिती मिळाली.
कोटी कोटी धन्यवाद साहेब.
मौर्य व मोरे यांच्या बद्दल काही
माहिती मिळाली तर बरे होईल. कृपया
हो साहेब! त्या विषयावर लवकरच व्हिडिओ बनवणारंच आहे. तोपर्यंत इतर व्हिडिओ पाहून घ्यावेत ही विनंती. प्रतिक्रियेबद्दल आपले मन:पूर्वक आभार
Jay Yaduvanshi
Jai Shree Krishna
108 कुळी क्षत्रिय धनगर समाज कोकणात असणारे क्षत्रिय भंडारी तसेच कित्ते भंडारी सोमवंशी क्षत्रिय वान माळी ज्या मध्ये भाई ठाकूर फेमस नाव बरेच आहेत दुसरे ही जवळ पास बऱ्याच जातीत क्षत्रिय पोट जाती आहेत महाराष्ट्र ही भूमी क्षत्रिय ओळखली जाते तसेच किनार पट्टी वर सूर्यवंशी क्षत्रिय सोन कोळी तसेच वनमाळी स माजातील राजे ही होते तसेच पैठणचे शालिवाहन राजे हे कुंभार समाजाचे होते तिथे ते शोभा यात्रा ही काढतात त्यांच्या बद्दल काही खरी खोटी माहिती मिळत नाही जव्हार तालुक्यातील राजे हे मुकणे आदिवासी महादेव कोळी राजे आहेत आज ही आहेत त्यांचे वंशज. यादव.राजे क्षत्रिय गवळी समाजाचे होते यात किती तथ्य आहे प्रत्येक जातीत लिंगायत आणि क्षत्रिय आणि 5ते7 पोट जाती आहेत महाराष्ट्र राज्य किंवा पूर्ण भारत हा मिश्र वंशी आहे हे तर त्रिवार सत्य आहे.
सातवाहन स्वतःस ब्राह्मण म्हणवतात मग ते कुंभार कधी झाले?
आजकाल सगळ्यांनाच क्षत्रिय बनायचं आहे😂धनगर, माळी,कोळी क्षत्रिय आहेत मग उरलाच कोण. थापा पचतील अशाच माराव्या या लोकांनी.
७व्या शतकात चीनचा प्रवासी युआनत्संग भारतात आला होता.त्याने केलेल्या वर्णनात मरहट्टा शब्द आढळतो. त्याने येथील लोकांचे वर्णन केले आहे कि कणखर व रंगाने सावळे होते.ते दिहल्ले ,घेतहल्ले असे शब्द वापरतात.बाराव्या शतकात चक्रधर स्वामी,म्हाइंभट , ज्ञानेश्वर यांनी मराठीचे कौतुक केले आहे, ज्ञानेश्वरी लिहिली आहे.
मरहट्ट आणि मराठा यातील फरक
ruclips.net/video/m-COR9ngdBA/видео.html
Maratha The Great Warrior
जय श्री राम
जय श्री कृष्णा
हर हर महादेव
देवगीरीचे यादव हे श्रीकृष्णाचे वंशज मानले जातात यांना यादव कींवा जाधव म्हटले जाते
आणि यांची कुलस्वामिनी श्री विंध्यवासिनी कींवा योगमाया ही मानली जाते
गुजरात मधील यादव/जाधव हे हरसिद्धी देवीसिंह आपली कुळदेवी मानतात
असे बऱ्याच यादव/जाधवां कडुन ऐकायला मिळते
एवमाश्वास्य पितरौ भगवान् देवकी सुत:।
मातामहं तु उग्रसेनयदूनाम् अकरोतन्नृपम्।१२
आह चास्मान् महाराज प्रज्ञाश्चाज्ञप्तुमर्हसि ।
ययाति शापाद् यदुभिर्नासितव्यं नृपासने ।।१३ श्रीमद्भागवत पुराण दशम् स्कन्ध ४५ वाँ अध्याय
कोई भी यादव जो राजा बनता है उसको यादव समाज अपने समाज से बाहर कर देता है श्रीकृष्ण को जब लोग कंस के मरने के बाद राजा बनाना चाहते थे तो श्रीकृष्ण ने यही कहा था जाओ एक बार द्वारका वहा पूछो कितने गज का ध्वज होता है और हर कुछ घंटे में धवज क्यों बदला जाता है यादव राजा नही बनता कभी गणतांत्रिक शासन करते है।
Yadavan madhe mul gotr 64 ahe aani total gotr 1700 ahe
मराठवाड्यामध्ये जे पूर्वी यादव होते ते आत्ताचे जाधव आहेत जावळीचे मोरे हे पूर्वी मौर्य वंशाचे आहेत भोसले घराणे राजस्थानमधील सिसोदिया वंशाचे आहेत यावर आपण सविस्तर माहिती सांगावी
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
तुमचा अभ्यास आणि विद्वत्ता दोन्ही चांगले आहे....तुमचा विडिओ समजण्यासाठी..... इ.स.पु १५०० पासुन आता पर्यंत चा इतिहास , तसेच वेगवेगळ्या राजवटी आणि आक्रमणे , माहित असणे गरजेचे......समाजशास्त्र , मानववंशशास्त्र थोडी फार माहिती पण आवश्यक .....आपलया सांगणयातील काही गोष्टी जर व्यवस्थित समजुन घेतलया .....तर समस्त भारतीय लोकांसाठी तो एक चांगला धडा असेल......काही प्रशनांची उत्तरे पण यात मिळतात....धन्यवाद....
एवढ्या छान व मार्मिक प्रतिक्रियेबद्दल आपले मन:पूर्वक आभार साहेब
यादव राजे देवराय ही उपाधी लावत. त्यांचे काही सैनिक देवरै म्हणजेच देवरे होत. खांदेशात देवरे आडनावाचे मराठा पाटील आहेत.
मी पण खानदेश चां धुळे चां आमचे relative मराठा आहेत deore आहेत ते पण
आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी काही अधिकृत प्रमाण कागदपत्रे आहेत साहेब?
साहेब माझं surname जाधव आहे. सांगली जिल्हा तासगाव तालुका .
कुलदेवता यल्लंबा देवी कर्नाटका.
आम्ही पण यादव कूळ मध्ये येतो का??
माझ्या मते नाही साहेब. अधिक माहितीसाठी कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
भिल्लम देव यादव व पुढील वंशाची आणि त्यांच्या पराक्रमाची माहीती मिळेल?
ठीक आहे साहेब! आपण कालानुक्रमाने व्हिडिओ बनवत आहोत. या विषयाचा व्हिडिओ बनवला की कळवतो.
ruclips.net/video/trvlT09aae4/видео.html
Jai ho yaduvanshi Aalha Udal ko sat sat naman
मुळात देवगिरीच्या यादवांची भाषा मराठीच होती आणि बाहेरील प्रांतातील लोक मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांनाच मराठा म्हणत असत. एवढी सरळ गोष्ट आहे तिच्यावर एवढा research करण्याची आणि या गोष्टीचा एवढा उहापोह करण्याची गरजच नाही 😀. मराठी लोकांनी जातीवाद सोडून भाषेला महत्त्व द्यावे. जे आपली भाषा बोलतात ते सगळेच आपले आहेत कारण ते महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. युरोपियन लोकांनी native American लोकांना संपवून अमेरिका बळकावली तसे हाल महाराष्ट्राचे व्हायला नकोत बास एवढेच.
प्रस्तुत व्हिडिओमध्ये देवगिरीच्या यादवांची भाषा मराठी होती का नाही? याबद्दल चर्चा चाललेली नसून, शुद्ध स्वरूपात व आजच्या शुद्ध मराठी भाषेत आपण जो हा एक 'मराठा' शब्द वापरतो, तो महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकसमुहाला कधीपासून वापरला जाऊ लागला? एत्तदेशीय व परकिय लिखाणात व व्यवहारात केव्हापासून रूढ झाला? याची चर्चा चाललेली आहे. यादवकालीन मराठी भाषा हा एक वेगळा स्वतंत्र पीएचडीचा विषय होऊ शकतो. त्यामुळे त्यावर चर्चा करायची असेल तर एक वेगळा व्हिडिओ बनवायला लागेल.
राहता राहिला महाराष्ट्राच्या भुमीपुत्रांना बाजूला सारून महाराष्ट्र बळकावण्याचा, तर त्याला अनेक गंभीर गोष्टी कारणीभूत आहेत. आपले शिवछत्रपतींच्या विचारांचे अनुयायी व्हायचे सोडून पुतळ्यांचे आणि सोहळ्यांचे गुलाम होणे, हे ही एक महाराष्ट्राचे आणि इथल्या भुमीपुत्रांच्या अध:पतनाचे महत्वाचे कारण मानता येऊ शकेल. नाही का?
Proof please. Post link of any book or Name of book to purchase and read about this. I am really intrested to go in deep to this topic.
मी कदंब राष्ट्र्कु आहें आणि मूळ हे कर्नाटका बनवासी आहें आणि महादेव कोळी आनी आत्ता क़दम कर्दम कदंब ही आडनावे। महाराष्ट्रत आहेंत
कदंब राजवंशाची स्थापना व मूळ आजच्या कर्नाटकात आहे हे सत्य आहे. बाकी महादेव कोळी व कदम याविषयी आपण जे बोलता आहात, ते मोघमपणे मान्य करायला काहीच हरकत नाही. पण काही वंशावळ्या, गोत्र, देवक व इतर कागदपत्रे अभ्यासासाठी कोणा कुटुंबाकडे उपल्ब्ध झाली, तर मग खात्रीने त्यांचा संबंध कदंब राजवंशाशी जोडता येऊ शकेल.
यादव हिंदू धर्मीय आहेत म्हणून विषय सोडून द्या .. खूप हेमाडपंथी मंदिर यादव काळातली आहेत
हे सत्य आहे.
जय श्री राधे कृष्णा 🚩🚩🚩🚩🚩
Yadavas used kannada as their official language...
Why are you claiming others history as your own???
Its true Yadava used Kannada Langugage in the begining of their period. But later it changed to Marathi and Marathi become prominent languge of Yadavas for later generations.
So Its not important what any dynesty at the start. Important is what was it become in at the end.
@@KimantuLiveshivaji maharaj came from Karnataka his own language was kannada then they use marathi ......they was a ahir yadav.....
Simplification
Kshatriya living down the Narmada river speaking marathi language were Maratha and 96 kuls are 96 kshtriya dynasties of Bharat together form 96 kul of Maratha
Edit :- extra info
Sisodiya become sisode
Chalukya became Chalke, Marne, sarkale etc
Solanki become salunkhe ,solankhe
From shinde it became shindiya in north
Patil become patel
We are one all hindus from the world and from great Himalayas to great hindmahasagar from gandhar to bangal from burma to Gujarat🔥
Jay shree ram
Jay hindurashtra
Jay Akhand bharat 🔥
Jay Shivrai
Sisodiya themselve originated from Sisode Maratha
धन्यवाद अभ्यासपूर्ण व्हिडिओ आजुन करत रहा माहिती मिळाली
नक्कीच. परत एकदा आपले आभार!
मि पण मराठा आहे माझे आडणाव कोरडे आहे आसईच्या युद्घात द्वत्तीय मराठा आग्ल या च्यामध्ये माझे पुर्वज होते त्या युद्धानंतर आमचे आडणाव कोरडे पडले त्याच्या अगोदर माझे आडनाव सुर्यवंशी होते आणी ते राज्यस्थान मधून येथे व्यापार काण्यासाठी आले होते ही माहिती आमच्या पुर्वीच्या भटाकडे लिवलेली आहे
फक्त एक नोंद असेल तर विश्वसनीय मानता येणार नाही. पण भटाकडे तुमच्या पुर्वजांची वंशावळी व नावे असतील तर दखल घेता येईल. ही वंशावळी व गोत्र, देवक वगैरे इतर गोष्टी इतर मानक कागदपत्रांशी जुळाल्या, तर मग विश्वसनीय मानता येईल.
Wrong information, more than north Indian rulers South Indian rulers more particularly from Karnataka have ruled in western, konkan and marathvada region and chalukya empire is most important in one of them which you have missed out. You need to do more study. Your study is more inclined towards north Indian history whereas maharashtra is more connected with Karnataka and andhra.
Dear Sir,
My Study is not inclined to north Indians. The topic of this video inclined to. I always also mentioned the contributions of Satvahana, Andhra, Hoyasala, Kadamba in Maharashtra History. But unfortunately, it's very little written in history about these dynasties compare to north Indian dynasties. And what was written in south Indian and English language. Very little available to read in Marathi even me too.
So due to unavailability of right source in local language very little people know about topics you mentioned. Even when I try to search good book on Chalukya in marathi, I can't find it. It's not the case about Mourya, Gupta, Rajput, or Yadavas. I used to read English but a lot of common people do not. It's the root of the problem.
So people know little about southern dynasties due to the unavaiblitiy of a good resource book, it's not my fault. What can I do?
Hope you will understand.
Thanks & Regards
जिजाऊमातेचे आजोळ कोणते होते,लखुजी जाधवराव यांचे नातेवाईक ,येसूबाई राणीसरकार यांचे खरे माहेर याविषयीची माहिती घेतली तर आणखी वेगळी माहिती मिळेल
तुम्ही हा प्रश्न विचारता आहात म्हणून विचारतो आहे. तुमच्याकडे या प्रश्नाच्या अनुषंगाने काही वेगळी माहिती आहे का?
साहेब तुमचा इतिहास कच्चा आहे मराठा समाजाचा उल्लेख हा सम्राट अशोक च्या पत्रात आणि चिनी प्रवास वर्णनात मराठा अढळतो
साहेब! तुम्ही पण ज्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देता, त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्याआधी तो व्हिडिओ पूर्ण नीट व्यवस्थित ऐकण्याची व त्यावर चिंतन, मनन करण्याची बिलकूल तसदी घेत नाही हे स्पष्टच दिसते आहे. कारण तसे असते तर अशी उचलून जीभ टाळ्याला लावली नसती.
कारण व्हिडिओमध्ये मराठा समाजाचा उल्लेख प्रथम कुठे आढळून येतो याबद्दल चर्चा चाललेली नसून 'मराठा' हा शब्द महाराष्ट्रात राहणाऱ्या समाजाला उद्देशून कधी पासून वापरला जाऊ लागला, याबद्दल चालली आहे. सम्राट अशोक आणि ह्युएन त्संग या चीनी प्रवाशाने कुठे 'मराठा' हा शब्द वापरल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही. तुमच्या कुठे वाचण्यात आले असेल आणि तुमचा अभ्यास याबाबतीत पक्का असेल, तर तुम्ही तो संदर्भ सादर करा आणि इतिहास संशोधनात स्वत:चे नाव अमर करा.
तुमच्यात तेवढी पात्रता दिसून येतेच आहे तुमच्या प्रतिक्रियेवरून. संदर्भ द्या आणि सिद्ध करा.
कृपया इस वीडियो को हिंदी में भी बनायें, ताकि हमलोग भी समझ सकें!
OK Sir
*अतिशय उत्कृष्ट अभ्यासपूर्ण आणि निःस्वार्थ भावनेने दिलेले अप्रतिम उत्तर, अगदी माझ्या अभ्यासाप्रमाने सुद्धा खूप आनंद झाला सर तुमचा व्हिडिओ बघून. तुमच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा !!*
आपले मन:पूर्वक आभार साहेब!
Me devagiri chya yadavacha vanshj ahe
Ayush aher (ahir =aher)
मुझे मराठी नहीं आती तो आप मुझे केवल ये बता सकते है की देवगिरी के यादव गवली अहीर थे।
इतिहास में कभी कभी चाह कर भी सभी बातों के यथोचित प्रमाण ढूंड पाना संभव नही हो पाता है। क्यों की बहोत से प्रमाण समय के साथ खो जाते है। अगर आप इतिहासकार की नजरिये से चीजों को देखते हो तो किसी भी ऐतिहासिक चीज के उपर बात करने के लिये, आप के लिये साधार साक्ष्य, तथ्य और प्रमाण बहुत ही जरूरी हो जाते है। आप ने जो प्रश्न किया है उसका उत्तर समय के चक्र में कही खो गया है। अगर आप किसी भी इतिहासकार से पुछोगे तो उचित साक्ष्य, तथ्य और प्रमाण के अभाव की वजह से देवगिरी के यादव गवळी अहीर थे ये कहना, और गवळी अहीर नही थे ये कहना, दोनों ही उचित नही होगा। मेरे विचार में इस विषय में अभी और संशोधन की जरुरत है।
प्राचीन काल मे यादव यदुवंशियों को कहा जाता था |
आज के अहीर 19 शताब्दी के बाद से यादव लगाना चालु किये हैं और अपने आप को यदुवंशी कहते हैं|😅
ये अहीर, देवगिरि के यादव (जाधव) के साथ कल्चुरियो को भी अपना बताते हैं जो की गलत हैं
देवगिरि के यादव आज के जाधव हैं और कल्चुरी की चार शाखा हुई
1त्रिपुरी के कल्चुरी
2महेसमती के कल्चुरी
3 रतनपुर के कल्चुरी
4 रायपुर के कल्चुरी
मैं रायपुर का कल्चुरी हु, रायपुर के लास्ट कल्चुरी शासक अमर सिंह देव थे जिन्हे मराठा शासक रघु जी ने 1750 मे हरा दिया था और पास के ही 5 गांव दिये थे जो बड़गांव, मुद्हेना, नंदगांव, फिंगेशर, गोईंदा ये गांव है | आज भी उनके वंशज इन्ही गांव मे रहते हैं मैं उनमे से एक हु|
हमारा इन अहिरो से कोई लेना देना नही हैं | हमारा दूसरे वंश के क्षत्रियों के साथ वैवाहिक संबंध बनते है | ये अहीर अपने आप को यदुवंशी क्षत्रिय कहते है और आपस मे शादी करते रहते हैं 😅😂🤣
Bhai gawali yadavo ka gotra hai but upnaam ahir hai jo ki paryayvachi word hai
@@political_ahiryadav/ jadhav is yaduvanshi kshtriya.
Gawali/ ahir has no relation with us
We come under general category.
Gawali/ ahir come under obc
Sir nice video 👌👌bt bhartatil yadav yaduvanshi yavr video bnava 🙏
हो बनवतो आहे लवकरच मॅम.
@@KimantuLive tq sir🙏
मैडम यदुवंशी अलग अलग क्षेत्र मैं अलग अलग सर नाम लिखते हैं।।कारणवश हम लोग भृमित होजाते हैं।।Gavali, Yadav, Abhira, Rashtrakoota,Ahir, यदुवंशी हैं।।बैमिसाल इतिहास हैं।। एक इतिहास कार हैं।।सुम्नत कुमार, और रोही,4वैदो,18पुराणों से एक बुक लिखी हैं।।अभीरा, गवली, यादव, उसकों आप अवश्य पडे।। यदि आप चाहें तो मै सुम्नत कुमार का फोन नम्बर दे सकता हूँ।। आप डारेक्ट अपने पत्ते पर मगा सकते हो।।
Isme koi sak nahi yadav , ahir same hai. Vedic time se yadav ko ahir ke roop me pukara jata aa raha hai. Chahe wo yayati ho ya fir yadu ho ya fir Aahuk ho ya Krishna ho. Yadhu aur bhagwan Krishna ko gop gwala aur kaliya nag marane par ahir bhi kaha gya hai . Yadu ne bhi vishalkay nag ko mara tha isliye unhe ahir kaha gya . Aahuk bahut hi pratapi the nirbhik the isliye unhe bhi ahir kaha gya aur unke vanshaj ahir as yadav lagane lage.
ततस्ते पापकर्माणो लोभोपहतचेतस: । आभीरा मन्त्रामासु: समेत्याशुभ दर्शना: ।। ४७। अर्थात् उन पापकर्म करनेवाले तथा लोभ से पतित चित्त वाले !
Fir bat aati hai ki Mahabharat me aesa kyu likha hai abhir ne yadav stree ka apahran kiya Arjun jab le ja rahe the. Yahi bat barahwi Satabdi me abhir sabd ke isthan par gop ka use hua hai.
"सो८हं नृपेन्द्र रहित: पुरुषोत्तमेन । सख्या प्रियेण सुहृदा हृदयेन शून्य: ।। अध्वन्युरूक्रम परिग्रहम् अंग रक्षन् । गौपै: सद्भिरबलेव विनिर्जितो८स्मि ।२०।
To aesa kyu isse shlok se ye sabit hota hai ki gop abhir ahir ek hi hai aur yadhu Krishna ko rigved me gop namo se sambodhit kiya gya hai. To lootane wale koi aur nahi yadav hi the jinpar sarap ka prabhav tha jinko Arjun ne haraya . Isiliye Arjun unko dwarka se leke indraprastha ki taraf le ja rahe the.
Ye hi abhir sabd ahir kahalaya jiska matlab nirbhay (fearless) hota hai . Gop gwala isliye yadav ko kahate the kyuki yadu , Krishna sabhi gayo ko palate the us samaj yahi unke dhanwan hone ka praman tha.
Sach to ye hai ki inme koi difference nahi hai tanik bhar bhi nahi. Lekin in sabke bad “rajput “ log ek hi bad karate hai 1924 ki jab all india mahasabha me sabhi ahir yadav surname lagane lage . Wo yadav hai isliye yadav lagate hai naki Bane hai . Rajputo ki purani aadat hai koi bhi mahan hua to unhe apni jati ka bata do . Wo sach janne ki koshish bhi nahi karate nahi unhe iski shram hai.
Rahi bat jo log kahate hai yadav shudra hai vaishya hai kshtriya hai to unhe ye bata dn ki yadu ne vachan diya tha ki wo kabhi raha nahi banenge isi vachan ko nibhate hue Krishna ya balram dono hi Raja nahi bane. Yadavo ne yadu ke vachan ka man rakhate hue kabhi chandravanshi nam use nahi kiya aur yaduvanshi use kiya usne bhi aaj ke rajput ghush rahe hai yadavo ko yadav na bolke.
Yadav ne kabhi varn vyavastha ko apanaya hi nhi . Isliye wo janma se to kshtriya hai lekin kisi bhi Varna me nahi nahi Braham nahi kshtriya nahi shudra aur nahi vaisya.
Swaym rigved me yadu ko aur Krishna ko kahi gop kahi detya (monsters) kaha hai . Because Brahmin can't tolerate any other cast to be more worshipped than their.
All india yadav mahasabha me ahir gop ko yadav surname diya nahi gya wo yadav Vedic kal se hai isliye yadav use karate hai . Nahi to koi bhi muh uthake yadav kahlata . Joki aaj ke rajput banane ki koshish kar rahe hai.
Aur Rahi bat jadeja ki joki kahate hai 2010 me court ne kaha wo Krishna vanshi hai to ye bat bilkul jhoot hai kyuki court me Jamin ka mamla tha court ke order me kahi bhi nahi likha ki jadeja Krishna vanshi hai. Likha kya kahi vansh tak ka jikara nahi hai usme . Ye sab bhi rajputo ke dwara failaya hua jhooth hai .
Ab ye kal aaye log yadvo ko yadav na kahake khud ko yadav kahalwa rahe hai .
Agar ye sach me yadav Hote to jagannath mandir dwar ye kholte naki yadav.
Ye sach hai kahi yadavo ko vaishya kaha gya hai kahi shudra to kahi kshtriya lekin yadav inne se kisi me bhi nahi aate ye bat alag hai wo janma se kshtriya hai. Isliye Mahabharat me bhi yadav wird use hua hai gop hua hai ahir hua hai naki kshtriya yadavo ke liye . Aur Krishna inhi jati me janma liye.
To ye dimag se nikal do ki inme kuchh bhi difference hai yadav kal ke aaye rajput nahi hai we Vedic kal se apni sahash aur bahaduri ke liye ahir kahalate aaye hai .
Agar isme kisi ko koi dikkat hai to wo pahale ved Vishnu puran aur Mahabharat geeta hai achhe se path kare . Sach to yahi hai ki ye manana hi nahi chahate isliye Bina Jane yadav ko yadav nahi mante.
Jo rajput ahir yadav ko oppose karate hai unhe “ahir no asaro" sentence ka history bhi dekhana chahiye tab pata chalega rajput ko bachane ke liye ahir ne khud ke bete ki kurbani dedi.
साहेब मी सुद्धा पवार आमचे आजी आजोबा आम्हाला सांगायचे कि आपण धार पवार आहोत.तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूर्वीच्या राजे महाराज्यांची आणि आता उपलब्ध असलेल्या आडनाव ह्यांची dna test कशी करतात. किंवा त्यांची आणि आपली dna same आहे ही कशी ओळखतात.
साहेब! हे इथे एका व्यक्तीचे किंवा घराण्याचे डीएनए टेस्ट करून कळणार नाही. त्यासाठी व्यापक प्रमाणावर सर्व समाजातून जे सर्व लोक धारचे पवार यांचे वंशज असल्याचा दावा करतात, त्या सर्वांचेच डीएनए सॅंपल घेऊन त्यात एखादा कॉमन जीन आढळतो का ते पहावे लागेल. जर स्वत:ला धारचे पवार असल्याचा दावा करणाऱ्या सर्व लोकांच्या डीएनए मध्ये त्या सगळ्यांना एकत्र जोडणारा सामायिक जीन सापडला, तर मग तो जीन आला कधी व कुठून याचा शोध घ्यावा लागेल. मग कळेल की धारच्या पवारांना जोडणारा तो एक सामायिक जीन नक्की कोणत्या वंशाशी संबंधित आहे. काम महाअवघड आहे. पण कोणी करायचंच म्हटलं तर अशक्य नाही. पहा कोणी स्पॉन्सर मिळाला या कामाला तर. आणि काही रिझल्ट मिळाला तर मला पण कळवा.
धन्यवाद. हो खरच आहे आणि कठीण सुद्धा सगळ्यांना समजवने म्हणजे डोक्याला ताप. पण असं कुठल्या वंशजाने केली आहे का टेस्ट
माझ्या माहितीत तरी नाही.
खूप खूप आभार खरी माहिती बद्दल ( नाहीतर लोक खोटाच बोलतात ) देवगिरी चे यादव हे मुळ चे मथुरा (यूपी ) येथिल होते . महाराष्ट्रात ऐवून अन्य माराठाशी लगीन गाठ बांधून मराठा झाले ...
सर! महाराष्ट्र व मराठा समाज इथे शासन करणाऱ्या अनेक मिश्र वंशांपासून बनलेला असून यादव देखिल त्यातीलच एक आहेत. आणि बाहेरून तर सर्वच इथे आलेले आहेत. त्यामुळे उगाच फक्त यादवांनाच त्याबाबतीत दूषण देणे योग्य होणार नाही.
@@KimantuLive मराठा ही जात नाही किंवा समाज नाही मराठा हा ग्रुरुप आहे .....तयत कदम हे खडंबा भोसले हे राजपूत मोरे हे मोर्य शिंदे हे non Aryan आणि आहेर , यादव हे यादव आहे .......पण याने काहीच फरक पडत नाही . मराठा जात नाही हा एक विचार आहे स्वातंत्र्याचा ,अभिमानचा ,
संघर्षाचा आणि गुलाम न होनायचा .
साहेव! तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेत ते सुंदर आहे. पण कोणी मानो अथवा ना मानो पण आजच्या तारखेला मराठा ही एक जात आहे. सरकार दरबारी कागदोपत्री लोक तशी नोंद करतात. आणि एकदा निर्माण झाली की कधीच नष्ट होत नाही तिला जात म्हणतात. जात नाही ती जात. त्यामुळे आता या विषयावर उगाच डोके आपटून काही उपयोग नाही.
@@KimantuLive हे स्पष्ीकरण नाही हा इतिहास आहे .....आपण DNA बदलू शकत नाही . जे लोक आपल्या ला आपले म्हणात असतील तर त्यांना आपन का आपले म्हणू नये .
कोणी आपल्याला आपले म्हणत नसेल तरी आपले म्हटले तरी काही हरकत नाही आणि आपले म्हणत असेल तर आपले म्हणायला कोणाची काही हरकत असायचे काही कारणच नाही.
Namaskar sir
You said absolutely right.
Thank You Very Much
Sir was kolhapur part of south india because there is mahalaxmi temple which is part of pilgrimage in south india ?
No. Kolhapur is part of Western Ghat in Maharashtra. 🙏
Migration ahe te bhau... Kolhapur is always part of Western Maharashtra ❤
Aprreciating the definition of MARATHA SAMAJ.Itihasache yogya mulyamapan kelyabaddal Abhinandan.
आपले मन:पुर्वक आभार साहेब!
आजही ब्राह्माणांचा आणि मराठांचा DNA वेगळे आहेत, कोब्रा चा DNA आजही European लोकांच्यशी मिळतो
साहेब! या व्हिडिओच्या विषयाचा ब्राह्मण, कोब्रा, युरोपिअन यांच्याशी आणि त्यांच्या डीएनएशी काही तरी संबंध आहे का? कमेंट तरी जरा आशय-विषय समजून करत जावा की राव! एवढाच तुमचा गुणसुत्र आणि जनुकीय शास्त्राचा प्रकांड अभ्यास आहे, तर मग बनवा की दहा व्हिडिओ या विषयावर तुमच्या चॅनेलला. अडवले कोणी आहे.?
कुठून ही तुम्हाला माहिती मिळाली वामन मेश्राम कडून काय?
@@sunsaxz maratha ani brahman aryian
बेळगावला माझे कदम आडनावाचे पाहुणे आहेत, त्यांचा इतिहास हा कदंब घराण्याशी निगडीत आहे.
सर, जगदंब हा शब्द जय कदंब पासून तयार झालेला असू शकतो का?
या बाबतीत नक्की काही सांगता येणे अवघड आहे.
नाही कदम साहेब जगदंब म्हणजे जग म्हणजे विशव आणी आदंब म्हणजे थोडक्यात आई पालनकरती त्यावरू जगाची आदिम आदी माया यावरून बदल होऊन जगदंब
जगदंब = जग = विश्व ,अंब = आई अर्थात जी विश्वाची आई आहे ती जगदंबा
आणि जगदंबेलाच जय जगदंब म्हणतात
कदंब हा वृक्ष आहे
आणि देवीस कदंबवनचारीणी म्हणजे कदंब वनात राहनारी म्हटले जाते
जगत अंब = जगाची आई
साहेब आपला अभ्यास कुठे तरी चुकत आहे माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली हे 1275 ते 1296 या कालखंडातील आहे त्याच्या वाग्मयात मराठा शब्द दिसत आहे आपण 16 व्या शतकात उडी घेतली
पहिला मुद्दा. तुम्ही म्हणता ते सर्व सत्य आहे साहेब. पण या गोष्टी भागवत धर्म, अध्यात्मिक काव्य, संत साहित्य, मराठी भाषा याच्याशी निगडित आहेत. हे विषय खरोखरच चर्चा करण्यासारखे आणि स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यासारखे आहेत. पण दुर्दैवाने तुम्ही बोलत आहात ते मुद्दे या व्हिडिओचा विषय नाही आहेत. या व्हिडिओचा विषय मराठा शब्दाची उत्पत्ती कधी झाली आणि देवगिरीच्याच्या यादवांना उद्देशून १२व्या शतकात हा शब्द वापरला जात होता का? इथपर्यंतच मर्यादित आहे. व तेवढ्यापुरताच हा व्हिडिओ पहावा ही विनंती.
दुसरा मुद्दा. तुम्ही ज्ञानेश्वरीतला जो दाखला दिला आहे. तो आधी देखिल आपल्या एका दर्शक मित्रांनी दिला होता, त्याला मी सविस्तर उत्तर आधीच खाली दिले आहे. वेळेअभावी परत इथे टाईप करत नाही आहे. आपण गैरसमज करून घेणार नाही आणि ते खाली जाऊन वाचाल अशी अपेक्षा आहे.
तिसरा मुद्दा. महाराष्ट्र शब्दाची शब्दाची उत्पत्ती अथवा राज्याची निर्मिती हा पण या व्हिडिओचा विषय नाही. म्हणून याबद्दल देखिल व्हिडिओत काही एक उल्लेख नाही. त्यामुळे याबद्दल कृपया इथे काही चर्चा करू नये. तो एक सर्वस्वी वेगळा चर्चेचा विषय आहे. तुम्हाला एखादा विषय मी पूर्णपणे उलगडून सांगावा व त्यावर माहिती द्यावी असे वाटत असेल, तर चॅनेलचे सभासद व्हावे ही विनंती. तुम्ही सांगाल त्या विषयावर तुमच्याशी चर्चा करून आपण एक चांगला व्हिडिओ बनवू शकतो.
फारच छान माहिती...धन्यवाद
आपले मन:पुर्वक आभार साहेब!
The Nashik Gazetteer states that in 246 BC "Maharatta" is noticed, as per the Mahavanso, as one of the ten places to which Ashoka sent an embassy,[1] and the word "Marhatta" (later used for the Marathas) is found in the Jain Maharashtri literature.[6] कृपया ह्यावर आपलं मत कळावे
त्यात जे काही लिहलं आहे ते खरंच आहे. पण ते जे काही लिहलं आहे किंवा म्हट्लं आहे ते त्या काळातल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना उद्देशून म्हटलेले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक काळात कित्येक स्थित्यंतरे व स्थलांतरे झाली आहेत. त्यामुळे त्या काळात राहणारे जे लोक आहेत तेच आज महाराष्ट्रात राहणारे लोक आहेत असे नाही. मराठा हा शब्द सोळाव्या शतकापासून आजपर्यंत महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व लोकांना आणि त्यातही जातीवाचक एका लोकसमुहाला वापरला जातो. सम्राट अशोकाच्या किंवा जैन ग्रंथ लिहले गेले त्या काळातल्या लोकांना उद्देशून नाही. शिवाय त्या काळातले लोक व आत्ताचे लोक यांची गुणसुत्रे देखिल जुळत नाहीत. म्हणून त्याकाळात महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना त्या काळात मरहट्ट किंवा अजून काही नावाने संबोधत असतील तर त्या नावाने ओळखावे व सोळाव्या शतकापासून आज महाराष्ट्रात राहणाऱ्या समस्त लोकसमुहाला मराठा नावाने संबोधावे हे इतिहासशास्त्राला धरून होईल.
कारण प्राचीन काळी इटलीत राहणाऱ्या लोकांना आजही रोमन म्हणतात व आज राहणाऱ्या लोकांना इटालियन म्हणतात. हे तसेच आहे. प्राचीन काळी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या प्राचीन नावाने (मरहट्ट किंवा अजून जे काही असेल ते) त्या नावाने ओळखावे आणि आजच्या अर्वाचीन काळात राहणाऱ्या लोकांना मराठा म्हणून ओळखावे. कारण कालचे रोमन आजचे इटालियन होऊ शकत नाहीत आणि आजचे इटालियन देखिल कालचे रोमन असू शकत नाहीत. तसेच पुर्वीचे मरहट्ट आजचे मराठा होऊ शकत नाहीत आणि आजचे मराठा देखिल कालचे मरहट्ट होऊ शकत नाहीत.
@@KimantuLive Sir It's "Maharatta" Mentioned in Ashoka Era,,,, not Marahatta,,, I think u just made spelling mistake in Marathi,,, See his coment also it's "Maharatta" By the way ur analysis is way beyond Neutral and unbiased,,,, Great sir
मरहट्ट आणि महरट्ट असे दोन्ही शब्द माझ्या वाचनात आलेले आहेत. यातला एक बरोबर असू शकतो किवा दोन्हीही बरोबर असू शकतात. किंवा वेगवेगवेगळ्या काळात काही अपभ्रंश होऊन वेगवेगळे शब्द झालेले असू शकतात. आपण त्याबद्दल आता काही ठामपणे सांगू शकत नाही. म्हणून वर प्रतिक्रियेमध्ये लिहताना पण मी (मरहट्ट किंवा अजून जे काही असेल ते) असाच उल्लेख केला आहे. तरीही प्रतिक्रिया एवढ्या बारकाईने वाचून सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सुचनांचे नेहमी स्वागतच आहे.
आम्ही पण गवळीगोपाळ हे यादवि वंशाति ल आहोत
Fir shinde title kyu lagaya h
चांगला प्रयत्न.
एक सूचना.
चॅनेलवर उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका. वेळ जातो उगाच. त्यापेक्षा आणखी सकस संशोधन करा. तुम्हाला शुभेच्छा.
आपले मन:पुर्वक आभार साहेब! तुमचे म्हणणे खरे आहे. सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर देता येणे वेळे अभावी शक्य नाही. मग व्हिडिओ बनवण्याचे सोडून तेवढे एकच काम राहिल करण्यासाठी.
खर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजस्थान मधुन किती पिढ्या आगोदर देवगीरीला आले होते..?
अचूकपणे नक्की तारीखवार कोणालाच सांगता येणे शक्य नाही. कारण तो काळ कुठेच कोणीच लिहून ठेवलेला नाही. अंदाज लावायचा म्हटाला, तर प्रत्येकाचा अंदाज वेगळा येणार. त्याला आता कोणी काही करू शकत नाही.
संपूर्ण भारतातून लोक महाराष्ट्र मध्ये आले होते त्यात yadav, jaat,, गुज्जर, राजपूत, इ
पहीले राजे हे शिवाजी महाराज हे आपले म्हणणे बरोबर आहे, त्याआधी कोणी मराठा राजा नव्हता, पण आपली इतर माहिती अपूर्ण वाटते.
ठीक आहे साहेब!
जी जातियाँ राज हर गयीं महाराष्ट्र में आगयी ये मराठा हैं. यादव झाधव बन गए, इनमे गुजार हैं इन्हे गुर्जर कहते हैं चौहान चव्हाण होगये.
विदर्भा नरेश यांची मुलगी रुक्मिणी श्री कुंष्णा बरोबर लग्न झाले त्यावेळी ते कोण होते महाराष्ट्रला 5000 वर्ष पूर्वीचा इतिहास आहे
पहिला मुद्दा. साहेब पौराणिक गोष्टी आणि ऐतिहासिक गोष्टी यात फरक आहे. इथे आपण इतिहासातल्या घटनांबद्दल चर्चा करतो आहोत. पुराणातल्या नाही.
दुसरा मुद्दा. या व्हिडिओमध्ये चर्चा मराठा शब्दाच्या उत्पत्तीची चालली आहे. महाराष्ट्राच्या उत्पत्तीची नाही.
वास्तवाचे विश्लेषण !
आपले मन:पुर्वक आभार साहेब.
Ami Mahar aahot amcha nav Jadhav aahe ani amachi kuldevta Hi Mahakali aahe. Asa ka
ऋषीचे कूळ व नदीचे मूळ विचारु नये म्हणतात साहेब. कारण यात इतके गोंधळ आहेत की नक्की काही सांगता येणे अवघड आहे. महाराष्ट्रात तर अनेक वंश, गोत्र व प्रवर चातुर्वणात समानच आहेत. म्हणून तर खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. कारण खंडोबा हे चारही वर्णातल्या लोकांचे कुलदैवत आहे. महार पण मुळचे हिंदूच आहेत. आजही महाराष्ट्रातले महार लक्षणीय संख्येने हिंदूच आहेत. सर्वच काही बौद्ध झाले नाहीत. त्यामुळे महार समाजातील आडनावे व कुळदेवता देखील हिंदू प्रथापरंपरांप्रमाणे काहीही असू शकतात. शोधला तर इतिहासही महाराष्ट्रातील इतर कुळांइतकाच महान असू शकतो. त्यात एवढे आश्चर्य वाटून घेण्यासारखे काहीही नाही आहे.
महार आणि मराठा यामध्ये खूप आडनाव common आहे याचं कारण काय??
या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देता येणे शक्य नाही. याबद्दल पुष्कळ विचारवंतांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत आणि वेगवेगळी मांडणी केली आहे. ते सर्व समजून घ्यायचे म्हटले तर मग एक स्वतंत्र व्हिडिओच बनवावा लागेल.
त्या काळात महार लोकांना काही लोक उगीचच त्रास द्यायचे आपल्याला त्रास होऊ नये म्हणुन लोकांनी त्या काळातील लोकांनी त्या गावात जे पुढारी लोकं असतील त्याची आडणाव लावायला सुरवात केली कींवा त्या काळात ज्याच्या घरी वर्षानुवर्ष लोकं कामं करायची त्या लोकांनीपण त्या मालकाच आडनाव वापरायला सुरवात केली
@@vandanadhumal8073chukich
@@vandanadhumal8073तुम्ही एखादं गाव सांगा जिथं महार लोकांनी तिथल्या पुढारलेल्या लोकांची आडनाव लावली?
अस कुठंही नाही एकाच गावात कधीच एकाच आडनावाचे जातीचे लोक नसतात.सगळ्यांचे वेगवेगळ्या आडनाव असतात. जास्तीतजास्त बाजूच्या गावात असतात ते मूळ गावातून स्थलांतरित झालेले असतात .
तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण गावावरून जात कळते जर तुम्ही म्हणले तसे असते तर तस झालं नसत.आणि तुम्हाला माहित आहे का?महार लोकही एकाच आडनावमध्ये लग्न करत नाही. तुम्ही म्हणले तस असत तर खुशाल त्यांनी लग्न केले असते कारण काही संबंधच नाही तर लग्न करायला काय समस्या एकाच आडनावात?पण तसं नाही म्हणून ते एक आडनावात लग्न करत नाहीत
@@kgdkgd4170जिल्हा सातारा, तालुका वाई, येथील गावे पांडे, बोपेगाव आणि खानापूर. या ठिकाणी मुळ गावकरी सर्व जातींचे लोक जाधव आडनावाचे आहेत. जाऊन स्वतः पडताळणी करु शकता.
Jai shree krishna
Jai Yadav jai madhav
Jai yadav king ramchandra dev ki
सुंदर , अभ्यासपूर्ण माहिती 👌👌
ज्यांची मातृभाषा मराठी तो प्रत्येक जण मराठी.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब. पण प्रस्तुत व्हिडिओमध्ये चर्चा कोणी मराठी आहे की नाही या संबंधाने चाललेली नसून, १२ व्या शतकात महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना आजच्यासारखे मराठा म्हटले जात होते का? किंवा त्या काळात आज जशी एक मराठा जात महाराष्ट्रात अस्तित्वात आहे तशी होती का? आणि त्यापैकी कोणाला शुद्ध 'मराठा' हा शब्द वापरला जात होता का? या संबंधात चर्चा करण्यात आलेली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे निखालस नाही अशी आहेत.
मराठीचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे आणि असायलाच हवा. पण इतिहाससंशोधन करताना डोळ्यावरची अभिमानाची झापडे बाजूला काढून ठेवली पाहिजेत. नाही तर धर्म, जात, भाषा, पोकळ दंतकथा आणि कल्पनाविलासात, सत्य आणि इतिहास दोन्ही अदृष्य होऊन जातात.
आधि मराठा समाजाची संकल्पना काय आहे ती...
मराठा हे सर्व एकच आहेत....
पण देवगिरीचे यादव काही राजपूत तर काही चालूक्य तर काही सातवाहन वंशज हे सर्व क्षत्रिय कम्युनीती मिळून मराठा छत्रपतींचा काळात किंवा आधी झाले असावेत...
यादव व चालुक्य यांचा संबंध आता लावु नका, यादव हे चालुक्य साम्राज्याचे मांडलिक होते...ज्यावेळी चालुक्य साम्राज्य क्षिण झाले तेव्हा यादवांनी स्वतः ला राजे घोषित केले....चालुक्य व सेन्द्रक वंशी शिंदे या़चा संबंध अगदी जवळचा आहे....
🙏🚩🚩राम राम
पुरे मराठा समाज द्वारा देवगिरि के यादव महाराजा पर विडियो बहुत ही अच्छी लगी बस्की हर मराठा पुरे मराठा समाज को यदुवंशी मराठा ही कह रहा है
शायद आपने व्हिडिओ ठीक से सुना नही है श्रीमान। यादव कुल की गरिमा अपने जगह है। पर मराठा एक मिश्रवंशिय वंश है। उसमें से कुछ के पुर्वज यादव हो सकते है। पुरे मराठा समाज को यदुवंशी नही कहा जाता।
@@KimantuLive श्रीमान यही तो मै भी कह रहा हूँ मित्र
आप देवगिरि साम्राज्य से जुडी मराठा समाज के कुछ वीडियो देख सकते हैं फिर आप मुझ से बात करे
@@KimantuLive मै आपके वीडियो से पूरी तरह से सहमत हूँ मित्र
किमन्तु ओंबळे तुम्ही कुठले सरकार याचा पण जरा इतिहास सांगा
तुमचा मराठा ह्या शब्दाच्या उत्पत्तीचा अभ्यास फारच तोडका आहे
पहिला मुद्दा. साहेब! माझा सगळा इतिहास नाव गाव, ईमेल, वेबसाईट, फोन क्रमांकासहित व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ नीट पाहिला तर सर्व काही समजेलच. तुम्हाला पण विनंती आहे. किमान डिस्प्लेला स्वत:चा ओरीजनल फोटो तरी ठेवा हा प्रश्न विचारण्याआधी. आणि तुमच्या यूट्यूब अकाऊंटला पण तुमची माहिती किमान ईमेल आणि फोन नंबर दिसू द्यात. त्याने प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विश्वासहर्ता वाढते. प्रश्न विचारणाऱ्याचे अकाऊंट फेक तर नाही ना अशी शंका मनात यायला जागा राहत नाही.
दुसरा मुद्दा. माझे ज्ञान मोडके-तोडकेच आहे. मी कधीही मोठा इतिहासकार असल्याचा दावा केला नाही. पण मराठ्यांच्या उत्पत्तीबद्दल तुमच्याकडे काही मोठे ज्ञान असेल, तर कृपया तुमच्या यूटयूब चॅनेलला एक व्हिडिओ बनवा. आम्हाला पण आपल्या थोर ज्ञानाचा थोडा लाभ होऊ द्यात.
@@KimantuLive youtube वापरण्याचं तांत्रिक ज्ञान आम्ही update करूच ती गरज आहेच नाहीतर गैरसमज चं रूढ करण्यात चाणाक्ष मंडळी यशस्वी होतात मराठा समाज आतापर्यंत त्याचाच बळी पडलाय
असो आपला हेतू शुद्ध नाही हे नक्की
पहिला मुद्दा. चाणाक्ष मंडळी गैरसमज रूढ करण्यात यशस्वी होतात हे सत्यच आहे. पण मराठा समाजात देखिल आता इतिहासाबद्दलची जागृती व ज्ञान वाढले आहे. इंटरनेटमुळे सहज संदर्भ वाचायला उपलब्ध होतात व कोणी आता इतक्या सहजतेने खोटे बोलू शकत नाही. बोलले तरी ते जास्त काळ टिकत नाही. लोकांना सर्व कळते.
दुसरा मुद्दा. आता हेतू शुद्ध आहे की नाही हे व्हिडिओ बनवून किंवा काही लिहून सिद्ध करता येणे अवघड काम. त्यामुळे त्याबद्दल इथे आता फार काही लिहित नाही. पण तुमचे माझ्याबद्दलचे मत ऐकून खेद वाटला. विनंती आहे आपण इतर व्हिडिओ पहावेत व येत राहणारे नवीन व्हिडिओ पण पहात राहावेत. जर भविष्यात कधी माझ्या विषयी आपले मत बदलले तर आनंदच होईल.
सर मराठा हा शब्द केव्हापासून जातिवाचक झाला ?
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने इसवी सन १९३१ मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. त्यामुळे कागदोपत्री का होईना 'मराठा' हा शब्द तेव्हापासून अधिकारिकरीत्या जातिवाचक झाला असे आपण म्हणून शकतो.
@@KimantuLive मराठा शब्द जातीवाचक व्हायला नाही पाहिजे होता कारण इतर अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार स्वत: मराठा असून देखील मराठा म्हणवु शकत नाहीत.
महाराष्ट्रात राहणारे सर्वच जण स्वत:ला मराठा म्हणवून घेऊ शकतात. महाराष्ट्रात कोणी मानले नाही तरी, महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातल्या जाती-पाती कोणाला माहित आहेत? आजही महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठा म्हणूनच ओळखले जातात. पंजाब प्रांतात राहणारा पंजाबी, काश्मिर मधला काश्मिरी, तसेच महाराष्ट्रात राहणारा तो मराठा.
राहिला प्रश्न जातीचा, तर जात नाही ती जात म्हणतात. ज्या दिवशी जात हा प्रकार आपल्या देशाचा आणि सर्वच धर्मांचा पिच्छा सोडेल त्या दिवशी या देशाचा स्वर्ग होईल. पण धर्म बदलला तरी जात इथे माणसांचा पिच्छा सोडत नाही हे भीषण वास्तव आहे.
त्यामुळे कोणी कशाला स्वत:ला जातीवाचक मराठा म्हणवून घ्यायचा हव्यास करायला पाहिजे? मराठा ही पण शेवटी एक महाराष्ट्रातल्या इतर जातीप्रमाणे एक जातच आहे. कोणी स्वत:ला असताना किंवा नसताना उगाच मराठा, ब्राह्मण, धनगर किंवा अजून काही म्हणवून घेण्यापेक्षा शाळेच्या दाखल्यांवरून आणि सरकारी कागदपत्रांवरून जातीचा कॉलमच कसा काढून टाकता येईल यासाठी प्रयत्न केले, तर सर्वच जण खऱ्या अर्थाने मराठा होतील. सर्वांचा इतिहास एकच. सर्वांची ओळख एकच. महाराष्ट्रात राहतो तो मराठा.
@@KimantuLive अगदी बरोबर बोलला तुम्ही पण मी जातीने मराठा नाही पण मी इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा समजतं की मी सुद्धा मराठा आहे. माझा असा तर्क आहे की जर मराठा शब्द जातीवाचक नसता तर किमान महाराष्ट्रात तरी जातीयवाद फोफावला नसता कारण मराठा शब्दात जी वीरता जाणवते ती दुसऱ्या शब्दात जाणवत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लोक मराठा या शब्दाच्या छत्राखाली एकजुट येऊन समाजातील जातीयवाद नष्ट व्हायला मदत झाली असती
जातीयवाद मराठा शब्दाशी किंवा इतर कोणत्या गोष्टीशी संबंधित नाही आहे. तो मानवी प्रवृत्तीशी संबंधित आहे. राहता राहिला प्रश्न मराठा होण्याचा. तर मग कोणत्याही सरकारच्या एखाद्या सर्टिफिकेटचा मराठा होण्याऐवजी शिवछत्रपतींच्या विचारांचा मराठा होणं हे आज मराठा आणि बिगर-मराठा दोघांसाठीही आणि महाराष्ट्रासाठीही कधीही जास्त हिताचे व भाग्याचे होऊ शकेल.
सर खूप छान आवडलं विषय धन्यवाद आणखी विडिवो बनवा सर
आपले मन:पुर्वक आभार
Mast explain kele
आपले मन:पुर्वक आभार साहेब!
सावंत या आडनावाची उत्पती कशी झाली यावर ही व्हिडिओ बनवा
ठीक आहे साहेब. 🙏
मला एक प्रश्न होता देवीगिरी किल्या मध्ये एक मिनार आहे मोठी ती कोणी बांधली आहे ते सांगा 🙏🙏🙏🙏
सन १४४५ - अलाउद्दीन बहामनी
महंमद तुघक
सर .. आपण सांगत आहात 2000 वर्षा पुर्वी विविध लोक महाराष्ट्र क्षेत्रात आले मग त्या पुर्वी कोणते लोक या महाराष्ट्र भोगोलिक क्षेत्रामध्ये रहिवासी असू शकतात. सविस्तर सांगावें सर
हो! या विषयावर महाराष्ट्रात कोण कधी कुठे राहत होते हा व्हिडिओ लवकरच बनवत आहे.
खूप सारे लोक हे पूर्वी नोमॅड म्हणजेच भटके होते. ती त्यांची जीवनशैली होती मजबुरी नाही. महाराष्ट्र मध्ये जे शासक /सामंत होते ते शक म्हणजेच सिथियन (scythian) होते. कुल्याही लेखी पुरावे नसलेला इतिहास मग संस्कृती, जीवनशैली , समाजजीवन या मध्ये शोधावा लागतो. जर शक लोक बद्दल बोलायचे म्हणाले तर हे अर्थातच स्वतः इतिहास लिहीत नसतं. यांचा इतिहास कोणी तरी दुसऱ्याने सांगितलेला किंवा मग समाजशात्र, नाणेशास्त्र आणि इतर इतिहास साधन वापरून शोधला जातो. मराठा हे मिश्रवंशीय हे सत्यच आहे कारण संपूर्ण भारत हाच मुळात मिश्रवंशीय आहे. पण इतिहासकार जेव्हा मूळ सांगत असतात ते जास्तीत जास्त कोणाच्या जवळ आहे याच शोध घेतात. सर्व भारत विक्रम सवन्त वापरात असताना दक्खन मात्र शक सवन्त वापरात. शक सवंत चा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी शक राजा चेस्टना यांचा राज्याभिषेक झाला होता त्याचमुळे शक सवंत सुरु आहे आणि आपण आजही वापरतो. शक सवंत सातवाहन यांनी सुरु केला हे मुळातच ऐतिहासिक नाही. डी . सी. सरकार याला "historical inaccurate notion " म्हणतात . जवळपास सर्व महाराष्ट्रा , माळवा, गुजरात, आणि कर्नाटक च काही भाग हा या शक अधिपत्य्या खाली होता. गुप्त राजा चंद्रगुप्त ।। ने हे राज्य संपवलं. (इ. स. ४१५ ) पण नंतर यातील कोणिही परत गेला नाही ते इथेच राहिले आणि येणारया राजवटी मध्ये सामंत वैगेरे पदव्या धारण करत राहिले आणि इथल्या संस्कृतीचा भाग बनले. या वरून आपण समजून घेऊ शकता मराठे कोण आहेत. राहिला तुमचा प्रश्न च उत्तर ते कोठून आले ? ते आले यूरेशिया च्या गवताळ प्रदेशातून. आजचा कझाकिस्तान , सर्बिया , उरल पर्वत रांगा , आणि काहीसा ukrain . आपल्या आजच्या माइंडसेट ला न पटणार आहे पण हा इतिहास आहे. पण लक्ष्यात घ्या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रपती हीच पदवी का घेतली असेल राज्याभिषक करते वेळी. येथील सर्व सामंताना क्षत्रप म्हणले जायचे. या सर्वांचा राजा म्हणजे क्षत्रपती.
काही प्रश्न असतील तर जरूर कळवा. धन्यावाद :) @kimantulive Sir काही आक्षेप असेल तर जरूर कळवा
खूप छान दादा.
आपल्या भेटीचा मानस आहे.
आणि मराठा म्हणजे या श्लोकात आहे.
दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
आपत्तीतही पाय मागे फिरेना |
महा संगरी धैर्य ज्याचे गळेना ||
मिळवितो रणी म्लेंच्छ सेना धुळीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
वाह! मराठ्यांची महती वर्णन करण्यासाठी लिहला गेलेला एवढा सुंदर श्लोक दुसरा कोणता याआधी वाचण्यात आला नव्हता. आजची संध्याकाळ आणि दोन्ही मन प्रसन्न केले साहेब तुम्ही. जगदंब!
भेटायचं म्हणाल तर कधीही येऊ शकता तुम्ही. मनाचे आणि घराचे दोन्ही दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडेच आहेत.
🙏🙏
Sir tumhala ek prashn vicharayacha ahe khup mahatwacha ahe .
BHOSALE kul he ( BHOYSALA ) hya kula pasun aal asav ani ( BHOYSALA ) he dakshinetal ( KOYSALA ) pasun aal asav .
Hyavar kay watate.
Mala ti bhosale he mewad che ahe hya baaddal thodi shanka watate .
Karan jar aapan shivaji maharaj sambhaji Maharaj hyanchya kapalavar jar pahil tar te aadave chandanache teen patte lavayache , je jast larun karnatak madhe pahile jate .
lamb bhagawa tila nahi lavayache
शिवछत्रपतींनी स्वत:च त्यांचा घराण्याचा मूळ पुरुष मेवाडच्या शिसोदिया वंशातील होता हे पुरावे दिले आहेत. आणि गागाभट्ट व इतर तत्कालीन विद्वानांनी पण ते मान्य केले आहेत. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासारखं काही शिल्ल्कच राहिलं नाही आहे साहेब.
@@KimantuLive
Ok thanks 🙏🙏🙏👍
आपण योग्य माहिती सांगितली आहे. माहिती मनोरंजक नसून ज्ञानवर्धक आहे. वस्तुस्थिती आणि सत्य मांडणारी आहे.
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार.🙏
फार छान माहिती सान्गितली.
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
Jai ho
माराठा समुहवाचक शब्द आहेजात नाही तुमची तुमच उदात्तीकरण करुन घ्यालात
पहिला मुद्दा. साहेब! कोणाला आवडो ना आवडो आज मराठा ही कागदपत्रांवर वापरली जाणारी शासनमान्य जात आहे. आणि लोकमान्य पण जात आहे. मराठा ही जात आहे की नाही या विषयावर आता चर्चा करण्यासारखं काही शिल्ल्क राहिलेलं नाही आहे. मराठा हा समुहवाचक, जातवाचक आणि स्थलवाचक शब्द आहे.
दुसरा मुद्दा. मराठा जातीततल्या कोणाला आता स्वत:ला सिद्ध करायला उदात्तीकरण करून घ्यायची गरज नाही. कारण औरंगजेबाला याच मातीत गाडण्याचं उद्दात्त कार्याचं श्रेय याच मराठा जातीच्या नावावर आहे. अर्थातच महाराष्ट्रातील सर्वच जातीतील सर्वच जण २७ वर्षे महाराष्ट्रात मुघलांशी लढत होते, सर्वांनीच आप-आपल्या परीने आप-आपलं शक्य ते योगदान दिले आहे. पण या लढ्यात मराठ्यांचाच हिस्सा फार मोठा होता हे कोणी इतिहासकार पण नाकारू शकणार नाही. मराठा जातीच्या प्रखर प्रतिरोधाविना महाराष्ट्र मुघलांना हरवू शकला नसता हे एक ऐतिहासिक सत्य आहे.
तिसरा मुद्दा. आता कोणाला मराठा जातीविषयी फारच असुया वाटत असेल आणि मराठ्यांच्या या उद्दात्त लढ्याचं श्रेय मराठ्यांना द्यायचं नसेल, मराठ्यांच्या या सम या पराक्रमाला कोणी मराठा जातीचं उदात्तीकरण मानत असेल, तर मग तो वेगळा भाग आहे. त्या विषयी न बोलेल तर चांगलं आहे. कारण तो इतिहासाचा भाग नाही. असुयेचा भाग आहे.
उत्कृष्ठ माहिती
Thank You Very Much.
Very good information thanks 🙏
So nice of you. Thank you very much.
देवगिरीचे सीवना यादव द्रविड(कानडी) होते.
महाराष्ट्रा वर 1000 वर्षे कानडी लोकांचे राज्य होते.
चालूक्य, राष्ट्रकूट, वेस्टर्न चालूक्य हे कानडी राजे होते.
देवगिरीचे सीवना यादव हे चालुक्यां चे सुभेदार होते.
नंतर ते स्वतंत्र झाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले मराठी राजे होते.
शिवाजी महाराजां पूर्वी 350 वर्षे महाराष्ट्रावर खिलजी, तूगलक, बहमनी सल्तनत,आदिलशाह, निजामशाह यांचे राज्य होते.
इस 1300 ते 1947 पर्यंत मराठवाड्या वर मुस्लिम शासकांचे राज्य होते.
आम्ही 96k Maratha ahot yadav
Yaduvanshi yadav ki upadhi ahir hai
Okay
This man is a true historian and researcher has detail knowledge of ancient and medieval history
Thank You.
Shivaji Maharaj che Mavale mhanje Maratha mag to kuthalahi samaj asu de.